निवडणुकीदरम्यान दिलेल्या जाहीरनाम्या प्रमाणे सर्व कामे येणाऱ्या काळात मार्गी लागणार- ना. तनपुरे.

राहुरी (प्रतिनिधी)-माजी आमदार जनतेची दिशाभूल करत आहे.खोटी पाणी योजना मंजूर करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम माजी आमदारांनी केले. तर येणाऱ्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी राहुरी नगरपालिकेला येणार असून निवडणुकी दरम्यान दिलेल्या जाहीर नामा प्रमाणे सर्व कामे मार्गी लागणार असल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी घोषणा केली.

        राहुरी शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, ना. विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, डॉ. सौ. उषाताई तनपुरे शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, राहुरी पालिकेचे नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष नंदाताई उंडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहु कानडे, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन सदस्य धनराज गाडे, ज्ञानदेव वाफारे, सौ. सोनालीताई तनपुरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदा खुळे युती अध्यक्ष तृप्ती येवले आदी व्यासपीठावर होते.

      यावेळी नगरसेवक प्रकाश भुजाडी, सूर्यकांत भुजाडी, ज्योती तनपुरे, अशोक आहेर, विलास तनपुरे, नंदू तनपुरे अॅड. राहुल शेट, महेश उदावंत, नगरसेविका ज्योती तनपुरे, अनिता पोपळघट, इंद्रभान थोरात, दिलीप चौधरी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, अशोक कदम, शरद तनपुरे आदी उपस्थित होते.



Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget