आपल्या घरी जाण्यासाठी बाहेरच्यांची लगबग। न,पं चा।दाखला घेण्यासाठी होते आहे तगमग।

शिर्डी( राजेंद्र गडकरी ) -कोरोणामुळे सर्वत्रलॉकडाऊन सुरू आहे ,संचारबंदी जारी आहे, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घरात आहेत ,बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे, त्यामुळे राज्यात ,जिल्ह्यात अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे अनेकजण गुंतून पडले आहेत , अनेक जण पायी शेकडो किलोमीटर प्रवास करत आहेत, अशा लोकांना आपापल्या घरी ,आपापल्या जिल्ह्यात, राज्यात जाता यावे म्हणून कालच केंद्रीय गृहमंत्रालयाने अटी व शर्ती ठेवून अशा लोकांना आपापल्या जिल्ह्यात ,राज्यात जाण्यासाठी परवानगी दिली असल्याने आता अशा लोकांमधून आनंद समाधान निर्माण झाले आहे, मात्र अशा बाहेरच्या व्यक्तींना आपापल्या घरी जाण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा दाखला घेणे क्रमप्राप्त आहे, असा दाखला घेण्यासाठी शिर्डीत आज मोठी गर्दी झाली होती, लॉक डाऊनच्या काळात शिर्डीत अडकलेल्या अनेक बाहेरचे जिल्ह्यातील, राज्यातील कामगार, साईभक्त, नागरिक अडकून पडले होते, अशा लोकांना आता आपापल्या घरी, आपल्या जिल्ह्यात राज्यात जाता येणार असून त्यासाठी हे लोक शिर्डी नगरपंचायत मध्ये दाखला घेण्यासाठी गर्दी करत होते ,मात्र यावेळी सोशल डिस्टन्स व मास्क या नियमाचे उल्लंघन झालेले दिसून येत होते,कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू आहे, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू झाल्यानंतर 25 मार्चपासून लॉक डाऊन सुरू करण्यात आला ,14 एप्रिलला लॉक डाऊन संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला, तीन मे पर्यंत तो सुरू आहे, त्यानंतर हा लॉक डाऊन वाढतो की काय अशी नागरिकांमध्ये शंका आहे, मात्र या लॉकडाऊन मुळे शिर्डी व परिसरात अनेक बाहेरच्या जिल्ह्यातील ,राज्यातील पोटापाण्यासाठी येथे आलेले मजूर, कामगार ,साई भक्त असे अनेक जण शिर्डीत अडकून पडले होते ,शासनाने त्यांची भोजन व निवासाची व्यवस्था व्यवस्थित केली होती, मात्र अनेक दिवस झाल्यानंतर आपापल्या घरी जाण्याची प्रत्येकाला ओढ होती ,महाराष्ट्रातून अनेक जण मुंबई पुण्यातून बिहार ,उत्तर प्रदेश मध्ये इतर राज्यात वेगवेगळ्या मार्गाने कोणी सायकलवर ,कोणी मोटरसायकलवर,विविध प्रकारे, कोणी पायी जातानाचे चित्र अनेकदा दिसत होते ,अशा बाहेरच्या लोकांचे हाल होत असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच आदेश काढून अशा लोकांना काही अटी व शर्ती वर आपापल्या राज्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यानुसार शिर्डी व परिसरात असणाऱ्या बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील लोकांना मजूर कामगार ,साईभक्त यांना शिर्डीच्या नगरपंचायत मधून दाखला घ्यावा लागणार आहे ,तसे राहत्या चे  तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, ग्रामसेवक कामगार तलाठी ,न,पं,मुख्याधिकारी मंडलाधिकारी ,यांना तसे आदेश दिले आहेत खात्री करून अशा व्यक्तींना त्या-त्या ग्रामपंचायत, नगरपंचायत चा दाखला देण्यात येणार आहे व त्यांची नावे जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयात पाठविण्यात येणार असून तेथून मग पुढील निर्णय होणार आहे ,आपल्या जिल्ह्यात राज्यात गेल्यानंतर या लोकांना तपासणी करून 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे, आपापल्या घरी जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी शिर्डीत मोठ्या संख्येने लोक नगरपंचायत कार्यालयासमोर जमा झाले होते, मात्र या ठिकाणी अनेक जणानां मास्क नव्हते, सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला होता, असे होऊ नये यासाठी नगरपंचायत दक्षता घेणे गरजेचेआहे, असे शिर्डीकर बोलत होते, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील राज्यातील लोकांनी आपापल्या घरी जाताना लोकांचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे सोशल डिस्टन्स मास्क या गोष्टी पाळणे महत्त्वाचे असून अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल त्यामुळे कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये असे राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले,
राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी

एक मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी लॉक डाऊन  चे नियम पाळावेत ,आपल्या घरात रहावे, कुणी विनाकारण बाहेर फिरू नये, सोशल डिस्टंन्स व मास्क तसेच सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करत सुरक्षित रहा घरात राहा ,आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळा, असे यावेळी बिंदास न्यूज शी बोलताना सांगितले,

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget