Latest Post

श्रीरामपूर : नजीकच्या काळात होवू घातलेल्या विविध निवडणूकांमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये या करिता राज्य निवडणूक आयोगातर्फे नवमतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम जाहीर केला असून जास्तीत जास्त नवमतदारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात अनिल पवार यांनी म्हटले आहे की,०१ जानेवारी २०२२ वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार म्हणून यादीत नाव समविष्ट करू शकतो.नाव नोंदणीसाठी संपूर्ण मतदार संघात मतदार केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकारी नेमले आहेत.०५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत,तसेच विविध राजकीय पक्ष पदाधिकारी ,पत्रकार,सामाजिक संस्था यांनी मतदार जागृती करावी असे आवाहनही  अनिल पवार यांनी केले आहे.

आगामी बहुतेक मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ मध्ये होत असून यासाठी ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दिनांक २७ व २८ नोव्हेंबर या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर करण्यात आले आहे.यात नाव नोंदणीसह यादीत पूर्वीपासून नावे असलेल्या मतदारांना आपल्या नावातील दुरुस्ती करता येणे शक्य आहे.सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक उगले स्वतंत्रपणे निवडणूक शाखेत मदतकक्ष उभारून मतदारांच्या शंकांचे निरसन करत आहेत.दि. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी भारत निवडणूक आयोग यांचेकडून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत तसेच आपल्या भागातील अथवा कुटुंबातील मयत व्यक्ती, दुबार, समान नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आपल्या भागातील बी. एल. ओ. अथवा निवडणूक शाखेत विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रवाशासाठी सुरक्षित व सुखरुप सेवा देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही सुरुच असुन या संपास शेवगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पाठींबा दर्शविला असुन शासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेवुन संपावर तोडगा काढावा अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.संघटनेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सध्या संपूर्ण राज्यात एस टी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांंचा शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसह विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरुच आहे अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी झालेले आहेत या आंदोलनामुळे दळणवळण व्यवस्था ठप्प झालेली आहे खाजगी प्रवासी वहातुक करणारे सर्व सामान्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत सर्व सामान्यांना परवडणारी ही एकमेव सोय असतानाही शासनाने त्यांच्या मगणीकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यांचे आंदोलन लांबल्यामुळे आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे विशेषकरुन विद्यार्थी दिव्यांग तसेच जेष्ठ नागरीक यांना मोठ्या सांकटाला तोंड द्यावे लागत आहे तरी शासनाने त्यांच्या योग्य मागण्यांची दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहै या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे तालुकाध्यक्ष बाबा कराड देविदास बटुळे श्रीकांत मोडके राजेंद्र वाल्हेकर ज्ञानदेव ठाकरे रामकिसन फुंदे शिवाजी काळे विठ्ठल गव्हाणे विक्रम गरड डी आर उंदरे एस टी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप लबडे जगन्नाथ पवार रसाळ आदिंच्या सह्या आहेत.



श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे.याकरिता दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पासून “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडीच्या” वतीने गांधी पुतळा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.आज दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी उपोषणाच्या 05 व्या दिवशी सकाळच्या सुमारास एक उपोषणकर्ते श्री.योगेश सोनार यांची प्रकृती खालावल्याने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

         ह्या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ या आमरण उपोषणाची 05 व्या दिवशी योग्य ती दखल घेतली. श्रीरामपूर चे तहसीलदार मा.श्री.प्रशांत पाटील,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.संजय सानप व श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.मधुकर साळवे यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट दिली व “ सर्व अवैध धंदे बंद केले असून कोठे अवैध धंदे चालू झाले तर तुम्ही त्या अवैध धंद्यांची माहिती आम्हाला द्यावी आम्ही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करू” अशा स्वरूपाचे लेखी पत्र चंद्रशेखर(चंदू) आगे यांना प्रशासनाने दिले.

त्यामुळे आमरण उपोषणाची योग्य ती दखल घेतल्यामुळे व पोलिसांनी लेखी पत्र देऊन कोणी अवैध धंदे चालू केले तर निदर्शनास आणुन द्यावे त्यांच्यावर कारवाई करू असे लेखी पत्र दिल्याने “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”चे उपोषणकर्ते चंद्रशेखर आगे व दीपक संत यांनी यावेळेस उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.यावेळी उसाचा रस उपोषणकर्त्यांना पाजुन प्रशासनाने या उपोषणाला पूर्णविराम दिला. दरम्यान साखर कामगार रुग्णालयात दाखल असलेले उपोषणकर्ते शिवप्रहार प्रतिष्ठान चा मावळा श्री.योगेश सोनार यांची प्रकृती स्थिर असल्याचे कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री.जगधने यांनी सांगितले आहे.

आज रोजी उपोषण स्थळी स्वर्गीय अप्पासाहेब गांगड मित्र मंडळाच्या वतीने भेट देण्यात आली.



श्रीरामपूर:- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील  कच्चे रसायन, 7800  लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 248  लिटर   व तसेच 50 किलो नवसागर , देशी दारू, तसेच 450  किलो गुळ एक टेंपो व  एक दुचाकी असा एकूण 6,43,955  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात  आले आहे . त्यानुसार,

1) श्रीकांत प्रभाकर काळे, रा कदम वस्ती  श्रीरामपूर

2)  सागर माणिक शिंदे, रा. गोंधवणी ता श्रीरामपूर

3)  भीमराव काळे रा अशोक नगर ता  श्रीरामपूर

4)   दत्तात्रेय जानकीराम मंचरे रा वैजापूर

5) दीपक वसंत शेलार रा अशोक नगर

6)  अशोक काशिनाथ शिंदे( फरार)

7) बाप्पू नागू गायकवाड ( फरार)

8) अर्जुन फुलारे ( फरार) सर्व  राहणार गोंधवणी वडारवाडा ता श्रीरामपूर   यांचेविरुध्द  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) ( क) ,( ड), (  इ) नुसार P.C.  नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन  व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  मा.गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p  संदीप मिटके, Dy s.p. नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क),P.I. कोल्हे, P.I.  हुलगे, P.I, वाजे व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया काल न्यायालयाच्या निर्देशानुसार व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. मात्र सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून सदरचा निकाल बुधवार दि. 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत जाहीर करणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी अनिल पवार यांनी दिली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्याबाबतचे अपिल उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली.पंचायत समितीचे सभापती पद विखे गट व काँग्रेसकडून प्रतिष्ठेचे करण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीला विषेश महत्व प्राप्त झाले होते. दोन्ही गटाकडून निवडणूक प्रक्रियेनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला.पंचायत समितीच्या सभापती संगिता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आले. यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. हे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वंदना मुरकुटे या पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. शिंदे यांच्या अपात्रतेसाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दि. 9 नोव्हेंबर रोजी या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याला विखे गटाचे माजी सभापती दीपक पटारे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.पंचायत समितीत 50 टक्क्यापेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याचे आपल्या याचिकेत नमूद केले आहे. याप्रकरणी खंडपीठाने दि. 18 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया घेण्यास मान्यता देत निकाल जाहीर करण्यास मात्र मनाई केली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार, सहाय्यक तथा गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी काँग्रेसच्यावतीने वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्यावतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड.समीम बागवान यांनी काम पाहिले,व कल्याणी कानडे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. डी. जोंधळे तर वैशाली मोरे यांच्यावतीने अ‍ॅड. एस. बी. काकड यांच्या मार्फत्त पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला.वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड.समीम बागवान यांनी काम पाहिले 



श्रीरामपुर  (प्रतिनिधी )- श्रीरामपूर शहर व तालूक्यातील अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालाली आहे त्यामुळे शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठाण युवा अघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.या बाबत उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की शहर व तालुक्यात अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन दारु मटका गुटखा जुगार तर दररोज सुरुच आहेत त्यातच आता काँम्प्यूटर लाँटरीची भर पडली आहे अनेक बेरोजगार तरुण शालेय विद्यार्थी या झटपट लाँटरीचे बळी ठरत आहे शिक्षणाच्या नावाखाली आई वडीलाकडून पैसे उकळून हे गेम खेळले जात आहे या अवैध व्यवसायामुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त झालेले आहेत नशेच्या अहारी गेल्यामुळे अनेकांना वेगवेगळे आजार जडले आहे या सर्व प्रकारास जबाबदार कोण? असा सवाल शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला असुन हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे  . प्रशासनाकडुन दोन दिवसात यावर कठोर कारवाई झाली नाही व शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर श्रीरामपुरातील महात्मा गांधी पुतळयाजवळ लोकशाही

मार्गाने सर्व नियमांचे पालण करून आमरण उपोषण करण्यात येईल.असेही निवेदनात म्हटले आहे.



राहाता :-मोठ्या शहरा पाठोपाठ आता राहाता शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही व्हाईटनर नशेच्या जीवघेण्या व्यसनांमध्ये तरुणाई अडकल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. व्हाईटनरच्या या नशेमध्ये 14 ते 18 वर्षाच्या अनेक मुलांच्या आरोग्याची दुर्दशा होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.तंबाखू, सिगारेट, गुटखा, मद्यपान करणार्‍यांना व्यसन लागले असा आपल्याकडे सहज समत आहे. अशांची संख्या प्रामुख्याने मोठी आहे. परंतु सध्या राहाता परिसरात शाही खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईटनर रुमालवर टाकून त्याचा गंध घेऊन नशा करणारे तरुण परिसरात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. प्रामुख्याने 16 ते 25 वयोगटातील तरुणांना हे व्यसन लागले आहे. राहाता तालुक्यात शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे तसेच तालुक्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.परप्रांतीय तरुण रोजगारासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या संगतीत राहून येथील तरुणांनी अनेक व्यसने लावून घेतली आहेत. यामध्ये व्हाईटनरची नशा सध्या चर्चेचा व तितकाच गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी शाळेत न जाता हे व्यसन करतात. हल्ली जनरल स्टोअर्समध्ये व्हाईटनरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. काही वर्षांपूर्वी कोरॅक्स, आयोडेक्स औषध सेवन करून तरुण वर्ग व्यसनाधीन झाला होता. व्हाईटनर रुमालावर टाकून त्याचा गंध घेऊन व्यसनाचा फंडा परिसरात तरुणांच्या हाती लागला आहे. या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.राहाता शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. राहाता शहरात परराज्यातून गुटखा मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीसाठी आणला जातो व तो तालुक्यातील विविध ठिकाणी विक्रीसाठी दिला जातो. शहरात अवैधरित्या गुटखा विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात असताना पोलीस प्रशासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. अनेकदा पोलिसांनी होलसेल गुटखा विक्री करणार्‍यांना रंगेहाथ पकडले, परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.राहाता शहरात बस स्थानक, व्यापारी संकुल, नगरपरिषद बगीच्या, कातनाला, पाण्याच्या टाकी परिसर, पिंपळस खटकळी कॅनॉल रोड या ठिकाणी अनेक तरुण

रात्रीच्यावेळी व्हाईटनर, मद्यपान, धूम्रपान अशा विविध नशा करताना दिसतात. शिर्डीत काही वर्षापूर्वी व्हाईटनरची नशा करणार्‍या मुलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी तात्पुरती कारवाई करून काही काळ या नशेबाज तरुणांवर अंकुश ठेवला होता. परंतु पुन्हा नशा करणार्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयात मुलांना प्रबोधन करणे गरजेचे आहे अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे. राहाता तालुक्यात बेकायदा मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गावठी दारूची विक्री रहिवासी परिसरात राजरोसपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. बेकायदा मद्यविक्रीला एक प्रकारचा परवाना मिळवायचे चित्र आहे. बेकायदा मद्यविक्रीमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. पोलीस प्रशासनाने या बाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget