Latest Post

शिर्डी ।जितेश लोकचंदानी । सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राहता तालुक्यात शासनाच्या वतीने  शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे, मात्र अनेक रेशन दुकानांमधून अशा शिधापत्रिकाधारकांची अडवणूक करण्यात येत आहे, प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याऐवजी दोन किंवा तीन किलो तांदूळ दिले जातात ,अश्या लाभार्थीकडून तक्रारी येत आहेत, यावर जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच राहाता तहसीलदारसाहेब यांनी अश्या रेशन दुकानदारांवर त्वरित कारवाई करावी ,अशी मागणी होत आहे,कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, सर्वत्र बंद असल्यामुळे कामधंदा नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना पोटापाण्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शासनाने शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सध्या राहता तालुक्यात होत आहे, एप्रिल ,मे, जून अशा तीन महिन्यासाठी लाभार्थींना मोफत तांदूळ मिळणार आहे व त्याचे वाटप सध्या सुरू आहे ,मात्र राहता तालुक्यातील काही ठिकाणी रेशन दुकानदारांकडून अश्या लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे, अशाच सावळीविहीर येथील राजीव गांधी या रेशन दुकानदार वाल्याकडून निघोज येथील एका लाभार्थींना कुटुंबात पाच सदस्य असल्याने त्यांना नियमानुसार 25 किलो मोफत तांदूळ देणे गरजेचे असताना त्यांना फक्त दहा किलो तांदूळ दिले गेले ,अशी तक्रार लाभार्थी सौ सुवर्ण अनिल येेवले यांनी केली आहे ,तसेच रेशन दुकानातून पिवळे रेशन कार्ड असतानाही अन्नधान्य घेतल्यानंतर पावती देणे क्रमप्राप्त असतानाही पावती दिली जात नाही, असे ग्रामीण भागात प्रकार घडत असून अशांवर चौकशी करून कारवाई करावी, सावळीविहीर येथील राजीव गांधी या  रेशन दुकानदारांवर  सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी  जिल्हा पुरवठा अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी हेअसताना  लाभार्थींनी तक्रार केली होती  व त्यावेळी  असाच प्रकार घडला होता,  आता परत  हा प्रकार या रेशन दुकानदार वाल्याकडून होऊ लागला  आहे  ,त्यामुळे  या रेशन दुकानदारावर  कारवाई करावी, अशी मागणी रावसाहेब एखंडे यांनी केली आहे, तसेच  गावागावात या रेशन दुकानदारांवर  मोफत तांदूळ देतांना लक्ष ठेवण्यासाठी  शासनाच्या आदेशान्वये  कामगार तलाठी, ग्रामसेवक ,सरपंच , पोलिस पाटील आदींची कमिटी नेमून आशा रेशन दुकानांच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात यावे ,  अनेक ठिकाणी  रेशन दुकानात अन्नधान्य घेण्यासाठी लाभार्थी  गर्दी करतात , रेशनदुकानदारही लॉक डाऊन चे नियम   पाळत  नाही , तरी अशा   रेशन दुकानदारांवर  लॉक डाऊन चे नियम पाळण्यासाठी  सक्ती करावी , अन्यथा  कडक कारवाई करावी ,अशी मागणी लाभार्थी व नागरिकांकडून कडून होत आहे.

दुःखद निधन मुख्तार उस्मान खान
श्रीरामपूर प्रतिनिधी- येथील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष हाजी मुख्तार उस्मान खान ( वय 78 ) यांचे रात्री दीड वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले.माजी मंत्री गोविंदराव आदिक यांचे ते निकटचे कार्यकर्ते होते .श्रीरामपूरातील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या उभारणीमध्ये तसेच जामा मशिदीच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता .
 के जी ए उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका महेजबीन खान,टिळकनगर उर्दू शाळेच्या शिक्षिका शिरीन खान तसेच शिर्डी उर्दू शाळेच्या उपाध्यापिका जरीन खान तसेच इंजिनिअर परवेज खान व जिया खान यांचे ते वडील तर ठेकेदार एस के खान,आरटीओ एजंट निजामभाई शेख यांचे ते सासरे होते .त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज सकाळी कब्रस्तानात त्यांचा दफनविधी पार पडला .मुख्तारभाई यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना इच्छा असूनही त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही .अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद तसेच उर्दू शिक्षक संघटना व मुशायरा कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असुन प्रवाशाच्या सोयीसाठी रस्त्यावर धावाणारी लालपरी एस टी बस स्थानक व रेल्वे स्थानक सुनसान झाले आहे  कोरोनामुळे दाळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे प्रवाशांनी गजबजलेले बस स्थानक सुनसान झाले आहे रस्त्यावर धावाणार्या बसेस प्रवाशांची वाट पहात एका रांगेत निवांत बसलेल्या आहे एस टी महामंडळाच्या ईतिहासात ही पहीलीच वेळ आहे इतक्या दिवस कधीच बस बंद झालेल्या नव्हत्या  तिच अवास्था रेल्वेची झिलेली आहे रेल्वेचा प्रविसा हा अतिशय सुखकर असणारा समजला जात होता गरीबांच्या खिशालाही परवडणारा होता परंतु कोरोनामुळे रेल्वे देत जागेवारच थांबली आज बसा स्थानक असो वा रेल्वे स्थानक प्रवाशाविना सुनसान झाले आहे नागरिकही लाँक डाऊनमुळे एकाच जागेत बंदीस्त झालेले आहे अनेक प्रवाशांनी पायीच गाव गाठणे पसंत केले गावागावाच्या सिमा बंद केल्यामुळे त्या प्रवाशंना घरची वाट देखील बिकट झालेली आहे अशाही परिस्थितीत पोलीस बाधव सामाजिक  कार्यकर्ते अशा लोकांच्या जेवणाची व रहाण्याची व्यवस्था करत आहे कोरोनाच्या संकटकाळात खर्या माणूसकीचे दर्शन पावलो पावली होत आहे.

गिनी गवत कापताना अंबादास गिते.
नेवासे :कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनच्या काळातील जमावबंदी आणि संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर काम करण्यात पोलिस आघाडीवर आहेत. हे करत असताना नियम मोडणाऱ्या अनेकांना दंडुक्‍याचा प्रसाद द्यावा लागला. त्यातून नागरिकांची नाराजी पचवून समाजाच्या भल्यासाठी ते लढत आहेत... त्यातच या काळातही घडणाऱ्या एखाद-दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठीही त्यांना धावपळ करावी लागत आहे. मात्र, आरोपींच्या घरी हंबरणाऱ्या जनावरांची सेवाही करण्याची संधी मिळेल, असे कोणा पोलिसाला कधी वाटले नसेल... नेवासे तालुक्‍यात मात्र हा अनुभव सध्या येत आहे... अर्थात ही संधी स्वतः दोन पोलिसांनीच साधली आणि "खाकी'तील माणुसकीचा नवा प्रत्यय समाजाला दिला... खरे तर भुकेल्या जनावरांसाठी हे दोन पोलिस देवदूतच बनून आले...
जनावरांसाठी घास कापताना भीमराज पवार.
घटनेनंतर घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही फिरकत नव्हते. अशातच कुकाणे पोलिस दूरक्षेत्रातील हेड कॉन्स्टेबल भीमराज पवार व कॉन्स्टेबल अंबादास गिते तपासासाठी वस्तीवर गेले. त्यांना पाहून तेथे बांधलेल्या सहा गायी-म्हशी आणि आठ शेळ्यांनी जोरदार हंबरडा फोडला. शेतकरीपुत्र असलेले पवार व गिते यांच्या मनात कालवाकालव झाली. या जित्राबांच्या भावना ओळखून त्यांनी त्यांना गोंजारले. जवळच शेतातील गिनी गवत, घास कापून, ऊस तोडून त्यांना टाकला आणि त्यांच्यासाठी पाणीही ठेवले. पवार व गिते हे फक्त एकच दिवस करून थांबले नाहीत, तर रविवारपासून आजपर्यंत ते आपल्या कर्तव्याच्या वेळेतून वेळ काढून सकाळ-सायंकाळ न चुकता या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करत आहेत. या दोन्ही "खाकीधारीं'च्या या अनोख्या कर्तव्याचे परिसरात कौतुक होत आहे.

(शिर्डी प्रतिणिधि जय शर्मा  )१४ हजार  जप्त मुंबई, दि.२२ : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६२ हजार ९८७ गुन्हे दाखल झाले आहेत तर १३ हजार ८६९ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४४ हजार १३५ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७४ हजार ६१६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर ‘क्वारंटाईन’ असा शिक्का आहे, अशा ५९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०६७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ४१ लाख (२ कोटी ४१ लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.१२ अधिकारी व ५२ पोलिसांना बाधा  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारीदेखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने १२ पोलीस अधिकारी व ५२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १३४ घटनांची नोंद झाली असून यात ४७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सावळीविहीर राजेंद्र गडकरी     ।। सध्या कोरोनामुळे देशात लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे सर्व काही बंद आहे, लोक घरात आहेत त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब महिलांना स्वयंपाकासाठी  अडचण भासू नये म्हणून याकाळात केंद्र शासनाने उज्वला गॅस मोफत देण्याची घोषणा केली आहे, एप्रिल ,मे ,जून असे तीन महिने उज्वला गॅस  या महिलांना मोफत मिळणार आहे, सध्या गावागावात महिलांना उज्वला गॅस मिळत आहे, मात्र उज्वला गॅस देणाऱ्या एजन्सी व गॅस कर्मचाऱ्यांकडून अनेक ठिकाणी लॉक डाऊन चे नियम मोडले जात आहेत, सावळीविहीर येथेही उज्वला गॅस देण्यासाठी संवत्सर येथून एका गॅस एजन्सीची सिलेंडर घेऊन मालवाहतूक  पिकअप जिप येथे येते , या उज्वला गॅससाठी  आगाऊ नोंदणी केल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी गॅस सिलेंडर दिले जाते, अनेक उज्वला गॅस घेणाऱ्या महिला ह्या ग्रामीण भागातल्या आहेत ,त्यांना अधिक माहिती नसते, त्या गॅस घेण्यासाठी हेलपाटे मारत असतात, त्यांना योग्य सल्ला ही दिला जात नाही, ही गॅस सिलेंडर  जीप सावळीविहीर येथील  बाजार तळावर येते, येथे दररोज ही सिलेंडरची जीप आल्यानंतर मोठी गर्दी होते, अनेक मोटरसायकली ,सायकली महिला-पुरुष, मुले येथे उज्वला योजनेचा गॅस सिलेंडर घेण्यासाठी जमा होतात, सध्या लॉक डाऊन सुरू आहे, संचारबंदी जारी आहे, त्यामुळे सर्वांना नियम सारखेच आहे, सोशल डिस्टंन्स ठेवून गॅस वितरित करणे गरजेचे आहे, येथे मात्र असे होत नाही, अनेकांच्या तोंडाला मास्क  नसते, सोशल डिस्टंन्स पाळला जात नाही, येथे लॉक डाऊन च्या नियमाचा फज्जा उडत आहे, अनेकजण मोफत उज्वला गॅस सिलेंडर घेण्यासाठी चढाओढ करतात, येथे गर्दी होते, लॉकडाऊन  चे नियम पूर्णतः पायदळी तुडवले जात आहे ,अनेकजण जीप चालका  बरोबर  गॅस सिलेंडरची नोंद करण्यासाठी  धडपड करत असतो, त्यामुळे सामाजिक दूरी राहत नाही,  अनेक जण गॅस सिलेंडर मिळेपर्यंत  एकत्रित गप्पा मारताना दिसतात, येथे  कोणीही कोरोना  संदर्भात कोणतीही दक्षता घेताना दिसून येत नाही गॅस  वितरण कर्मचाऱ्यांनी तरी याचे भान ठेवले पाहिजे व ग्राहकांना  तसेच स्वतःही भाऊंचे नियमाचे आचरण केले पाहिजे, हे असेच अजून सुरू राहिले तर दुर्दैवाने  मोठे संकट येथे निर्माण होऊ शकते, त्यामुळे या सर्वांवर  कारवाई होणे गरजेचे आहे ,तसेच येथील उज्वला गॅस एजन्सी कडून एका गॅस सिलेंडरचे 740 रुपये घेण्याऐवजी 780 रुपये घेतले जातात, प्रत्येक सिलेंडर मागे 40 रुपये अधिक घेतले जातात, सिलेंडरचे हे वाहतूक  भाडे घेत असल्याचे  गॅस वितरण कर्मचारी सांगतात,अशी तक्रारही काही महीलां करत असुन यावर जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे उज्वला गॅस धारक महिला बोलत आहेत.

(शिर्डी प्रतिनिधि राजेंद्र गडकरी ) कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव  सुरू असलेल्या लाॅकडाउन मुळे शेतकरी व सर्व सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर अडचणी मध्ये आलेले आहे  शेतकरी. लोकांना  मोठा आधार ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टी कोणातुन नुकतीच सुरू झालेल्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेअंतर्गत राहता तालुक्यातील जवळपास २०७४६पात्र शेतकरी लोकांच्या बॅन्क खात्यात  दोन कोटी  १४लाख रुपये  जिल्हाधिकारी राहुल द्रविदी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे  माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे-पाटील. खा सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती राहता येथील तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली
       शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ नियमीत पणे दिला जातो मात्र लाॅकडाउन काळात तातडीने या योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करून  शेतकऱ्यांना आधार ठरलेल्या या योजनेचा लाभापोटी प्रत्येकी दोन हजार रुपये थेट बँक खात्यात तातडीने वर्ग केल्यामुळे राहता तालुक्यातील शेतकरी बांधवांन मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे त्या बरोबरच  केन्द्र व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेत समावेश असलेल्या ७४००लाभार्थीना ७९लाख तर इंदिरा गांधी निराधार योजनेतील  श्रावणबाळ जेष्ठ नागरिक आदींसह असलेल्या पात्र १०६२९ पात्र लाभार्थी यांना १कोटी ७५लाख  अशी जवळपास  जानेवारी फेब्रुवारी पोटी १कोटी ८६लाख ८२हजाराची रक्कम त्यांच्या बॅंकांच्या खात्यात वर्ग देखील तात्काळ केली गेली आहे विविध योजनांचा लाभ लोकांना तात्काळ कसा देता येईल यासाठी देखील प्रयत्न केला गेला त्यामुळे  या अडचणीच्या काळात सर्व सामान्य गरजु कुटुंबातील लोकांना हा मोठा आधार ठरला आहे   यासाठी राहता  तहसील कार्यालयात असलेल्या कर्मचारी सतिश पाटोळे  अनिल फोफसे  तुपे त्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे जवळपास    २०७४६शेतकरी लोकांना  दोन कोटी १४लाख तर  संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना यातील  १८०२९लाभार्थीना  १कोटी ८३लाख अशी चार कोटी रुपयांच्या भरीव लाभ राहता तालुक्यातील जनतेला मिळाला आहे  यामुळे राहता तालुक्यातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget