Latest Post

बेलापूर(प्रतिनिधी)ःसत्ताधा-यांंनी  सोसायटीच्या जुन्या सुंदर व मजबुत अशा इमारतीची दुर्दशा करुन दुरुस्तीच्या नावाखाली पक्के मजबुत बांधकाम तोडण्याचे महापाप केले असुन त्यामुळे ए डी सी सी बँक व पतंजली केंद्राचे नुकसान  झाल्याचा आरोप गावकरी  मंडळाचे ज्येष्ठ नेते जालिंदर कु-हे यांनी केला आहे .    गांवकरी मंडळाचे जेष्ठ नेते जालींदर कुऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की  अशी चुकीची कामे करुन संस्थेचे नुकसान करणारांना आता घरीच बसवायची वेळ आली आहे .  बेलापूर सोसायटीची दुमजली इमारत ही संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात सन १९७१ मध्ये उभी राहीलेली  आहे  .ज्यांना बोगस कामे करुन पैसे उकळायची सवय आहे अशा लोकांनी  जनरल मिटींगची परवानगी न घेता  सभासदांना पूर्व कल्पना न देता स्ट्राँगरुमच्या नावाखाली इमारतीला मागच्या बाजूला भगदाड पाडले.भिंत एवढी मजबूत होती की ती तोडायला व्हायब्रेटरचा वापर करावा लागला .सदरचे भगदाड पाडून शेजारी सावञ ईमारत बांधण्यात आली.त्यावर लाखो रुपये खर्च केले गेले.   स्ट्राँगरुमची सावञ इमारत झाली आणि मूळच्या चांगल्या भक्कम इमारतीत गळती सुरु झाली.या गळतीमुळे बँकेच्या साहित्याचे नुकसान झाले.तसेच तळमजल्यावरील पतंजली औषधालयाचेही लाखो रुपयांच्या औषधांचे नुकसान झाले.सदरचे लिकेज काढण्यासाठी टेंडर काढण्यात आले.वास्तविक दोन इमारतीतील फट बुजविणे एवढेच काम करणे आवश्यक होते.त्याऐवजी संपूर्ण छतच खोलले आणि ओबडधोबड डागडुजी केली गेली.यात संशयास्पद व्यवहार झाल्याची शंका आहे.स्ट्राँगरुम ही संस्थेच्या मुळ इमारतीसाठी राँगरुम ठरल्याची टिका श्री.कु-हे  यांनी केली आहे.अशी चुकीची कामे करुन त्यात गैरव्यवहार करणारांच्या हाती पुन्हा सत्ता द्यायची कां असा सवालही त्यांनी केला आहे.ज्यांनी अधिकार नसताना चुकीच्या पध्दतीने ग्रामपंचायत हाकली अधिकार नसताना सोसायटीत चुकीची कामे केली गुपचुप ठराव बदलले हे चुकीचे चालले हे माहीत असुनही काही सुज्ञ जण गप्प बसले मग आपला सुज्ञपणा हरवलेल्या स्वयंघोषीत नेत्याना आपण पुन्हा निवडून देवुन आपल्या कामधेनुचे नुकसान करणार का ?असा सवाल कुऱ्हे यांनी केला असुन आपल्या संस्थेला टोळधाडीपासून वाचविण्यासाठी आता गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या ग्रामपंचायत नतर सेवा संस्थेतही स्वच्छ व पारदर्शी कारभार करु अशी ग्वाही कुऱ्हे यांनी दिली आहे .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपाच्या घटीबाबत व नविन केबिन बांधकामाबाबत विरोधकांच्या तक्रारीवरुन सहाय्यक निबंधकांनी काढलेली नोटीस चौकशीअंती वि उ लकवाल सहाय्यक निबंधक यांनीच परत घेतली असुन आमचे कामकाज चोख असल्याचा दावा शेतकरी जनता विकास अघाडीचे नेते सुधीर नवले यांनी केला आहे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात शेतकरी जनता विकास अघाडीचा नेते सुधीर नवले पुढे म्हणाले की जि प सदस्य शरद नवले यांनी सन २०१८ साली बेलापुर सेवा सोसायटीच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या .पाच हजार लीटर पेट्रोल डिझेल घट दाखविण्यात आली तसेच पेट्रोल पंपाचे केबिन बांधकाम अंदाजपत्रकात साडेसात लाख रुपये असताना १५ लाख रुपये बेकायदेशीर खर्च केला असल्याची खोटी तक्रार केली त्या तक्रारीची दखल घेवुन सहाय्यक निबंधकानी नोटीस काढली होती त्या तक्रारी नुसार सहाय्यक निबंधक लकवाल यांनी पेट्रोलीयम कंपनीशी चौकशी करुन घटीबाबत पडताळणी केली असता बेलापुर सेवा संस्थेने कंपनीच्या नियमापेक्षाकमी घट दाखवीली असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सहाय्यक निबंधक लकवाल यांनी संदर्भ क्रमांक ३ नुसार काढलेली कारणे दाखवा नोटीस परत घेण्यात येत असल्याचा आदेश काढला विरोधक खोट्या नाट्या अफवा पसरवत आहेत परंतु गेल्या दहा वर्षात संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा झालेला आहे ७०लाख रुपये फंडात जमा आहे स्वभांडवल ५० लाख रुपये जमा आहेत आम्ही आजपर्यंत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा .नाईक जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा कारभार चोख सांभाळला आहे त्यामुळे विरोधकांचे पित्त खवळले असल्याचा आरोपही नवले यांनी केला असुन सभासद शेतकरी जनता विकास अघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वासही नवले यांनी व्यक्त केला आहे

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील नागेबाबा प्रतिष्ठाणचे आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांना मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार नुकताच माजी मंत्री खा. अरविंद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चारूशिला देशमुख होत्या. यावेळी सिने अभिनेत्री दिपाली सय्यद, कामगार नेते अभिजीत राणे, आदिनाथ थत्ते, डॉ. प्रविण निचत, मकरंद वांगणेकर, सिने अभिनेते प्रसाद तारकर, पत्रकार राजेश जाधव, गुरूदत्त वागदेकर, स्वागताध्यक्ष प्रकाश जाधव, संयोजक सुरज भोईर आदी उपस्थित होते.सुभाष गायकवाड वर्षांपासून नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमित्र म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी आतापर्यंत 800 रुग्णांना चार कोटीहून अधिक रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. शिवाय रुग्णांना मदत करण्यासाठी ते स्वतः पुणे, मुंबई, शिर्डी, कोपरगाव, अहमदनगर आदी ठिकाणी स्वतः रुग्णांसमवेत जातात. त्यांना सर्व प्रकारचे मदत मिळवून देतात. यापूर्वी त्यांना 221 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी  )- बेलापूर सोसायटीच्या पेट्रोल पंपाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाची  किंमत वाढविली म्हणून ज्यांनी तक्रारी केल्या प्रकरण गुन्हा दाखल करण्यापर्यन्त गेले.त्यांनीच निवडणुकीत सत्तेसाठी आपापसात गळाभेट करुन सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला निवडणूकीत सभासद हा डाव हाणून पाडतील असा विश्वास सोसायटीचे माजी संचालक भास्कर बंगाळ यांनी व्यक्त केला आहे. सेवा संस्थेचे जेष्ठ माजी संचालक भास्कर बंगाळ म्हणाले की,अरुण पां.नाईक हे चेअरमन असताना सोसायटीच्या पेट्रोलपंंपाच्या सरंक्षक भिंतीच्या बांधकामाचे  टेंडर काढण्यात आले होते.सदरचे काम पढेगाव येथील मर्जीतल्या ठेकेदाराला दिले होते.काम झाल्यावर टेंडरची रक्कम वाढवून बिल काढण्यात आले होते.सदर प्रकारास तत्कालिन सहा संचालकांना मान्य नसल्याने त्यांंनी यासंदर्भात तक्रार केली होती.अरुण पां .नाईक यांचेविरुध्द केसही चालली.पण नंंतर नेते माजी कै .माजी आ.जयंतराव ससाणे यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटवुन समेट घडविण्यात आली होती .तरीही  तक्रारदार संचालकांना तीन हजाराचा दंड करण्यात आला.होता .                यावरुन यांचा कारभार कसा होता? किती सावळा गोंधळ व अनागोंदी कारभार  होता याचे हे उत्तम उदाहरण आहे.ज्यांनी एकमेकांचे वाभाडे काढले,भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या तेच आता निवडणुकीत एकञ आले आहेत.यावरुन पेट्रोलपंपाच्या संरक्षक भिंत प्रकरणात 'अर्थ'पूर्ण तडजोडी होवूनच प्रकरण मिटविले गेले हेच सिध्द होते.अशा लोकांच्या हाती सोसायटीचा कारभार सोपवायचा कां याचा विचार सभासदांनी करावा असे अवाहन बंगाळ यांनी केले आहे. विद्यमान सत्ताधा-यांनी विरोधकांना सतत सूडबुध्दीने वागविले.त्यांना कधीही विश्वासात घेतले नाही.चेअरमन आणि त्यांचा रिमोट हाती असणारा नेता हेच कारभार हाकायचे.संचालक मंडळाला महत्वाच्या व आर्थिक बाबींपासून अंधारात ठेवले जायचे.मी व देवीदास खंडागळे यांना  आकसातून अपाञ ठरविले.कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा या हेतूने आम्ही थकबाकी भरली नाही.तर सत्ताधा-यांनी तक्रारी करुन आम्हाला थेट अपाञच ठरविले.आताही काही सभासदांना अक्रियाशिल ठरवून डच्चू देण्याचा डाव होता.पण आमच्या जागृततेमुळे तो डाव उधळला गेला आणि या सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली.सभासदांना अशा सूडबुध्दीने वागणाऱ्या सत्ताधा-यांना सभासद धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असेही बंगाळ म्हणाले.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) - येथील श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन अणि शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी राज भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. ईफरा सलीम शेख, बिलाल इकबाल काकर,श्रावणी नवनीत जोशी व वैष्णवी नवनीत जोशी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शिरीष लांडगे हे होते.

यावेळी कविवर्य सुभाष सोनवणे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कवी रज्जाक शेख यांनी प्रास्ताविक केले व आपल्या रचने ने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत व सत्कार स्वागताध्यक्ष इकबाल इस्माईल काकर (सर) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवनीत जोशी यांनी केले तर आभार श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सलीम शेख व डॉ.सौ.कौसर शेख यांनी मानले.


 याप्रसंगी प्रा.अजय घोगरे, इसाक शेख, कॅरियर कॉम्प्युटरचे रफिक शेख सर,जमील काकर,शाहीन शेख मॅडम,आरिफ जहागीरदार, ऑलविन नाॅर्टन, कवी आनंदा साळवे, शब्दगंधचे अध्यक्ष मीराबक्षभाई बागबान तथा इतरही मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ.सलीम शेख,शब्दगंधचे अध्यक्ष मीराबक्षभाई बागबान,  स्वागताध्यक्ष इकबाल काकर सर, डॉ.नवनीत जोशी,रज्जाक शेख सर,कवी आनंदा साळवे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बेलापूर (प्रतिनिधी )-.सोसायटीचा पेट्रोल पंप दुरुस्तीच्या नावाखाली वेळोवेळी बंद ठेवुन सेवा संस्थेचे नूकसान करणारांना आपण निवडून देणार आहात का ?असा सवाल संस्थेचे हितचिंतक सुधाकर खंडागळे यांनी केला असुन कोणतीही निवडणुक असो जिथे तिथे मीच हि मक्तेदारी नष्ट करण्यासाठी गांवकरी मंडळाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे अवाहन खंडागळे यांनी केले आहे                                           

प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सुधाकर खंडागळे यांनी पुढे म्हटले आहे की नेतेच कार्यकर्ते होत असतील तर कार्यकर्त्यांना न्याय केव्हा मिळेल ? एकीकडे नेता म्हणवायचे अन दुसरीकडे उमेदवारी लाटायची मग सर्व सामान्यांना संधी मिळणार तरी कधी .कार्यकर्त्यांना निवडणुकीपुरते वापरायचे आणि पदे माञ आपणच बळकवायची.  प्रत्येक संस्थेत तुम्हीच सत्तेत राहायचे तर सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त तुमचे ओझेच वाहायचे कां असा सवाल बेलापूर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे यांनी केला असून गावकरी मंडळाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे  सभासदांचे गांवकरी मंडळाला मिळणारे  पाठबळ पहाता सत्ताधाऱ्यांची हवाच गुल झालेली आहे नाराज सभासद मतपेटीतुन आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही बेलापुर ग्रामपंचायती नंतर आता सेवा संस्थेचा कारभारही सभासद गांवकरी मंडळाच्या ताब्यात देतील असा दावा खंडागळे यांनी केला आहे..ग्रामपंचायत,सोसायटी ,बाजार समिती,जिल्हा परिषद,पंचायत समिती अशी कोणतीही निवडणूक असो.ह्या ठराविक नेत्यांचीच मक्तेदारी असते..वेळ येईल तशा तडजोडी करायच्या आणि सत्ता व पदे मिळवायचे हेच यांचे ध्येय आहे.यांचा इतिहास बघितला तर सत्तेसाठी यांनी अनेकांशी घरोबा केला आहे.अनेक नेत्यांच्या मांडवाखालून यांची वरात गेली आहे.हेतू एकच ज्याची चलती त्याच्याशी युती.सोसायटी निवडणुकीतही अशीच अभद्र व मतलबी लोकांची युती झाली आहे.हि युती म्हणजे निवडणुकीच्या  गोंडस नावाखाली जमलेली भ्रष्टाचार करणारांची टोळी आहे.यांचे कारनामे आणि घोटाळे सभासदांना माहित असल्याने सभासद यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत.सत्ताधा-यांचे पितळ सभासदासमोर उघडे पडले असल्याने गावकरी मंडळाचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास श्री.खंडागळे यांनी व्यक्त केला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी)-किर्तन प्रवचन हे समाज प्रबोधनाचे धर्म प्रसाराचे साधन आहे परंतु काही लोक वायफळ गोष्टी सागुंन त्यास करमणूकीचे साधन बनवू पहात आहे किर्तन प्रवचनाचा तमाशा करु पहात आहेत हे दुर्दैव आहे अशी खंत तुकाराम महाराज संस्थानचे मठाधीपती महंत उध्दव महाराज मंडलीक यांनी व्यक्त केली . 

उक्कलगाव येथील हरिहर भजनी मंडळ व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री हरिहर

केशव गोविंद भगवान मंदिराच्या 

प्रांगणात आयोजित अखंड हरिनाम 

सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी काल्याच्या 


किर्तनात भाविकांना उपदेश करताना ते बोलत होते. "चला बळ गाई, बैसो जेऊ 

एके ठायी...बह केली वणवण पायपिटी लाभलेली 

जाला सिण....खांदी भार पोटी भक, ते 

काय खेळायाचे सुख,..तुका म्हणे धावे, उक्कलगावला 

मग अवघे बरखे। या संतश्रेष्ठ तुकाराम

महाराजांच्या अभंगावर निरुपण करत 

त्यांनी काल्याचे महत्व विषद केले.मंडलीक महाराज पुढे

म्हणाले,की माणूस संस्कृती विसरत चालला आहे संस्कृती विसरलो की विकृती निर्माण होते काम क्रोध मोह मत्सर या गोष्टीवर नियंत्रण मिळविण्याचे शिकाल तरच जिवनात यशस्वी व्हाल शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे त्यामुळे आपल्या मायेपोटी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवु नका आपला मोह माया सोडून मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवा ग्रंथ समजुन घ्या ग्रंथ समजले तरच संत समजतील समाजाला पोषक असणाऱ्या सर्व गोष्टी ग्रंथामध्ये आहेत .परंतु काही लोक ग्रंथ समजुन सांगतांनाही तमाशाचे स्वरुप आणतात   हे चुकीचे आहे धर्माचे रक्षण व प्रसार करणारांना त्याचे भान असले पाहीजे कष्टाने मिळविलेले धन हे लक्ष्मी असते तर अन्य मार्गाने मिळविलेले धन हे माया असते हीच माया सुखाने झोपूही देत नाही व जगुही देत नाही अन व्यवस्थित खाऊही देत नाही  हवा पाणी जमीन प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घ्या मन अःतकरण शुध्द ठेवा असे सांगुन भगवान श्रीकृष्ण जन्माचा ओघवत्या 

भाषेत आढावा घेताना त्यांनी अधुन  मधून विविध दाखलेही दिले. उक्कलगाव श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिराचे आणि आपले कौटुंबिक नाते असल्याचा 

 महाराजांनी आवर्जून उल्लेख करत हरिहर भजनी मंडळ व ग्रामस्थांना धन्यवाद दिले. 

ते सांदीपानी गुरुकुल आश्रम पावबाकी, संगमनेर येथील भजनी मंडळाची  लाभलेली साथ, समोर उपस्थित पाच हजारांचा जनसमुदाय यामुळे उक्कलगावला पंढरीचे स्वरूप आले होते. 

हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व ग्रामस्थांच्या वतीने सात दिवस चाललेला  हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. दिवसागणीक भाविकांची संख्या वाढत गेली

त्यामुळे तरुणांचाही उत्साह वाढत 

जाऊन अतिशय भक्तिमय वातावरणात  कोणतेही गालबोट न लागता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.गावातील विविध मंडळे, पंचक्रोशितील भजनी मंडळे, प्राथमिक व माध्यमिक

शाळा, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी,

 मंडप सेवा, जार सेवा पत्रकार या सर्वांनीच आपापल्या पातळीवर सहकार्य केल्याने

उक्कलगावचे पहिल्याच वर्षी सप्ताहाने कळस गाठला.

यावेळी पं.स.माजी सभापती

 इंद्रनाथ पा.थोरात, अशोकचे ज्येष्ठ

. संचालक रावसाहेब पा.थोरात, पं.स.माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या हस्ते मंडळाची सप्ताहात व्यासपीठ चालक म्हणून काम पहाणारे नामदेवकाका मोरे, उल्हास महाराज तांबे, बाबा महाराज ससाणे,

मृदंगाचार्य, गायनाचार्य, हार्मोनियम

उछालगाव वादक, देवस्थानसाठी स्वमालकीची

चाललेला जागा देणारे श्री.जगदीश कुलकर्णी

. दाम्पत्य, स्वच्छता कर्मचारी इम्तीयाज शेख विनामुल्य मंडप सेवा

वाढत देणारे सुनील व अनिल गवळी, भजनी मंडळ व अन्य मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget