मधुकर वक्ते कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावातील अंजनीसुर्य हेल्थ क्लबचा वतीने कोपरगाव शहर तसेच ग्रामिण भागात कोराना विषाणुचा वाढता प्रार्दुभाव रोखण्या हेतुने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चार दिवसाची टाळेबंदी जाहीर केली असल्याने या रिकाम्या वेळात सामाजिक कार्य करण्याचा उद्देशाने डाऊच खुर्द येथील अंजनी सुर्य व्यायाम शाळेने पै.दिपकभाऊ कांदळकर, सरपंच पै़.संजय गुरसळ, ऋषीकेश ससाणे,देवा पवार,अमन चोपडा,तुषार व सहकारी तसेच ग्रामस्थांचा उपस्थितीत हेल्थ क्लब परीसरात वृक्षारोपनचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ म्हणाले कि पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूतअसले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होतअसलेली वनराई हे देखील कारणीभूत असल्याने मागील काही वर्षापासून पर्जनमान अनियमित तसेच कमी अधिक प्रमाणात होत परिस्थिती अशीच राहिल्यास भावी पिढीचेभविष्य हे निश्चितपणेअंधकारमय होऊ शकते.त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड बरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने ही जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली
ते पुढे म्हणाले उत्तमआरोग्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहे यात काही शंका नाही शरीर एखाद्या मशीनसारखेच आहे जर मशीन सतत चालू राहिली तर ते चांगले कार्य करते.तरी यासाठी व्यायाम महत्वाचा असल्याचे सांगत
व्यायाम करण्याचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्लाही संजय गुरसळ यांनी यावेळी दिला.
Post a Comment