Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी- शर्टच्या वरच्या खिशात डावीकडे मोबाईल ठेवल्याने तो ह्रदयाजवळ असतो तथा ह्रदयाचे ठोके देखील वाढवतो, म्हणून वरच्या खिशात मोबाईल ठेऊ नये असे सांगितले जाते आणि ते सत्यही आहे, आणि पॅंटच्या खिशात मोबाईल ठेवल्यास पडून जाने अथवा फुटतुट होत आडचणीचे ठरते मग इतरत्र कोठे मोबाईल ठेवणार ?

यावर जालिम उपाय शोधला आहे तो श्रीरामपूर येथील सुप्रसिध्द अब्बु बॅग प्रोडक्शनचे


संचालक कलिमभाई बिनसाद यांनी,आपल्या दंडावर मोबाईल ठेवण्याची त्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे आणि ती खुपच फायदेदायी देखील आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि मोबाईल अत्यावश्यक सेवा म्हणून आपण वापरत असाल तर या पावसात आपल्या मोबाईलचा रक्षण देखील होणार आहे याकरिता अबू बॅग प्रोडक्शन मध्ये वार्ड नंबर 3 सैलानी बाबा दर्गा शेजारी उपलब्ध होतील मोबाईल नंबर 9579499909 आता त्यांचा हा अनोखा उपक्रम बघुन चित्रपटात देखील अशाच प्रकारचे दंडावर मोबाईल ठेवण्याचे उपक्रम बघावयास मिळाल्यास नवल वाटनार नाही.

श्रीरामपुर प्रतिनिधी: राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा Dy.s.p  संदीप मिटके यांनी आज रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

      संपूर्ण राज्याचे लक्ष लागून  असलेल्या तसेच पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरण प्रथमतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला.अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक 07/03/2021 रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा लक्षवेधी ठरणार होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच नगर  जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री मनोज पाटील सो  यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता त्यानंतर यातील पाच मुख्य आरोपींना अटक करून आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमिनि कार , पल्सर मोटरसायकल, हत्यार तपास कामी जप्त करण्यात आले. तपासादरम्यान एकूण 25 साक्षीदार तपासण्यात आले व एकूण 505 पानाचे सबळ पुराव्यासह आरोपी

 1) अजय राजू चव्हाण वय 26 वर्ष

2) नवनाथ धोंडू निकम वय 23 वर्ष 3)आकाश प्रकाश खाडे वय 22 वर्ष 4)संदीप मुरलीधर  हiडे वय 26 वर्ष 5) जुनेद/जावेद बाबू शेख वय 25 वर्ष यांचे विरुद्ध  Dy.s.p. संदीप मिटके यांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

*असा रचला कट*

दि.27/02/2021 रोजी ढग्याचा डोंगर ता सिन्नर येथे सदर गुन्ह्यातील  आरोपींनी एकत्र येऊन मयत गौतम झुंबरलाल  हिरण यांचे अपहरण करून त्यांना जिवे ठार मारून त्यांचे जवळील रोख रक्कम जबरीने चोरून घेऊन त्यांचे प्रेताची विल्हेवाट लावणेबाबत फौजदारी पात्र गुन्ह्याचा कट रचला होता.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- शेळीला उचलुन नेताना शेळीसह विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन अधिकाऱ्यांनी रात्री दिड वाजता विहीरीतुन सुखरुप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.बेलापुर खूर्द येथील शेतकरी रमेश निवृत्ती भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झडप घालुन शेळीला उचलून नेण्याच्या नादात विहीरीचा अंदाज न आल्याने शेळीसह बिबट्या विहीरीत पडला ही बाब भगत व त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली आसपासचे लोक जमा झाले रात्रीच्या अंधारात विहीरीत बाज सोडून शेळीला बाहेर काढण्यात आले त्या नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले कोपरगावचे वनपाल भाऊसाहेब गाढे विकास पवार गोरख सुरासे सुर्यकांत लांडे हे रात्रीच घटनास्थळी पोहोचले सकाळी बिबट्याला बाहेर काढताना गर्दी जमा होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी रात्रीच बिबट्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला रात्री एक वाजता त्यांनी विहीरीत बाज सोडली त्या बाजेवर बिबट्या बसला नंतर काही वेळाने पिंजरा सोडून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करुन अज्ञात स्थळी हलविले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- प्रवरा नदी पात्रात अनोळखी ईसमाचे प्रेत आढळून आले असुन प्रवरा नदीच्या पुलावर एक हीरो होंडा मोटारसायकल  सापडली आहे  मोटार सायकलला असलेल्या कागदपत्रावरुन संबधीत ईसमाची ओळख पटली आहे.बेलापुर येथील प्रवरा नदी पात्रात अनोळखी इसमाचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना काही व्यक्तींनी पाहीले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांना तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवीले बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे उपसरपंच अभिषेक खंडागळे रमेश अमोलीक देविदास देसाई किशोर कदम तातडीने घटनास्थळी पोहोचले याच दरम्यान प्रवरा नदीवरील पुलावर एक मोटारसायकल उभी असल्याची माहीती मिळताच हवालदार अतुल लोटके माजी सरपंच भरत साळुंके देविदास देसाई किशोर कदम यांनी प्रवरा नदीवरील पुलावर जावुन गाडीची पहाणी केली असता एम एच 17 ऐ एल 5198  ही हीरो होंडा कंपनीची गाडी  हँण्डल लाँक केलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला लावलेली आढळली  गाडीला खराब झालेला भाजीपाला तसेच वजनकाटा एक पिशवी तसेच एक डायरी आढळून आली या डायरीत शंकर उत्तम गलांडे नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्र तसेच काही फोन नंबर असलेली चिठ्ठी सापडली त्यावरुन संपर्क साधला असता शंकर  हा तीन दिवसापासुन घरी आलेला नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले  पोलीसांनी खटकाळी येथील गणेश अल्हाट नितीन जगताप दिनेश शेलार विश्वास बागुल सुरेश छल्लारे यां पोहणार्या तरुणांना बोलावुन ते प्रेत पाण्याबाहेर काढले पढेगाव येथील नातेवाईकांनी ते प्रेत शंकर उत्तम गलांडे वय वर्ष 31 याचेच असल्याचे सांगितले बेलापुर पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपुर येथे पाठवीले आहे  पोलीसांनी अकस्मात मृत्यू गुन्हा रजिस्टर नंबर 55/2021 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास हवालदार अतुल लोटके हे करत आहे.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकारांच्या संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार मनोजकुमार शंकरराव आगे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र ही संघटना राज्यातील नियमित प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांच्या प्रशासकीय पातळीवर अडचणी सोडविण्यासाठी राज्यात काम करते. संघटनेचे राज्यभर, जिल्ह्यात प्रतिनिधी असून, वृत्तपत्र तसेच संपादक व पत्रकार यांना येणाऱ्या अडीअडचणी व त्यांना शासनाकडून कशी मदत मिळून देण्यात येईल याचे काम संघटना करते.मनोजकुमार आगे हे गेल्या ३४ वर्षापासून पत्रकारितेत काम करत असून, त्यांचा अनुभव पाहता, संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे यांनी मनोजकुमार आगे यांना नुकतेच पत्र दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संपादक पत्रकार यांची संघटनेच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रशासकीय पातळीवर समस्या व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम केले जाईल असे नूतन जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे यांनी सांगितले. या निवडीचे जेष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, जवाहर मुथा, अरविंद गाडेकर, नरेंद्र लचके, यांच्यासह अनेकांनी स्वागत केले आहे

प्रतिनिधी राहुरी-आज दिनांक ७ मे रोजी खरीप हंगाम पार्श्वभूमीवर येवले आखाडा राहुरी बुद्रुक येथे आकाश शेटे यांच्या प्रक्षेत्रावर हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक व कापुस शेतीशाळेच्या वर्गाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे म्हणाले की एकात्मिक कीड व्यवस्थापन, प्रकाश सापळे,बीबीएफ तंत्रज्ञान द्वारे पेरणी याबाबींचा वापर शेतीला फायदेशीर ठरेल. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी शरदराव लांबे, शेतकरी संदीप कदम,दादा येवले, अमोल जाधव,दादा भवर,महेश येवले, शशिकांत येवले, सुनिल जाधव शेतकरी उपस्थित होते तसेच वळण येथील किसान कृषी सेवा केंद्र  येथे सोयाबीन बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गढधे व संचालक युनुस शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अरुण फुलारी, दिलिप डमाळे,विजय रूपनवर,कैलास रूपनवर आदी शेतकरी उपस्थित होते.



नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लसीकरणावर महत्त्वाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Naredra Modi) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी देशात सर्वांना मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासनाने घेतल्याचे सांगितले. तसेच दिवाळीपर्यंत ८० कोटी जनतेला मोफत धान्य रेशन दुकानांमधून देण्यात येणार आहे.

जाणून घ्या महत्वाचे मुद्दे-1) देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र, आता १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. २१ जूनपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना केंद्र शासनाकडून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल तर ते पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात, असेही मोदींनी स्पष्ट केले. लसनिर्मिती कंपन्यांकडून एकूण उत्पन्नाच्या ७५ टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन, राज्य सरकारांना मोफत देणार आहेत.

2) मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल. 

3) भारताने जगात जिथे कुठे उपलब्ध होईल, ते सर्व भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या लढाईत लस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लशीची संपूर्ण देशातून मागणी आहे. लस बनवणारे देश मोजकेच आहे. भारतात जर लस बनवण्याची कंपनी जर नसती तर आपल्या या विशाल देशात काय अवस्था झाली असती. आधी भारताला विदेशातून लस मिळवण्यासाठी खूप कठीण काम होतं. बाहेरच्या देशात लस तयार झाल्यानंतर आपल्याला लस मिळत होती. पोलिओच्या लशीचे तसेच झाले' असेही मोदी म्हणाले.

4)काही लोक या महामारीच्या काळातही भ्रम पसरवत होते, भारताची लस आली त्यावर अनेकांनी शंका उपलब्ध केली. जे लोक लसीबाबत शंक उपस्थित करत होते, ते भोळ्या बाबड्या लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. अशा अफवांपासून सावध राहावं.

5) १ मे पासून राज्यांना २५ टक्के काम सोपवण्यात आले, काहींनी प्रयत्न केलं, काहींना अडचणी समजून आल्या. जगात लसींची उपलब्धता किती आहे हे राज्यांना समजलं. मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट, लसींचा तुटवडा, राज्य सरकारच्या अडचणी असे प्रश्न होते. त्यानंतर सर्व राज्यांना समजलं, केंद्राचीच यंत्रणा नीट होते. राज्यांना अधिकार द्या असं जे म्हणत होते, त्यांनाही कळून चुकलं.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget