डीएफओच्या धाडीत खुलासा, वनपालच करत होता अवैध सागवनची तस्करी,वाहनासह सागवान जप्त.

बुलडाणा - 12 मार्च
वन व वनसंपत्तिचे रक्षणासाठी वनविभागाच्या माध्यमाने शासन कोठ्याधीश खर्च करते परंतु या खात्यात काही "रक्षक" एवजी "भक्षक" आहे जे आपला कर्तव्य विसरून गैरकृत्य करत आहे.अशीच बाब बुलडाणा डीएफओ संजय माळी यांच्या एका धाडीत समोर आली असून पकडलेला अवैध सागवन कोणी दुसऱ्याचा नसून चक्क वनपालाचा असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
       बुलडाणा जिल्ह्यात वन विभागात गुम्मी वर्तुळ मिळवण्यासाठी मोठी ओढतान असते,त्याचे कारण ही तसेच आहे.या भागातील जंगलात व खाजगी शेतात मोठ्या प्रमाणात सागवन आहे व या परिसरात कोणी फारसा लक्ष ही देत नाही म्हणूनच वृक्षरोपण,संगोपन व इतर विकास कामात भरपूर वर कमाई होते अशी धारना वन कर्मचाऱ्यात आहे.सद्या गुम्मी वर्तुळ मध्ये वामन पवार वनपाल म्हणून कार्यरत आहे असून या परिसरात अवैध वृक्ष कटाई चा प्रमाण वाढलेला आहे.तर चला आता येऊ 8 मार्चच्या घटनेकडे,सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार बुलडाणा डीएफओ संजय माळी यांना गुप्त माहिती मिळाली की,एका मालवाहू  वाहनातून अवैध सागवानची तस्करी होणार आहे व सदर लाकुड धाड-रोइखेड मायंबा- साकेगांव मार्गे चिखलीकडे जाणार आहे. ही माहिती मिळाल्याने डीएफओ संजय माळी यांनी आपल्या सोबत बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांना घेऊन चिखली जवळील अनुराधा कॉलेज येथे 8 मार्चच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या एका टाटा मैजिक मालवाहू वाहनाला थांबवून त्याची झळती घेतली पण  त्यात बाभळीचा जळतनच मिळून आला,शेवटी चालकाला विचारपुस केली असता त्याने सांगितले की सागवानचे कापलेले रीपा सर्वात खाली ठेवलेले आहे.या वाहनात वनपाल पवार यांचा जवळचा नातेवाईक सुद्धा बसलेला होता व वनपालची बैग ही या वाहनातून जप्त करण्यात आली. सदर वाहन बुलडाणा येथील लाकुड आगारात जमा करण्यात आला असून या प्रकरणी वनपालने दुधा येथील एका मिस्त्रीचा बिल सादर केला असला तरी त्यांच्याकडे वाहतूक पास होती का?आता पर्यंत या वनपालाने अशा प्रकारे किती वेळ अवैधरित्य सागवानची तस्करी केली??ढालसांवगी येथील शासकीय निवासस्थानचा वापर अवैध लाकुड ठेवण्यासाठी का केला? वनपाल वर गुन्हा कधी दाखल होणार?? अशे अनेक प्रश्नांचे उत्तर लवकरच समोर येणे गरजेचे आहे.

बयान ठरणार महत्वाचे
वाहन पकडल्या नंतर वन विभागाने चालकावर गुन्हा दाखल केला असला तरी चालकाचा बयान महत्वाचा आहे.आज 12 मार्च रोजी बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे धाड परिसरात पोचले व त्यांनी इतर काही लोकांचे सुद्धा बयान घेतले आहे.हे सर्व बयान वनपाल पवार यांना घातक ठरणार असल्याची चर्चा वन विभागात सुरु आहे.

योग्य कारवाही करणार! टेकाळे
अवैधरित्य सागवान घेऊन जाणारा वाहन पकडण्यात आलेला असून त्याच रात्री वाहन चालकावर वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.लाकुड कुठून आनले? कोणाचे होते?व कुठे नेले जात होते याची पूर्ण चौकशी दोन दिवसात करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येईल.जे कोणी दोषी असेल त्याला सोडण्यात येणार नाही,अशी प्रतिक्रिया बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांनी "बिंदास न्यूज़" ला दिली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget