Latest Post

दतनगर- मा. खा. डाॅ. सुजयदादा विखे पाटिल, यांच्या सकंल्पनेतुन, दतनगर ग्रामपंचायत, व ग्रामस्थ यांच्या सयुंक्त विदयमाने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर रेणुकानगर संत गोरोबा काका मदिंर या ठिकानी उस्पुर्थ प्रतीसाद दर्शवुन तरूण युवक व महिला यांनी ही रक्तदान करुन एक सामाजिक कार्यास सहभाग नोदवला, रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान होय, कोविड काळात अनेक रुग्ण यांना रक्ताची अवशक्ता भासली, अनेक रुग्ण यांचे जिवदान करीता, रक्तदान करण महत्वपूर्ण होय, दतनगर ग्रामपंचायत चे लोक नियुक्त सरपंच मा.सुनिल भाऊ शिरसाठ, मा.प्रेमचंद कुंकूलोळ उपसरपंच, दतनगर ग्रामपंचायत चे विदयमान सदस्य, मा.बाळासाहेब विघे, माजी सदस्य मा.रविद्र गायकवाड़, मा. सुरेश जगताप (सदस्य) यांनी रक्तदान करुन प्रथम सुरुवात केली, यास प्रतीसाद दर्शवुन तरूण नवनिर्वाचित रूजु झालेले मा.निलेशजी लहारे पाटिल (दतनगर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक) यांनी ही रक्तदान करुन सामाजिक योगदान देवुन एक ग्रामसेवक आपल्या गावातील या उपक्रमला कस स्वरूप दिल, दर्शवल आहे, या प्रसंगी उपस्थित मान्यवर मा.भगवान सेठ कुकूलोळ, मा. रमजान भाई बागवान (सदस्य) मा. अरूण वाघमारे (सदस्य) मा. प्रदिप गायकवाड़ (सदस्य) मा.आनंद(भैया) चावरे, मा. ईद्रजीत गायकवाड़, रेणुकानगर परीसरातील युवक वर्ग, महिला वर्ग, यांनी नेत्र तपासणी करुन घेतली, डाॅ.विखे पाटिल मेमोरियल हाॅस्पिटल विळदघाट अहमदनगर, स्टाफ यांच सरपंच व उपसरपंच यांनी अभिनंदन केले, आभार व्यक्त अशोक लोढे यांनी केले, हा उपक्रम यशस्वी सर्व स्टाफ व दतनगर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच मनपुर्वक अभिनंदन करतांना, सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच मनपुर्वक आभार व्यक्त राजेन्द्र गायकवाड़ यांनी मानले,

अहमदनगर : जिल्ह्यातील नगर-मनमाड, नगर-पुणे,लोणी-संगमनेर या महामार्गावर,अनेक वाहन चालकांना अडवून, त्यांना हत्याराचा धाक दाखवून लुटमार केल्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल आहेत, या सर्व गुन्ह्याचा तपास लावण्याचे मोठं आवाहन पोलीस प्रशासनावर असतांना. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असतांना. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठं यश आले आहे. ज्यात नगर मनमाड महामार्गावर झालेल्या रस्तालुट प्रकरणी आरोपी नितीन मच्छिन्द्र माळी, वय वर्ष २२ राहणार मोरे चिंचोरे, राहूरी, गणेश रोहीदास माळी, वय वर्ष २१ राहणार खडकवाडी, मूळा डॅम जवळ, राहूरी, रवि पोपट लोंढे, वय वर्षे २२ राहणार घोडेगाव,नेवासा, निलेश संजय शिंदे, वय वर्षे २१ राहणार पारिजात चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर व एका अल्पवयीन साथीदार अशा ४ प्रौढ, एका अल्पवयीन सराईत आरोपीस, १ लाख ९५ हजारांच्या मुद्देमालास ताब्यात घेतले असून. सदर आरोपींनी मागील दोन महिन्यांच्या कालावधीत, नगर-पुणे रोड, सुपा शिवार, नगर-मनमाड रोड व संगमनेर- लोणी रोड,या ठिकाणी वाहन चालकांना अडवून, ७ लुटमारी केल्याची कबुली दिल्याने, ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. यासह या रस्तालुटीच्या गुन्ह्यातील ३ फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार यांच्या सुचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्ष, गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोलीस नाईक शंकर लोढे, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने, आकाश काळे, राहूल सोळंके, सागर ससाणे, रणजित जाधव, रोहित येमूल, सागर सुलाने, माच्छिद्र बर्डे उमाकांत गावडे, बबन बेरड आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.


बेलापुर  (विशेष प्रतिनिधी  )-कडक लाँकडाऊन बाबत सध्या मिडीयामध्ये फिरत असलेली चर्चा चुकीची असुन नागरीकांनी अशा अफवावर विश्वास ठेवु नये असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे    सोमवार पासून पुन्हा कडक निर्बंध होणार ३१ जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्याचे  निर्बंध अशा मथळ्याची वृत्तपत्रातील   बातमी सध्या सर्वत्र पसरवली जाता आहे या वृत्तामुळे नागरीक व्यापारी कारखानदार उद्योजक यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे या बाबत वस्तूस्थिती समजुन घेण्यासाठी बिनधास्त न्यूजचे संपादक असलम बिनसाद यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याशी संपर्क साधुन या वृत्ताबाबत नागरीकात गोंधळाचे वातावरण तयारा झाले असुन शासनाची भूमिका काय आसे विचारले असता उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की

सोमवार पासून कडक निर्बंध लागू होणार असे वेत्तपत्राचे कात्रण सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे परंतु अजुन तरी कडक निर्बंधाबाबत शासन स्तरावर कुठल्याही सूचना नाहीत तरी नागरीकांनी अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच अशा अफवा सोशल मिडीयावर पसरु नये अशा अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळावेत मास्क हे सक्तीचे  असुन विना मास्क बाहेर पडू नये गर्दीची ठिकाणे टाळावीत काही त्रास जाणवला तर वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी विनाकारण घाबरुन जावू नये असे अवाहनही प्रांताधिकारी पवार यांनी केले आहे च  चार वाजेनंतर कडक लाँकडाऊन होणार अशी अफवा.

श्रीरामपूर( प्रतिनिधी)आज दि.  29/09/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  गोंधवणी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. 

आरोपी. क्र.) 1 अशोक काशिनाथ शिंदे 

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2500/- रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2. अशोक सिताराम गायकवाड

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3.  राजेंद्र फुलारे

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4.   दिलीप नाना फुलारे

28,000/-  रु. कि.चे 400 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

2000/- रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी  दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 5.   सुरेश फुलारे

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3500/- रू  किमतीची 35  लिटर तयार गावठी हातभट्टी   दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

---------------------------------------------

 एकूण 2,13,500/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पो. स्टे. गु.र.नं.III 568,569,570,571,572, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भल्या पहाटे अचानक केलेल्या या कारवाईमुळे  श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे सर्व स्तरातून Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक होत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके Psi ऊजे, ASIराजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, श्याम बनकर, आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरी, गौतम दिवेकर आर. सी. पी. पथक श्रीरामपूर आदींनी केली.

राहुरी (प्रतिनिधी )-खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी कान्हू गंगाराम मोरे  वय 42 हा नगर येथील शासकीय रुग्णालयात आजारावर उपचार घेत असताना पोलिसांच्या तावडीतून पसार झाला.करोना बाधित  झाल्याने त्यास राहुरी तुरूंगातून उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते. मोरे यास मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला नगर येथील शासकीय रुग्णालयातून पुणे येथे उपचारासाठी घेवून जाण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र या वेळेतच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. ही घटना काल शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून मोरे हा पसार झाल्यानंतर कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या रडारवर जिल्ह्यासह बाहेरील रूग्णालये आली आहेत. मोरे हा राहुरीतील  पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी आहे. दातीर यांचा खून केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे चारही आरोपी राहुरी येथील तुरूंगात होते. तेथे मोरे यास करोनाने गाठल्यानंतर त्याला नगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेही त्याला मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने मोरे यास पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात येणार होते. यातच तो पसार झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राहुरी (प्रतिनिधी)-माजी आमदार जनतेची दिशाभूल करत आहे.खोटी पाणी योजना मंजूर करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम माजी आमदारांनी केले. तर येणाऱ्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी राहुरी नगरपालिकेला येणार असून निवडणुकी दरम्यान दिलेल्या जाहीर नामा प्रमाणे सर्व कामे मार्गी लागणार असल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी घोषणा केली.

        राहुरी शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, ना. विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, डॉ. सौ. उषाताई तनपुरे शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, राहुरी पालिकेचे नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष नंदाताई उंडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहु कानडे, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन सदस्य धनराज गाडे, ज्ञानदेव वाफारे, सौ. सोनालीताई तनपुरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदा खुळे युती अध्यक्ष तृप्ती येवले आदी व्यासपीठावर होते.

      यावेळी नगरसेवक प्रकाश भुजाडी, सूर्यकांत भुजाडी, ज्योती तनपुरे, अशोक आहेर, विलास तनपुरे, नंदू तनपुरे अॅड. राहुल शेट, महेश उदावंत, नगरसेविका ज्योती तनपुरे, अनिता पोपळघट, इंद्रभान थोरात, दिलीप चौधरी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, अशोक कदम, शरद तनपुरे आदी उपस्थित होते.



श्रीरामपूर : आजकाल विवाह जमविणे अतिशय क्लेषदायक प्रक्रिया झालेली आहे.त्यात दिव्यांगाची वैवाहिक जीवनाची घडी बसवितांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन श्री.संजय साळवे यांनी मागील 20 वर्षापूर्वी दिव्यांग वधू वर सूचक केंद्राची श्रीरामपूरात स्थापना केली व त्या माध्यमातून आजतागायत राज्यातील 272 दिव्यांग व्यक्तीचे विवाह जमविले व संसारात देखील यशस्वी केले.याबरोबरच 18 दिव्यांग व्यक्तीचे नाॅर्मल व्यक्तीशी आंतरजातीय विवाह यशस्वी केले. चि.सौ.कां.सविता भालेराव ( कर्णबधिर ) व चि.राजेंद्र जाधव ( नाॅर्मल ) यांचा आंतरजातीय विवाह श्री.संजय साळवे यांनी आज यशस्वी केला आहे.अपंग सामाजिक विकास संस्थेचा दिव्यांग वधू वर सूचक केंद्र प्रकल्प दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींच्या पालकांकरिता अतिशय दिलासादायक व दिशादर्शक  ठरत आहे.असे प्रतिपादन अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना आयोजित दिव्यांग नाॅर्मल शूभविवाह कार्यक्रम प्रसंगी आ.लहू कानडे यांनी केले.

         अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या वतीने मातोश्री मंगल कार्यालय यां ठिकाणी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.कार्यक्रम प्रसंगी रोटरी एज्यूकेशन ट्रस्टचे चेअरमन सूरेश पा.बनकर,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,चेअरमन संजय साळवे,आसान दिव्यांग संघटनेच्या महिला राज्याध्यक्ष सौ.स्नेहा कूलकर्णी,राज्य उपाध्यक्ष सूनिल कानडे,मूकबधिर विद्यालयाचे मूख्याध्यापक संतोष जोशी,संत तेरेजा चर्चचे प्रमूख धर्मगूरू फा.सूरेश साठे,काँग्रेसचे तालूकाध्यक्ष अरूण पा.नाईक,ज्ञानेश्वर मूरकूटे,संत लूक हाॅस्पिटलच्या संचालिका सि.फिलोमिना चालील,व्यवस्थापिका सि.मेरी डार्लिल,मेट्रन सि.फातिमा मेरी यांची प्रमूख उपस्थिती होती.

          याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती देतांना मागील 16 वर्षापासून दर वर्षी मोफत राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर परिचय मेळावा आयोजीत केला जात आहे.कोरोना महामारीच्या संकटामूळे मेळावा आयोजीत करता येत नाही परंतू विवाह जमविण्याचे पवित्र कार्य मात्र थांबलेले नाही.कोरोना काळात देखील 16 विवाह जमविण्यात आली आहेत.मानव जातीवर संकटे येतच राहतील परंतू जीवन रहाटी थांबवून चालनार नाही.त्यामूळे दिव्यांगा करिता अहोरात्र सेवाधर्म हा सूरूच राहणार आहे.सदरचा विवाह अहमदनगर येथील रजिष्टार आॅफिसमध्ये नोंदणीक्रूत पध्दतीने करण्यात आला तदनंतर श्रीरामपूर येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सदर जोडप्यास जि.प.समाज कल्याण विभागाची दिव्यांग सदृढ विवाह योजनेचे 50 हजार रूपयांचे अनूदान प्रस्ताव दाखल करण्यात येइल

         याप्रसंगी संत तेरेजा चर्चचे प्रमूख धर्मगूरू यांनी सूखी व समाधानी वैवाहिक जीवनांची त्रिसूत्री सांगितली.नवविवाहित व संसारिक लोकांनी विवाह पवित्र बंधन मानून सूसंस्कारित पिढीची पायाभरणी करणे आवश्यक आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय साळवे,वर्षा गायकवाड, सौ.मिना भालेराव,श्री.भगवान भालेराव,श्री.तूळशीराम जाधव,तेलधूने परिवार,सौ.श्रूती जाधव इ,नी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भालेराव यांनी केले तर आभार सौ.मनिषा भालेराव यांनी मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget