Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी)  नेवासा तालुक्यातील पानेगाव-खेडले रस्त्यावर रस्ता विचारण्याच्या बहाण्याने डोळ्यात मिरची पूड टाकून निखील आंबिलवादे या सराफ व्यावसायिकाकडील 7 लाख 90 हजार 778 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ‘लुटी’ ची सुपारी चक्क कोल्हारमधील सराफ विजय उर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर यानेच दिली होती. त्यासाठी त्याने श्रीरामपूरच्या ‘लुटारू’ गँगला हाताशी धरून या कृत्याला अंजाम दिला. यातील चौघांना गजाआड करण्यात आले असून अन्य संबंधित सराफासह पाचजण पसार झालेत. त्यांचा एलसीबीचे पोलीस कसून शोध घेत आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे हा लुटेरे टोळीचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. या लुटीत एका महिलेचाही सहभाग आहे.निखिल बाळासाहेब आंबिलवादे (रा. खेडले परमानंद, ता.नेवासा) हे त्यांचे मांजरीतील गुरूकृपा ज्वेलर्स दुकानातील 7 लाख 90 हजार रूपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने घेऊन पानेगाव ते खेडले परमानंद रोडने पानेगाव शिवारातून जात असताना मोटारसायकलवरील तिघांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग चोरून नेली. ही घटना 21 जानेवारीला सायंकाळी 5.15 वाजता घडली. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरविली. अशातच पो. नि. दिलीप पवार यांना गुप्त खबर्‍याकडून हा गुन्हा टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे व त्याच्या सहकार्‍यांनी केला असल्याची माहिती कळाली. त्यानंतर पवार यांनी आपल्या सहकार्‍यांमार्फत टाकळीभानचा निखील रणनवरे (वय 21),श्रीरामपूरच्या वॉर्ड नं. 1, फातेमा हाऊसिंगमधील सोहेल जुबेर शेख (21) श्रीरामपूरच्या वॉर्ड नं. 1, फातेमा हाऊसिंगमधीलच आवेज उर्फ बाबा जुबेर शेख (23), आणि नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता निखील रणनवरे याने कबुली दिल.निखील रणनवरेसह बेलापुरातील चाँदनगरचा शाहरूख सांडू सय्यद, टाकळीभानचे मतीन पठाण, सोहेल जुबेर शेख, आवेज उर्फ बाबा जुबेर शेख, गौरव बारकू अवसरमल, प्रकाश उर्फ भावड्या भिमराव रणनवरे, निखील रणनवरेचा जोडीदार शहारूख सय्यद (रा. श्रीरामपूर) याची माहिला नातेवाईक आलिशा आजीज शेख हिची देडगावकराशी ओळख आहे. या महिलेच्या माध्यमातून कोल्हारचा सराफ विजय देडगावकराच्या घरी सर्वजण जमले. तेथे खेडले परमानंद येथील आंबिलवादे या सराफाचे मांजरी येथे श्रीगुरूकृपा नावाचे सराफी दुकान आहे. रात्री तो दुकानातील सोने बॅगमध्ये भरून मोटारसायकलने घरी जातो. रस्त्यात अडवून त्याला मारहाण करा, सोने लुटा, त्याचा मोबादला देऊ असा कट देडगावकरच्या घरात शिजला. त्यानंतर लूट करण्यासाठी या टोळीने नियोजन केले.त्यानुसार 21 तारखेला दुपारी शाहरूख सय्यद, गौरव अवसरमल, प्रकाश रणनवरे हे युनिकॉर्न मोटारसायकलवर होते. त्यानंतर आंबिलवादे यांच्या दुकानाजवळ पाहणी करण्यासाठी सोहेल शेखला सोडले. निखील रणनवरेसह अन्य आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. सोनार निखील आंबिलवादे यांनी दुकान बंद करताच, तेथे असलेल्या साहेलने रणनवरेला इशारा केला. लगेचच रणनवरेने स्वतःच्या मोबाईलवरून सोनार पांढर्‍या रंगाच्या मोपेड मोटारसायकलवर बॅग घेऊन निघाल्याची माहिती दिली. व या सोनाराचा पानेगाव चौकापर्यंत पाठलाग केला. व युनिकॉर्न मोटारसायकवर असणार्‍या शाहरूख, गौरव आणि प्रकाश यांनी आंबिलवादे यांना रस्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि सोने-चांदीची दागिने असलेली बॅग लांबविली.लुटीनंतर टाकळीभान मार्गे ही टोळी श्रीरामपूरातील संजयनगरमधील अलिशा शेख हिच्या घरात एकत्र आली. तिने देडगावकराला फोन करून मोहीम फत्ते झाल्याची माहिती दिली. त्यावर देडगावकराने सोने घेऊन कोल्हारला येण्याचे सांगितले. शाहरूख सय्यद, निखिल रणनवरे, प्रकाश रणनवरे व अलिशा शेख नॅनो कारने कोल्हारला देडगावकरच्या घरी पोहचले. लुटलेल्या सोन्याचे 5 लाख वीस हजार रुपये देईल असे सांगत देडगावकराने काही पैसे दिले बाकीचे तीन दिवसांत देण्याचे ठरले असल्याची कबुली निखील रणनवरे याने पोलिसांना दिली.  अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश देण्यात आले.लुटणारी गँग..निखील शशिकांत रणनवरे (रा. टाकळीभान), सोहेल जुबेर शेख, आवेज ऊर्फ बाबा जुबेर शेख (दोघेही रा. वॉर्ड नं. 1, फातेमा सोसायटी, श्रीरामपूर) आणि मतीन गुलाब पठाण (रा. बेलपिंपळगाव, ता.नेवासा) या चौघांना अटक.शाहरूख सांडू सय्यद (रा. बेलापूर), गौरव बारकू अवसरमल, प्रकाश उर्फ भावड्या भीमराव रणनवरे (रा. टाकळीभान), आलिशा अजीज शेख (संजयनगर,श्रीरामपूर) आणि विजय ऊर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर (कोल्हार)हे सगळे पसार आहे. 

शिरसगाव[वार्ताहर]हरिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विकासाचे काम शासनाच्या आदेशानंतर,माजी सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनानंतर अद्याप सुरु झाले नाही शासनाकडून ९५ लाख रु त्यासाठी मंजूर झाले निविदा निघून वर्क ऑर्डर झाली परंतु काम सुरु झाले नसल्याने रवींद्र वाहूळ,बाळू बोर्डे,माधव झाल्टे हे तिघे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले आहेत.तेथे विविध पदाधिकारी,आमदार लहू कानडे,सार्वजनिक बांधकाम विभाग उजागरे,राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक विधाते,श्रीरामपूर उपनगराध्यक्ष करण ससाणे,सभापती सचिन गुजर,मुन्ना पठाण सरपंच अस्मिता नवगिरे,अनिता भालेराव,सीताबाई गायकवाड,कोमल जाधव,सुर्यकांत चाबुकस्वार,रसूल पठाण,प्रा.किरण खाजेकर,डॉ,नंदकुमार वाघमारे,दिलीप त्रिभुवन चेतन त्रिभुवन,सुनील शिणगारे, भीमराज बागुल,जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी आदींनी उपोषणार्थी यांची भेट घेतली.पण हरिगाव ग्रामविकास अधिकारी मात्र ४ दिवसात फिरकले नाहीत.पालकमंत्री ना.मुश्रीफ यांना २५ जाने.ला शिष्टमंडळ भेटले उपोषण संदर्भात २७ जाने.रोजी तातडीने अहमदनगर येथे संबंधित अधिकारी यांची बैठक झाली..त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.प्रा.किरण खाजेकर यांच्या नेतृत्वाखाली हरिगाव शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रचना विभागीय कार्यालय येथे भेटले.त्यांचे समवेत दिलीप त्रिभुवन,सुनील शिणगारे,डॉ नंदकुमार वाघमारे,चेडे,चंद्रकांत खरात दीपक नवगिरे,रमेश भालेराव,रसूल पठाण,,अशोक  खरात,अमोल वाहूळ,विनायक वाघमारे,सुनील रूपटक्के,सचिन बोधककळू बावस्कर,हरीश मढीकर,अनिल लिहिणार,सुनील पवार,महेबूब शेख,,संदीप लोखंडे आदी होते.तेंव्हा सकारात्मक चर्चा झाली व हा प्रश्न सकारात्मक सोडविला जाईल असे निवासी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.तसेच दि २४ जाने.पासून अहमदनगर येथे बसलेल्या डॉ आंबेडकर स्मारक विकास काम सुरु करणे बाबत उपोषणार्थीना पाठींबा देणेसाठी सरपंच ग्रामस्थ हरिगाव,यांनी दि २७ जाने रोजी हरिगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.बंद शांततेत पाळला.संध्यकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार महसूल निखारे,यांनी लेखी पत्र तातडीने नगररचना कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सूचना दिल्याचे प्रत दिल्याने तीन उपोषणार्थी यांचे आमरण उपोषण संध्यकाळी तहसीलदार नगर गिरीश वाखारे,यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन सोडण्यात आले.त्यावेळी नेमाणे गृह विभाग,ठोंबरे,प्रा.किरण खाजेकर उपस्थित होते.

सातारा : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल खटल्यात सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांना निर्दोष ठरवलं आहे.
उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांवर सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण केल्याचा आणि 24 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्यानंतर राजकुमार जैन यांनी 23 मार्च 2017 रोजी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणात मध्यंतरीच्या काळात उदयनराजेंच्या अडचणी वाढल्याचंही बोललं गेलं. मात्र, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने यावर निकाल सुनावत आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे सोना अलायन्स नावाची लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली कामगारांची संघटना आहे. उदयनराजे भोसलेंनी 18 फेब्रुवारी रोजी कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून खंडणीची मागणी केली आणि बेदम मारहाण केली, असा आरोप जैन यांनी केला. या प्रकरणी त्यांनी पोलीस तक्रारही दिली. या तक्रारीनुसार उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उदयनराजेंसह 9 जणांना 2017 मध्ये अटकही झाली होती.
उदयनराजे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणी वाढल्या होत्या.

कोल्हार ( साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
शिवशाही बस व ईरटीका कारच्या धडकेत सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हार येथील पुलानजीक दुपारी साडे तीनच्या दरम्यान घडली
याबाबत सविस्तर असे की कोपरगाव पुणे ही शिवशाही बस क्रमांक mh 14 GD 8440दुपारी कोल्हारहून  पुण्याकडे जात असताना विरुद्ध दिशेने  शनिशिंगणापूर हुन शिर्डी कडे जाणाऱ्या ईरटीका कार नंबर एम एच 17 , 5150 नंबरच्या कारची  पुलानजीक धडक होऊन ईरटीका कार मधील अपर्णा अनिल लामा( वय 20 )पार्वती चंद्रप्रकाश लामा( वय 64) पूनम अनिल लामा( वय 42) कांची देढू डुबका (वय 65 )नारिम उदय  डुबका (वय 50) सर्व (राहणार दार्जिलिंग ) व ईरटीका कार चालक निखिल संजय अत्रे (वय  23) (राहणार राहाता) असे सहाजण गंभीर जखमी झाले जखमींना लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांनी स्वतः लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
 या अपघातात ईरटीका कार च्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला व शिवशाही बसचे नुकसान झाले अपघातानंतर वाहतूकीची कोंडी झाल्याने नगर-मनमाड राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील गोंडेगाव येथील चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह काल गोडेंगाव शिवारातील विहीरीत आढळून आला. तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी गावात याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे

बेलापूर( प्रतिनिधी )--कामाचे ठेके कोणीही घ्या निधी कुणीही आना पण गावचा विकास झाला पाहिजे विकास कामात कोण तक्रारी करते याचे नाव ग्रामसभेत जाहीर करा अशी जोरदार मागणी बेलापूरच्या ग्रामसभेत करण्यात आली बेलापूरचे उपसरपंच रवींद्र यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात झाली ग्राम विकास अधिकारी संग्राम चांडे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखविले यावेळी अभिषेक खंडागळे यांनी प्रभाग निहाय निधी देऊन विकास कामे करावीत कामाची ई-निविदा करूनच कामे देण्यात यावीत ग्रामपंचायतीने खरेदी केलेले एलईडी बल्ब निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी खंडागळे यांनी केली यावेळी संबंधित ठेकेदाराचे बिल आदा करण्यात आले नसल्याचे ग्रामविकास अधिकारी चांडे यांनी सांगताच सदस्य विवेक वाबळे यांनी ग्रामसभेस खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका संबंधित ठेकेदाराचे बिल केव्हाच  आदा केले असल्याचे सांगितले महेंद्र साळवे यांनी गायकवाड वस्ती वर निधी खर्च केला जात नाही तसेच ठराविक ठिकाणी बल्प बसविण्यात आले असून गरजेची कामे होत नसल्याची तक्रार केली यावेळी रमेश अमोलिक सुधीर तेलोरे विजय शेलार यांनी दलित वस्ती ची कामे का होत नाही त्यास कोण विरोध करतो ते जाहीर करा विकास कामाला खोडा कोण आणतो ते जाहीर करा अशी मागणी करत दलितांची कामे होत नसेल तर आम्ही या गावात राहायचे की नाही असा संतप्त सवाल केला यावेळी अभिषेक खंडागळे यांनी आपण सर्वजण मिळून गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांगून गैरसमज करू नये  तसेच सदस्यांनाच ग्रामसभेत विकास कामाबाबत आवाज ऊठवावा लागत असेल तर ते दुर्दैव आहे असे मत मांडले वसुलीबाबत ग्रामसेवक पांडे यांनी थकबाकीदारांना एखादी योजना राबवून बाकी भरण्याकरिता उत्साहित करण्याची सूचना मानतात पत्रकार देविदास देसाई यांनी मग नियमित नळपट्टी पाणीपट्टी भरणारा चे काय असा सवाल करून बोगस नळ कनेक्शन व थकबाकी त्याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली जि प सदस्य  शरद नवले यांनीघन कचरा प्रकल्प राबविणे आवश्यक आहे तसेच पाझर तलाव अशोक बंधारे गावतळी या करीता पाण्याचे आरक्षण करण्याची मागणी केली बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी कामाबाबत वेळोवेळी तक्रारी होत असल्यामुळे कामे करताना अडचणी येत असल्याचे सांगितले  ग्रामसभेत माजी सरपंच भरत साळुंके चंद्रकांत नाईक पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक प्रसाद खरात दत्ता कुरे मनोज श्रीगोड यादव काळे आदींनी सूचना मांडले यावेळी व्यायाम शाळेकरिता मराठी शाळेच्या प्रांगणात असलेल्या समाज मंदिराचा वापर करण्यात यावा अशी सूचना विजय शेलार यांनी केली त्यास देवीदास देसले यांनी अनुमोदन दिले  ग्रामसभेस सरपंच राधाताई बोंबले लैला शैख नंदा पवार दिलीप दायमा आदिसह नागरीक उपस्थित  होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल नगर पालिका उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये प्रजासत्ताकाचा 71 वा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शाह, जायदाबी कुरेशी, माजी नगरसेवक निसार कुरेशी, नजीर मुलानी, याकुब बागवान, कलीम कुरेशी, साजिद मिर्झा, जलीलभाई काजी, अशपाक शेख, हमीद चौधरी, अब्दुललतीफ शेख, अकिल सुन्नाभाई, अकिल आत्तार, किशोर शिंदे, अॅडवोकेट शफीअहमद शेख, हारुन शाह, जाफर शाह, असलमभाई सय्यद,डॉ.मन्सूर  सय्यद, गणीभाई टिनमेकर, फिरोज शेख, इस्माईल शाह, अमीर अलहामेद,शेख फिरोज बशीर , शेख मोहम्मद रफीक, काकर जाकिर , शेख अनीस, शेख यूसुफ इब्राहिम , शाह यूनुस , पिंजारी शमशूददीन, मन्सुरी बरकतअली आदिंसह शाळा क्र ४ व ९ चे विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी सामुदायिकपणे ध्वजारोहणापूर्वी संविधानाच्या उद्दिशकेचे वाचन केले. शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत , ध्वज गीत व देशभक्तिपर गीतांचे गायन व भाषणे केली.
शाळेच्या क्रिडा महोत्सवातील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलतांना नगरसेवक हाजी अंजूमभाई शेख यांनी शाळेला नगरपालिकेमार्फत स्वच्छतागृहांचे काम व पेवींग ब्लॉक बसवून देण्याचे जाहीर केले.
प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली फारूक शाह,सय्यद वहीदा, नसरीन इनामदार, शाहीन शेख, जमील काकर, अस्मा पटेल, नीलोफर शेख, बशीरा पठाण, मिनाज शेख, आसिफ मुर्तुजा, एजाज चौधरी, युवराज पाटील, सदफ शेख, यास्मिन शेख, नाझिया शेख, रजिया मोमीन, सलमा शेख, सफिया शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुझा यांनी केले तर आभार फारुकशाह यांनी मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget