Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायत स्थापनेला शभंर वर्ष पुर्ण होत असुन गावात निवडणूक निमित्ताने होणारी कटुता पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी व गावचा । विकास होण्यासाठी बेलापुर पत्रकार  संघाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घेतलेला पुढाकार योग्य असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले आहे           प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जि प सदस्य शरद नवले यांनी पुढे म्हटले आहे की गावाची लोकसंख्या २५ हजार असुन १४ हजार मतदार आहेत या सर्व लोकाच्या हिताचे निर्णय घेणारे काही ठराविकच लोक आहेत गावाच्या हिताचे निर्णय घेणार्या पुढार्यांनी गाव हे केंद्रस्थानी ठेवुन ही निवडणूक बिनविरोध व्हावी या साठी मनापासुन सहकार्य करावे गावातील अनेक नागरीकांचीही तशीच इच्छा आहे सर्व नेते मंडळींना विनंती आहे की  गाव महत्वाचे की नाव हे आपणच ठरवायचे आहे बेलापुर पत्रकार संघाने गावांच्या हितासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असुन सर्वांनी गट तट मतभेत बाजुला ठेवुन गावचा ईतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहीजे सर्वांनी मनावर घेतले तर काहीच  अवघड नाही तसेच कुणावरही दबाव न आणता आपण ही निवडणूक बिनविरोध करावी गावासाठी सर्वांनी दोन पावले मागे यावे आपणाला तालुका जिल्हा पातळीवर कारखाना बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद अशा इतर निवडणूका आहेत गावात सलोख्याचे चांगले वातावरण ठेवायचे असेल तर सर्वांनी मिळून गावच्या विकासाचा एक कृती आराखडा ठरवुन काम केले तर गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही काल काय झाले कुणी काय केले  हे सर्व मतभेद विसरुन स्वच्छ मनाने उद्याच्या सुंस्कृत  बेलापुर गावाकरीता एकत्र होवुन गावची निवडणूक बिनविरोध करु या असेही जि प सदर शरद नवले यांनी म्हटले आहे.

बेलापुर(वार्ताहर)गाव म्हणजे एक मोठे कुटुंब असुन सर्वांनी शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कोनाचीही गय केली जाणार नाही, असा ईशारा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांनी दिला.ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेलापुर पोलीस चौकीत विविध पक्षांचे स्थानिक प्रमुख, पत्रकार व ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, घटनेची चौकट आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र ते सोडून जर कोणी व्यक्ती निवडणूक प्रक्रियेत बाधा आणुन समाजघातक कृत्य करीत असेल तर ताबडतोब पोलीसांना कळवा आम्ही त्यांच्यावर  कोणताही पक्षपात न करता त्वरित गुन्हे दाखल करु असेही नोपानी यांनी यावेळी आश्वाशीत केले.*या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई माजी सरपंच  भरत साळुंके पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा द्वारकनाथ बडधे प्रा अशोक बडधे आदिंनी मनोगत व्याक्त केले या बैठकीला सर्वश्री ,रविंद्र खटोड ,पोलीस पाटील अशोक प्रधान, अशोक प्रधान,युवराज जोशी,कैलास चायल, अशोक पवार, जावेद शेख, अकबर सय्यद,प्रा. अशोक बडधे,अजय डाकले, द्वारकानाथ बडधे, पत्रकार ज्ञानेश गवले, सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, अशोक शेलार,यांच्यासह पो. हे. कॉ. अतुल लोटके, रामेश्वर ढोकने, निखिल तमनर, हरिष पानसंबळ पोपट भोईटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर समाजाने शाबासाकीची थाप दिल्यास असे कार्य करणारांचा उत्साह वाढतो त्यामुळे असे कार्यक्रम सर्वच स्तरावर राबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बेलापुर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी केले                                           नाताळ सणाचे औचित्य साधुन शालोम ए जी चर्च बेलापुर यांच्या वतीने कोरोना काळात आपला जिव धोक्यात घालुन सामाजाची काळजी घेणार्या सर्व क्षेत्रात काम करणार्या बांधवांचा सन्मान करण्यात आला त्या वेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बेलापुर ग्रामपंचायतीचे प्रशासक तगरे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे डाँ देविदास चोखर हवालदार अतुल लोटके उपस्थित होते                     या वेळी बेलापुर ग्रामपंचायतीचे प्रशासक तगरे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पंडीत सिस्टर आदिंनी मनोगत व्यक्त केले 

शालोम ए जी चर्चचे पास्टर अलिशा जोगदंड यांनी कोरोना सारखे संकट पुन्हा येवु नये सर्वांना सुख शांती मिळावी या साठी प्रार्थना केली या वेळी बेलापुर पोलीस स्टेशनचे निखील तमनर बेलापुर पत्रकार सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम कामगार तलाठी कैलास खाडे अविनाश शेलार बाबासाहेब प्रधान सुशिलाबाई खरात मधुकर गायकवाड जालीदर गाढे अमोल साळवे सचिन साळुंके आदिसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी महसुल कर्मचारी बेलापुर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित  होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषीकेश जाधव प्रसाद शेलार ललीत शेलार निशिकांत शेलार संकेत गीरमे प्रसाद अमोलीक गौरव शेलार आदिनी विशेष प्रयत्न केले ऋषीकेश जाधव यांनी आभार मानले.

अहमदनगर- नगर शहरातील दिल्लीगेटजवळील नीलक्रांती चौकात पोलिसांनी थांबवलेल्या मोटारीत चार धारदार तलवारी सापडल्या. मोटारीतील ड्रायव्हर सीटच्या मागे पांढऱ्या गोणीत या तलवारी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पकडण्यात आलेल्याचे नाव अशोक बाळासाहेब राळभाते (रा.रत्नापूर, ता.जामखेड) आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ही कारवाई एलसीबी पथकाने केली.
याबाबतची माहिती अशी की, पो.हेकॉ संदीप घोडके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती कि, अशोक राळेभात (रा. रत्नापूर, ता.जामखेड) हा त्याचे ताब्यातील चारचाकी मोटारीतून चार तलवारी घेवून दिल्ली गेटकडून सिव्हील हॉस्पिटलकडे जाणार असल्याची ही खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी नीलक्रांती चौकात फौजफाटा तैनात केला होता व ही गाडी आल्यावर पंचांसमक्ष तिची झडती घेतली. कारमध्ये ड्रायव्हर सीटचे पाठीमागील बाजूस एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये ३ हजार ८०० रुपये किमतीच्या चार धारदार व टोकदार तलवारी मिळून आल्या. या तलवारींबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक माहिती सांगितली नाही. त्यामुळे या तलवारी व तसेच ६ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ५३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यत म्हणजे ३०डिसेंबर रोजी  सर्व पक्षीय बैठक घेवुन बेलापुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा या सर्वपक्षिय प्रमुखांनी  मांडलेल्या सुचनेला  कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.                                        श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या बेलापुर बु!! गावाची ग्रामपंचायत निवडणूक दिनांक १५ जानेवारी रोजी होत असुन १७ जागेकरीता होणारी ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव बेलापुर पत्रकार संघाने गावातील नेते मंडळीसमोर मांडला होता या प्रस्तावास सर्वपक्षिय  प्रमुख नेत्यांनी मान्यता दिल्यानंतर काल पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा कोअर कमिटीची बैठक  बोलविण्यात आली होती.  त्या बैठकीतही सर्वांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीत बेलापुर ग्रामपंचायत  सदस्य निवडी बाबत ठोस अशी रुपरेषा ठरविण्यात आली. या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांनी सांगितले की संर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्याला पँनलचे उमेदवारी अर्ज दाखल करुन दिनांक ३०डिसेंबर रोजी सर्व उमेदवार यांची माहीती तसेच उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा फाँर्म कोअर कमिटीकडे जमा करावेत. या सर्व अर्जातुन सर्वानुमते सतरा सदस्य निवडण्यात येतील व उर्वरीत उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. हा सतरा जणाचा पँनल हा गावचा पँनल असेल. काहींनी जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर गावाचा पँनल विरुध्द ते उमेदवार अशी लढत होईल. सर्व पक्ष  गट तट विसरुन एकत्र होवुन गावाच्या निर्णया विरुध्द जाणाऱ्या  उमेदवारांविरुध्द विरोधात सर्वपक्षिय  नेते मंडळी प्रचार करतील या मुथा यांच्या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शविली. या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले,माजी सरपंच भरत साळुंके, भाजपाचे शहर प्रमुख प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, साई पावन प्रतिष्ठानचे कैलास चायल भाऊसाहेब दाभाडे, सुधाकर खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय डाकले ,विक्रम नाईक,  हाजी ईस्माईल शेख आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दूरध्वनिवरुन या प्रस्तावास संमती दिली. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे  मारुती राशिनकर, रणजीत श्रीगोड, सुनील मुथा,नवनाथ कुताळ,ज्ञानेश्वर गवले दिलीप दायमा आदि उपस्थित होते शेवटी पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी आभार मानले.

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथून इंदूरची महिला  तीन वर्षापूर्वी बेपत्ता झाली होती ती इंदूर येथे आता सापडली आहे, मात्र ही महिला शिर्डीतून बेपत्ता झाली होती, मात्र तिच्या पतीने या महिलेचे अपहरण झाल्याची मोठी चर्चा केली होती, शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्यासंदर्भात मिसिंग  गुन्हा दाखल झाला असला तरी  हे प्रकरण खंडपीठा पर्यंत गेले होते ,त्यामुळे ते संपूर्ण राज्यात गाजले होते ,मात्र ही महिला इंदूरची व ती तीन वर्षांनी परत इंदूरमध्येच सापडली, ही महिला सध्या काही सांगत नाही ,असं तिचा पती मनोज सोनी  म्हणतो, मात्र इंदूरची महिला इंदूरमध्ये सापडते ती शिर्डीतून बेपत्ता झाली तीन वर्ष गायब होती आणि आता परत इंदूरला सापडते या पाठीमागे काहीतरी गौडबंगाल आहे ,मात्र त्यामुळे शिर्डीचे नाव बदनाम होत आहे, विनाकारण शिर्डी चे नाव त्यामध्ये बदनाम होत असून शिर्डीतून महिलांचे अपहरण होते याची चर्चा देश-विदेशात झाली त्यामुळे शिर्डीचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाला याला कारणीभूत मनोज सोनी व दीप्ती सोनी हेच आहेत, त्यामुळे या दोघांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे,

  जितेश लोकचंदानी यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या या मागणी पत्र पुढे म्हटले आहे की, इंदौर येथील सोनी परिवार शिर्डीला साई दर्शनासाठी आला होता ,दि, १० /८/२०१७रोजी पती व लहान मुलगा व मुली समावेत शिर्डी शहरात साई दर्शन झाल्यानंतर  प्रसादासाठी भोजनालयात हे कुटुंब गेले असता व नंतर बाहेर आल्यानंतर अचानक रहस्यमय दीप्ती मनोज सोनी ही महीला बेपत्ता झाली होती, तसा मिसिगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, शिर्डी पोलिसांनी विविध प्रकाराने तपास करुनही मिळुन आली नाही , हे मिसीगचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे ,असे असताना ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात तिच्या बहीणीला  तीन वर्षानंतर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे , 

      याबाबत बेपत्ता महिलेचा पती मनोज सोनी यांनी सांगितले की शिर्डी  पोलिसांनी मेडिकल तपासणी केली असुन सोमवारी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगुन   १७तारखेला ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात मोठ्या बहिणीला सापडली आहे ओळख वगैरे पटली आहे ,या बाबत ती इतकी वर्षे कोठे होती तीला कोणी आधार दिला ती इंदौर येथे कशी पोहचली  या बाबत मी चौकशी चा प्रयत्न केला आहे मात्र ती फार काही सांगण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याने यांचा देखील शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास केला पाहिजे असे सांगितले शिर्डी  विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी देखील शोध घेण्यासाठी  मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता मनोज सोनी यांनी माहितीच्या अधिकारात किती लोक बेपत्ता झाली आहे ,याची माहिती. प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती, शिर्डी शहरात मानवी तस्करी होते ,याबाबत मोठा गाजावाजा झाला होता , शिर्डीतून महिलांच्या पोरं होते अशी मोठी चर्चा राज्य झाली होती त्यामुळे शिर्डी चे नाव मोठे बदनाम झाले होते त्यामुळे आर्थिक उलाढालीवर शिर्डीत फटका बसला होता ,आता दिप्ती सोनी हि महीला जरी सापडली असली तरी या प्रकरणाची कठोर चौकशी होऊन सत्य जनतेसमोर. आणण्यासाठी शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास करुन सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज आहे, त्याचप्रमाणे दीप्ती मनोज सोनी व तिचा पती मनोज सोनी या दोघांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे ,हे खरे बोलतात की खोटे बोलतात, हे संपूर्ण नागरिकांना, साईभक्तांना कळणे गरजेचे आहे ,ही महिला बेपत्ता होते व इंदोर मध्ये स्वतःच्या शहरात सापडते, या पाठीमागे कोण आहे, याचाही शोध घेणे गरजेचे आहे, विनाकारण शिर्डीचे नाव महिलांचे अपहरण होते म्हणून बदनाम केल्यामुळे मनोज सोनी व ,दिप्ती सोनी यांच्यावरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे ,अशी मागणी साई भक्तांच्या वतीने जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली असून या दोघांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे,


श्रीरामपूर प्रतिनिधी :-महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने जानेवारी 2021 मध्ये आयोजित कै. वसंतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ पत्रकार संघाचे श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात रविवार दिनांक 20- 12-2020 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय मिडीया फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र वाघ हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीरदार, उपाध्यक्ष बी.के.सौदागर, महासचिव शेख फकीर मोहम्मद, शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जाद भाई पठाण, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, पत्रकार संघाचे कायदेविषयक सल्लागार अँड.हाजी मसूरभाई जहागीरदार, प्रदेश महासचिव फकीर महंमद शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मंन्सूरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाबखान,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजमोहंमद शेख यांनी केले या बैठकीत स्नेहमेळावा कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली याच बरोबर कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम पार पाडणे करीता कार्यक्रम समितीची निवड करण्यात आली. या समितीवर अब्दुल्ला भाई चौधरी,अमीरभाई जागीरदार, मन्सूरभाई पठाण, रियाज खान, अस्लम बिनसाद, वहाब खान, विजय खरात,सज्जादभाई पठाण, राजमोहंमद शेख, मिलिंद शेंडगे,आदींची निवड करण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय मिडीया फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी भारतीय मीडिया फाउंडेशन इतर पत्रकार संघांना बरोबर घेऊन काम करण्याची दानत ठेवून लघु वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांच्या अडचणी सोडविणे करिता प्रयत्नशील आहे पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा बिंदुसार जी यांनी पत्रकारांना किमान वेतन द्यावे त्यांच्या विमा पॉलिसी बद्दल हमी घ्यावी पत्रकारांच्या मुला-मुलींना शैक्षणिक सवलती द्याव्यात पत्रकारांना निवास्थान देण्यात यावी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना त्यांना पुढील आयुष्य साधारणपणे जगता येईल अशी भरीव मदत द्यावी पत्रकार संरक्षण कायद्यात किमान तीन वर्षे पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना समाविष्ट करून घेण्यात यावे अशाप्रकारे पत्रकारांच्या विकासाबद्दलचा विचार करता अनेक मागण्या केंद्र शासनाकडे केलेल्या आहेत. या मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावे याकरिता मीडिया फाउंडेशन च्या वतीने दिल्ली येथील रामलीला मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख बरकत अली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकाराला जात नसते जनसेवा करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करणे हीच खरी पत्रकारिता ठरते सध्या पत्रकारितेला व पत्रकार संघांना जातीय स्वरूप दिले जात आहे आशा पत्रकार संघापासून पत्रकारांनी दूर रहावे व देशातील एकात्मता जोपासावी आपण याच उद्देशाने गेली पस्तीस वर्ष लघु वृत्तपत्रांच्या पत्रकारांना सोबत घेऊन लिखाणाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्याचे व त्यांच्यावरील अत्याचार दूर करण्याचे कार्य करीत आहे. पत्रकार बांधवांवर झालेल्या अत्याचारास पत्रकार संघाकडून  त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही केलेला आहे. ज्यावेळेस पत्रकारांवर व त्यांच्या लेखणीवर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले अशा वेळेस आम्ही पत्रकार संघाच्या वतीने त्या पत्रकारांना त्या खोट्या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. हा पत्रकार संघ सर्वसामान्य जनता व पत्रकारांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. बैठकीस प्रा. त्रिभूवन सर,दस्तगिर शाह, गरीबी निर्मुलन समितीच्या शबाना भाबी, मोहंमद इलियास,साजिद शाह,गुलाब भाई वायरमन, अरुण बागूल, अक्रम कुरेशी, शब्बीर कुरेशी, प्रतापसिंग  राठोड, मुअज्जम शेख,जिशान काझी,सलीम गोसावी,अफजल खान,अकबर भाई शेख, सुभाषराव गायकवाड, मोहन जाधव, संजय शेलार, रमेश शिरसाठ,अमोल शिरसाठ,आदी पत्रकार उपस्थित होते. फकीर मोहंमद शेख यांनी शेवटी आभार शेवटी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget