चुकीचा संदेश पाठविणार्या मनोज चिंतामणी विरुध्द श्रीरामपूरात पहीला गुन्हा दाखल.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी )-मोबाईलवरील व्हाँटसअप वर चुकीचा संदेश पसरवुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणार्या मनोज चिंतामणी याच्या विरुध्द श्रीरामपूर तालुक्यात पहीला गुन्हा दाखल झाला आहे या बाबतची फिर्याद श्रीरामपूर येथील अँड . समिन अजिज बागवान वय- 35,धंदा-वकिली रा.संजय हौसिंग सोसायटी संजय नगर,वॉर्ड नं-2,श्रीरामपूर जि-अहमदनगर यांनी दिली असुन त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की
मी वरील ठिकाणी आई,वडील,पत्नी व मुलासह राहत असून वकिली व्यवसाय करून उपजीविका भागवितो.मी माझा मोबाईल नंबर आज सकाळी 10:15 वा चे सुमारास नेट चालू केले असता श्रीरामपूर विचार मंच या ग्रुप वरील मेसेजेस बघत असता मनोज चिंतामणी यांनी त्यांचे मोबाईल . वरुन एक पोस्ट फॉरवर्ड केल्याचे माझ्या वाचनात आले सदर ग्रुप मधे 220 विविध धर्माचे सदस्य आहेत सदर ग्रुप वर केवळ एका धर्मा बद्दल चुकीचा व लोकांची बदनामी होईल तसेच दोन समाजात तेढ़ निर्माण होईल असा मजकुर पाठविण्यात आला होता
त्यामध्ये सर्वाना विनंती करण्यात आलेली होती की 'आपल्या गल्लीत टरबूज,खरबूज,अंगुर,कांदे, बटाटे, लसूण,अद्रक,भाजीपाला साठी टेम्पो किंवा गाडी घेऊन काही लोक येत आहेत. कृपया त्यांच्या कडून काही खरेदी करू नका.असा चुकिचा सदेश प्रसारित केला होता
या आणि अशा आशयाचा अन्य मजकुर असणार्या या मेसेजमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते असे मला वाटते, तसेच ' ठराविक लोकांकडून भाजीपाला,तसेच कसलाही माल विकत घेऊ नका. तसे केल्यास..तुम्ही तुमचा मृत्यू विकत घेत आहात हे लक्षात ठेवा' अशा आशयाचा मेसेज मनोज चिंतामणी या व्यक्तीने काल ग्रुप वर फॉरवर्ड केलेला होता,
तरी माझी सदरील व्यक्ती नामे मनोज चिंतामणी या विरुद्ध कायदेशीर
भा द वी कलम 295आ नुसार फिर्याद आहे अँड समिन बागवान यांच्या फिर्यादी वरुन पोलीसांनी मनोज चिंतामणी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चुकीचे गैरसमज पसारविणारे संदेश पसरवु नये असे अवाहन केले जात असताना देखील अनेक फेक मेसेज संध्या व्हायरल होताना दिसत आहे या फेक मेसेजमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची दाढ शक्यता असते या बाबत श्रीरामपूर तालुक्यात पहीलाच गुन्हा दाखल झाल्यामुळे झटपट चुकीचे मेसेज पाठविणार्यांना एक प्रकारे चपराकच बसली आहे