Latest Post

बेलापूर प्रतिनिधी- गंगाधर शास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान बेलापूर बुद्रुक (.....एक सामाजिक उपक्रम) आणि पोस्ट ऑफिस बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत साळुंके बिल्डिंग आझाद मैदान ग्रामपंचायत समोर बेलापूर बुद्रुक येथे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक करणे व आधार कार्ड दुरुस्ती करणे व नवीन मतदार नोंदणी करणे साठी सदर शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने अँड. अजिंक्य साळुंके आणि अँड. मयूर साळुंके यांनी दिली आहे.

या शिबिरा बाबत माहिती देताना अँड. साळुंके म्हणाले की अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी लिंक असणे गरजेचे आहे तसेच अनेक नागरिकांच्या आधार कार्ड मध्ये नाव पत्ता यामध्ये चुका झाल्या असल्याने त्या चुका दुरुस्त होणे गरजेचे आहे यासाठी गंगाधरशास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान व पोस्ट ऑफिस बेलापूर बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील शिबिराचे आयोजन केले गेले आहे.

गंगाधर शास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने यापुढेही बेलापूर व परिसरात सामाजिक कामे करण्याच्या मानस अँड. साळुंके यांनी व्यक्त केला आहे.

तरी बेलापूर आणि पंचक्रोशीतील सर्वच आणि जास्त जास्त नागरिकांनी या सदरील कॅम्पचे लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठान तर्फे श्री. पुरुषोत्तम गंगाधर साळुंके, श्री. प्रताप गंगाधर साळुंके, श्री. प्रदीप गंगाधर साळुंके, अँड. मयूर साळुंके, अँड. अजिंक्य साळुंके,प्रज्वल साळुंके, सोहम साळुंके , संजय साळुंके ,पार्थ साळुंके तसेच सर्व साळुंके परीवारातर्फे करण्यात आलेला आहे.


दि. 10/11/2021 रोजी सकाळी 09.00 ते रात्रीचे 08.00 च्या दरम्यान तेरुगंण गावात राहणारे बाळु भागा चौधरी यांच्या राहत्या घरात अज्ञात आरोपीने घराचा दरवाजा उघडुन त्यांच्या घरातील मातीच्या कोठीत ठेवलेले खालील वर्णनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेले होते.

1 ) 22.000/-रुकिंमतीच्या अर्धा अर्धा तोळ्याच्या दोन नथी जु.वा.कि.अं 2) 33.000/- रु. किंमतीच्या दिड तोळा चजनाच्या चार पुतळ्या व एक पान जु.वा.किं.अं

3 )10.000/- रु किंमतीच्या अर्धा किलो वजनाचे चांदीचे एळा जु.वा. कि.अं एकुण-65.000/- रु.कि.त्यानुसार बाळु भागा चौधरी याने दिलेल्या फिर्यादी वरुन राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 189/2021 भा.द.वि. कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हाचा तपास करत असतांना गुप्तबातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदरची घरफोडी मारुती रामा कातडे, वय 25 वर्ष, रा.तेरुगंण ता. अकोले याने केली आहे. त्यानुसार मारुती रामा कातडे यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली असुन वरील वर्णनाचा चोरीस गेलेले 2.5 तोळे सोन्याचे दागिने व 500 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण 65,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल त्याचे कडुन हस्तगतं करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर मा.श्री राहुल मदने उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, नरेद्र साबळे, पोसई, नितीन खैरनार पोहवा/ 2042 भांगरे, पोना/775 देवीदास भडकवाड, पोकॉ/2584 अशोक गाढे, पोकॉ/2492 प्रविण थोरात यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोना / 775 भडकवाड करीत आहेत.


अहमदनगर -15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित अनुदानाचा (टाईड) पहिल्या हप्त्यापोटी 1292.10 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण 80 टक्के ग्रामपंचायत, 10 टक्के पंचायत समिती आणि 10 टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे, त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व 1318 ग्रामपंचायतींच्या वाट्याला 60 कोटी 56 लाख 88 हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.हा निधी अकोलेतील 146, संगमनेर तालुका 143, कोपरगाव 75, राहाता 50, श्रीरामपूर 52, राहुरी 83, नेवासा 114, शेवगाव 94, पाथर्डी 107, जामखेड 58, कर्जत 91, श्रीगोंदा 86, पारनेर 114, अहमदनगर 105 अशा एकूण 1318 ग्रामपंचायतींना मिळणार आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये सन 2020-21 या कालावधीसाठी नगर जिल्ह्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 85 कोटी 39 लाख रुपये आले होते. यात 1 हजार 318 ग्रामपंचायतींना 68 कोटी 31 लाख रुपये, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 8 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी हा निधी देण्यात येतो. यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते.ही रक्कम जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे. या अनुदानाचे वाटप ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात येणार आहे.पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट (अनटाईड) व टाईड ग्रँट अशा दोन प्रकारच्या ग्रॅन्टच्या स्वरूपात 50 - 50 टक्के या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे.


श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - औरंगाबाद येथील सरपंच  परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध करत संबधितांवर भा.दं.सं.नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन करत गट विकास अधिकारी, तहसिलदार आणि तालुका पोलिस स्टेशन श्रीरामपूर यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे तुकाराम जाधव, रामदास जाधव, रुबाब पटेल, दादासाहेब काळे, रमेश निषेध, निलेश लहारे, हितेश ढुमणे,राजु भालदंड आदींनी तिव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,दिनांक ८


नोव्हेंबर २०२१ रोजी औरंगाबाद याठिकाणी आयोजित सरपंच परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबद्दल बिभत्स व अपमाजनक तथा अवमानकारक शब्द वापरुन संवर्गाचा अवमान केलेला आहे, वास्तविक पाहता राज्यातील ग्रामसेवक संवर्ग हा शासन व्यवस्थेमध्ये गावपातळीवर काम करणारा शेवटचा घटक असून सदर कामे करताना जनमानसांशी संपर्क व समन्वय ठेऊन अत्यंत सचोटीने व पारदर्शक पध्दतीने असंख्य अडी-अडचणींवर मात करून काम करणारा घटक आहे,असे असतानासुद्धा आमदार महोदयांनी या बाबी विचारात न घेता बेताल वक्तव्य करुन जाणिवपुर्वक जनमानसात ग्रामसेवक संवर्गाची प्रतिमा मलिन केली आहे,

या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत असून जोपर्यंत आमदार संजय शिरसाठ यांच्यावर शासन दरबारी भा.द.संहितेनुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही, ते राज्यातील ग्रामसेवक संवर्गाची जाहिरपणे माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी लोकशाही मार्गाने काम बंद आंदोलन करीत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटना डी.एन.ई.१३६ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रमेश निबे, सचिव दादासाहेब काळे, श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष नितेश लहारे, सचिव राजु भालदंड, जि.प.कर्मचारी महासंघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रुबाब पटेल, सचिव हितेश ढुमणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुकाराम जाधव,ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास जाधव यांच्या समवेत तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सर्वश्री ए.ए.विधाटे, डी.एल.डोंगरे, पी.पी.दर्शने, एच.एस.ढुमणे, पी.यु.वाघमारे, आर.ए.भालदंड, व्ही.ई.देसाई,आर.आर.कांदळकर,व्ही.एस.मेहेत्रे, बी.एस.म्हस्के, सी.डी.तुंबारे, आर.एफ.जाधव, टी.के.जाधव, पी.व्ही.ढुमणे, आर.बी.ओहोळ, व्ही.एन.धाकतोडे, श्रीमती. एस.ए. जाधव, श्रीमती,एस.एस.शेटे, एस.डी.उंडे, पी.एन.सोनवणे, आर.व्ही.निबे, आर.आय.पटेल, एन.डी.लहारे,श्रीमती एस.डी. पोळ.समीर मणियार आदींच्या स्वक्षऱ्या आहेत.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-वेळेवर पगार न मिळाल्यामुळे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत या आत्महत्येस शासनच जबाबदार असुन  कर्मचाऱ्यांंच्या आत्महत्येस जबाबदार असणारावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर एस टी आगारात एसटी कामगारांच्या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यानी जाहीर पाठींबा देऊन. निवेदन आगारप्रमुखांना देण्यात दिले .त्या प्रसगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष, तुषार बोबडे जिल्हा सचिव, सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष विकी राऊत, शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, दीपक लांडे तालुका सरचिटणीस, संदीप विशम्‍भर शहर सचिव, प्रथमेशवर गांगुर्डे शहर उपाध्यक्ष, अभिजीत खैरे तालुका उपाध्यक्ष,

आदी पदाधिकारी उपस्थित होते.कामगारांच्या कामबंद आंदोलनास मनसेच्या वतीने पाठींबा देण्यात आला  त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब  शिंदे म्हणाले की  कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावा.तसेच एसटी ड्रायव्हर कंडक्टर हे ऊन वारा वादळ कुठलाही प्रसंग असला तरीपण आपली सेवा योग्य रीतीने देत असतात महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब असताना एसटी ड्रायव्हर कंडक्टर आपला जीव मुठीत घेऊन अहोरात्र प्रामाणिकपणे आपले कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडतात तरी राज्य सरकार त्यांना म्हणावे तसे सुख सुविधा देत नाही व इतरां पेक्षा कमी पगार  देत असते राज्य सरकार भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाचा समावेश राज्य सरकार स्वतः कडे विलगीकरण करून घेत नाही आम्ही आज राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन यापुढे कामगार बांधवांच्या आंदोलना मध्ये सक्रिय सहभाग घेऊ व महाराष्ट्र सरकारला तुमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे आश्वासन  जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिले. कामगारांना पाठींब्याचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी   श्रीरामपूर एसटी वाहतूक निरीक्षक किरण शिंदे,सहा.वाहतूक निरीक्षक वसंत लटपटे यांना तसेच एसटी कामगार सुरेश चांदणे,देविदास कहाणे,प्रभाकर पवार,अमोल पगारे,वसंत दहिफळे,सुनील तुपे,विष्णू गर्जे,रवी मारवाडे,शामलिंग शिंदे,भगवान पाचारणे,प्रशांत लिहिणार,मुन्नाभाई शेख,यांना देण्यात आले.




बेलापुर  (प्रतिनिधी  )-बाल वयातच ज्याचे पालकत्व हरवले तोच व्यक्ती वयाच्या १९ व्या वर्षी अनेक अनाथांचा नाथ बनला असुन समाजातील दानशुर व्यक्तींनी या चांगल्या समाज कार्यास हातभार लावावा असे अवाहन जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे .बेलापुर येथील गोखलेवाडी येथे १९ वर्ष वय असणारे ह भ प कृष्णानंद महाराज यांनी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम सुरु केला असुन आज या आश्रमात १३ अनाथ मुले मुली शिक्षण घेत आहे आश्रमाचा दर महा खर्च हा ३५ हजार रुपये असुन कृष्णानंद महाराज हा खर्च किर्तन प्रवचन करुन भागवत आहे परंतु कोरोनामुळे किर्तन प्रवचन बंद पडले त्यामुळे त्यांनी आपल्याकडील असलेले चार चाकी वाहन विकुन मुलांचा खर्च भागविला गावकंरी मंडळाचे नेते जि प सदस्य शरद नवले बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे गांवाकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी सामाजिक कार्याची जाण ठेवुन गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्याकडून वर्गणी जमा करुन या अनाथ आश्रमास मदत करण्याचा निर्णय घेतला व जमा झालेले सतरा हजार पाचशे रुपयाचा निधी दिपावलीच्या दिवशी कृष्णानंद महाराजाकडे सुपुर्त करण्यात आला या वेळी सरपंच महेंद्र साळवी यांनी देखील बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने जी मदत करता येईल ती सर्वा मदत करण्याचे अश्वासन दिले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आश्रमास पाच गुंठे जागा विनामोबदला दिल्याबद्दल प्रकाश मेहेत्रे  व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले. या वेळी जालींदर कुऱ्हे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,दिलीप दायमा,प्रकाश मेहेत्रे,रावसाहेब अमोलिक,मुस्ताक शेख,वैभव कु-हे,गणेश बंगाळ,दादासाहेब कुताळ,महेश कु-हे,शफीक बागवान,नामदेव मेहेत्रे,अकबर सय्यद,अजिज शेख,आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी प्रकाश मेहेत्रे यांनी आभार मानले.


बेलापुर  (प्रतिनिधी )-आपल्या सर्वावर या मातीचे ऋण असुन ते फेडण्यासाठी मातीशी ईमान राखत  राजकारणापलीकडे जावुन गावात बंधुभाव टिकविण्यासाठी प्रयत्न करावे असे आशिर्वचन गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी बेलापूरवासीयांना दिले.राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली बेलापुर ग्रामपंचायतीला स्थापन होवुन शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्या दृष्टीने आचार्य किशोरजी व्यास यांची ग्रामपंचायतीला  भेट महत्वाची मानली जात आहे.  जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे

यांच्याकडून आचार्य किशोरजी व्यास यांनी ग्रामपंचायत कारभाराबद्दल माहीती करुन घेतली बऱ्याच वर्षानंतर स्वामीजी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते  या वेळी ग्रामस्थांना आशिर्वादीत करताना स्वामीजी म्हणाले की जगात कुठेही असलो तरी या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे येथे खेळलो बागडलो येथील मातीच्या कणाकणाशी एकरुप झालो ज्या प्रवरा माईच्या तिरावर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहीली त्याच प्रवरेचे पाणी पिऊन मी मोठा झालो आहे अनेक तपस्वी लोकांनी या गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले होते या गावात उद्योग  व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे सर्वांनी चांगली सेवा देण्याचा संकल्प करावा गावाची शांतता भंग होणार नाही जाती जातीत तणाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी गावात नविन रचनात्मक विकासात्मक कामे करावीत ज्या ठिकाणी माझी मदत लागेल ती करण्यास मी सदैव तत्पर राहील असेही ते म्हणाले. या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने आचार्य किशोरजी व्यास यांचा सन्मान करण्यात आला या वेळी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे,जुने बालाजी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष हरजीभाऊ व्यास,रणजित श्रीगोड,महेशजी व्यास,जालिंदर कु-हे,भास्कर बंगाळ, सुधाकर खंडागळे,भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले,प्रफुल्ल डावरे,साहेबराव वाबळे,रामेश्वर सोमाणी,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,पुरुषोत्तम भराटे,बाळासाहेब दाणी,रविंद्र कोळपकर,राहुल माळवदे,योगेश पवार,मोहसिन सय्यद,दादासाहेब कुताळ,अजिज शेख,पत्रकार देविदास देसाई,विष्णूपंत डावरे, दिलीप दायमा,लक्ष्मण शिंदे,नितीन शर्मा,गणेश बंगाळ,बाबूलाल पठाण,सचिन वाघ,राकेश कुंभकर्ण,विशाल आंबेकर,महेश कु-हे,अमोल गाडे,बाळासाहेब शेलार,प्रकाश मेहेत्रे,राज गुडे,ग्रामपंचायत कर्मचारी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.






MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget