Latest Post

बेलापुर(वार्ताहर) समाजात सामाजिक काम करणाऱ्या सर्वांनाच अनुदानाचा लाभ दिला जातो मग  चौथा स्तंभ म्हणून  ओळखल्या जाणा-या पत्रकारांना मानधन का नको ? असा सवाल  महाराष्ट्र संपादक व पत्रकार सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार  आगे यांनी केला आहे .      

पत्रकार मनोज आगे यांची संपादक पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी  म्हणून निवड झाल्याबद्दल बेलापुर व परिसरातील पत्रकारांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ  पत्रकार अशोक गाडेकर  होते. तर प्रमुख आतिथी म्हणून नरेंद्र लचके,जेष्ठ पत्रकार मारुती राशिनकर  तसेच बाजार समिती संचालक सुधीर नवले उपस्थित  होते.


 सत्काराला उत्तर देताना आगे पुढे म्हणाले की,खासदार -आमदार लोकांसाठी काम करतात पोलीस अधिकारी विविध खात्यातील सरकारी कर्मचारी जनतेसाठी काम करतात त्यांना पगार मिळतो, मानधन मिळते मग पत्रकारही सतत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळेची,आपल्या जिवाची पर्वा न करता लढत असतात. यंत्रणेतील दोष जनतेसमोर आणण्याची ताकद फक्त पत्रकारातच आहे.  हे त्रिवार सत्य असतानाही सर्वांना सेवानिवृत्ती वेतन मिळते विविध क्षेत्रातील लोकांना अनुदान मिळते मग जनतेसाठी काम करणाऱ्या पत्रकार अनुदान मिळण्यापासून वंचित का ?असा सवाल करुन आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग पत्रकारांच्या हितासाठी करणार असल्याची ग्वाही त्यांनी  दिली.  जिल्ह्यातील ज्येष्ठ व ज्या पत्रकारांनी सतत पंधरा वर्षे पत्रकारिता केली अशा पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून सरकारी पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अधिस्विकृती   कार्ड मिळविण्यासाठी अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले मात्र  किचकट नियमांमुळे  शासनाचे पत्रकारितेचे कार्ड काही ठराविक पत्रकार वगळता कुणालाही मिळाले मिळू शकले नाही  ग्रामीण भागातील पत्रकारांनाही यासाठी संघटनेच्या माध्यमातून राज्याध्यक्ष किसनभाऊ  हासे याच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देवू असेही आगे म्हणाले .

यावेळी बेलापूर पंचक्रोशीतील पत्रकार व बाजार समिती , व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने  आगे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी  देविदास देसाई, प्रा. ज्ञानेश गवले ,नरेद्र लचके ,नवनाथ कुताळ बाजारा समितीचे संचालक सुधीर नवले  ,दिपक क्षत्रिय, आदिंनी मनोगत व्यक्त केले.

 अध्यक्षीय भाषणात बोलताना अशोक गाडेकर यांनी सत्कारमूर्ती मनोज आगे यांच्या पत्रकारितेतील वाटचालीची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागांतून त्यांना संधी मिळाली याबद्दल कौतुक केले.त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील समस्यांची जाणीव असल्याने त्या सोडविण्यासाठी ते  प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.  यावेळी सुनील नवले, दिलीप दायमा ,सुहास शेलार , बाबा शेख, किशोर कदम, दीपक क्षत्रीय, गोविंद साळुंके, अशोक शेलार, शरद थोरात ,अभिजित रांका, अतिश देसर्डा  उपस्थित होते.


श्रीरामपूर प्रतिनिधी- शर्टच्या वरच्या खिशात डावीकडे मोबाईल ठेवल्याने तो ह्रदयाजवळ असतो तथा ह्रदयाचे ठोके देखील वाढवतो, म्हणून वरच्या खिशात मोबाईल ठेऊ नये असे सांगितले जाते आणि ते सत्यही आहे, आणि पॅंटच्या खिशात मोबाईल ठेवल्यास पडून जाने अथवा फुटतुट होत आडचणीचे ठरते मग इतरत्र कोठे मोबाईल ठेवणार ?

यावर जालिम उपाय शोधला आहे तो श्रीरामपूर येथील सुप्रसिध्द अब्बु बॅग प्रोडक्शनचे


संचालक कलिमभाई बिनसाद यांनी,आपल्या दंडावर मोबाईल ठेवण्याची त्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे आणि ती खुपच फायदेदायी देखील आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि मोबाईल अत्यावश्यक सेवा म्हणून आपण वापरत असाल तर या पावसात आपल्या मोबाईलचा रक्षण देखील होणार आहे याकरिता अबू बॅग प्रोडक्शन मध्ये वार्ड नंबर 3 सैलानी बाबा दर्गा शेजारी उपलब्ध होतील मोबाईल नंबर 9579499909 आता त्यांचा हा अनोखा उपक्रम बघुन चित्रपटात देखील अशाच प्रकारचे दंडावर मोबाईल ठेवण्याचे उपक्रम बघावयास मिळाल्यास नवल वाटनार नाही.

श्रीरामपुर प्रतिनिधी: राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा Dy.s.p  संदीप मिटके यांनी आज रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

      संपूर्ण राज्याचे लक्ष लागून  असलेल्या तसेच पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरण प्रथमतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला.अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक 07/03/2021 रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा लक्षवेधी ठरणार होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच नगर  जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री मनोज पाटील सो  यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता त्यानंतर यातील पाच मुख्य आरोपींना अटक करून आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमिनि कार , पल्सर मोटरसायकल, हत्यार तपास कामी जप्त करण्यात आले. तपासादरम्यान एकूण 25 साक्षीदार तपासण्यात आले व एकूण 505 पानाचे सबळ पुराव्यासह आरोपी

 1) अजय राजू चव्हाण वय 26 वर्ष

2) नवनाथ धोंडू निकम वय 23 वर्ष 3)आकाश प्रकाश खाडे वय 22 वर्ष 4)संदीप मुरलीधर  हiडे वय 26 वर्ष 5) जुनेद/जावेद बाबू शेख वय 25 वर्ष यांचे विरुद्ध  Dy.s.p. संदीप मिटके यांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

*असा रचला कट*

दि.27/02/2021 रोजी ढग्याचा डोंगर ता सिन्नर येथे सदर गुन्ह्यातील  आरोपींनी एकत्र येऊन मयत गौतम झुंबरलाल  हिरण यांचे अपहरण करून त्यांना जिवे ठार मारून त्यांचे जवळील रोख रक्कम जबरीने चोरून घेऊन त्यांचे प्रेताची विल्हेवाट लावणेबाबत फौजदारी पात्र गुन्ह्याचा कट रचला होता.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- शेळीला उचलुन नेताना शेळीसह विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन अधिकाऱ्यांनी रात्री दिड वाजता विहीरीतुन सुखरुप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.बेलापुर खूर्द येथील शेतकरी रमेश निवृत्ती भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झडप घालुन शेळीला उचलून नेण्याच्या नादात विहीरीचा अंदाज न आल्याने शेळीसह बिबट्या विहीरीत पडला ही बाब भगत व त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली आसपासचे लोक जमा झाले रात्रीच्या अंधारात विहीरीत बाज सोडून शेळीला बाहेर काढण्यात आले त्या नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले कोपरगावचे वनपाल भाऊसाहेब गाढे विकास पवार गोरख सुरासे सुर्यकांत लांडे हे रात्रीच घटनास्थळी पोहोचले सकाळी बिबट्याला बाहेर काढताना गर्दी जमा होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी रात्रीच बिबट्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला रात्री एक वाजता त्यांनी विहीरीत बाज सोडली त्या बाजेवर बिबट्या बसला नंतर काही वेळाने पिंजरा सोडून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करुन अज्ञात स्थळी हलविले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- प्रवरा नदी पात्रात अनोळखी ईसमाचे प्रेत आढळून आले असुन प्रवरा नदीच्या पुलावर एक हीरो होंडा मोटारसायकल  सापडली आहे  मोटार सायकलला असलेल्या कागदपत्रावरुन संबधीत ईसमाची ओळख पटली आहे.बेलापुर येथील प्रवरा नदी पात्रात अनोळखी इसमाचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना काही व्यक्तींनी पाहीले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांना तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवीले बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे उपसरपंच अभिषेक खंडागळे रमेश अमोलीक देविदास देसाई किशोर कदम तातडीने घटनास्थळी पोहोचले याच दरम्यान प्रवरा नदीवरील पुलावर एक मोटारसायकल उभी असल्याची माहीती मिळताच हवालदार अतुल लोटके माजी सरपंच भरत साळुंके देविदास देसाई किशोर कदम यांनी प्रवरा नदीवरील पुलावर जावुन गाडीची पहाणी केली असता एम एच 17 ऐ एल 5198  ही हीरो होंडा कंपनीची गाडी  हँण्डल लाँक केलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला लावलेली आढळली  गाडीला खराब झालेला भाजीपाला तसेच वजनकाटा एक पिशवी तसेच एक डायरी आढळून आली या डायरीत शंकर उत्तम गलांडे नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्र तसेच काही फोन नंबर असलेली चिठ्ठी सापडली त्यावरुन संपर्क साधला असता शंकर  हा तीन दिवसापासुन घरी आलेला नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले  पोलीसांनी खटकाळी येथील गणेश अल्हाट नितीन जगताप दिनेश शेलार विश्वास बागुल सुरेश छल्लारे यां पोहणार्या तरुणांना बोलावुन ते प्रेत पाण्याबाहेर काढले पढेगाव येथील नातेवाईकांनी ते प्रेत शंकर उत्तम गलांडे वय वर्ष 31 याचेच असल्याचे सांगितले बेलापुर पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपुर येथे पाठवीले आहे  पोलीसांनी अकस्मात मृत्यू गुन्हा रजिस्टर नंबर 55/2021 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास हवालदार अतुल लोटके हे करत आहे.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकारांच्या संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार मनोजकुमार शंकरराव आगे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र ही संघटना राज्यातील नियमित प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांच्या प्रशासकीय पातळीवर अडचणी सोडविण्यासाठी राज्यात काम करते. संघटनेचे राज्यभर, जिल्ह्यात प्रतिनिधी असून, वृत्तपत्र तसेच संपादक व पत्रकार यांना येणाऱ्या अडीअडचणी व त्यांना शासनाकडून कशी मदत मिळून देण्यात येईल याचे काम संघटना करते.मनोजकुमार आगे हे गेल्या ३४ वर्षापासून पत्रकारितेत काम करत असून, त्यांचा अनुभव पाहता, संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे यांनी मनोजकुमार आगे यांना नुकतेच पत्र दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संपादक पत्रकार यांची संघटनेच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रशासकीय पातळीवर समस्या व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम केले जाईल असे नूतन जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे यांनी सांगितले. या निवडीचे जेष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, जवाहर मुथा, अरविंद गाडेकर, नरेंद्र लचके, यांच्यासह अनेकांनी स्वागत केले आहे

प्रतिनिधी राहुरी-आज दिनांक ७ मे रोजी खरीप हंगाम पार्श्वभूमीवर येवले आखाडा राहुरी बुद्रुक येथे आकाश शेटे यांच्या प्रक्षेत्रावर हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक व कापुस शेतीशाळेच्या वर्गाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे म्हणाले की एकात्मिक कीड व्यवस्थापन, प्रकाश सापळे,बीबीएफ तंत्रज्ञान द्वारे पेरणी याबाबींचा वापर शेतीला फायदेशीर ठरेल. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी शरदराव लांबे, शेतकरी संदीप कदम,दादा येवले, अमोल जाधव,दादा भवर,महेश येवले, शशिकांत येवले, सुनिल जाधव शेतकरी उपस्थित होते तसेच वळण येथील किसान कृषी सेवा केंद्र  येथे सोयाबीन बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गढधे व संचालक युनुस शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अरुण फुलारी, दिलिप डमाळे,विजय रूपनवर,कैलास रूपनवर आदी शेतकरी उपस्थित होते.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget