Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील पंधरा दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील लग्न समारंभ, यात्रा, वाढदिवसाच्या पार्ट्या व अन्य गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच चित्रपट गृह, मॉल या ठिकाणी असणारे रिलिंग व खुर्च्या वर असणारे कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहे.

बुलडाणा - 12 मार्च
वन व वनसंपत्तिचे रक्षणासाठी वनविभागाच्या माध्यमाने शासन कोठ्याधीश खर्च करते परंतु या खात्यात काही "रक्षक" एवजी "भक्षक" आहे जे आपला कर्तव्य विसरून गैरकृत्य करत आहे.अशीच बाब बुलडाणा डीएफओ संजय माळी यांच्या एका धाडीत समोर आली असून पकडलेला अवैध सागवन कोणी दुसऱ्याचा नसून चक्क वनपालाचा असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
       बुलडाणा जिल्ह्यात वन विभागात गुम्मी वर्तुळ मिळवण्यासाठी मोठी ओढतान असते,त्याचे कारण ही तसेच आहे.या भागातील जंगलात व खाजगी शेतात मोठ्या प्रमाणात सागवन आहे व या परिसरात कोणी फारसा लक्ष ही देत नाही म्हणूनच वृक्षरोपण,संगोपन व इतर विकास कामात भरपूर वर कमाई होते अशी धारना वन कर्मचाऱ्यात आहे.सद्या गुम्मी वर्तुळ मध्ये वामन पवार वनपाल म्हणून कार्यरत आहे असून या परिसरात अवैध वृक्ष कटाई चा प्रमाण वाढलेला आहे.तर चला आता येऊ 8 मार्चच्या घटनेकडे,सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार बुलडाणा डीएफओ संजय माळी यांना गुप्त माहिती मिळाली की,एका मालवाहू  वाहनातून अवैध सागवानची तस्करी होणार आहे व सदर लाकुड धाड-रोइखेड मायंबा- साकेगांव मार्गे चिखलीकडे जाणार आहे. ही माहिती मिळाल्याने डीएफओ संजय माळी यांनी आपल्या सोबत बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांना घेऊन चिखली जवळील अनुराधा कॉलेज येथे 8 मार्चच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या एका टाटा मैजिक मालवाहू वाहनाला थांबवून त्याची झळती घेतली पण  त्यात बाभळीचा जळतनच मिळून आला,शेवटी चालकाला विचारपुस केली असता त्याने सांगितले की सागवानचे कापलेले रीपा सर्वात खाली ठेवलेले आहे.या वाहनात वनपाल पवार यांचा जवळचा नातेवाईक सुद्धा बसलेला होता व वनपालची बैग ही या वाहनातून जप्त करण्यात आली. सदर वाहन बुलडाणा येथील लाकुड आगारात जमा करण्यात आला असून या प्रकरणी वनपालने दुधा येथील एका मिस्त्रीचा बिल सादर केला असला तरी त्यांच्याकडे वाहतूक पास होती का?आता पर्यंत या वनपालाने अशा प्रकारे किती वेळ अवैधरित्य सागवानची तस्करी केली??ढालसांवगी येथील शासकीय निवासस्थानचा वापर अवैध लाकुड ठेवण्यासाठी का केला? वनपाल वर गुन्हा कधी दाखल होणार?? अशे अनेक प्रश्नांचे उत्तर लवकरच समोर येणे गरजेचे आहे.

बयान ठरणार महत्वाचे
वाहन पकडल्या नंतर वन विभागाने चालकावर गुन्हा दाखल केला असला तरी चालकाचा बयान महत्वाचा आहे.आज 12 मार्च रोजी बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे धाड परिसरात पोचले व त्यांनी इतर काही लोकांचे सुद्धा बयान घेतले आहे.हे सर्व बयान वनपाल पवार यांना घातक ठरणार असल्याची चर्चा वन विभागात सुरु आहे.

योग्य कारवाही करणार! टेकाळे
अवैधरित्य सागवान घेऊन जाणारा वाहन पकडण्यात आलेला असून त्याच रात्री वाहन चालकावर वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.लाकुड कुठून आनले? कोणाचे होते?व कुठे नेले जात होते याची पूर्ण चौकशी दोन दिवसात करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येईल.जे कोणी दोषी असेल त्याला सोडण्यात येणार नाही,अशी प्रतिक्रिया बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांनी "बिंदास न्यूज़" ला दिली आहे.

बुलढाणा - 10 मार्च
भयावाह कोरोना वायरस के कारण बुलढाणा जिला प्रशासन ने सैलानी बाबा की यात्रा को स्थगित कर दिया गया है जिसके कारण यहां जलनेवाली राज्य की सबसे बडी होली भी नही जलाई गई और ये 112 वर्षों की परंपरा खंडित हो गई है.
बुलढाणा जिले के ग्राम पिंपलगांव सराय के पास हाजी हज़रत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा की दरगाह है जहां लाखों की तादाद में हर साल भाविक पहूंचकर अपनी अकीदत पेश करते हैं.बता दे कि सैलानी बाबा की यात्रा का आरंभ होलीका दहन से होता है और इस होलिका दहन में केवल राज्य ही नही बल्कि पूरे देश भर से लाखों भाविक सैलानी में पहूंचते हैं.पडोसी देश चीन के बाद भारत मे भी कोरोना वायरस की चपेट में आए कुछ मरीज़ पाए गए.इस जानलेवा बीमारी के फैलने से पहेले ही उसे रोकने के लिए प्रशासन मुस्तैद हो गया तथा बुलढाणा जिलाधिश श्रीमती सुमन चंद्रा रावत ने 5 मार्च को एक आदेश के तहत सैलानी बाबा की यात्रा को स्थगित कर दिया है ताकि सैलानी में भीड इकट्ठा ना होने पाए.भाविकों को सैलानी में पंहुचने से रोकने के लिए सैलानी की तरफ आनेवाले सभी रास्तों पर कडा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है. सैलानी यात्रा में होलिका दहन का सिलसिला पिछले चला आ रहा है.मुजावर परिवार के हातों से होली को अग्नि देकर यात्रा का आरंभ किया जाता किंतु इस वर्ष कोरोना के कारण होली भी नही जलाई गई और 112 वर्षों से जारी होलिका दहन की ये परंपरा इस साल खंडित हो गई है.खास बात तो ये है कि सैलानी की होली में भक्तगण नारियल के साथ अपने शरीर से उतारे हुए कपड़े जलाते है.भक्तो की ये आस्था है कि ऐसा करने से भूत-प्रेत, करनी-कौटाल, जादू-टोना से निजात मिलती है.इस होली में करीब 10 से 12 ट्रक नारियल जलाए जाते है.होलिका दहन में शामिल होने के लिए आए भाविकों को सैलानी में दाखिल नही होने दिया गया जबकि कुछ भक्त 20 से 25 किलोमीटर पैदल चलकर सैलानी तो पहोंचे किंतु होली नही जलने के कारण काफी निराश हो गए थे.

शिर्डी प्रतिनिधि श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने गुरूस्थान मंदिरासमोर पेटविण्यात आलेल्‍या होळीचे पूजन संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.अंजली डोंगरे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सौ.वैशाली ठाकरे, प्र.मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर कर्मचारी व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-नगर जिल्ह्यातील बेलापूर रेल्वे स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक मिनीचंद मिना यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महात्या केली. मीना हे राजस्थान मधील अलवर या गावात रहिवासी होते.मिना सध्या ते  रेल्वे स्टेशन समोरील महात्मा फुले हौसिंग सोसायटी मध्ये भाड्याच्या बंगल्यात दोन वर्षापासून एकटेच राहत होते. त्यांची पत्नी व 15 वर्षाची मुलगी गावी राहतात.  काल रात्री 1 वाजेपर्यत मीना हे  मित्रासोबत गप्पा मारत होते. सकाळी आठ वाजता मिना यांना उठविण्यासाठी कर्मचारी गेले होते. दरवाजा उघडला  नसल्याने ते परत गेले. ऑफिसला का आले नाही म्हणून पुन्हा दोन कर्मचारी घरी गेले. दरवाजा वाजविला. पण दरवाजा उघडला नाही म्हणून मागील बाजूच्या खिडकीतून पाहिले असता, मिना हे गळफास घेतलेल्या आवस्थेत दिसले. तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा तोडला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांचे पार्थिव अलवर येथे पाठविण्यात आले.  मीना हे चांगले अधिकारी होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. 

राहुरी : शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश  मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. रविवारी रात्री बिबट्या कात्रड येथील ज्ञानदेव तांबे व रंगनाथ घुगरकर यांच्या शेतातील विहिरीत पडला़ ३० फूट खोलीच्या विहिरीत बिबट्या पडल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन बिबट्यासाठी विहिरीवर पिंजरा लावला़ विहिरीत पाणी नसल्याने बिबट्याला मुका मार लागला़ बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती उपसरपंच शरद दांगट यांनी वनविभागाला दिली़ वनविभागाचे कर्मचारी गोरक्षनाथा लोंढे, महादू पोकळे, लक्ष्मण किनकर, ताराचंद गायकवाड यांनी विहिरीवर पिंजरा लावला़ विहिरीत पडलेला बिबट्याला मुका मार लागल्याने तो बेशुध्द पडला होता़ ग्रामस्थांनी बिबट्याला शुध्दीवर आणण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकले़ त्यानंतर बिबट्या शुध्दीवर आला़ बिबट्या जेरबंद करण्यासाठी पोलीस पाटील आदिनाथ घुगरकर, रायभान घुगरकर, रावसाहेब तांबे, रंगनाथ घुगरकर, धनंजय पटारे, शिवाजी तांबे, माधव घुगरकर आदींनी सहकार्य केले़ सर्वत्र शांतता झाल्यानंतर विहिरीत टाकलेल्या शिडीवर चढून बिबट्यावर आला़ विहिरीवर आलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला़ बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी कात्रड येथे गर्दी केली होती़

अहमदनगर : खंडकरी शेतक-याचे येथील कूळ कायदा विभागात आलेले प्रकरण मार्गी लावून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणा-या लिपिकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (९ मार्च) सकाळी साडेअकरा वाजता अटक केली. सुनील बाबूराव फापाळे (वय ४८) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.फापाळे हा जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेत अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहे. श्रीरामपूर येथील खंडकरी शेतकºयाचे प्रकरण कायदेशीर मान्यतेसाठी कूळ कायदा शाखेत वर्ग झाले होते. या प्रकरणाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी फापाळे यांनी सदर शेतकºयाकडे लाच मागितली होती. याबाबत शेतक-याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचा-यांनी सापळा लावून लाच मागणा-या लिपिकास पकडले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget