Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे मे महीन्यात मोफत धान्याचे वाटप होणार असुन तसा आदेश कक्ष अधिकारी हेमंत वाडीकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे.या आदेशात म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा या करीता महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये टाळेबंदी तसेच रात्रीच्या कालावधीसाठी संचारबंदी जाहीर केली आहे त्या पार्श्वभूमीवर मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळविण्यास पात्र असलेल्या लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योंदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील ७ कोटी लाभार्थ्यांना एक महीन्याकरीता मोफत अन्नधान्य गहु तांदूळ  वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत देय धान्य तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असुन एप्रिल महीन्याचे विकतचे धान्य तसेच मे महीन्याचे मोफत धान्य पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असुन मे महीन्याचे धान्य मोफत देण्यात येणार आहे कार्डधारकांनी त्याचे पैसे देवु नये तसेच दुकानदारांनी मे महीन्यात रेग्यूलर धान्य वाटप करताना पैसे घेवू नये असेही आदेशात म्हटले असुन मे महीन्याच्या धान्यासाठी कार्डधारकांना आता पैसे मोजावे लागणार नाही.

राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी  कान्हु गंगाराम मोरे  वय 46  यास नगर औरंगाबाद  जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त  येथून  Dy.S.P. संदीप मिटके व त्यांचे पथकाने ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. *सरकारी पक्षातर्फे   ॲड. श्री शिंपी व Dy.s.p  संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद  केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून  आरोपीस दहा दिवसाची पोलीस कोठडी दिली* . आरोपीच्या बाजूने ॲड.तोडमल व सांगळे यांनी काम पाहिले.

राहुरी-राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार

दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील साहेब यांनी या गुन्ह्याचा पुढील तपासDy.S.P. संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. Dy.s.p.मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हो गंगाराम मोरे  वय 46  यास नगर औरंगाबाद  जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त  येथून शिताफीने अटक केली आहे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली DySP   संदीप मिटके , सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख  , स फौ. राजेंद्र  आरोळे, पोहे का सुरेश  औटी, ,  पोलीस कॉन्स्टेबल  नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ ,  आदींनी केली.

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संध्याकाळी जिल्ह्यात चौदा दिवसांचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याच वेळी उद्यापासून नवीन निर्बंध लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी फेरआदेश काढतील असे संकेतही त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्री बारा वाजेपासून 1 मे च्या सकाळी  7 वाजेपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत नव्याने नियमावली जाहीर केली आहे.
 विवरणपत्र- अ बंद करण्यात आलेल्या बाबी.
हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालु राहील,
धार्मिक स्थळे पुर्णतः बंद राहतील,आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील,भाजीपाला/ फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील,
दारु दुकाने पुर्णतः बंद राहतील,टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.सर्व खाजगी कार्यालये पुर्णतः बंद राहतील
कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पुर्णतः बंद राहतील शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पुर्णतः बंद राहतील ,स्टेडिअम, मैदाने पुर्णतः बंद राहतील,विवाह समारंभास बंदी राहील.
चहाची टपरी दुकाने पुर्णतः बंद राहतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पुर्णतः बंद राहतील, सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पुर्णतः बंद राहतील
सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पुर्णतः बंद
राहतील,सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पुर्णतः बंद राहतीलसेतू ई-सेवा केंद्र, आधार केंद्र पुर्णतः बंद राहतील, व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मोनिगाइव्हीनिंग वॉक पुर्णतः बंद राहील. बेकरी, मिठाई दुकाने पुर्णतः बंद राहतील

विवरणपत्र -
वेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी

किराणा दुकाने वेळ सकाळी 7.00 ते 11.00
दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री,भाजीपाला विक्री (फक्त ब्दार वितरण),फळे विक्री (फक्त व्दार वितरण)अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री कृषी संबंधीत सर्व सेवा दुकाने पशुखादय विक्री
पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरीता पेट्रोल, डिझेल/सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी 7.00 ते 11.00या वेळेत करता येईल. पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा। मालवाहतूक याकरीता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार करता येनार आसल्याचे पत्रकात नमुद केले आहे.


पुणे ः हिंदू विवाह कायदा आधीच मिस यूज म्हणून वारला जात आहे. महिला या नियमाचा 90 टक्के मीस यूज करत आहेत आणि पुरुष 10 टक्के देखील करत आहेत. परंतु केवळ हिंदू विवाह कायद्यामुळे पुरुषांना न्याय मिळण्याची तरतूद नाही आणि केवळ स्त्रियांसाठी बनविला गेला, पुरुष साठी या कायद्यात काहिच नाहीं या अन्यायामुळे पुरुष आत्महत्या करीत आहेत, तरीही यंत्रणा सुधारण्यास तयार नाही. 

न्याय  देवतांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, परंतु न्यायालय अंध नाही किंवा सर्व समजत असूनही त्यावर काही कार्यवाही होत नाही का? आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सर्व वेळ का म्हणतात?

असा हा  अत्याचारी , दहशतवादी आणि देशद्रोही   हिंदू विवाह  कायदा बंद करावा आणि पुरुषांना न्याय मिळवा म्हणून हक्क अयोग स्थापन करावा आणि महिलांवर खोटा आरोप सिद्ध करणार्‍या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हायला हवी. यासाठी न्याय मिळाला पाहिजे या साठी आम्ही आमरण उपोषणाला कोर्टासमोर बसणार आहे. विकास महाजन शशीकला गादिया, गणेश गुंजाल, मुकेश खनके आणि पोटगी बंद आंदोलन चळवळीचे नायक अतुल छाजेड पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या वेळी हिंदू विवाह कायद्याची होळी करण्यात आली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- साई खेमानंद फौंडेशनच्या माध्यमातून उंबरगाव येथे  कोविड सेंटर सुरु करण्यात यावे अशी मागणी बेलापुर व पंचक्रोषितील गावच्या सरपंचांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना केली आहे                       बेलापुर वळदगाव उंबरगाव पढेगाव केसापुर आंबी दवणगाव संक्रापुर अंमळनेर गंगापुर एकलहरे उक्कलगाव कुरणपुर गळनिंब फत्याबाद मांडवे कडीत येथील सरपंचानी खासदार सदाशिव लोखंडे यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की बेलापुर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे अनेक ठिकाणी रुग्णांना बेड देखील उपलब्ध होत नाही सर्व दवाखाने गच्च भरलेले आहेत नातेवाईक रुग्णांना घेवुन वणवण या दवाखान्यातून त्या दवाखान्यात चकरा मारत आहे खासदार लोखंडे यांनी ईंबरगाव येथे साई खेमांनद फौंडेशन सुरु केले या ठिकाणी रुग्णांना लागणार्या सोयी सुविधा उपलब्ध होवु शकतात त्यामुळे उंबरगाव येथे कोविड सेंटर सुरु करावे असेही  प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे या निवेदनावर बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर खूर्दच्या सरपंच सौ वर्षा महाडीक उक्कलगावचे सरपंच नितीन थोरात एकलहरे येथील सरपंच रिजवाना शेख पढेगावचे सरपंच किशोर बनकर लाडगावचे सरपंच गिताराम खरात उंबरगावचे माजी सरपंच राजेंद्र ओहोळआदिंच्या सह्या आहेत   तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे हे डाँक्टर आहेत त्यामुळे त्याचा लाभ  परिसरातील रुग्णांना होवु शकतो निवडणुकीच्या आगोदर डाँ.चेतन लोखंडे यांनी बेलापुर  व परिसरात अनेक आरोग्य तपासणी शिबीर भरविले होते गावातीलच काही तरुण कार्यकर्ते त्या वेळी अघाडीवर होते आज परिसरातील नागरीकांना खरोखर उपचाराची आधाराची गरज आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्यासाठी आग्रह धरावा अशीही मागणी नागरीकामधुन केली जात आहे.

 .बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावातील ५६ हजार रुपये किमतीची आठ गाढव चोरीला गेली असुन या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे  पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे           या बाबत सविस्तर हकीकत अशी की बेलापुर येथील रविंद्र आंबादास बोरुडे हा माती वहातुक करत असुन या कामाकरीता त्याच्याकडे चार गाढव होती त्याला पाथरे तालुका राहुरी येथील माती वहातुक करण्याचे काम मिळाल्यामुळे रविंद्र याचेकडील चार गाढव तसेच रवि राजेंद्र रोकडे याचेकडील दोन गाढव व भाऊसाहेब विश्वनाथ नवनिधे याची दोन गाढव अशी आठ गाढव घेवुन रविंद्र बोरुडे हा पाथरे ता .राहुरी येथे गेला होता दिनांक  १६ मार्च रोजी माती वहातुक केल्यानंतर रविंद्र बोरुडे याने आठही गाढंव पायाला दोरी बांधुन गावातील विठ्ठल मंदिरासमोर बांधली  व चार वाजता बेलापुरला घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळीच ते कामाकरीता पाथरे येथे गेले असता त्यांना बांधलेल्या ठिकाणी गाढंव आढळून आली नाही कुणीतरी सोडून दिली असतील अशा समजुतीने रविंद्र  बोरुडे याने पुर्ण परिसर पिंजुन काढला परंतु गाढंव आढळून आली नाही त्यामुळे त्याने पोलीसात तक्रार दाखल केली पोलीसांनी रविंद्र बोरुडे याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेतला या गुन्ह्याचा तपास करत असताना ही गाढंव पंढरपूर येथे असल्याची माहीती मिळताच पोलीसांनी सहा गाढंव व तेथील गाढंव विकत घेणारा अहीनाथ जाधव यास ताब्यात घेतले त्या नंतर बेलापुरातुन ज्याने गाढव विकली तो अविनाश ऊर्फ सोन्या बाबासाहेब बोरुडे  रा बेलापुर यास ताब्यात घेतले असुन आणखी आरोपींचा या गुन्ह्याच सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे 
वाटणी वरुन झाली बोंब या बाबत समजलेली माहीती अशी की आरोपींनी ही गाढंव पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे विकली होती एका गाढवाची किमंत साधारण पंधरा ते अठरा हजार रुपये येते या प्रमाणे आठ गाढंवाचे दहा हजार रुपया प्रमाणे जरी  धरले तरी ८० हजार रुपये येणे अपेक्षित असताना एकाने कमी पैसे आल्याचे सांगितले त्यामुळे वाटणी कमी मिळाली याचा राग आल्यामुळे एक जण गाढंवाच्या मुळ मालकाला येवुन मिळाला व गाढवाचा ठावठिकाणा सांगीतला लगेच रविंद्र बोरुडे चार दोन जणांना घेवुन पंढरपूर येथे गेला व गाढंव आपलीच असल्याची खात्री केली त्या नंतर गाढंव चोरीच बिंग फुटले  असल्याची माहीती हाती आली आहे या पुर्वीही बेलापुरातुन मोठ्या प्रमाणात गाढंव चोरीला गेलेली होती काहींनी मढीच्या बाजारात त्या गाढवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु गाढव मिळाली नाहीत काहींनी आसपासच्या शेतकऱ्यांवर गाढंव गेल्याचे खापर फोडले होते आता खरे चोर उघड झाल्यामुळे मागील गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget