Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी): आज दि. 17/03/2022 रोजी Dysp संदिप मिटके   श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक) हा हायप्रोफाइल  महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके  यांनी PI सानप श्रीरामपूर शहर , व अंमलदार यांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक)व विश्वास रामप्रसाद खाडे वय 26 रा कांदा मार्केट,शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर्  यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके ,PI सानप, Api  विठ्ठल पाटील,PN करमल पो कॉ नितीन शिरसाठ,  पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार  म पो कॉ सरग, गलांडे आदींनी केली.

बेलापुर (प्रतिनिधी  )- प्रदेश तेली महासंघाच्या अध्यक्षपदी बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांची बिनविरोध निवड करण्यात आली  आहे तेली महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष           भागवतराव लुटे यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाध्यक्ष निवडीबाबत बैठक बोलविण्यात आली होती या वेळी महासंघाचे मार्गदर्शक. विठ्ठलदास लुटे उपस्थित होते बैठकीत  जिल्ह्यातील सामाजिक विषय व संघटनेच्या पुढिल वाटचाली विषयी सकारात्मक चर्चा झाली,तसेच जुनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन नुतन  कार्यकारिणी बनविण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ मार्गदर्शक  जयदत्तजी क्षिरसागर व प्रदेशाध्यक्ष श्री. विजयभाऊ चौधरी यांच्या संमतीने सर्वाधिकार नागले यांना देण्यात आले.

      या वेळी नुतन जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांना निवडीचे नियुक्ती पत्र श्री. भागवतराव लुटे यांच्या हस्ते देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संघटनेचे प्रदेश सेक्रेटरी मा. श्री. विजयजी काळे,विभागिय अध्यक्ष मा. श्री. अरविंद शेठ {कारभारी}दारुणकर, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथशेठ देवकर,  प्रभाकरराव लुटे. राजेंद्रभाऊ म्हस्के,. कैलासजी बनसोडे,. अनिलशेठ जाधव, देविदास कहाणे  दिपक नागले संतोष मेहेत्रे बाळकृष्ण दारुणकर नितीन फल्ले अँड विजय साळूंके रामेश्वर नागले संदीप सोनवणे योगेश शिंदे सागर ढवळे प्रविण नागले शुभम नागले आदि मान्यवर उपस्थित होते शेवटी प्रभाकर लुटे यांनी आभार मानले

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरात काल पोलीस उमहानिरीक्षक पथकाने जुगार खेळणार्‍या क्लबवर छापा टाकून पोलिसांनी 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात 20 जणांना ताब्यात घेण्यात आले होते तर एक जण पसार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरात जुगार, मटका, तसेच अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आहे तसेच पोलीस उपविभागाीय कार्यालय असतानाही शहर पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष असल्याचे यावरून स्पष्ट होते. पोलीस उमहानिरीक्षक पथकाने दोन तीन ठिकाणी छापे टाकले. यात तिरट नावाचा पत्याचा जुगार पैसे लावून खेळत असताना पकडले. यात दिनेश मोहनदास माखिजा, चंद्रकांत गोपीनाथ गुडधे, नसीम मुख्तार शेख, अमरजितसिंग, जावेद खलिद मलिक, रोहिदास अडागळे, सुखदेव गांगुडेर्र्, जाफर करीम शेख, जुनेद असलम मेमन, सलमान हसन कुरेशी, समीर शेळके,जैनुद्दीन याकूब शेख, तुषार नाणेकर, राजेश गोसावी,अजमल नासिर शेख, सर्फराज बाबा शेख, अकील शेख, अमजद पठाण यासह अन्य 21 जण तिरट नावाचा जुगार खेळत असताना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 45780 रुपये रोख रक्कम, 63 हजारांचे 15 मोबाईल, 1 लाख 55 हजारांच्या पाच मोटारसायकल असा एकूण 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सुरेश मराठे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 160/2022 प्रमाणे मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )- एकीकडे दिवाळीपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी स्टँड ओस पडलेले असताना दुसरीकडे या एसटी स्टँडवर खाजगी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळ्या गाड्या बिनदिक्कतपणे आत मध्ये उभ्या राहत असून तेथेच प्रवासी सुद्धा भरले जात आहेत. विशेष म्हणजे एस टी डेपो सध्या सुरू आहे . सर्व अधिकारी कामावर हजर आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यासमोर या काळया पिवळ्या गाड्यांचे अतिक्रमण बसस्थानकामध्ये झालेले आहे. त्यामुळे एस टी महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने काळया पिवळ्या गाड्यांनी श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याचे चित्र सध्या रोज पाहायला मिळत आहे.

गेले अनेक महिने एस टी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण राज्यात सुरू आहे.श्रीरामपूर डेपो मध्ये काही कर्मचारी हजर झालेले असल्याने नगर,पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी ठिकाणच्या बसगाड्या सुरू आहेत. मात्र बहुतांश वेळ बसस्थानकामध्ये शुकशुकाट असतो. याचाच फायदा घेत काळ्या पिवळ्या गाड्या चालवणाऱ्या चालकांनी बसस्थानकाचा ताबा घेतला आहे. नगर, संगमनेर,नेवासा या मार्गावर श्रीरामपूरातून काळया पिवळ्या गाड्या चालू असल्याने जनतेची बऱ्यापैकी प्रवासाची सोय झालेली आहे हे निर्विवाद. पूर्वी या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून भरल्या जात होत्या. मात्र त्या बंद असल्यामुळे रिकाम्या बसस्थानकाचा सदुपयोग म्हणून कि काय या सर्व काळात या खाजगी गाड्या बसस्थानकामध्ये एका रांगेत उभ्या केल्या जातात आणि तेथूनच भरल्या देखील जातात. त्यामुळे श्रीरामपूरचे बसस्थानक एस टी महामंडळाने काळ्या पिवळ्या गाड्याची वाहतूक करणाऱ्या लोकांना कराराने दिले आहे कि काय ? असा प्रश्न सध्या श्रीरामपूरकरांना पडला आहे.

नजिकच्या काळामध्ये एस टी बसेस सुरू होण्याची शक्यता नाही . त्यामुळे जनतेची गैरसोय दूर होण्यासाठी या काळया पिवळ्या गाड्यांचा निश्चितपणे मोठा हातभार लागला आहे . प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम मोडून या गाड्यांमधून प्रवासी भरले जातात . त्याबद्दल ही नागरिकांची तक्रार नाही . कारण गरजू लोकांना प्रवास करणे क्रमप्राप्त असल्याने ते या गाड्यांमधील सर्व प्रकारच्या गैरसोयी सहन करत आपला प्रवास करीत असतात . नगर लाईनवर चालणारे गाड्यांचे चालक हे किमान सौजन्याने तरी वागतात . मात्र संगमनेर लाईन वर चालणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत . त्यात ही आता या गाड्यांनी राजरोसपणे श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याने व तेथूनच या गाड्यांची वाहतूक होत असल्याने भविष्यामध्ये काळा पिवळ्या गाड्यांसाठी श्रीरामपूरचे बसस्थानक हे माहेर घर बनण्याची शक्यता आहे . एस टी च्या स्थानिक अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या गाड्या एसटी स्टँड मध्ये लावल्या जातात .ज्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या गाड्या बस स्थानकात लावण्यात येत आहेत त्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात यावा अशी मागणी शहरवासीयांनी एस टी महामंडळाच्या जिल्हा नियंत्रक यांच्याकडे केली आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी-शासनाने पंधरा वर्षानंतर सर्व प्रकारची वाहने  बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र त्यामुळे अनेक वाहने बिनधास्तपणे व परिवहन अधिकाऱ्यांची परवानगी नसतानाही स्क्रॅप केली जात आहेत. त्यामध्ये कागदपत्रे असणारी व कागदपत्रे नसणारी अशी अनेक वाहने स्क्रॅप केली जात असून त्यामध्ये चोरी केलेल्या वाहनांचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या स्क्रप होणाऱ्या वाहनांवर नियंत्रण यावे व त्यासाठी शासनाने स्वतंत्र पथक किंवा पोलीस नियंत्रणासाठी नियुक्त करावेत. व विनापरवाना स्क्राप करणाऱ्या स्क्रॅप धारकांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी आता होत आहे.केंद्र शासनाने 15 वर्षा

नंतर सर्व प्रकारची वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा वर्षे झाल्यानंतर अनेक वाहने स्क्रप करण्यात येत आहेत. मात्र या स्क्रॅप होणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. यासंदर्भात उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्क्रॅप होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परिवहन विभागातून परवानगी घ्यावी लागते .तरच अशी वाहने स्क्रॅप करता येतात. मात्र श्रीरामपूर शहराप्रमाणेच इतर ठिकाणीही दररोज अनेक वाहने स्क्रॅप केली जात आहेत. मग ती वाहने खरंच पंधरा वर्षे झालेली आहेत की चोरीचे आहेत. याचाही तपास लागत नाही .श्रीरामपूर शहरात तर अनेक तरुणांनी असे व्यवसाय टाकले आहेत व ते गब्बर होत चालले आहेत. मात्र यातून खरंच कायदेशीर हा व्यवसाय होत आहेत का? हा खरा प्रश्न आहे. जर विभागीय परिवहन अधिकाऱ्याची परवानगी नसतानाही वाहने स्क्रॅप केली. तर अशा वाहनधारकांवर, गॅरेज मालकांवर , व स्क्रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. जेणेकरून बेकायदेशीरपणे वाहने स्क्रॅप करणाऱ्या टोळीवर नियंत्रण येईल .अनेक तरुण त्यामुळे विविध ठिकाणाहून वाहनांच्या चोरी करतात व ही वाहने स्क्रॅप केली जातात . श्रीरामपूर शहरांमध्ये दोन रुपये किलोने  वाहने स्क्रॅप करून दिली जातात. त्यामुळे वाहने चोरीला ही आणखी पाठबळ मिळत आहेत. शिवाय अशी वाहने विविध ठिकाणी स्क्रप केली जात असल्यामुळे या स्क्रॅप वाहनांच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेल्या सुट्ट्या भागामुळे इतर नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होतो. अनेक जण त्यामुळे जखमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतेही वाहन स्क्रप होताना विभागीय परिवहन कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची त्यास परवानगी हवी .जर‌ ती नसल्यास किंवा कोणतीही वाहन स्क्रॅप विनापरवाना होत असेल तर अशा वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर  त्वरित कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरू लागली असून यासाठी परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा व शासनाने याकडे अधिकाधिक लक्ष देऊन या विनापरवाना स्क्रॅप होणार्‍या वाहनांवर नियंत्रण यावे म्हणून स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांडुन बोलले जात आहे.



श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-युक्रेन रुस युध्दाच्या नावाखाली अनेक ठिकाणी जिवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकत असल्याच्या तक्रारी असुन या बाबत व्यापारी पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल तसेच गँस वितरक व महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेवुन समस्या सोडविण्यात येतील असे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात ग्राहक दिन संपन्न झाला .त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक मंचचे विभागीय अध्यक्ष रणजीत श्रीगोड हे होते प्रास्ताविक भाषणात ग्राहक मंचचे अध्यक्ष प्रा .गोरख बारहाते म्हणाले की अनेक व्यापारी चढ्या भावाने जिवनावश्यक वस्तूंची विक्री करत आहे खाद्य तेलाच्या किमती वाढलेल्या आहे ही बाब गांभिऱ्याने घेणे आवश्यक आहे युध्दाच्या नावाखाली ग्राहकांची लुट केली जात आहे .महावितरण कडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे या करीता महावितरण अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात यावी ,असेही ते म्हणाले अध्यक्षपदावरुन बोलताना रणजीत श्रीगोड म्हणाले की आज आहार

कोणता घ्यावा तेच समजत नाही सर्व जिवनावश्यक वस्तूत भेसळ होत आहे झटपट पैसे मिळविण्याच्या नादात नागरीकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे देश भेसळमूक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजे .फसव्या जाहीरातीमुळे अनेकांची फसवणूक होते त्यांच्यावरही कारवाई झाली पाहीजे तसेच बदलत्या काळानुरुप व परिस्थिती नुसार कायद्यातही बदल झाला पाहीजे असेही श्रीगोड म्हणाले या वेळी लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष  भागचंद नवगीरे यांनी गँस धारकाकडून जादा रक्कम घेतली जात असल्याची तक्रार केली तसेच ग्राहक दिनात आलेल्या समस्येवर निराकरण करुन ते ईतिवृत्त पुढील ग्राहक दिनात वाचले गेले पाहीजे अशी सूचना नवगीरे यांनी मांडली या वेळी दक्षता समीतीच्या सदस्या सौ आशा परदेशी यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी अनिता आहेर अमित चंदन रितेश ऐडके कमलकिशोर मुंदडा  संतोष परदेशी धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले शहराध्यक्ष गोपीनाथ शिंदे अव्वल कारकुन चारुशिला मगरे मँडम वंदना नेटके मँडम पुरवठा निरीक्षक पुजारी दक्षता कमीटी सदस्य चंद्रकांत झुरंगे भाऊसाहेब वाघमारे अरुण खंडागळे संतोष परदेशी सुभाष चोरडीया एकनाथ थोरात नाना मोरे योगेश नागले सुदर्शन पवार मुरलीधर वधवाणी राजेंद्र वधवाणी चंद्रकांत गायकवाड सुनिल पारखे अतुल झिरंगे राजेंद्र वाघ सुधीर गवारे सचिन मानधने सुभाष साळूंके नरेंद्र खरात सोमनाथ देवकर रणजीत जामकर मयुर मुखेडकर आनंद परदेशी राहुल लिहीणार आदिसह मान्यवर उपस्थित होते शेवटी देविदास देसाई यांनी आभार मानले तर रज्जाक पठाण यांनी सूत्रसंचलन केले

श्रीरामपूर-चित्रकार भरतकुमार उदावंत व चित्रकार रवी भागवत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रंगलहरी कलादालनाच्या दशकपूर्तीनिमित्त कला रसिकांना विविध १० माध्यमतील सुमारे १०० चित्रांची मेजवानी मिळणार आहे. येथील रंगलहरी कलादालनात (रविवार) दि. १३ मार्च रोजी सायं ४ वाजेपासूनपासून हे चित्रांचे प्रदर्शन सर्वांसाठी पूर्णपणे मोफत खुले केले जाणार आहे.

चित्रकार  उदावंत व भागवत यांनी २०१२ मध्ये रंगलहरी आर्ट ॲकॅडमीची स्थापना करून रंगलहरी कलादालनाची निर्मिती केली. या अंतर्गत गेल्या दहा वर्षांत कला रसिकांची कलाभिरूची वाढविण्यासठी या गुरू-शिष्य जोडीने शेकडो उपक्रम घेतले. यामध्ये नामांकित चित्रकार, शिल्पकार यांना निमंत्रित करून चित्रकलेची प्रात्यक्षिके, चित्रांची तसेच व्यंगचित्रांची प्रदर्शने, समाजातील दुर्बल घटकांसाठी मोफत


हस्तकला प्रात्यक्षिके, मुलांना लहानपणापासूनच कलेची आवड वाढावी यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मोफत चित्रकला तसेच व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके, पर्यावरण पूरक गणेश मुर्तींची प्रात्यक्षिके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनाचे चित्रण घडविणारे रेखा चित्र प्रदर्शन, सुलेखन प्रात्यक्षिके तसेच प्रदर्शन यांचा समावेश आहे. यासोबतच कोरोना काळातील घरात बसून नैराश्येच्या गर्केत गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये केलची रूची वाढावी यासाठी दोन वर्षांमध्ये अनेकदा ऑनलाईन पद्धतीने मोफत चित्रकला शिबिरे घेतली. या शिबिरात अमेरिका, जॉर्जिया, ऑसट्रिया, दुबई, कॅनडा या देशांसह भारतातील सर्वच कानेकोपऱ्यातील विद्यार्थी रंगलहरीशी जोडले गेले. पालकांचा चित्रकलेप्रती दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी अनेक मान्यवरांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित केली. या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. याव्यतिरिक्त सामाजिक भान जपत भागवत व उदावंत यांनी आतापर्यंत अनेक गरजू रूग्णांसाठी रस्त्यावर उतरून कला रसिकांची चित्रे, व्यंगचित्रे त्यांच्यासमोर साकारून २ लाखाहून अधिक रूपयांचा मदत निधी उभारला.

अशी वाटचाल करीत रंगलहीरने दशकपूर्ती केली असून त्यानिमित्ताने आता सर्वांसाठी मोफत चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. यावेळी कला रसिकांना चित्रकार उदावंत व भागवत यांची साकारलेली व्यक्तीचित्र, निसर्गचित्र, कार्टून्स, प्राण्यांची चित्रे, धार्मिक चित्रे, ऐतिहासिक चित्रांसोबतच रंगलहरीच्या निवडक विद्यार्थ्यांची चित्रेही पहावयास मिळतील, रंगलहरी, साई सुपर मार्केट, मेनरोड या ठिकाणी प्रदर्शनाचा जास्तीत मोठ्या संखेने आनंद लुटावा, असे आवाहन चित्रकार भागवत व उदावंत यंनी केले आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget