Latest Post

जबरी चोरी प्रकरणाची Dysp संदिप मिटके यांच्या कडून गंभीर दखल

दिनांक 18/ 7 /2021 रोजी मध्यरात्री देवळाली प्रवरा येथे झालेल्या जबरी चोरी व घरफोडीचे प्रकरणाची Dy.s.p संदीप मिटके यांनी गंभीर दखल घेत देवळाली प्रवरा दूरक्षेत्र चे अधिकारी व अंमलदार यांच्या तडकाफडकी बदल्या करून त्यांचे जागी नवीन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.देवळाली प्रवरा सह इतर 32 गावातील कामकाज या विषयावर  देवळाली प्रवरा नगरपरिषद येथे आमदार लहू कानडे  यांनी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीदरम्यान देवळाली प्रवरा येथे झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने आमदार लहू कानडे व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचेत  चांगलीच खडाजंगी झाली होती सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत Dy.s.p.संदीप मिटके यांनी देवळालीप्रवरा चे सर्व अधिकारी व अंमलदार यांची तात्काळ बदली करून त्यांचे जागी नवीन अधिकारी आणि अमालदर यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत

यांची झाली बदली

PSI मधुकर शिंदे

Asi टिक्कल

Pn  जानकीराम खेमनार

PC  गणेश फाटक

Pc  अमोल पडोळे

Pc  किरण ठोंबरे

नवनियुक्त अधिकारी कर्मचारी

Psi निलेश वाघ

Hc प्रभाकर शिरसाठ

Pn  वैभव साळवे

Pc सुरेश भिसे,  महेंद्र गुंजाळ,  सागर माळी,  शहामद शेख.

श्रीरामपूर शहर पोलिसांन कडे दिनांक 23 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी पोलिसांच्या  मारहाणीत एका युवकाचा हात फॅक्चर होऊन मोठी दुखापत झालेली आहे.या घटनेची सीसीटीव्ही फुटेज हे माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली होती. मात्र सदर अर्जाची माहिती मुदतीमध्ये देण्यात आली नाही त्यामुळे अपील दाखल करावी लागली. प्रथम अपीलीय अधिकारी याच्याकडे अपील करण्यात आले यावेळी दोन्ही बाजूने माहिती घेत अपीलार्थी यांच्या बाजुने निकाल दिला व सदर प्रकरणी सुनावणी करुन दि. 05.07.2021 रोजी आदेश जरी करण्यात आला.  तात्काळ माहिती ही विनामूल्य देण्याचे आदेश जारी केले.  मात्र श्रीरामपूर शहर पोलिस निरीक्षक यांनी आदेशाला केराची टोपली दाखवत आज १७ दिवस उलटले तरी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. साहेबांना भेटा,साहेबांची सही आजून झलेली नाही.  सदर माहिती अधिकारी हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून माहिती लपवण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही अपेक्षा घेऊन.मी लवकरच श्रीरामपूर पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या विरोधात अहमदनगर जिल्हा पोलीस कार्यालय या ठिकाणी लवकरच उपोषण करणार आसल्याची माहिती असलम बिनसाद यांनी दिली आहे.

"" ईद-उल-अजहा '"म्हणजे फक्त आपल्या भारतातच त्यालाच " बकरी ईद '" म्हणतात .   ".कुरबानी ईद "" म्हणून ही बोली भाषेत प्रसिद्धी आहे. आणि भारतातील खुप कॅलेंडर मधे त्याला बकरी ईद म्हणून च प्रसिद्धी देवून टाकतात ,पण असे नाही आहेत ,ईद अल अजहा ही ईद फार पवित्र ईद आहेत .. या दिवसाचे फार महत्त्व पवित्र आहे .

         ५पांचहाजार वर्षे पुर्वी प्रेषीत इब्राहिम अलैहिससलाम .यांना अल्लाह ने स्वपनामधे आज्ञा केली की, तुझं सर्वात प्रिय जे काही आहे ते कुरबान करं , तदनंतर हजरत इब्राहिम अलै.यांनी खुप विचार केला. काय आहे अपलं सर्वात प्रिय .तर डोळ्यांसमोर विज कपकपावी तसं झालं , लख्खप्रकाश पडाव तसं झालं , समोरच एकुलता एक मुलगा हजरत इस्माईल अलै. त्यांच्या डोळ्यासमोर  होते . आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी अगदी उतारवयात जन्म झालेला एकुलता एक मुलगा , ज्यासाठी अल्लाहा रबबुल आलमीन जवळ कित्येक वेळा दुआ करून अल्लाहाच्या आशिर्वादाने झालेल्या मुलाला अल्लाहा त्याची कुरबानी मागतात .

            एकप्रकारे अल्लाहा कडून परीक्षाच होती ती . 

          क्षणाचाही विचार न करता हजरत इब्राहिम अलै.नी हा विचार आपल्या पत्नीला व एकुलता एक भर जवानीत आलेल्या मुलाला हजरत इस्माईल अलै . यांना बोलावुन अल्लाहा रबबुल आलमीन ची ईच्छा सांगतात . तो आज्ञाधारक मुलगा हजरत इस्माईल अलै . आपल्या वडिलांच्या आज्ञाला लगेच यत्किंचितही विचार न करता लगेच अल्लाहा रबबुल आलमीन ची ईच्छाच असेल तर , होकार देतात .....

तारीख असते जिलहिजजा १०,मीनाचं मैदानात ,एक वयोवृद्ध वडील आपल्या उतारवयातील काठी ज्याला म्हणतात अशा आपल्या काळजाच्या तुकड्यांला घेवून कुरबानी साठी तयार करून नेतात.

 काय घडी असेल ती .......मन स्तंभ होवून जातं........हा विचार करून...

               अल्लाहा कडून परीक्षाची घडीच होती  ती...

अल्लाहा रबबुल आलमीन च्या परीक्षा साठी

हजरत इब्राहिम अलै. तययार होतात. डोळ्याला पट्टी बांधून कुरबानी साठी आपल्या मुलांवर सुरी चालवण्यासाठी जातात तेवढ्यात अल्लाहा ने काही क्षणातच चमत्कारिक घडावं तसं  पापणीच्या उघडझाप होण्याच्या आधीच तेथे हजरत जिब्राईल अलै.यांच्याद्वारे  एक दुमंबा (,मेंढा) पाठवून . त्या दुमंब्याची कुरबान दिली . काही वेळा ने हजरत इब्राहिम डोळ्यावरील पट्टी काढून बघतात आश्चर्य च बघावयास मिळते .हजरत इब्राहिम कृतज्ञता व्यक्त करतात .

अल्लाहा  कडून मानव जातीला एक उदाहरण होते.

   ...जगाच्या पाठीवर एक ऐतिहासिक कुरबानी होती ती. 

अल्लाहा ने हजरत इब्राहिम अलै.व हजरत इस्माईल अलै यांची सत्व परीक्षा बघून .. समस्त मानवजातीसाठी धडाच  दिला.

          तदनंतर आजपर्यंत  लोकांकडून त्याची आठवण म्हणुन व समस्त जगातील मुस्लिम ज्यांची कुरबानी करण्याची ऐपत आहे ते  कुरबानी करतात..त्यामधे तीन हिस्से करून एक वाटा आपल्या साठी ,ऐक वाटा मित्रगण व नातेवाईक व तीसरा वाटा गोरगरिबांसाठी वाटून देण्यात येते ....

                      त्याचप्रमाणे कुरबानी म्हणजे फक्त रक्त सांडून न होता आपले मनातील वाईट भावना , विचार ,आचार यांचं ही सोडून देणं होय ....व चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणे ही .....ही पवित्र भावना ही असते....

              तसेच काही धनिक वर्ग हाज यात्रेला जावून करतात ."" .हाज यात्रा .....""".

ज्यांच्याकडे मुलाबाळांचे सर्व खर्च भागून जो पैसा शिल्लक राहिलेला आहे त्या पैशातून हाज ला जाण्यासाठी एवढी रक्कम आहे त्यांनी ' हाज 'करणे , आयुष्यात एक वेळा पैसा असलेल्यांसाठी हाज अनिवार्य केले आहेत.

   ऊर्द महिन्याचा १२वा महिना जिल-हिजजा ,या जिलहिजजा  महिन्यातील ता.८ ,९ १० ,११ ,१२,  असतात . हाजी. लोकं  ता. ८ जिलहिजला मक्का च्या काबागृहामध्ये अंगावर पांढरेशुभ्र वस्त ्गुंडाळून, लपेटून  पुरुष असो स्त्री असो अंगाला  पांढरा शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करून पुरुष अडीच ते तीन मीटर लांब कपडा आपल्या सर्व अंगात गुंडाळून व स्त्रिया पांढरा शुभ्र ऐहराम चा कपडा  परीधान करून येतात त्यांस''  ऐहराम "' असे म्हणतात .

                          ऐहेराम पांघरूण , '" आल्लाहा मी हजर आहे ,।। आल्लाहा मी हजर आहे।। आल्लाहा  मी हजर आहे  ।।। 

आशा मंजुळ स्वरांचा निनाद  दुमदुमत रात्रंदिवस  मक्केमध्ये  हाजमय वातावरणात  मीना नावाच्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या"  आराफात  " या पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहोचतात .९ नऊ जिलहिज हे  हाज  चा प्रमुख मुख्य दिवस असतो .

                       तर सर्व हाजी सकाळी बाराच्यासुमारास  पवित्र ऐतिहासिक मैदानात पोचून " मस्जिद ऐ नमराह  ' येथे जोहरची नमाज अदा करतात .आपल्या पापांची क्षमा ,करुणा ,मागतात . मुला-बाळांसंबंधी , नातेवाईकासंबंधी आपल्या देशासंबंधी त्याठिकाणी दुआ मागतात .

त्याठिकाणी जगातील विविध देशातून आलेले विविध भाषिक जवळपास ३५६४ बोलीभाषा  बोलल्या जातात , आशा कित्येक ठिकाणाहून आलेले हाजी  एकाच आराफात च्या पवित्र मैदानामध्ये एकत्र जमून  कोणीही उच्य नाही, कोणी गरीब नाही ,कोणी काळा नाही व कोणी गोरा नाही  सर्व लेकरे आल्लाहाची आहेत.सर्व माणसं सारखीच  30 ते 40 लाख लोक एकाच रांगेत अल्लाच्या छताखाली बसून अल्लाहच्या आदेशाचे पालन करतात, एकाच भाषेच्या कुरआन मजीद मधे सांगितलेल्या आदेशाचे पालन करतात. रडून-रडून, व्याकुळ होऊन,ऊर बडवून अल्लाहा जवळ आपण केलेल्या कळत-नकळत पापांची  माफी मागतात .आल्लाहा जवळ पाप मुक्तीची प्रार्थना करतात.

           ३ मार्च ६३२ या दिवशी हजरत प्रेषित मोहम्मद सल्ल. यांनी " मानवी कल्याणासाठी जगप्रसिद्ध ऐतिहासिक  ( Historical Farewell Pilgrimage Speech)  म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यालाच हाजजतुल विदाह खुतबा दिलेला आहेत .

अल्लाहचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल. यांनी मक्का विजयानंतर आपल्या ' जीवनाची अंतिम हाज' यात्रेला आपल्या पत्नीसह सुमारे एक लाखापेक्षा जास्त सहाबा व अनुयायी सह "  3मार्च ६३२ '

 '  आराफात " या मैदानात  दाखल झाले . लोकं हजरत प्रेषित यांना बघून उत्साहाला सिमाच राहिली नाही. भक्तीच्या सागरात लोटलेल्या लोकांना  प्रेषित मुहम्मद स्व.यांच्या प्रवचनची ओढ  क्षणाक्षणाला लागलेली होती. 

                            प्रेषित हजरत सल्ल.  यांनी  टेकडीवर चढून  खूतबा  Historical speech देण्यास प्रारंभ केला, 

                        "  सर्व स्तुतीसुमनं ही फक्त अल्लाहासाठी आहे . व  मी असे घोषित करतो की आल्लाहा  हा केवळ एकच आहेत , व प्रेषित मोहम्मद स्व.  शेवटचे प्रेषित (नबी व रसुल)आहेत. तुम्ही सर्व आदम ची संतान आहात. तुमचा रब हा

 एकच आल्लाह आहेत . आदम हे मातीने बनवलेले होते , परंतु तुम्ही सर्व आपापसात एकमेकांचे भाऊ , बंधु आहेत .तुम्ही सर्व मातीतूनच जन्मलेले आहेत. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे .    मानवामध्ये जात-पात , रंग ,.नसल,काळे-गोरे, वर्णदोषाला काही स्थान नहीं .

शेवटी सर्व मानवजात   ही एकाच आल्लाहाची लेकरे आहेत .त्यामुळे संयम बाळगा .तुम्ही परस्परांचे गळे कापुन श्रद्धा- हिन होवू नका . 

कोणत्याही कळ्यांचा गोऱ्यांवर अधिकार नाही व कोणत्याही गोर्‍यांचा काळ्यावर अधिकार नाही असे म्हणत तुम्ही सर्व एकच आहेत .

 हे लोकांनो , जो अपराध  करील त्याच्या खेरीज अन्यकोणावर त्या अपराधाची जबाबदारी येत नसते . व  त्यांनी केलेल्या अपराधाची त्याचा मुलगा जबाबदार असत नाही व मुलाने केलेल्या अपराधासाठी त्याचा बाप जबाबदार असंच नाही ;

   त्यामुळे खून खराबा पासून सावध राहा,  दूर राहा , तुम्ही परस्परांचे गळे कापून श्रद्धाहीन होऊ नका , कायम अल्लाहाचे भय बाळगा.आल्लाहा सगळे काही बघत आहे .

         तुम्ही कष्टाने काम करून खाणारे अल्लाहाला जास्त प्रिय आहेत .

        त्यामुळे तुम्ही जे काही हाराम काम करता आहेत उदा.  सट्टा खेळणे , व्याज देणे -घेणे, दारू पिणे ,पाडणे.चोरी -लूट करणे, इत्यादी हाराम कामापासून अलिप्त रहा, सावध रहा ,दूर रहा .

         कष्ट करणारे आल्लाहाजवळ जास्त प्रिय आहेत .

              जर तुम्ही एखाद्यास ऊधार मदत केली असेल तर त्याच्याकडून व्याज व जास्तीचे पैसे घेऊ नका त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा ; 

         जर तुम्ही कर्ज दाराजवळ एवढे पैसे नसतील तर तुम्ही त्याला माफ करा , संपूर्ण पैसे माफ करा. अशा करण्यामुळे आल्लाहच्या कृपाप्राप्त व्हाल. 

       वारसांना वारसाहक्क लवकरात लवकर द्या . 

       महिला या अल्लाहाच्या' "" अमानती'"  आहेत त्याबद्दल अल्लाहचे भय बाळगा, त्यांना त्रास देऊ नका ,त्यांचा योग्य सांभाळ करा ,त्यांचे जे काही हक्क असतील ते सर्व हकक लवकर देऊन टाका. त्यांच्या विरासतीतील  हिस्सा जो असेल तर लवकर देऊन टाका .ते विरासतीमधील हिस्सेदार आहेत .त्यांच्या बरोबर योग्य ज्ञाय करा ,इंसाफ करा. त्यांना तुम्ही अल्लाच्या जामीनावर  स्विकारलेली आहेत .

         तर तुमचे तुमच्या पत्नीवर अधिकार आहेत ,; आणि तसेच तुमच्याप्रमाणे तुमच्या पत्नीचे तुमच्यावर अधिकार आहेत तर त्यांचे अधिकार द्या. त्यांना योग्य प्रकारे वागवा ,त्यांचा संभाळ योग्य प्रकारे कारा.  त्याची तमा बाळगा. आल्लाहा  सर्व काही बघत आहेत. कयामतच्या  दिवशी तुम्हाला  हिशोब द्यायचा आहे ; तर तुम्ही त्या दिवसाची आठवण ठेवा ..

     हे लोकांनोंं,  माझे म्हणणे.,(खुतबा), काळजीपूर्वक  ऐकावे ,कारण  या वर्षांनंतर मी तुमच्यात असेल किंवा नसेल हे मी सांगू शकत नाही .

        तुमचे प्राण वित्त ,अंतिम निर्णय  हा कयामतच्या दिवसापर्यंत पवित्र व अतुलनीय आहेत ..

                    लक्षात ठेवा शेवटी तुम्हाला आल्लाहासमोर हजर व्हायचे आहेत , तोच तुमच्या सार्‍या स्वर्गीय व नरकाच्या  हिशोब बांधणार आहेत..

         लोकांनों ,मी माझे जीवन कार्य पूर्ण केलेले आहेत मी माझ्या आल्लाहाचा कुरआन मजिद  व त्यांच्या प्रेषितांचे सुन्नत(हादीस) तुम्हांसाठी सोडून जात आहेत.     तर त्यास श्रद्धेने व  आपल्या जीवनामधे  त्यांच्यावर अंमल करा,अंमलात आणा ,  तुम्ही सरळ मार्ग कधीही सोडू नका ,तुम्ही आल्लाहच्या मार्गावर चला. व सर्व जगात हा संदेश पाठवा ''. 

                             प्रेषितांचे  हे प्रवचन , संदेश ऐकून लाखोंच्या संख्येने त्यांचे मित्रगण (सहाबा , रजि.)  ढसाढसा रडू लागले व तिथूनच आपल्या लाडक्या प्रेषितांचे लोक कल्याणकारी  संदेश घेऊन जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात   ज्यांना जेथे जेथे मार्ग भेटले तेथे तेथे अनुयायी( सहाबा) व त्यांनाही मानणाऱ्या संतांनी ,वलींनी , पीर ,व ईतर धर्म प्रचारक  असतील त्यांनी ईसलाम व प्रेषीतांचा लोककल्याणकारी संदेश शांतपणे ,शांतबद्ध रितीने प्रसारित केला.व आजही करीत आहेत ..... 



लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.

बैतुशशिफा दवाखाना, श्रीरामपूर

९२७१६४००१४,.

बेलापूर वार्ताहर,कासम शेख व त्यांचे सहकारी यांची महाराष्ट्र लघुवृत्तपत्र पत्रकार संघात बेलापुर चे माहिती व कायद्या या मासिक व्रत्त पत्राचे  प्रतिनिधी यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ यामध्ये नवनिर्वाचित पदांची निवड झाल्याने इलेक्ट्रॉनिक मिडीया जिल्हा अध्यक्ष श्री असलम बिनसाद यानी सदिच्छा भेटी दरम्यान त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच शितल टाइम्स चेउपसंपाद सुहास शेलार यांचाही सत्कार करण्यात आला.निवड झालेले पदाधिकारी,बेलापूर शहर प्रमुख एजाज सय्यद,उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद,शहर संघटक मुसा सय्यद तालुका अध्यक्ष कासम शेख यांचाही सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी माहिती व कायद्याचे पत्रकार एजाज सय्यद,मोहम्मद अली सय्यद,शफिक शेख, जिल्हा प्रतिनिधी कासम शेख,तसेच समीर भाई,मजर भाई आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर :-( प्रतिनिधी)महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शहर कार्यकारिणी ची नुकतीच निवड करण्यात आली असून शहराध्यक्षपदी माहीती व कायदा या वृत्तपत्राचे प्रतिनिधी एजाज सय्यद तर शहर उपाध्यक्ष पदी मोहंमद अली सय्यद तसेच बेलापूर शहर संघटक पदी मुसा सय्यद यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी शेख यांनी श्रीरामपूर येथील पत्रकार संघाचे मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी सदरील पत्रकारांच्या कार्याचा आढावा घेता या पदांवर निवड करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहंमद,प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, किशोर गाढे, राज मोहंमद शेख जिल्हाध्यक्षसु भाषराव गायकवाड, अरुण बागुल, अमीर जागीरदार, असलम बिनसाद, विलास पठारे, अरुण त्रिभुवन, मुदस्सर पटेल, वहाब खान, उस्मान के. शेख, फिरोज पठाण, सुखदेव केदारे, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अन्वर पठाण, छबुराव साळुंखे, सूर्यकांत गोसावी, हाजी शकील शेख, अब्दुल्ला भाई चौधरी, इदरीस भाई शेख दस्तगीर शहा, शाहनवाज बेगमपूरे, सज्जाद पठाण, जीशान काझी, उगलमुगले, मिलिंद शेंडगे, अफजल खान, हनिफ भाई तांबोळी, रियाज खान पठाण, विजय खरात, गोरक्ष गाढवे, शब्बिर भाई कुरेशी, अक्रम कुरेशी, साईनाथ बनकर, अकबर भाई शेख, गुलाब भाई शेख, जावेद के. शेख, रमेश शिरसाट, हनीफ शेख, आदींनी शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर : मुस्लिम धर्मीय बांधवांचा पवित्र बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपूर्वी, पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, मुस्लिम धर्मगुरू ,तसेच समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीवेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, यांनी शासनाच्या गाईडलाईन, तसेच नियमांच्या अधीन राहून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटांचे संकट उभे असल्याने प्रतिकात्मक स्वरूपात, कुर्बाणीचा कार्यक्रम करावा आशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर, शहरातील वार्ड नंबर २ व इतर भागात पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला, यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, साह्ययक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक घायवट, पोलीस उपनिरीक्षक उजे यांच्यासह, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाच्या जवानांसह, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे ६५ कर्मचारी सहभागी झाले होते. नियम पाळण्याचे आवाहन 


पंढरपूर सोलापूर :  आषाढी एकादशीनिमित्त आज २० जुलै २०२१ रोजी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली.दरम्यान, पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात झाली होती. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना हा मान मिळाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला.  आजच्या या महापुजेला मुख्यमंत्र्यांसोबतच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी मंदिरात हजर होते.आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाले होते. यंदा आषाढी एकादशीची महापूजा ही वारकऱ्यांविनाच पार पडली. खरं तर गेली अनेक शतकं वारीची परंपरा मात्र कोरोनाचं संकटामुळे मागील दोन वर्षापासून ही परंपरा खंडित झाली. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित येणाऱ्या माऊलींच्या पादुका यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरात दाखल झाल्या. यावेळी मोजके वारकरी या पालख्यांसोबत होते. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज ओसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर). ह. भ. प. प्रकाश नवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, सदस्य, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद व अन्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget