Latest Post

बेलापूर( प्रतिनिधी  )- कोरोनाच्या धास्तीमुळे चिंतामणी- कुलथे परिवारांचा शुभविवाह केवळ दहा पाहुण्याच्या उपस्थितीत ना मांडव ना बँण्डबाजा ना गाजावाजा अशा पध्दतीने लिंबाच्या झाडाखाली  संपन्न झाला                      बेलापूर येथील भगीरथ चिंतामणी यांचे   चिरंजीव योगेश  व बुरुडगाव अहमदनगर येथील ज्ञानेश्वर विठ्ठल कुलथे यांची  मुलगी प्रज्ञा हीच्याशी निश्चित झाला होता विवाहची तारीख १५ एप्रिल धरण्यात आली होती परतु लाँक डाऊनमुळे विवाह करणे अशक्य झाले होते लाँक डाऊन वाढतच चालला होता अखेर ज्ञानेश्वर कुलथे व भगीरथ चिंतामणी यांनी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याची तयारी दर्शविली या करीता पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्याकडे परवानगी मागीतली पोलीस अधिकार्यानी काही मोजक्याच लोकाच्या उपस्थितीत विवाह करण्याच्या अटीवर परवानगी दिली मग काय ना मांडव ना बँडबाजा ना वरात केवळ दहा पाहुण्याच्या उपस्थितीत लिंबाच्या झाडाखाली  प्रज्ञा व योगेश यांचा विवाह संपन्न झाला या वेळी कुलथे व चिंतामणी परिवाराचे केवळ तीन ते चार हजार रुपयेच खर्च झाले या बाबत नवरदेव योगेश व नववधु प्रज्ञा यांनी अशी भावना व्यक्त केली की आपण खोट्या प्रतिष्ठेपायी मोठेपणा दाखविण्याच्या नादात कर्जबाजारी होवुन लग्न करतो लग्नात अनावश्यक खर्च करतो  पैशाची अन अन्नाचीही उधळपट्टी करतो परंतु कोरोनाच्या संकटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबाचा फार मोठा खर्च वाचला जो आमच्या भावी जिवनासाठी वरदान ठरु शकतो अशा प्रकारे विवाह करुन लग्नाचा फालतु होणारा खर्च आम्ही निश्चितच  चांगल्या कार्याला लावु त्यामुळे दोन कुटुंबाचे हे नाते अधिक घट्ट होणार आहे.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )साईबाबामुळे  न पाहता, पैशासाठी काहीही करत असून कोणालाही रूम देत असल्याने शिर्डीत गैरप्रकारांना आणखी बळ मिळत आहे, हे परत एकदा स्पष्ट झाले आहे ,दि, 30 एप्रिल 20 20 रोजी दुपारी शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथिल केके  मिल्क लगत हॉटेल वेलकम एस आर रिसॉर्ट हे कवडे यांचे असून ते कोपरगावचे विद्यमान नगराध्यक्ष विजयी वहाडणे यांचे चिरंजीव शिवराज वहाडणे यांनी  चालवायला घेतले आहे, येथे नुकतेच कोपरगावचे अपक्ष विद्यमान नगरसेवक यांचा मुलगा मोहसीन मोहम्मद सय्यद वय 29रा, गांधीनगर कोपरगाव व त्याची  27 वर्षीय एक महीला यांना लॉकडाऊनकाळात संचारबंदी असताना या हॉटेलचे व्यवस्थापक रामहरी जानराव काळे याने ओळखपत्र न पाहता पैशासाठी बेकायदेशीरपणे रूम दिली ,शिर्डी पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी येथे छापा टाकून त्यांना अय्याशी करताना रंगेहाथ पकडले, गुन्हा दाखल झाला मात्र पिटासारखा गुन्हा दाखल करण्याऐवजी नेहमीप्रमाणेभा,द,वि,188 (2)प्रमाणे 269 ,271 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा याप्रमाणे
 शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला मात्र संचार बंदीचा आदेश डावलून येथे अय्याशीसाठी रूम दिली जाते ,कोणतेही रजिस्टरनाही, नोंद ठेवली जात नाही, येथे बिनधास्त वेश्या व्यवसाय चालतो तरीही येथे पोलिसांचेही फारसे लक्ष नाही, या हॉटेलमध्ये दिनांक 30 एप्रिल रोजी अय्याशी करणाऱ्या राजकारणी तरुणाला एका महिलेचे बरोबर पकडले जाते,तरीही दुसऱ्याच दिवशी दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असताना व लॉकडाऊन सुरू असताना याचहॉटेलमध्ये दोन रूम बाहेरच्या लोकांना  पैशासाठी दिले जातात , एम एच 01,एमएच02 पासिंग च्या दोन कार या हॉटेल समोर पार्किंगला उभ्या असतात, रूममध्ये या कार मधील लोक मौजमजा करत  नियमांना पायदळी तुडवतात, मात्र या कानाची खबर त्या कानाला नाही असे हॉटेलवाले समजताच, पोलिसही कानाडोळा करतात,  याचा अर्थ काय।।
 येथे गेल्या काही दिवसापासून हायप्रोफेशनल वेश्याव्यवसाय चालतो, येथे नाशिक ,औरंगाबाद अहमदनगर जिल्ह्यातून मुली येत असतात, या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींचे फोननंबर हि येथील लॉजवालेकडेआहे, पैशाच्या व ग्राहकाच्या ऐपतीप्रमाणे येथे  वेश्यामुली बोलवल्या जातात, हे सर्व पैशासाठी बिनधास्त सुरू आहे ,या पाठीमागे कोण आहे ,
या हॉटेल बरोबरच शिर्डी व परिसरातील असे अनेक हॉटेल, लॉज आहेत, तेथे असा वेश्याव्यवसाय बिनधास्त चालतो, शिर्डी धार्मिक क्षेत्र आहे ,येथे मात्र दिवसेंदिवस वेश्याव्यवसाय, अवैध धंदे वाढले आहेत , सावळीवीहिर फाटा येथील हॉटेल मध्ये आदल्या दिवशी अवैध जोडपे पकडले जाते व दुसऱ्या दिवशी कसलाही विचार न करता लॉकडाऊनकाळात सर्व बंद असताना परत येथे दोन रूम दिल्या जातात ,याला कोणाचातरी पाठबळ असल्याशिवाय हे घडू शकत नाही याची आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करून परिसरात असे अनेक हॉटेल लॉज आहेत की तेथे सर्रास  वेश्याव्यवसाय चालत आहेहह बाहेरील लोक येथे येऊन बाहेरील मुली येथे येऊन हाव्यवसाय करतात, गुप्त पद्धतीने लक्ष ठेवून अशा हॉटेल,लॉजवर कठोर कारवाई करण्यात यावी व परिसराचे नाव त्यामुळे  बदनाम होण्यापासून टाळावे ,अशीच आता या परिसरातील नागरिक मागणी करत आहेत.

अहमदनगर दि. 2 - राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे  अहमदनगर जिल्‍हयात व राज्‍यामधील  इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी  व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीसाठी सोयीचे व्हावे यासाठी https://covid19.mhpolice.in लिंकद्वारे माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पदसिध्‍द नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये बाहेरुन येणा-या व्‍यक्‍तींसाठी  नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील यांची तर जिल्‍हयातून बाहेरच्‍या जिल्‍हयामध्‍ये जाणा-या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पथक क्रमांक 1 - अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये बाहेरुन येणा-या व्‍यक्‍तींसाठी - नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील (मो.9763739974), सहाय्यक नोडल अधिकारी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेचे तहसीलदार महेश पवार ( मो. 8956799922), करमणूक कर शाखा नायब तहसीलदार सुनिल पाखरे (मो. 9309881788) व पुनर्वसन शाखा अव्‍वल कारकून अमोल झोटींग (मो. 9922426717), कुळकायदा शाखा  अव्‍वल कारकून  शेखर साळूंके (मो.9881119866)आणि सं.गा.यो. शाखा लिपीक भगवान सानप (मो.9130836918) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहेत.
पथक क्रमांक 2- अहमदनगर जिल्‍हयातून बाहेरच्‍या जिल्‍हयामध्‍ये जाणा-या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील ( मो.9130799939), सहाय्यक नोडल अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील  (मो.7020739411), महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गिते (मो.9403709123), निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे (मो.9881304874) गृह शाखा नायब तहसीलदार राजू दिवाण (मो.9890929510) व निवडणूक शाखा अव्‍वल कारकून राजेंद्र शिंदे (मो. 7588543715), करमणूक कर  शाखा अव्‍वल कारकून  संदेश दिवटे (मो.7020945296) आणि ग्रामपंचायत शाखा लिपीक प्रवीण कांबळे (मो.7020360085) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहेत.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ) विनाकारण बाहेर फिरणे गुन्हाआहे, तरी शिर्डीतील काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर शतपावलीच्या निमित्ताने फिरण्यासाठी आपल्या घराबाहेर पडतात , त्यामुळे नियमाचे उल्लंघन होत असते, कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  लॉकडाऊन सुरू आहे, फिरण्यास परवानगी नसताना शिर्डीतील उपनगरात अनेक लोक, महिला, रात्री जेवण झाल्यानंतर शतपावलीच्या निमित्ताने आपल्या घराबाहेर पडतात व उपनगरातील रस्त्यांवर आपापसात गप्पा मारत फिरत असतात, सोशल डिंस्टन्स पाळत नाहीत ,मास्क वापरत नाहीत, रात्री आठ नंतर शिर्डी नगरपंचायतचे  कर्मचारी, पोलीस , उपनगरांमध्ये किंवा रस्त्यांवर नसतात ,त्याचा फायदा नागरिक घेत आहेत, संचारबंदीचे नियम पायदळी तुडवले जात आहे, पोलिसांकडून सकाळी मॉर्निंगवॉक करणाऱ्या लोकांवर कारवाई होते, रात्री जेवणानंतर शतपावली करणार्‍यांवर कारवाई का होत नाही,   रात्री आठ ते अकरा या वेळेत उपनगरातील स्ट्रीटलाईट नगरपंचायतीने बंद ठेवाव्यात, त्यामुळे तरी अंधार झाल्याने  कोणी फिरणार नाही.

बुलडाणा - 2 मे - बुलडाणा जिल्हा अन्तर्गतच्या जळगांव जामोद तालुक्यातील पिंपळगांव काळे या गावात ग्राम पंचायतच्या वतीने नाली बांधकामा साठी खोदण्यात आलेल्या एका खड्यात 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास 4-5 साप काही युवकांना दिसून आले त्यांनी ते मारून टाकले थोड्या वेळात पुन्हा त्या खड्यात अजुन साप दिसले असता काही लोकांनी त्या खड्यातील जमीन खोदली असता 30 ते 40 साप बाहेर निघाले.1 मे ला सायंकाळ पर्यंत त्या खड्यातुन 132 च्या जवळ साप निघाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालेली होती.भीतीपोटी गावकऱ्यांनी सर्व साप मारून टाकले.तर साप निघण्याचा सत्र सुरु असल्याची माहिती त्या गावातील नागरिकांनी दिली आहे.गावात एकही सर्पमित्र नसल्याने हे साप विषारी की बिनविषारी हे स्पष्ट झाले नाही परंतु मृत सापांचे फोटो पाहुन काही सर्प मित्रांनी हे साप पानदिवड जातीचे असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.तर ही घटना समोर आल्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची चौकशी करने अपेक्षित आहे.
कोब्रा,पानदिवड व कवड्या या 3 जातीचे आहे साप!सर्पमित्र रसाळ
बुलडाणा येथील सर्प मित्र एस. बी.रसाळ यांना पिंपळगांव काळे येथील घटनीची माहिती मिळताच त्यांनी आपली वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे सदस्य जळगाव जा. चे सर्प मित्र शरद जाधव व भगत सर यांना आज सकाळी पिंपळगांव काळे रवाना केले. या दोघे सर्प मित्रांनी घटनास्थळी जावून सर्व बारकाइने पाहणी केली असता मृत सापां मध्ये अतिविषारी कोब्राचे पिल्ले तसेच बिनविषारी पानदिवड व बिनविषारी कवड्या प्रजातिचा एक साप दिसून आला.एकंदरीत त्या ठिकाणी 3 जातीचे साप आढळूण आले तसेच कोब्रा नागचे पिल्लू लहान असल्याने नर-मादी कोब्रा त्याच परिसरात असल्याची शक्यता ही सर्पमित्र रसाळ यांनी व्यक्त करत म्हणाले की काही काळ अगोदर या गावातून नागरिकांची सूचनेवर आमच्या सर्प मित्रांनी अजगर पकडून नेला होता त्याच प्रमाणे गावातील नागरिकांनी या घटनेची सुद्धा माहिती आमच्या जळगाव जा.च्या सर्प मित्रांना वेळेवर दिली असती तर आज या सर्व सापांचे जीव वाचले असते,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रकरणाची चौकशी करणार!आरएफओ खान
जळगांव जामोद वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या पिंपळगांव काळे या गावात नाली बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात मोठ्या संख्येत साप निघाले होते.भीतिपायी नागरिकांनी सर्व सापांना मारून टाकले आहे.या घटनीची माहिती मिळाल्यानंतर आमचे वन कर्मचारी गावात रवाना करण्यात आले आहे,चौकशी करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जळगाँव जा. वनपरिक्षेत्र अधिकारी खान यांनी दिली आहे.

शिर्डी( राजेंद्र गडकरी ) -कोरोणामुळे सर्वत्रलॉकडाऊन सुरू आहे ,संचारबंदी जारी आहे, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घरात आहेत ,बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे, त्यामुळे राज्यात ,जिल्ह्यात अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे अनेकजण गुंतून पडले आहेत , अनेक जण पायी शेकडो किलोमीटर प्रवास करत आहेत, अशा लोकांना आपापल्या घरी ,आपापल्या जिल्ह्यात, राज्यात जाता यावे म्हणून कालच केंद्रीय गृहमंत्रालयाने अटी व शर्ती ठेवून अशा लोकांना आपापल्या जिल्ह्यात ,राज्यात जाण्यासाठी परवानगी दिली असल्याने आता अशा लोकांमधून आनंद समाधान निर्माण झाले आहे, मात्र अशा बाहेरच्या व्यक्तींना आपापल्या घरी जाण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा दाखला घेणे क्रमप्राप्त आहे, असा दाखला घेण्यासाठी शिर्डीत आज मोठी गर्दी झाली होती, लॉक डाऊनच्या काळात शिर्डीत अडकलेल्या अनेक बाहेरचे जिल्ह्यातील, राज्यातील कामगार, साईभक्त, नागरिक अडकून पडले होते, अशा लोकांना आता आपापल्या घरी, आपल्या जिल्ह्यात राज्यात जाता येणार असून त्यासाठी हे लोक शिर्डी नगरपंचायत मध्ये दाखला घेण्यासाठी गर्दी करत होते ,मात्र यावेळी सोशल डिस्टन्स व मास्क या नियमाचे उल्लंघन झालेले दिसून येत होते,कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू आहे, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू झाल्यानंतर 25 मार्चपासून लॉक डाऊन सुरू करण्यात आला ,14 एप्रिलला लॉक डाऊन संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला, तीन मे पर्यंत तो सुरू आहे, त्यानंतर हा लॉक डाऊन वाढतो की काय अशी नागरिकांमध्ये शंका आहे, मात्र या लॉकडाऊन मुळे शिर्डी व परिसरात अनेक बाहेरच्या जिल्ह्यातील ,राज्यातील पोटापाण्यासाठी येथे आलेले मजूर, कामगार ,साई भक्त असे अनेक जण शिर्डीत अडकून पडले होते ,शासनाने त्यांची भोजन व निवासाची व्यवस्था व्यवस्थित केली होती, मात्र अनेक दिवस झाल्यानंतर आपापल्या घरी जाण्याची प्रत्येकाला ओढ होती ,महाराष्ट्रातून अनेक जण मुंबई पुण्यातून बिहार ,उत्तर प्रदेश मध्ये इतर राज्यात वेगवेगळ्या मार्गाने कोणी सायकलवर ,कोणी मोटरसायकलवर,विविध प्रकारे, कोणी पायी जातानाचे चित्र अनेकदा दिसत होते ,अशा बाहेरच्या लोकांचे हाल होत असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच आदेश काढून अशा लोकांना काही अटी व शर्ती वर आपापल्या राज्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यानुसार शिर्डी व परिसरात असणाऱ्या बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील लोकांना मजूर कामगार ,साईभक्त यांना शिर्डीच्या नगरपंचायत मधून दाखला घ्यावा लागणार आहे ,तसे राहत्या चे  तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, ग्रामसेवक कामगार तलाठी ,न,पं,मुख्याधिकारी मंडलाधिकारी ,यांना तसे आदेश दिले आहेत खात्री करून अशा व्यक्तींना त्या-त्या ग्रामपंचायत, नगरपंचायत चा दाखला देण्यात येणार आहे व त्यांची नावे जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयात पाठविण्यात येणार असून तेथून मग पुढील निर्णय होणार आहे ,आपल्या जिल्ह्यात राज्यात गेल्यानंतर या लोकांना तपासणी करून 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे, आपापल्या घरी जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी शिर्डीत मोठ्या संख्येने लोक नगरपंचायत कार्यालयासमोर जमा झाले होते, मात्र या ठिकाणी अनेक जणानां मास्क नव्हते, सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला होता, असे होऊ नये यासाठी नगरपंचायत दक्षता घेणे गरजेचेआहे, असे शिर्डीकर बोलत होते, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील राज्यातील लोकांनी आपापल्या घरी जाताना लोकांचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे सोशल डिस्टन्स मास्क या गोष्टी पाळणे महत्त्वाचे असून अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल त्यामुळे कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये असे राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले,
राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी

एक मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी लॉक डाऊन  चे नियम पाळावेत ,आपल्या घरात रहावे, कुणी विनाकारण बाहेर फिरू नये, सोशल डिस्टंन्स व मास्क तसेच सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करत सुरक्षित रहा घरात राहा ,आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळा, असे यावेळी बिंदास न्यूज शी बोलताना सांगितले,

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) समस्त मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले असून या आणीबाणीच्या स्थितीतही महाराष्ट्र पोलीस जीवाची पर्वा न करता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत आहेत. जनतेच्या रक्षणासाठी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी रात्रंदिवस राबून पोलिस प्रशासन करीत आहे . या संसर्गाचा धोका ओळखून ही प्रत्येकजण राबत आहे. पोलिसांमध्ये सुद्धा सहृदय माणूस असतो याची उदाहरणे या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाली .हे अस्मानी संकट असून यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करूया त्याचबरोबर पोलिस प्रशासनाकडून  मिळणाऱ्या  आदेशाचेही पालन करून पोलिसांना सहकार्य करू या असे प्रतिपादन मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन साहब यांनी केले .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन मध्ये ठीक ठिकाणी आपले कर्तव्य अहोरात्र पार पाडणाऱ्या पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उम्मती फाउंडेशन' चे अध्यक्ष सोहेल बारुदवाला यांचेतर्फे सॅनिटायझर, मास्क व अल्पोपहाराचे वाटप मौलाना आझाद चौक तसेच बेलापूर रोडवरील चौकात करण्यात आले .त्या प्रसंगी मुफ्ती रिजवान यांनी आपले विचार व्यक्त केले .
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व मुफ्ती रिजवान साहब यांच्या मार्गदर्शना ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, पत्रकार सलीमखान पठाण, हाजी जलीलभाई काझी यांच्या हस्ते सर्व पोलिसांना हे साहित्य वितरण करण्यात आले. जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी उपस्थितांनी केल्या. समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. त्यांनी स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. याकरिता प्रत्येकाने योग्य ती दक्षता घ्यावी. असे आवाहन ही मुफ्ती रिजवान साहब यांनी केले . हेड कांस्टेबल जोसेफ साळवे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला .
सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उंमती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला,डॉक्टर तोफिक शेख, फिरोज पठाण, युसुफ लाखानी,शाकीब पठाण, वसीम जहागिरदार, निरज शाह, माजिद मिर्झा, अलीम बागवान, शाहरुख बागवान, मोहसिन बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget