Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- रासायनिकच्या अति वापरामुळे शेत जमीनीचा पोत खराब होत चालला असुन नापीक होत चाललेल्या जमीनी सुपीक होण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करणे गरजेचे आहे असे मत माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पा .यांनी व्याक्त केले बेलापुर तालुका श्रीरामपुर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या साँईल चार्जर टेक्नाँलाँजी या सेंद्रिय खत व वैदीक औषधाच्या दुकानास आमदार राधाकृष्ण विखे पा यांनी भेट दिली त्या वेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की रासायनिक औषधाचा  वापर

वाढला आहे जमीनी नापीक होत चालल्या आहेत तसेच रासायनिक फवारणी केलेल्या शेतमालामुळे आपले आरोग्य देखील बिघडले आहे जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिकचा वापर वाढत चालला आहे कसदार व विषमूक्त अन्न  पिकविणे आता गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीची कास धरावी असे अवाहनही आमदार विखे पा .यांनी केले आहे या वेळी जि प सदस्य शरद नवले माजी सभापती दिपक पटारे माजी सभापती नानासाहेब पवार संचालक मुक्ताजी पटांगरे सुधीर नवले  राधाकृष्ण आहेर कैलास बोर्डे उपसभापती नितीन भागडे उपसभापती तोरणे नाना शिंदे गिरीधर आसने विश्वनाथ मुठे डाँक्टर आसने  भास्कर कोळसे अकबर टिन मेकरवाले आदिसह नागरीक उपस्थित होते पत्रकार देविदास देसाई यांनी आभार मानले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-तालुक्यात सर्वात मोठी असलेल्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरुझाली असुन आजपासुन उमेद़्वारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे                           एकुण तेरा जागेसाठी ही निवडणूक होत असुन एकुण १०२५ सभासदापैकी केवळ ६९० सभासदांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे आठ संचालक सर्वसाधारण दोन महीला  एक ओबीसी एक एससी व एक भटक्या विमूक्त असे एकुण तेरा सांचालक निवडले जाणार आहे तेरा जागेकरीचा फाँर्म भरण्याची मुदत दिनांक २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत  फाँर्म भरणे दिनांक ९ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता छाणणी दिनांक १० फेब्रुवारी उमैद़्वार यादी प्रसिध्द करणे दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ते २४ फेब्रुवारी  २०२२ माघार  घेणे दिनांक २५ फेब्रुवारी  चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिध्द करणे दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ८ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे ,मागील वेळेस बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जनता अघाडीचे रविंद्र खटोड यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या होत्या तरा जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक अभिषेक खंडागळे यांच्या गटाला ४ जागा मिळाल्या होत्या त्या नंतर तीन संचालाक अपात्र झाले होते या संस्थेची आर्थिक उलाढाल मोठी असुन संस्थेच्या मालकीचा पेट्रोल पंपआहे स्वःमालकीची भव्य अशी ईमारत आहे संस्थेकडे दोन स्वस्त धान्य दुकान आहेत संस्थेकडे खत डेपो आहे अशी उत्पन्नाची साधने आहेत.

अहमदनगर प्रतिनिधी- अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथे येणार आहे. आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउनि/सोपान गोरे, सफौ/राजेंद्र देवमन वाघ, संजय खंडागळे,पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, पोना/भिमराज खसे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच एक इसम विठामाधव थिएटर, राहुरी फॅक्टरी येथे मोटार सायकलवर येतांना दिसले, त्यांना हाताने इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगितले त्यावेळी त्यांनी मोटार सायकल रोडच्या कडेला थांबविली पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) किशोर बाळासाहेब खामकर वय ३२, रा. राजुरी, ता. राहाता २) किशोर साईनाथ शिणगारे वय २८, रा. गोमाळवाडी, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये दोन गावठी बनावटी कट्टे, सहा जिवंत काडतूसे, व प्लेझर मोपेड असे एकूण १,२१,२००/रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर बाबत सफौ/राजेंद्र देवमन वाघ, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच दरम्यान श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबन्याकडून माहिती मिळाली कि, दोन इसम गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी औरंगाबाद नगररोडने अहमदनगरकडे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी वर नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांना खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार बातमीतील नमूद ठिकाणापासून गाडी रस्त्याचे कडेला आडोशाला लावून शेंडी बायपास चौकामध्ये, ता. जि. अहमदनगर येथे सापळा रचुन थांबले असता, दोन इसम संशयीतरित्या हे त्यांचेकडील बजाज प्लॅटींना काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर औरंगाबाद कडुन येतांना दिसले असता, त्यांना हाताने इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगीतले असता, मोटार सायकल चालकाने मोटार सायकलचा वेग कमी केला. त्यावेळी त्याच्या मागे बसलेल्या इसमास पकडले असता मोटार सायकल चालकास संशय आल्याने तो तसाच मोटार सायकल घेवुन औरंगाबादच्या दिशेने पळून गेला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आलेला नाही. पकडलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) अभय अशोक काळे वय २४, रा. शिरसगांव, ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची अगंझडती घेतली असता त्यांच्या कब्जात देशी बनावटीचे दोन पिस्टल (गावठी कट्टा) व सहा जिवंत काडतुसे असा एकुण ५१,२००/- रु.किं.चा मुद्देमाल मिळुन आला त्यास त्याचा जोडीदार मोटर सायकलस्वार याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विवेक लक्ष्म शिंदे (फरार) रा.घोगरगांव रोड, टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर असे सांगितले. वर नमुद दोन्ही गुन्ह्यातील आरोपीकडे सदर देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्ट) कोठुन आणले याबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सदरचे गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे सागर रोहिदास मोहिते (फरार) रा. शिरसगांव, ता.नेवासा याचेकडुन घेतले बाबत सांगितले.वरील प्रमाणे राहुरी व एमआयडीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन चार पिस्टल (गावठी कट्टे), १२जिवंत काडतसे व एक प्लेझर मोपेड गाडी असा एकुण १,७२,२००/-रु.कि.चा मुद्देमाल व तीन आरोपी ताब्यात घेवून राहुरी व एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई राहुरी व एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे विवेक लक्ष्मण शिंदे (फरार) हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस चोरी व विनयभंग करणे असे एकुण ०२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. १) श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. २०१/२०२१ भादविक ३५४, ३२३, ५०४, ५०६ २) गंगापुर पोलीस स्टेशन, जिल्हा औरंगाबाद २८४/२०२० भादविक ४६१, ३८०, ३४ आरोपी नामे सागर रोहिदास मोहिते (फरार) हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस मारहाण करणे, आमली पदार्थ, दारुबंदी व घातकशस्त्रे बाळगणे व विक्री असे एकुण ०६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.१) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६६/२०१५ भादविक १४३, ३२३ २) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. २०४/२०१५ मुं.दा.का.क. ६५ (ई) ३) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२/२०१७ मुं.दा.का.क. ६५ (ई) ४) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२२/२०१७ भादविक ३२३, १४३ सह आर्म अॅक्ट ३/२५ ५) सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. २०/२०१४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ ६) अंबड पोलीस स्टेशन जिल्हानाशिक गु.र.नं. ३१०३/२०१६ एनडीपीएस २०, २२ सदर कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर, श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर, श्री.संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे.


अहमदनगर प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तालुक्यातील मक्तापूर येथील एका सराईत गुन्हेगारास नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याच्या पोलीस पथकाने कट्ट्यासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत नगरच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सोनई येथे येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिंळाल्याने त्यांनी आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार मनोहर गोसावी, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, कॉन्स्टेबल सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, रोहित येमूल व चालक हवालदार बबन बेरड अशांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे सापळा लावला.तिघे सचिन वसंतराव कोळेकर रा. मक्तापूर ता. नेवासा याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 26 हजार रुपये किमतीच्या वस्तू मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले.सचिन वसंतराव कोळेकर याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 35/2022 आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी-कोपरगाव तालुक्यातील जवळके नावाचे छोटेसे गाव आणि या गावातली तीन युवक फिरोज  मनियार, अक्षय थोरात अन् सागर दरेकर संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वतःच नशीब आजमावत आहेत. त्यांच तिसर गाण गर्लफ्रेंड   होशीलका ? हे गाणे नुकतेच  FSA PRODUCTION ह्या युट्युब चॅनेल वर प्रदर्शित झाले आहे. आशिष श्रावणी दिग्दर्शित या गाण्यात शाळा वेबसिरीज फेम अनुश्री माने तसेच सेजल अमनेकर, अक्षय थोरात , सागर

दरेकर यांनी  अभिनय केला असून प्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक फिरोज मणियार तसेच महाराष्ट्राच्या नामवंत गायिका सोनाली सोनवणे यांनी या गण्यास आवाज दिला आहे.अधिक माहिती अशी की, यातील फिरोज  हा स्थापत्य अभियांत्रिकी आहे. त्याच्या या स्वप्नाला त्याचे मित्र अक्षय थोरात (एम कॉम) आणि सागर दरेकर  (विद्युत अभियांत्रिकी ) यांची खंबीर साथ मिळत आहे.घरची बेताची परिस्थिती आणि त्यातून घेतलेले शिक्षण यात नोकरीच्या मागे न लागता तिन्ही युवक एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. आणी त्यांची स्तुती ही  एवढ्यासाठीच त्यांनी कुणाचाही आधार न घेता आपले तिसरे गाणे प्रदर्शित केले. ह्या क्षेत्रामध्ये आजकाल खूप तरुणी- तरुणांचा सहभाग वाढत चाललेला दिसतोय पण तुमच्यात जिद्द आणि त्यासाठी धडपड असणं आवश्यक आहे. हीच जिद्द धडपड घेऊन फिरोज मणियार व त्याच्या सह टीम ने चांगली भरारी घेतली आहे.यापूर्वी त्यांची दोन गाणी सादर झालेले असून त्यातील एक गाणे झी म्युझिक सारख्या मोठ्या वाहिनीने घेतलेले आहे तर त्यांच्या 'FSA PRODUCTION' या निर्मिती अंतर्गत चालणाऱ्या यूट्यूब चैनल वर ही त्यांचे अनेक चाहते आहेत.आज सर्व सुविधा सोयी उपलब्ध असतांना युवक नवीन काही  करण्यास हिम्मत करत नाहीत परंतु आपल्या परिस्थितीला शिक्षणाला कुठेही आडवे येऊ न देता आर्थिक परिस्थितीशी झगडत या युवकांनी जे क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्याची धडपड करत आहेत ती निश्चितच अभिनंदनीय आहे.फिरोज या क्षेत्रात कसा आला हे विचारला असता साईंच्या दरबारी भजन गात गात निर्माण झालेली आवड पुढे स्वप्न झाली आणि त्यातच करिअर करायचं ठरलं. गीतकार ,संगीतकार आणि गायक ह्या तिन्ही आघाड्यांवर आव्हान पेलताना दोन्ही जिवलग मित्र मोलाची साथ देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द,नवीन शिकण्याची तयारी आणि मेहनती स्वभाव यामुळे हे तारे संगीत क्षेत्राच्या आकाशात नक्कीच चमकतील ही खात्री आहे.या युवकांच्या प्रयत्नास साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष नामदार आशुतोष दादा काळे तसेच युवा नेते सुमित दादा कोल्हे,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनिष जाधव आदी मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


श्रीरामपुर  /( खास प्रतिनिधी )-अवैध धंदेवाल्याकडून हप्तेवसुली संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना तातडीने पोलीस नियंत्रण  कक्षअहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली असुन दोघा पोलिसांना निलांबीत करण्यात आले आहे.                                          अवैध धंद्यावाल्याकडून वसुली बाबत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पोलीस वैरागर तसेच राऊत यांच्या संभाषणाची आँडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती त्याची दखल घेवुन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.त्या संभाषणात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे हे राऊत यास वसुलीचे काम वैरागर याच्याकडे देण्यात आले असुन तु वसुली करु नको कुणाकडे जावु नको असे सांगत आहेत या सर्व गंभीर प्रकरणाची पोलीसा अधिक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत ताताडीने पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नगर मुख्यालयात नियत्रंण कक्षात बदली केली आहे  तर पोलीस शिपाई लक्ष्मण दशरथ वैरागर, कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना निलंबीत केले आहे  हे दोघेही श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

व्हायरल झालेल्या क्लिप मध्ये अधिकारी वसुली संदर्भात सल्ला देत असल्याचे ऐकु येते. वसुलीचे काम दुसऱ्याचे असल्याचे या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला म्हटल्याचे क्लिप मध्ये स्पष्ट होते. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची धमकी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत एस पी मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक साळवे यांची बदली तर दोघांच्या निलंबनाचे आदेश काढत चौकशी सुरू केली आहे.तर श्रीरामपूर पोलिसांतून आणखी दोन संशयाच्या भवर्यात. 


श्रीरामपूर प्रतिनिधी - 
भीम आर्मी भारत एकता मिशन चे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे साहेब, महाराष्ट्र प्रभारी दत्तू मेढे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे साहेब, महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दिपकजी भालेराव साहेब यांच्या आदेशानुसार भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मा. पँथर ऋषी पोळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत.भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचा विषय असा होता कि, _रोहन माळवदकर_ या मनुवादी लेखकाने "वास्तव" या पुस्तकात _भिमाकोरेगाव चा खोटा इतिहास लिहिला आहे. तसेच ब्राम्हण महासंघाने हि पुस्तके फुकट वाटू अशी बुरसटलेल्या विचारसरणीची मानसिकता दाखवली._  त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाचे असल्यामुळे सदरच्या घटनेचा निषेध म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काळी फीत लावून दिनांक 30/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता  निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार तसेच श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या अटीनुसार मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचे आंदोलन करण्यात आले.यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दीपकजी भालेराव साहेब, स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पँथर ऋषी पोळ साहेब, महाराष्ट्र सदस्य गौरव भालेराव, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख, राहाता तालुकाध्यक्ष सुनील भाऊ मोकळ, राहाता तालुका संघटक शब्बीर भाई कुरेशी, स्टुडंट्स फेडरेशन राहाता तालुका संघटक साहिल गायकवाड,विश्वदीप सोनवणे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.




MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget