बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनाचे पथ संचलन,नियम पाळण्याचे आवाहन.

श्रीरामपूर : मुस्लिम धर्मीय बांधवांचा पवित्र बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपूर्वी, पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, मुस्लिम धर्मगुरू ,तसेच समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीवेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, यांनी शासनाच्या गाईडलाईन, तसेच नियमांच्या अधीन राहून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटांचे संकट उभे असल्याने प्रतिकात्मक स्वरूपात, कुर्बाणीचा कार्यक्रम करावा आशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर, शहरातील वार्ड नंबर २ व इतर भागात पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला, यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, साह्ययक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक घायवट, पोलीस उपनिरीक्षक उजे यांच्यासह, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाच्या जवानांसह, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे ६५ कर्मचारी सहभागी झाले होते. नियम पाळण्याचे आवाहन 


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget