🌹!! लैलतुल कद्र :- हजार महीण्यांच्या रात्रींची फक्त एकच रात्रं !! 🌹
# हजरत ईबने अब्बास म्हणतात , प्रेषित मुहम्मद सल्ल. सांगितले ," लैलातुल कद्र ची रात्र रमजान महीन्याच्या अंतिम चरणात येते ,अंतिम दहाची ,नऊ ,सात किंवा पाच रात्री राहिल्या तर या रात्री येतात.(सहीह बुखारी २०२२).
हज.आयेशा रजि. प्रेषित मुहम्मद स्व.च्या पत्नी , सांगितले की," रमजानच्या अंतिम दहा रात्री जेंव्हा येत असत , त्यावेळेस आम्हाला प्रेषित स्व. स्वतः ड्रेस परिधान करून, बरोबर घरातील सर्व मंडळींना तीलावत , प्रार्थना करण्यासाठी संपूर्ण रात्रभर जागवीत असत." ( सहीह बुखारी २०२४).,
रमजान महिन्यातील पुष्कळ अद्भूत घटना घडलेल्या आहेत, पुराणां , इस्लामी इतिहासामधे बर्याच नोंदी आढळतात .
रमजान मुबारक मधील २१ ,२३ ,२५ ,२७ , २९ ,३० ची "लैलतुल जायजा " या पवित्र कद्र च्या रात्री येतात . यांचं महत्त्व शब्दातीत आहेत , ते व्यक्त करता येत नाहीत.
## या प्रत्येक कद्र च्या रात्र रोजच्या दैनंदिन रात्री (पेक्षा १०००) एक हजार महीण्यांपेक्षा ही अधिक महिन्यांच्या रात्रीपेक्षा जास्त सबाब ( पुण्यं) असते .
फक्त याच रात्रींना " लैलातुल -कद्र '" च्या पवित्र रात्रीं संबोधतात .
दिव्य कुरआन म्हणते की, " आम्ही या रात्र मध्ये दिव्य कुराण ग्रंथ पृथ्वीवर तुमच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत केला आहे ," "' आणि तुम्हाला काय माहीत की ही रात्र काय असते ", " तुम्हाला कधी या रात्रीचे महत्त्व जाणाले.", "तर तुम्ही स्तब्द व्हाल ,व तुम्हाला भान राहणार नाही ," (सुरह नं.९७ आ.नं.१-ते - ५)
या कद्र च्या रात्रींच महत्त्व आहे .
अशाच प्रकारे संपूर्ण वर्षभर ,,(१) ईदु आजहा( बकरी ईद) रात्र(२) ईदु ल फितत्र ( रमजान ईद) रात्र ,.(३)मोहरमची आशुरा १० वी रात्रीं चे महत्वही काही औरच सांगितले आहे.
# यांमध्ये कोणती रात्र महत्त्वाची आहे , हे तज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत . कारण अल्लाह (ईश्वरा)ने या दिव्य कद्र च्या रात्रींचं गुपित ठेवलं .
कुरआन म्हणते की ," जे समोर आहे आणि जे काही गुपित आहे या सर्वांचे ज्ञान फक्त(ईश्वर),अल्लाहाकडेच आहेत , व आपल्या ज्ञानाच्या मर्यादा ,फक्त तो पर्यंत मर्यादित आहे , जे (ईश्वराने) अल्लाहाने माणसाला प्रदान केलेले आहेत किंवा देवु इच्छितो , या रात्रीचे ज्ञान फक्त आल्लाहाने (ईश्वराने )आपल्या जवळ ठेवले आहेत ".
मानवाला , दुआ ,नमाज , कुराण पढण करून ,नामस्मरण करून, दया ,याचना करून . कद्र ची रात्र तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे शोधण्याचा प्रयत्न करा.
(# @ काही तज्ञांनी ,एक हजार (१०००) महीन्यांच्या दिवसानुसार फक्त एका रात्रीत ,# किती -सेकंद ,#किती - मिनिटे, # किती -तास , # किती -दिवस, # किती- वर्षांची ईबादत ,बंदगी,होते त्यांची गोळा बेरीज केली .# एक १ सेकंद = २३ तास ईबादत , # १ एक मिनिट = ५८ दिवसांची ईबादत , # एक तास = ९ -८ वर्षे ईबादत ,# शेवटी एक रात्र = ८३ वर्षे (त्रेयांशी वर्षे) इयर्स , ईबादत ,बंदगी ( पुजा ) होते ..एवढी मोठी महत्वाची लैलतुल -कद्र च्या फक्त एका रात्रींचं ##).
# प्रेषित मुहम्मद स्व. सांगितले की, '' लैलतुल-कद्र 'च्या रात्री आल्लाह शेवटच्या सातव्या आकाशावर येऊन पृथ्वी तलावरील प्राणीमात्रांना व माणसांना आव्हान करतात की ,,
"" कोण आहे जे माझ्याकडे दयेची याचना करतोय की मी त्याला दया ,देईल , दाखवील '"
" कोण आहे , जो करूणेची भिख मागेल ,मी त्याला करूणेची भिक देईल ",
" कोण आहे ,जो आपल्या केलेल्या लहान-मोठ्या पापांची क्षमा याचना मागतोय , की मी त्याला क्षमा देईल " ,
" कोण आहे ,जो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून माझ्याकडे मागणं मागतो मी , त्या सर्व मनोकामना पूर्ण करील ". " सर्वांना मनोभावे माफी देईल."...
# पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व म्हणतात की," या लैलतुल-कद्र च्या रात्री आल्लाहा दोन्ही हात मोकळे करून मानव जातीस अव्हान करतात की , " कोण आहेत जो एक आशा आल्लाहाला कर्ज दिईल की ,जो दरिद्री नाही व अत्याचारी तर नाहींच ,''
आल्लाहाचे ( ईश्वरा)हे सकाळी भोर पहाटेपर्यंत आव्हान हे , क्षमा, दया, करुणा,बक्षिसे, देण्याचे काम चालूच असते,
पण आपणाला त्या आव्हानांची फिकीर नसते ,आपण मस्तावलेले ,सुस्तावलेले झालेलो असतो , विचार करण्याची मानसिकताच नसते ,
# आल्लाहाला काय गरज कर्जाची. जशी आपली आई जेव्हा आपल्याकडून काही अपेक्षा करते व आपल्याला याचना करते की मला काहीतरी दे अगदी त्याचप्रमाणे आल्लाहा ही आपल्याला आपल्या आईप्रमाणे जाणून-बुजून आपल्याला कर्ज मागतात ( गरीब ,अनाथ ,विधवा , भुकेल्या यासाठी) आपली परीक्षा घेत असतात .त्यांना काय घेणं परंतु आल्लाह कृपावंत ,दया , देणारे . कायम आपल्याला काहीतरी देतच असतात , आपल्या इच्छांची पूर्तता करत असतात.
संपूर्ण मानवजातीने , प्राणिमात्र व जीवजंतू हे अल्लाहाचे ,त्यानेच निर्माण केलेले .सर्व जगात जगाने कितीही मागितले तरी , अथांग महासागरात समजा ऐक सुईच्या टोकाला जेवढे थैंब येतील तेवढे व कणभरही कमी होणार नाहीत येवढी लिला एकठ्या अल्लाहा ( ईश्वराची )आहेत.
कृपावंत ,दयावंत सृष्टीचा स्वामी देणाराआहेत .
परमेश्वर आपल्याला जेवढे योग्य व कुवती, सहनशक्ती प्रमाणेच देतात .
अल्लाह परमदयाळू ,कृपावंत आहे ,ते अत्याचारी तर ते नाहीत .
# हजरत आयेशा रजि.म्हणतात की ," आपण केलेल्या सर्वप्रथम पापाची क्षमा मागा कारण आपल्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत ".
आज संधी आहे , सेकंदा - ला २३ तास , मिनिटाला ५८ दिवस ,व १ तासाला ९ वर्षे , विचार करा किती ईबादत बंदगी करुन फायदा उचलण्याचा ,, अजुनही वेळ गेलेली नाही...उचला फायदा......
लेखक डॉ सलीम सिकंदर शेख