Latest Post

शिर्डी-शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉक डाऊंनच्या चौथ्या टप्प्यात रविवार व गुरुवार या आठवड्यातील दोन्ही दिवशी शिर्डीत जनता कर्फ्यू लागू राहणार असून आठवड्यातील सोमवार, मंगळवार ,बुधवार शुक्रवार शनिवार या पाच दिवशी सकाळी नऊ ते दोन या वेळेत दरम्यान काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे,
  देशा,त राज्यात कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लंकडाउनचा तिसरा टप्पा संपून चौथा टप्पा सुरू झाला आहे, 31 मेपर्यंत लॉक डाऊन सुरू आहे, अशा या लॉकडाउनच्या काळात शासनाच्या तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये तसेच दिनांक 16 मे रोजी येथे शासकीय विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी व्यापारी असोसिएशन ,दुकानदार शिर्डी ग्रामस्थ यांची बैठक होऊन शिर्डीत काही दुकाने उघडण्याबाबत व वेळेबाबत निर्णय घेण्यात आला, या सर्वांच्या अनुषंगाने शिर्डी नगरपंचायत ने सर्व दुकानदारांसाठी व ग्रामस्थांसाठी निर्देश जारी केले असून या निर्देश पत्रानुसार शिर्डीत आठवड्यातील सोमवार, मंगळवार बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी भाजीपाला फळे, किराणा, हार्डवेअर, दूध   अंडी ,मटन चिकन,  घड्याळ चप्पल-बूट ,शीतपेये ,भांडी ,प्रिंटिंग प्रेस झेरॉक्स,  भेळ ,फरसाण  कृषीविषयक दुकाने , फोटो स्टुडिओ,  कलरची दुकाने हार्डवेअर व ट्रेडर्स , इलेक्ट्रॉनिक दुकाने , सोन्याची दुकाने, कापड दुकाने गॅसपुरवठा , बेकरी, पीठ गिरणी, फर्निचर , पंचर दुकाने गॅरेज , इस्त्रीचे दुकान ,बेकरी मिठाई ,टेलरिंग,  शीतपेये  पाण्याचे जार,  आदी सर्व दुकाने सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे , मात्र शिर्डीत सर्व हॉटेल ,लॉज, रेस्टॉरंट, हार फुल प्रसाद लॉकेट ची दुकाने, पान शॉप ,चहा कॉफी दुकाने, रस्त्यावर बसणारे सर्व व्यवसाय, सलून, दुकाने हातगाडीवर असणारे नाष्टा सेंटर, ब्युटी पार्लर, भंगार ची दुकाने, मोठे हाल, मंगल कार्यालय ,प्रार्थनास्थळे, व्यायाम शाळा व आठवडे बाजार हे बंदच राहणार आहेत ,यांना कोणत्याही दिवशी उघडण्यास परवानगी नाही, तसेच रविवार व गुरुवार या दोन दिवशी शिर्डीत अत्यावश्यक सेवेचे म्हणजे मेडिकल व दवाखाना सोडून सर्व दुकाने बंद राहणार असून या दिवशी शिर्डीत जनता कर्फ्यू राहणार आहे ,तसेच ज्या दिवशी दुकाने उघडणार आहे त्या दिवशी सकाळी नऊ ते दोन या वेळेत दुकाने उघडावीत परवानगी असलेले दुकाने उघडावीत, दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मास्क असल्याशिवाय कोणते वस्तू देऊ नये , होम कॉरटाईन केलेल्यांना दुकानात येऊन देऊ नये,  सामाजिक दुरी चे अंतर ठेवावे ,सनेटायझर वापरावे ,उगाच कोठे गर्दी करू नये , नियमाचे सर्वांनी पालन करावे,  अन्यथा अशा दुकानदारांवर व ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नगरपंचायतीने या पत्रात म्हटले आहे.

शिर्डी (जय शर्मा)-शिर्डी येथे सध्या लॉकडाउन सुरू आहे, सर्व काही बंद असताना येथे मात्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, शिर्डीतून दिवसाढवळ्या गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने  तसेच  रात्रीच्या  वाहने जाळण्याचे प्रकारात वाढ झाली आहे , त्यामुळे शिर्डी व परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे,
शिर्डी परिसरातून नुकतेच दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिंद्र पिकअप गाडी पळवून नेली ,मोटरसायकलही चोरी जात आहे, मात्र विनाकारण झंजट नको म्हणून काहीजण तक्रार दाखल करत नाही, सध्या शिर्डीत व परिसरात अवैध धंदे तेजीत सुरू आहे, हे लॉकडाउनच्या काळात अनधिकृत धंदे कसे सुरु आहेत ,त्याला कोणाचातरी वरदहस्त असल्याशिवाय असे घडू शकत नाही, असेच शिर्डीतून बोलले जात आहे, शिर्डी व परिसरात राजरोसपणे अवैध दारू धंदे सुरू आहेत ,तसेच शिर्डीत नगर पंचायत समोर परप्रांतीयांची दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी होते, लोक डॉन चे नियम पाळले जात नाही,एकटी नगर पंचायत काय करणार।। पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात ,येथे लॉक डाऊन ,काळातअवैध धंदे वाढले आहेत, पोलिसांचा धाक कमी झाला आहे, की चिरीमिरी च्या जोरावर हे सगळे चालू आहे, अशी शंका येत आहे,त्यामुळे येथे सक्षम पोलीस अधिकाऱ्याची गरज असल्याचे शिर्डीतून बोलले जात आहे, तसेच राहता येथून मुली फरार होण्याचे प्रमाण सध्या वाढले असून येथून तीन मुली।नुकत्याच बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे ,या गोष्टीकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत आहे, लॉक डाउन च्या काळातही अवैध धंद्याकडे  आर्थिक घेवाण देवानातून दुर्लक्ष होत आहे ,मात्र कोणता मासा गळाला लागतो याकडे जास्त लक्ष आहे, तरी या गोष्टीमुळे राहता तालुक्यातील नागरिक मात्र तीव्र संताप व्यक्त करत असून या प्रकारामुळे शिर्डी व राहता करांनी येथे सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)- देशात कोरोनाचे रुग्ण सापडत असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोणाच्या  रुग्णांची संख्या वाढत आहे,  त्यामुळे महाराष्ट्रात  शासनाने  18 मे पासून  ते 31 मे पर्यंत लॉक डॉऊनचा चौथा टप्पा  जाहीर केला आहे ,त्यामुळे  आज 18 मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा  राज्यात  व शिर्डीतही सुरू झाला आहे ,या लॉकडाउनचा चौथा टप्पा  सुरू झाला असलातरी मात्र या चौथ्या टप्प्यात थोडीशी ढिलाई आल्याचे दिसून येत आहे, राज्यातील सर्व मंदिरे बंद असणार आहेत, शिर्डीचेही श्री साईबाबा मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी बंद राहणार आहे तसेच  हॉल, मॉल्स ,करमणुकीचे ठिकाणे हेही बंद राहणार आहेत, मात्र अत्यावश्यक दुकानासहित काही दुकानेस,९ ते २ या काही वेळेसाठी उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, नुकतीच शिर्डीच्या व्हीआयपी शासकीय गेस्ट हाउस मध्ये , आ,विखे  लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक होऊन तसा निर्णय घेण्यात आला होता, त्यामुळे शिर्डी व परिसरात पहिल्यांदाच आज सकाळी काही दुकाने उघडण्यात आली होती, तसेच ग्राहक व नागरिकही बऱ्याच दिवसातून आज शहरात रस्त्यांवर दिसून येत होते, दरवर्षी शिर्डीत सुट्ट्यांमुळे मे महिन्यात मोठी साई भक्तांची गर्दी होत असते,  मे महिन्यात येथे मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते, मात्र।सध्या लॉकडाउनमुळे  येथे सर्वकाही ठप्प झाले आहे, लॉकडाउनचा चौथा टप्पा महाराष्ट्रात सुरू झाला असला तरी काही शिथिलता देण्यात आली आहे, काही दुकाने उघडण्यास परवानगी काही वेळेसाठी देण्यात आली आहे, मात्र लॉज ,हॉटेल ,सलून ,मॉल्स आदी दुकानांना उघडण्यास परवानगी नाही ते बंदच होती, तसेच शिर्डीत आर्थिक मोठी उलाढाल असणारे हॉटेल रेस्टॉरंट लॉज हार प्रसादाची दुकाने हे मात्रहोती, साई मंदिर बंद असल्यामुळे साईभक्त येत नाही तोपर्यंत ते उडूनही उपयोग नाही त्यामुळे अनेक दुकाने बंद होती हॉटेल्स लॉज बंद आहेत,, मात्र ज्यांनापरवानगी आहे असे काही  आज सकाळी दुकाने उघडली होती, प्रथमच शिर्डीची दुकाने उघडल्याचे दिसून येत होते ,तसेच शिर्डीकरही आज बऱ्याच दिवसातून आपल्या घराबाहेर शहरात खरेदी करण्याच्या बहाण्यानेबाहेर पडल्याचे दिसून येत होते, शांत शांत वाटणारी दोन महिन्यातील शिर्डी आज थोडीशी गजबजलेली वाटू लागल्याचे जाणवत होते ,मात्र प्रत्येक जण कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंन्स व मास्क यांचे नियम पाळताना दिसत होता, अनेक दिवसा नंतर घरात असणारे शिर्डी व परिसरातील नागरिक साईभक्त हे मंदिर परिसरात येऊन लांबून श्रीसाई स्वर्ण मंदिर कळसाचे दर्शन घेत होते, कारण 17 मार्चला दुपारी तीन वाजता साई भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले होते व ते अजूनही बंद आहे, त्यामुळे लांबुनच मंदिर कळसाचे दर्शन घेता येत आहे व  खरेदीच्या निमित्ताने बाहेर आलेले नागरिक लांबूनच खरेदी करता करता श्री साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत आहेत, तर काही दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने एकमेकांशी बऱ्याच दिवसातून भेट झाल्यामुळे गप्पा मारताना दिसत होते, लोक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात थोडीशी तील का ठेवण्यात आली असली तरी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे, अनेक नागरिक विनाकारण काहीतरी खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तसेच ओळखीचे कोणी भेटल्यानंतर रस्त्यातच गप्पा मारीत असतात मात्र कायद्याने असे करण्यास बंदी आहे संचारबंदी जारी आहे, चार ते पाच लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे ,शिर्डी व राहता तालुका अद्याप कोरोणा मुक्त आहे, मात्र लॉकडाऊन  चे नियम जर चौथ्या टप्प्यात नागरिकांनी पाळले नाही ,तर शिर्डीत काही अनर्थ होऊ शकतो, त्यासाठी शहरातील नागरिकांनी स्वतःहून काटेकोर नियम पाळणे गरजेचे आहे ,तसेच मुंबई-पुणे-नाशिक तसेच इतर शहरातून गुपचूप रात्रीच्यावेळी ग्रामीण भागात किंवा शहरात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस चौथ्या टप्प्यात वाढत आहे, या बाहेरून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे, तसेच त्यांची माहिती स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे, शिर्डी भविष्यातही कोरोनामुक्त राहावी यासाठी सर्व शिर्डीकर यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आता सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे, दुकानदारांनी आपली दुकाने उघडली असली तरी आपली दुकाने वेळच उघडी ठेवावी, तसेच सेनेटायझर व मास्क वापरावे, ग्राहकांनाही मास्क असल्याशिवाय कोणतीही वस्तू देऊ नये, सोशल डिस्टंन्स  पाळणे महत्त्वाचे आहे, असेही बोलले जात आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-लाँक डाऊन काळात दुकान सुरु केल्याचा जाब ग्रामपंचायत कर्मचार्याने विचारताच दुकानदाराने संबधीत कर्मचाऱ्यांला शिवीगाळ केल्यामुळे बेलापूरात दिवसभर कोरोनाची नाही तर किराणाचीच चर्चा चालु होती.बेलापूर ग्रामस्थांनी १७ तारखेपर्यत दिवसाआड दुकाने सुरु  ठेवण्याचा निर्णय घेतला होता १७ तारखेनंतर काय हे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी ठरविणे गरजेचे होते परंतु तसा काही निर्णय न झाल्यामुळे किराणा दुकानदारांनी नेहमी प्रमाणे दुकाने सुरु केली किराणा दुकान सुरु झाल्याचे समजताच ग्रामपंचायत कर्मचारी खरोटे हे त्या ठिकाणी गेले व दंडाची पावती फाडली या वरुन दुकानदाराने कर्मचाऱ्यांस अरेरावी केली या वरुन काही काळ वातावरण संतप्त झाले होते व्यापाऱ्यांनी या बाबत तातडीने बैठक घेवुन पुढील निर्णय व्यापाऱ्यांना कळविणे आवश्यक असताना तसे केले नाही हा दोष आपला नाही आपल्याला मा जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी दिलेली आहे त्यामुळे सर्वानुमते तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे बैठकीत ठरले त्याप्रमाणे सर्व व्यापारी तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याकडे गेले बेलापूर ग्रामपंचायतीनेही तातडीने व्यापारी व ग्रामस्थ यांची एकत्रीत बैठक बोलविली या बैठकीत व्यापाऱ्यांना काही नियम घालुन दिले नियमाचा भंग करणारावर कायदेशीर कारवाई करण्याचेही बैठकीत ठरले छोट्या व्यवसायीकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या बैठकीत निर्णय घेण्यात आला व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी होणार नाही यांची दक्षता घ्यावयाची आहे सोशल डिस्टनींगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन प्रत्येक व्यापाऱ्यांनी सँनिटायझर  ठेवावे ठरवुन दिलेल्या वेळेतच दुकाने उघडी ठेवावी रविवार हा दिवस जनता कर्फ्यु म्हणून पाळण्यात यावा या नियमाचा भंग करणार्यावर कायदेशीर कारवाई करावी यात कुणीही राजकारण आणू नये असे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले अन काही तासातच बेलापूर गावची बाजारपेठ गर्दीने खुलली खरेदीदार व विक्रेते याची बाजारपेठेत गर्दी दिसु लागली या निमित्ताने बाहेर गावातील काही व्यापारीही माल विकण्यासाठी गावात येवु लागले असुन एखादा बाधीत व्यक्ती गावात आल्यास त्यास जबाबदार कोण असाही प्रश्न काही नागरीकांनी उपस्थित केला ग्रामपंचायत कर्मचार्यास शिवीगाळ करणार्या व्यापार्याने दिलगीरी व्यक्त केल्यामुळे तसेच विनापरवाना दुकान उघडल्यामुळे दंडात्मक कारवाई करुन त्या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असे असले तरी बेलापुर गावात दिवसभर कोरोनाची नव्हे तर किराणाचीच चर्चा होती.

♦पोकलैंड व 3 टिप्पर जप्त
🔹ठेकेदाराला 14 लाखचा दंड
बुलडाणा - 17 मे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वात अगोदर पैनगंगा नदीतील मुरुम,दगड खोदुन बुलडाणा-अजिंठा महामार्गाच्या कामात उपयोगी आना असे आदेश देऊन पैनगंगा नदीचे खोलिकरणच्या या कामाला त्यांनी आपले "पायलेट प्रोजेक्ट" म्हणून देशभरात प्रसिद्धि दिली मात्र या कामात प्रशासनच अडसर बनत असल्याची धक्कादायकबाब समोर आली असून देऊळघाट जवळ नदीचे खोलीकरणाचे काम थांबवून महामार्ग ठेकेदाराचे 3 टिप्पर व पोकलैंड बुलडाणा तहसीलदार यांच्या चमुने जप्त केल्याने त्यांनी एका प्रकारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना चैलेंज दिल्याची चर्चा महसूल प्रशासनात सुरु आहे.
     बुलडाणाचे तात्कालीन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेला हो म्हणत रास्ते व महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नदी,नाले,लहान कट्टे,धरण यातील मुरुम,दगड खोदुन सदर मटेरियल महामार्गाच्या कामी उपयोगी आणून या कामात लागणारा शासनाचा पैशा वाचवण्यासाठी खोलिकरणच्या कामांना प्राथमिकतेने करण्याचे निर्देश देशभरात दिले,जेणे करुण शासनाचे कोट्यावधी पैशेही वाचनार व पाणी पातळीही वाढणार.मागील दोन वर्षात पैनगंगा नदीचे मढ,पाडळी,दत्तपुर,कोलवड शिवारात खोलीकरण करण्यात आले.यावर्षी देऊळघाट जवळ मार्गाचा काम सुरु असल्याने संबंधित ठेकेदाराने गावा जवळ नादिखोलीकरण सुरु करूण मटेरियल मार्गाच्या कामासाठी नेन्यास सुरुवात केली मात्र शुक्रवारी दुपारी देऊळघाट नजीक पैनगंगा नदीतून अवैध मुरुमाचे उत्खनन सुरु असल्याची माहिती तहसीलदार संतोष शिंदे यांना कोणीतरी दिली. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन विचारपूस केली असता सुनील हायटेक कंपनीकडून बुलडाणा-अजिंठा महामार्गाच्या कामासाठी नदीतुन हे मुरुम उत्खनन सुरु असून त्यांनी काही पावती पुस्तक सुद्धा दाखविले व दत्तपूर येथे उत्खननाबाबत 2018 चा जिल्हाधिका-यांचा आदेश दाखविला.महसूल विभागा प्रमाणे आवश्यक कागदपत्रे आढळली नसल्याने 3 टिप्पर व एक पोकलैंड जप्त करून टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत.अवैध उत्खनन प्रकरणी संबंधित ठेकेदाराला 14 लाख दंड करण्यात आला आहे.एकीकडे मा. नितिन गडकरी यांच्या पैनगंगा नदी खोलिकरणच्या या "पायलेट प्रोजेकट" च्या नावा खाली बुलडाणा जिल्हा प्रशासनाने आपले उदो-उदो करुण घेतले व ज्या देऊळघाट गावाजवळ नदीचे खोलिकरण होऊन जमिनीतील जल पातळी वाढने गरजेचे असतांना त्या ठिकाणचे कामाला अवैध दाखवून अशा प्रकारे थांबविण्यात आल्याने गावकरी नाराज झाले आहेत.

नियम व अटींचे पालन न केल्याचे कारण, तहसीलदार प्रशांत पाटील यांचा आदेश.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील व्यवसाय सुरू करण्यात आले. परंतु व्यावसायिक व नागरिकांतून सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. अनावश्यक गर्दी केली. त्यामुळे सोमवार दि. 18 मे पासून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांना दिले. सदर आदेशाचे पालन करत मुख्याधिकारी समीर शेख यांनी सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद राहतील असे, जाहीर केले आहे.प्रशासनाने नियम व अटी घालून देऊन मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ खुली झाली होती. मात्र, बाजारपेठ खुली झाल्यानंतर व्यवसायिक व नागरिक यांच्याकडून नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या कालावधीनंतर लॉकडाऊनमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी सातत्याने केली होती. त्यास प्रतिसाद देत प्रशासनाने दि. 13 मे पासून काही नियम घालून देऊन बाजारपेठ खुली केली होती.
यावेळी दुकानदारांनी व पालिका प्रशासनाने गर्दीचे व इतर नियम पाळणे अपेक्षीत होते. मात्र तसे न झाल्याने शेवटी बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे.याबाबत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीत लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन झाले. त्यामुळे तालुक्यात करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तथापि शासनाच्या सुधारीत आदेशानुसार आर्थिक उलाढाली सुरू होणे आवश्यक असल्याने सोशल डिस्टन्सिंग अबाधित राहून शासनाच्या आदेशाच्या अधीन राहून इतर दुकाने उघडण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण शहरातील दुकाने सुरू करण्याचा आदेश दिला, मात्र मागील तीन दिवसांत असे निदर्शनास आले आहे, की गावातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहेत.तसेच दुकानांसमोर ग्राहकांचे सोशल डिस्टन्सिंग राखण्यात दुकानदारांना पालिका प्रशासनाला मर्यादा येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दीर्घकाळ रोखून ठेवलेला करोना विषाणूचा प्रादूर्भाव श्रीरामपूर शहरात व तालुक्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याने बाजारपेठेतील दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद करावी.तहसीलदारांचा हा आदेश मिळताच मुख्याधिकारी समीर शेख यांनी तत्काळ त्याची अंमलबजावणी करत श्रीरामपूर सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन तसे पत्रक पसिध्दी दिले आहे.
अन्यथा कारवाई होणार
सोमवार दि. 18 मे पासून श्रीरामपूर शहरातील जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करून कोणी दुकाने सुरू ठेवल्यास भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोगप्रतिबंधात्मक कायदा 1897 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

 अहमदनगर दि.१६: राहाता येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून लुटमार करणारे ४ गुन्हेगारांना दोन गावठी कट्टे व ७ जिवंत काडतुसासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी आरोपी किरण सोनवणे याच्यावर एकूण ३५ गुन्हे तर विकी चावरे याच्यावर ६ गुन्हे दाखल असून, याबाबत अधिक चौकशी करून पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली. यावेळी श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार आदी उपस्थित होते.पकडण्यात आलेल्या मध्ये किरण उर्फ अँन्थोनी छगन सोनवणे
( वय ३२, रा.पेठरोड,आरटीओ आँफिसजवळ, अश्र्वमेघनगर, नाशिक), बाबासाहेब शिवाजी पगारे (वय २०, रा.शिंगवे, ता.राहाता), विकी विष्णु चावरे (वय २९, रा.खंडोबागल्ली, राहाता) अशी नावे आहेत. या आरोपींकडून ५० हजार रु.च्या दोन गावठी कट्टे, १ हजार ४०० रु. सात जिवंत काडतुसे व एक रिकामी पुंगळी, ३८ हजार रु.वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, ४० हजार रु.चे शाईन मोटारसायकल (एमएच १५, जीएन ८५२७), ४० हजार रु.चे पल्सर (एमएच २०, एडडब्लु ७७७२) असा एकूण १ लाख ६९ हजार ४०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि.१५ मे ला सायंकाळी ५.३० वा.सुमारास कँनाँलच्या बाजूने मोटारसायकलने घरी जात होते. यावेळी आरोपींनी मोटारसायकल आडवी लावून मारहाण करुन बंदुकीचा धाक दाखवून जवळील पैसे बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरडा केल्याने आजुबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी लोकांचा जमाव पाहून आरोपींनी हवेत गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमलेल्या लोकांनी आरोपीचा पाठलाग करून एकास (आरोपी नारायण रामचंद्र म्हस्के वय २५, रा.विश्रांतवाडी, भिमनगर,पुणे) पकडले. उर्वरित आरोपी शेतामध्ये पळून गेले. पकडलेल्या आरोपीसह गावकऱ्यांनी राहाता पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची विकास पोपट ताठे यांनी फिर्याद दिली होती. या घटनेचे गांभीर्या ओळखून श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली. पळलेल्या आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके शोधार्थ पाठविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार शिंगवे येथे जाऊन सापळा लावून मुख्य आरोपी किरण सोनवणे याला पकडले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच, अनिल शिंदे, बाबासाहेब पगारे, विकी चावरे असे मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या माहितीवरुन आरोपी शिंदे,पगारे, चावरे याना पकडून त्याच्याकडील दोन गावठी कट्ट्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींपैकी किरण सोनवणे याच्यावर अनेक गंभीर ३५ गुन्हे नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर आरोपी विकी चावरे याच्यावर राहाता, लोणी पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत. या पकडण्यात आलेल्या आरोपींची अधिक चौकशी करण्यात येणार आहे. त्यादष्टीने पुढील तपास करण्यात येणार असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने या वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, पथकातील पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ मनोहर गोसावी, दत्ता हिंगडे, पोना शंकर चौधरी, आण्णा पवार, रविंद्र कर्डीले, भागीनाथ पंचमुख, सुनील चव्हाण, सुरेश माळी, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आडबल, विशाल दळवी, योगेश सातपुते, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे, बबन बेरड, भरत बुधवंत आदिंच्या पथकाने ही महत्त्वाची कारवाई केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget