बेलापुर (प्रतिनिधी )-बाल वयातच ज्याचे पालकत्व हरवले तोच व्यक्ती वयाच्या १९ व्या वर्षी अनेक अनाथांचा नाथ बनला असुन समाजातील दानशुर व्यक्तींनी या चांगल्या समाज कार्यास हातभार लावावा असे अवाहन जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे .बेलापुर येथील गोखलेवाडी येथे १९ वर्ष वय असणारे ह भ प कृष्णानंद महाराज यांनी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम सुरु केला असुन आज या आश्रमात १३ अनाथ मुले मुली शिक्षण घेत आहे आश्रमाचा दर महा खर्च हा ३५ हजार रुपये असुन कृष्णानंद महाराज हा खर्च किर्तन प्रवचन करुन भागवत आहे परंतु कोरोनामुळे किर्तन प्रवचन बंद पडले त्यामुळे त्यांनी आपल्याकडील असलेले चार चाकी वाहन विकुन मुलांचा खर्च भागविला गावकंरी मंडळाचे नेते जि प सदस्य शरद नवले बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे गांवाकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी सामाजिक कार्याची जाण ठेवुन गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्याकडून वर्गणी जमा करुन या अनाथ आश्रमास मदत करण्याचा निर्णय घेतला व जमा झालेले सतरा हजार पाचशे रुपयाचा निधी दिपावलीच्या दिवशी कृष्णानंद महाराजाकडे सुपुर्त करण्यात आला या वेळी सरपंच महेंद्र साळवी यांनी देखील बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने जी मदत करता येईल ती सर्वा मदत करण्याचे अश्वासन दिले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आश्रमास पाच गुंठे जागा विनामोबदला दिल्याबद्दल प्रकाश मेहेत्रे व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले. या वेळी जालींदर कुऱ्हे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,दिलीप दायमा,प्रकाश मेहेत्रे,रावसाहेब अमोलिक,मुस्ताक शेख,वैभव कु-हे,गणेश बंगाळ,दादासाहेब कुताळ,महेश कु-हे,शफीक बागवान,नामदेव मेहेत्रे,अकबर सय्यद,अजिज शेख,आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी प्रकाश मेहेत्रे यांनी आभार मानले.
Post a Comment