चि.सौ.कां.सविता भालेराव ( कर्णबधिर ) व चि.राजेंद्र जाधव ( नाॅर्मल ) यांचा आंतरजातीय विवाह संपन्न.

श्रीरामपूर : आजकाल विवाह जमविणे अतिशय क्लेषदायक प्रक्रिया झालेली आहे.त्यात दिव्यांगाची वैवाहिक जीवनाची घडी बसवितांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन श्री.संजय साळवे यांनी मागील 20 वर्षापूर्वी दिव्यांग वधू वर सूचक केंद्राची श्रीरामपूरात स्थापना केली व त्या माध्यमातून आजतागायत राज्यातील 272 दिव्यांग व्यक्तीचे विवाह जमविले व संसारात देखील यशस्वी केले.याबरोबरच 18 दिव्यांग व्यक्तीचे नाॅर्मल व्यक्तीशी आंतरजातीय विवाह यशस्वी केले. चि.सौ.कां.सविता भालेराव ( कर्णबधिर ) व चि.राजेंद्र जाधव ( नाॅर्मल ) यांचा आंतरजातीय विवाह श्री.संजय साळवे यांनी आज यशस्वी केला आहे.अपंग सामाजिक विकास संस्थेचा दिव्यांग वधू वर सूचक केंद्र प्रकल्प दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींच्या पालकांकरिता अतिशय दिलासादायक व दिशादर्शक  ठरत आहे.असे प्रतिपादन अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना आयोजित दिव्यांग नाॅर्मल शूभविवाह कार्यक्रम प्रसंगी आ.लहू कानडे यांनी केले.

         अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या वतीने मातोश्री मंगल कार्यालय यां ठिकाणी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.कार्यक्रम प्रसंगी रोटरी एज्यूकेशन ट्रस्टचे चेअरमन सूरेश पा.बनकर,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,चेअरमन संजय साळवे,आसान दिव्यांग संघटनेच्या महिला राज्याध्यक्ष सौ.स्नेहा कूलकर्णी,राज्य उपाध्यक्ष सूनिल कानडे,मूकबधिर विद्यालयाचे मूख्याध्यापक संतोष जोशी,संत तेरेजा चर्चचे प्रमूख धर्मगूरू फा.सूरेश साठे,काँग्रेसचे तालूकाध्यक्ष अरूण पा.नाईक,ज्ञानेश्वर मूरकूटे,संत लूक हाॅस्पिटलच्या संचालिका सि.फिलोमिना चालील,व्यवस्थापिका सि.मेरी डार्लिल,मेट्रन सि.फातिमा मेरी यांची प्रमूख उपस्थिती होती.

          याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती देतांना मागील 16 वर्षापासून दर वर्षी मोफत राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर परिचय मेळावा आयोजीत केला जात आहे.कोरोना महामारीच्या संकटामूळे मेळावा आयोजीत करता येत नाही परंतू विवाह जमविण्याचे पवित्र कार्य मात्र थांबलेले नाही.कोरोना काळात देखील 16 विवाह जमविण्यात आली आहेत.मानव जातीवर संकटे येतच राहतील परंतू जीवन रहाटी थांबवून चालनार नाही.त्यामूळे दिव्यांगा करिता अहोरात्र सेवाधर्म हा सूरूच राहणार आहे.सदरचा विवाह अहमदनगर येथील रजिष्टार आॅफिसमध्ये नोंदणीक्रूत पध्दतीने करण्यात आला तदनंतर श्रीरामपूर येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सदर जोडप्यास जि.प.समाज कल्याण विभागाची दिव्यांग सदृढ विवाह योजनेचे 50 हजार रूपयांचे अनूदान प्रस्ताव दाखल करण्यात येइल

         याप्रसंगी संत तेरेजा चर्चचे प्रमूख धर्मगूरू यांनी सूखी व समाधानी वैवाहिक जीवनांची त्रिसूत्री सांगितली.नवविवाहित व संसारिक लोकांनी विवाह पवित्र बंधन मानून सूसंस्कारित पिढीची पायाभरणी करणे आवश्यक आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय साळवे,वर्षा गायकवाड, सौ.मिना भालेराव,श्री.भगवान भालेराव,श्री.तूळशीराम जाधव,तेलधूने परिवार,सौ.श्रूती जाधव इ,नी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भालेराव यांनी केले तर आभार सौ.मनिषा भालेराव यांनी मानले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget