Latest Post

बेलापूर (प्रतिनिधी  )- एके काळी जिवंत देखाव्यासाठी  जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या बेलापूर गावातील जय श्रीराम गृपने   बसविलेल्या गणपती बाप्पा समोर पोलीस व डाँक्टर यांच्या प्रतिकृती तयार करुन कोरोनाचे संदेश देणारे फलक लावल्यामुळे मंडळाचा गणपती बाप्पा आकर्षणाचे केंद्र बनले आहे.बेलापूरातील जय श्रीराम गृपच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात आली दर वर्षी पेक्षा या वर्षीचा गणेशोत्सव कोरोनामुळे शांततेत साजरा करावा लागला असे असले तरी सौ नम्रता जितेंद्र वर्मा यांच्या संकल्पनेतुन जय श्रीराम गृप या मंडळाने कोरोना बाबत वेगवेगळे संदेश समाजा पर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे  कोरोना काळात अहोरात्र सेवा देणारे पोलीस दादा तसेच वैद्यकीय सेवा देणारे डाँक्टर याच्या प्रतिकृती तयार करुन त्याच्या कामाविषयी कृतघ्नता व्यक्त करण्यात आली आहे  तसेच  फलकाद्वारे वेगवेगळे जनजागृती करणारे संदेश देण्यात आले आहे या संदेशात आम्ही बेलापूरकर देणार प्रशासनाला साथ ,करु कोरोनावर यशस्वी मात ,घाबरु नका पण जागृक रहा स्वतःला व इतरांनाही सुरक्षित ठेवा ,आरोग्य हीच खरी संपत्ती, तुम्ही सुरक्षित तर देश सुरक्षित  मास्क वापरा कोरोनाला हटवा सँनिटायझरचा वापर करा सुरक्षित अंतर ठेवा असे संदेश फलकावर लिहुन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे सौ नम्रता वर्मा यांना मंडळाचे अक्षय  ओहोळ श्रेयस गांधी अक्षय लढ्ढा ऋषीकेश सराफ निरज राठी ऋषीकेश मुंदडा स्वप्निल ओहोळ यश वर्मा अशुतोष थोरात कौस्तुभ कुलकर्णी  धिरज सुर्यवंशी आकाश वांढेकर आदित्य कोळसे हितेश बोरुडे जितेद्र वर्मा मंगेश आदिंनी  सहकार्य केले.

🔹धास्तावलेल्या ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..
बुलडाणा - 27 ऑगस्ट
तालुक्यातील देऊळघाट येथील 60 वर्षीय इसमाला श्वासनाचा त्रास होत असल्याने 4 दिवसापूर्वी  बुलडाणा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामूळे त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची शक्यता व्यक्त होत असतांना, त्यांचा स्वॅब रिपोर्ट आज 27 ऑगस्टला निगेटिव्ह आला असून धास्तवलेल्या परिवारासह गावकरी व प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील अल्पसंख्यक बहुल गावापैकी एक देऊळघाट आहे.येथे अद्याप पर्यंत एक ही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, हे विशेष .सुरुवातीपासुनच स्थानिक ग्राम पंचायत,आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व गावकऱ्यांनी घेतलेले निर्णय व उचलले पाऊल तसेच नियमांचे पालन केल्याने आता पर्यंत या गावात रुग्ण संख्या "नो-कोरोना" अशी आहे. जिल्ह्यात सर्वात आधी देऊळघाट ग्राम पंचायतने गावकऱ्यांची आरोग्याची काळजी घेत लॉकडाऊनच्या पूर्वी महानगरातून आलेल्या जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांना होम क्वारनटाईनचे शिक्के लावून घरी बसवले होते.आता हळू हळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत आहे. कोरोना बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या शहरासह गांव-खेड्यात जावून पोहोचला आहे.अशात काही दिवसापूर्वी देऊळघाट येथील सय्यद खलील पहेलवान (60) यांची प्रकृती बिघडली व त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना बुलडाणा येथील महिला रुग्णालयचे कोविड सेंटर मध्ये अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.त्यांचे स्वेब नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविन्यात आले मात्र स्वेब रिपोर्ट येण्यापूर्वीच 25 ऑगस्टला सायंकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.माहिती मिळताच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,नगरसेवक पति मो.अज़हर रुग्णालयात पोहोचले प्रशासनाशी समन्वय साधुन प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले. गावात कोरोना मुळे मृत्यु झाल्याची अफवा व  भितीचे वातावरण पसरले होते.शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले. मृतकाच्या चाचणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष  लागले असतांना 27 ऑगस्टला सकाळी त्यांचा कोरोना अहवाल "निगेटिव्ह" आल्याने फक्त नातेवाईकच नव्हे तर गावकऱ्यांसह प्रशासनाने ही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते 
समृद्धी महामार्गाबद्दलच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी काल गायत्री कंपनी च्या कार्यालयात मीटिंग घेतली... यावेळी इतर विषया सोबत एक मुद्दा अजूनही खूप चर्चेत आला, रस्ता दुरुस्ती....
 यावेळी गावाच्या वतीने श्री विलासराव चव्हाण,किरण होन, शरद होन, सुधाकर होन,दादासाहेब होन,सचिन होन,प्रवीण होन,न्यू इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष सुनील होन यांनी गायत्री कन्स्ट्रक्शन यांनी गावाला व शाळेला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था, आणि गायत्री चे तात्याराव डुंगा यांचा गलथान कारभार आमदार साहेबांच्या लक्ष्यात आणून दिला,आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी समक्ष रस्ता पाहणी करून गायत्री कंपनी ला फटकारले व त्वरित रास्ता खडीकरण  करण्याच्या व पावसाळा संपताच 1 नोव्हेंबर पासून रास्ता डांबरीकरण करून मिळावा नाहीतर कार्यवाही चा इशारा दिला.तसेच समृद्धीच्या गायत्री कन्स्ट्रक्शनमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्याने काम मिळावे,स्थानिक मशिनरी धारकांना वेळत बिल अदा करण्यात यावे,स्थानिकांची कुणी अडवणूक करत असेल तर त्याची खैर केली जाणार नाही, असा सज्जड इशारा दादांनी या वेळी उपस्थित सर्व  अधिकाऱ्यांना दिला                                              दादांची कार्यतत्परता व भूमीपुत्रांच्या साठीची तळमळ पाहून,सर्वांनी दादांचे कौतुक केले व आभार मानले. 
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, विलास चव्हाण,किरण होन,शरद होन,सुधाकर होन,व सर्व गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती, तसेच रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस.के.बावा, टीमलीडर प्रशांत ताडवे, वीज वितरण कंपनीचे श्री. सूर्यवंशी, श्री. निरगुडे, श्री. बोन्डकर, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, आदी उपस्थित होते.

बेलापूर  (प्रतिनिधी ) बेलापूर सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपावरुन  काही संचालकानी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून लाखो रूपयांचे पेट्रोल व डिझल तसेच रोख रकमा,इतर विभागातुन पाईप खते  नेलेले असुन सभासदांनाही  अशाच प्रकारे उधारीवर पेट्रोल  डिझेल देण्याची मागणी सुधाकर खंडागळे शिवाजी वाबळे भास्कर बंगाळ प्रभाकर कुर्हे यांनी केली आहे .सांस्थेला दिलेल्या निवेदनात वाबके खंडागळे बंगाळ कुर्हे यांनी पुढे म्हटले आहे की काही संचालकांनी संस्था स्वःतच्या मालकीची समजुन पेट्रोल  डिझेल तसेच इतर वस्तूची नोंद न करता उचल केलेली आहे संस्थेच्या दप्तरी या व्यवहाराची कसलीही नोंद नाही आता या व्यहाराचा गौप्यस्पोट झाल्यावर कर्मचार्यांचे दोन महिन्याचे पगार वसुलीच्या करणास्तव थांबवले आहेत.  त्याच धर्तीवर सभासद शेतकऱ्यांना उधारीवर पेट्रोल व डिझेल देण्यात यावा अशी मागणी संस्थेचे जेष्ठ सभासद सुधाकर खंडागळे यांच्यासह सभासदांनी केली आहे   संस्थेला  दिलेल्या निवेदनात सुधाकर खंडागळे शिवाजी पा वाबळे भास्कर बंगाळ प्रभाकर कुर्हे यांनी पुढे म्हटले आहे की काही जेष्ठ व तज्ञ सभासदाच्या अथक प्रयत्नाने संस्थेला पंप परत मिळविण्यात यश आले याचा संचालक मंडळाला विसर पडला असुन काही जण आपलीच मालमत्ता समजुन राजरोसपणे पेट्रोल  डिझेल तसेच इतर वस्तू उधारीवर नेत आहे कर्मचार्यांनाही काम करावयाचे असल्याने हे सर्व निमूटपणे सहन करावे लागते पेट्रोल पंप हा सभासदांच्या मालकीचा आहे त्यामुळे त्यावर कुणा एकाने मालकी दाखवु नये जर संचालक मंडळातील काही लोक  पेट्रोल  डिझेल व इतर वस्तू कसलीही नोंद न करता  नेत असतील तर ती सवलत सर्व सभासदांना देण्यात यावी कोरोनाच्या लाँक डाउन मधे शेतकरी मेटाकुटीस आला आहे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली असुन संस्थेने सभासद  शेतकऱ्यांना देखील संचालक मंडळा प्रमाणे पेट्रोल  व डिझेल उधारीवर द्यावे अशी मागणीही या सभासदांनी केली आहे या बाबत लवाकरच  सहाय्यक निबंधक यांनाही निवेदन देणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले आहे

मधुकर वक्ते कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावातील अंजनीसुर्य हेल्थ क्लबचा वतीने कोपरगाव शहर तसेच ग्रामिण भागात कोराना विषाणुचा वाढता प्रार्दुभाव रोखण्या हेतुने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चार दिवसाची टाळेबंदी जाहीर केली असल्याने या रिकाम्या वेळात सामाजिक कार्य करण्याचा उद्देशाने डाऊच खुर्द येथील अंजनी सुर्य व्यायाम शाळेने पै.दिपकभाऊ कांदळकर, सरपंच पै़.संजय गुरसळ, ऋषीकेश ससाणे,देवा पवार,अमन चोपडा,तुषार व सहकारी तसेच ग्रामस्थांचा उपस्थितीत हेल्थ क्लब परीसरात वृक्षारोपनचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ म्हणाले कि पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूतअसले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होतअसलेली वनराई हे देखील कारणीभूत असल्याने मागील काही वर्षापासून पर्जनमान अनियमित तसेच कमी अधिक प्रमाणात होत परिस्थिती अशीच राहिल्यास भावी पिढीचेभविष्य हे निश्चितपणेअंधकारमय होऊ शकते.त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड बरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने ही जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली
ते पुढे म्हणाले उत्तमआरोग्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहे यात काही शंका नाही शरीर एखाद्या मशीनसारखेच आहे जर मशीन सतत चालू राहिली तर ते चांगले कार्य करते.तरी यासाठी व्यायाम महत्वाचा असल्याचे सांगत
व्यायाम करण्याचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्लाही संजय गुरसळ यांनी यावेळी दिला.

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील निपाणी वडगांव येथील अधिकृत ‘अशोकनगर पोलीस चौकी’ ही हरेगाव फाटा येथे पळविल्याप्रकरणी मागील महिन्यापासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी  समक्ष  ग्रामस्थांशी संवाद साधून अशोकनगरची चौकी ही अशोकनगरलाच असल्याचा खुलासा केला आहे.
            या प्रकरणी निपाणी वडगांव चे सरपंच आशिष दौंड, विकास सोसायटीचे चेअरमन  संतोष राऊत, मल्हार सेनेचे अध्यक्ष संजय राऊत व भगतसिग भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी गावकऱ्यांच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर 4 सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
त्यात त्यांनी म्हटले होते की, निपाणी वडगांवची  अग्रक्रमांवर असलेली लोकसंख्या विचारात घेऊन अनेक वर्षांपासून अधिकृत मान्यता दिलेली ‘अशोकनगर पोलीस चौकी’ ही हरेगाव फाटा येथे हलविलेपासून अशोकनगर येथील अधिकृत पोलीस चौकी बंद आहे. अशोकनगर चौकीसाठी नेमणुका असणारे पोलिसही हरेगाव फाटा  येथेच थांबण्यास जास्त उत्सुक दिसत आहे.  त्यामुळे गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने गावात  अवैद्य व्यवसाय, गुन्हेगारी, महिला अन्याय, छेडछाड, अवैद्य व्यवसायाशी संबधित गुंडाचे वाढते प्रमाण आदि बाबीवर वचक ठेवणे जिकरीचे झालेले आहेत. त्याकरता ग्रामपंचायतीचे तक्रारींचे निवेदनही देण्यात आले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने गावच्या न्याय हक्कासाठी गावची अधिकृत सजेचे पोलीस चौकी ही पूर्ववत ठिकाणी अशोकनगर येथेच चालू ठेवण्यात येवून ग्रामस्थांच्या हिताचे रक्षण करणे व गावातील अवैद्य व्यवसाय व गुन्हेगारीवर चाप लावणे करीता सदर चौकीच्या नेमणूका असणाऱ्या पोलिसांना चौकी बंद न ठेवण्याचे आदेश द्यावेत व हरेगाव फाटा येथे ‘अशोकनगर फाटा पोलीस चौकी’ हे केलेले बेकायदेशीर नामकरण त्वरित हटवावे. या मागणीसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
            या प्रकरणी स्वतः शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व उपनिरीक्षक बहाकर यांनी अशोकनगर येथील पोलीस चौकीस समक्ष भेट देवून संवाद साधला, व अशोकनगरची पोलीस चौकी ही अशोकनगरलाच  असल्याचा खुलासा करून संबधित पोलिसांना अशोकनगर पोलीस चौकीत थांबण्याचा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी अशोक सह.साखर कारखान्याचे चे मा.अध्यक्ष सोपानराव राऊत यांच्या  प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस मा.सभापती सुनीताताई गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुरलीधर राऊत, संजय गायधने,  रवींद्र पवार,संजय राऊत, दिपक राऊत, दिलीप राऊत, ज्ञानेश्वर खाडे, हमीद शेख, प्रशांतराजे शिंदे, ज्ञानेश्वर पडोळे, आप्पासाहेब दुशिंग, भारत वैरागर, दादासाहेब कापसे, बबन पाटोळे, आबा काळे, दादा राऊत  तसेच पो.कॉ. लोंढे, लोटके, किशोर जाधव, पोपट खराडे आदींसह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कॉ.श्रीकृष्ण बडाख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात समाजासाठी अहोरात्र झटणा-या वैद्यकीय क्षेत्रातील डॉ मोहन शिंदे व डॉ सचिन प-हे यांना श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या श्रीरामपूरतील अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर यांचा सन्मान म्हणून त्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यांनी लॉकडाऊन काळात आपल्या जिवाची पर्वा न करता काम केले तसेच अजूनही ते श्रीरामपुरातील लोकांना सेवा देण्याचे काम करत आहे त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कामाचे योगदान तसेच सहभाग व सहकार्याबद्दल श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंच यांच्या तर्फे सन्मानचिन्ह व बुके देऊन सन्मान करण्यात आला
श्रीरामपुर शहरातील कोरोना प्रादुर्भावाच्या काळात समाजातील सर्व समाजाच्या नागरिकांना आरोग्य सुविधा सह विविध प्रकारे मदत करणा-या डॉक्टर क्षेत्रातील मान्यवरांना श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंचच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूरचे अध्यक्ष श्री. के.के. आव्हाड मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूरचे अध्यक्ष श्री. अनिल साळवे व जागृत नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री. मनोजकुमार नवले व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget