Latest Post

श्रीरामपूर :- जगात भारतातील लोकशाहीचे वेगळे नाव आहे.नावाजलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक मतदार महत्वाची भूमिका पार पडत असतो ही लोकशाही आणखी बळकटीसाठी सर्व नागरिकांसह प्राधान्याने नवमतदार तरुणांनी जागरूक मतदार म्हणून पुढे येण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून सर्वत्र २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.यावेळच्या १० व्या मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी शहरातून काढलेल्या रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी कल्याण मंडळ,चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालय,खा.गोविंदराव आदिक अॅग्लो उर्दू कनिष्ठ महाविद्यालय,हजरत मौलाना मकदूम उर्दू
हायस्कूल,भि.रा.खरोड कन्या विद्यालय,डी.डी.काचोळे विद्यालय,क.जे.सोमैय्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचा समारोप समारंभ पोलीस परेड ग्राउंडवर पार पडला.त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून प्रांताधिकारी अनिल पवार बोलत होते.
व्यासपीठावर नायब तहसीलदार अशोक उगले,प्रा.सादिक सय्यद,रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश कुंदे ,प्रा.जलाल पटेल,दादा साठे,डॉ.बी जी घोडके,प्रा.व्ही एम मोरे,प्रा. व्ही बी नागपुरे,प्रा.एस डी पवार,शाहीन अहेमद रियाज अहेमद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लोकशाहीची रचना सांगून उद्याचे मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे तसेच भविष्यात नि:पक्ष मतदान करण्याचे आवाहन केले.      प्रारंभी प्रास्ताविक करताना शकील बागवान यांनी निवडणूक आयोगाची रचना,निवडप्रक्रिया व आयोगाच्या कार्याचा इतिहास,मतदार नोंदणी प्रक्रियेतील क्रमबद्धता सांगितली तसेच विद्यार्थ्यांना नवमतदाराची शपथ दिली.
याप्रसंगी विधानसभेमध्ये उत्कृष्ठ कार्य केलेबद्दल श्रीधर बेलसरे,शकील बागवान,संजीवन दिवे,जितेंद्र भगत,पुरुषोत्तम चौधरी,संदीप पाळंदे,आसमा शेख यांचा महसूल मित्र म्हणून गौरव करण्यात आला.तर मतदार नोंदणी चे कार्य सर्वोत्कृष्ठपणे पार पाडणारे केंद्रस्तरीय मतदार अधिकारी एकनाथ रहाटे,मुख्याध्यापक जलील शेख,ग्रामसेविका अलका साळवे,संभाजी फरगडे,रामदास जाधव,प्रशांत दर्शने यांचा बहुमान करण्यात आला.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध  स्पर्धेतील विजेत्यांना गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्रकाने सन्मानित करण्यात आले.       
सूत्रसंचालन शकील बागवान यांनी केले तर प्रा.जलाल पटेल  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बुलडाणा - 24 जानेवारी
घरफोडी व चोरीच्या प्रकरणात असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी आज 24 जानेवारी रोजी सकाळी बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणी लव्हाळा गावात गेले असता आरोपीची पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पारध्यांनी पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला केला. यात चार पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर या झटापटीत आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला. 
        अमडापूर, साखरखेर्डा या पोलिस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल असलेला आरोपी जखमेश्वर शेनफळ शिंदे हा साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम लोणी लव्हाळा येथे आलेला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक आढाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे, पोहेकॉ सुधाकर काळे, सैय्यद हारुण, संजय नागवे, मपोका अनुराधा उबरहंडे व चालक रविंद्र भिसे हे लोणी लव्हाळा येथे सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोहचले. आरोपी जखमेश्वर शिंदे हा पोलिसांना पाहून पळाला. त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले असता अचानक आरोपीचे नातेवाईकांनी पोलिस पथकावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली. इतकेच नव्हेतर उकळता चहा देखील पोहेकॉ सुधाकर काळे यांच्या अंगावर फेकला.या झटापटीत आरोपी जखमेश्वर हा हातातून पळून जाण्यास यशस्वी झाला.या प्राणघातक हल्ल्यात विजय मोरे, सुधाकर काळे, आढाव, संजय नागवे जखमी झाले आहे. या प्रकरणी स्था.गु.शा.चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे यांच्या फिर्यादीवरुन साखरखेर्डा पोलिस ठाण्यात आरोपी जखमेश्वर शिंदे, शेनफळ शिंदे, रवि उर्फ बबल्या, शिवगंगा शिंदे,आरती, वैशाली, सुनिता भोसले व इतर अनोळखी तिन पुरुष, दोन महिला यांच्या विरोधात भादविची कलम 143,147,148,148, 332,353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठानेदार संग्राम पाटील करीत आहे.या अगोदर ही या गावात पारध्यांनी पोलिस पथकावर हल्ले केलेले आहे,हे विशेष.

बुलडाणा - 23 जनवरी
अन्न व औषध प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या स्वजिल्ह्यात काही वेळा पूर्वी खामगांव येथील गुटखा माफिया "राठी" च्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील सहायक आयुक्त वाकडे अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत घेत छापा मारला परंतु जेंव्हा हे पथक सदर ठिकाणी पोहोचली असता त्यांच्या हाती काहीच आले नाही.शहरात अशी चर्चा आहे की,राठी ला अगोदरच या रेड ची माहिती मिळाली होती म्हणून त्याने सर्व माल गायब करून टाकला, आता अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची ही नामुशकि चर्चेचा विषय बनला आहे,,आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की राठीला अगोदरच या कार्यवाहीची माहिती देणारा तो "घर का भेदी"  कोण??अन्न व औषध प्रशासनातला की पोलिस विभागातील??? तर दूसरी कडे अशीच धाड चिखलीत गुटखा किंग "हाजी" च्या ठिकाणावर ही टाकण्यात आल्याचे समझते.चिखली मध्ये 2 ठिकाणी फक्त एक ते दीड लाखाचा गुटखा पकडण्यात आला आहे तर बातमी लिहिस्तव चिखलीत कार्यवाही सुरु होती.

अहमदनगर (प्रतिनिधी)-कॉलेजचे शिक्षण घेणार्‍या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात लोणीचे विखे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे ठाकले आहेत. विराज राजेंद्र विखे असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव असून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी तो लोणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.354 (ड) 506, 507 सह महिलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11(4),12 सहा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित मुलगी ही नगरच्या आगरकर मळा भागात राहणारी असून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 2017 ते 2018 याकाळात प्रवरानगरच्या पद्मश्री विखे पाटील जुनिअर कॉलेज परिसरात ही घटना घडली.पिडित तरुणी ही 2017 ते 2018 मध्ये प्रवरानगर (लोणी) येथे पद्श्री विखे पाटील ज्युनियर व सीनियर कॉलेजला शिक्षण घेत असताना विराज विखे यांनी तिचा सतत पाठलाग केला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू जर मला होय म्हणाली नाही तर मी माझे जीवाचे बरे-वाईट करीन’ असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.त्यानंतर पिडित तरुणी शिक्षण अर्धवट सोडून अहमदनगर येथे आली. येथे पुढील शिक्षण घेत असताना विराज विखे यांनी विराज विखे, श्रद्धा कानडे पाटील, स्मिता अशा नावाने फेसबुक अकौंट ओपन केले. त्यावर पिडित तरुणीच्या नावाचा वापर करून बदनामी करण्याच्या हेतूने नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. आरोपी  नगरात असल्याचे लोकेशन फेसबुकवर टाकून पिडितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कॉलेजचे शिक्षण घेणार्‍या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात विराज राजेंद्र विखे वर गुन्हा दाखल झाला आसून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील तपास रहाता पी. आय. सुभाष भोय करीत आहे. 

नवी दिल्लीः तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावत फासावर लटवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर एवढा खर्च करण्यात येत आहे. तुरुंगाच्या बाहेर 32 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, फाशी देण्यासह इतर कामांवरही पैसे खर्च होत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्याची प्रत्येक दोन तासांनी शिफ्ट बदलली जात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आराम मिळावा आणि चोख सुरक्षा व्यवस्था राबवावी, यासाठी जेल प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.चारही दोषींना तिहार तुरुंगातील जेल नंबर 3मध्ये वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक दोषीच्या बाहेर दोन सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक दोन तासांनी या सुरक्षा कर्मचाऱ्यांना थोडी विश्रांती दिली जाते. शिफ्ट बदलल्यानंतर दुसरे सुरक्षा कर्मचारी त्यांच्याजागी पाठवले जातात. प्रत्येक कैद्यासाठी 24 तास आठ-आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आलं आहे. चार कैद्यांसाठी जवळपास 32 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. ते 24 तासांत 48 तास शिफ्टमध्ये काम करत आहेत. या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या आधी त्यांना इतर कैद्यांबरोबर ठेवण्यात येत होते. परंतु न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ते कैदी आत्महत्या करू नये, तुरुंगातून पळून जाऊ नये,  यासाठी कैद्यांच्या सुरक्षेवर खर्च करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.  1 फेब्रुवारीला होणार फाशीया दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार असून, 30 जानेवारीला जल्लादला बोलावण्यात आलं आहे. जेणेकरून जल्लाद फाशी देण्याचं प्रात्यक्षिक करू शकेल. बुधवारी पवन आणि विनय या दोघांच्या कुटुंबीयांनीही तुरुंग प्रशासनाची भेट घेतली आहे.

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा-राहुरी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सराफ दुकान असलेल्या सराफ व्यावसायिकाचा त्याच्या नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानंद या गावी मंगळवारी सायंकाळी घरी परतत असताना चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लुटल्या प्रकरणी काल सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत निखील बाळासाहेब आंबिलवादे (वय 21) धंदा-सराफ दुकान रा. खेडलेपरमानंद ता. नेवासा यांनी काल दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मांजरी येथील त्यांचे ‘गुरुकृपा ज्वेलर्स’ हे दुकान सायंकाळी बंद करून 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 760 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे 7 लाख 90 हजार 778 रुपये किंमतीचे दागिने चेनीच्या बॅगमध्ये भरुन त्यांच्याकडील स्कूटरवरून खेडलेपरमानंद येथे घरी परतत असताना पानेगाव ते खेडलेपरमानंद रस्त्यावर पानेगाव शिवारात सायंकाळी साडेसहा वाजता काळ्या रंगाच्या युनिकॉर्न गाडीवरील चालक व त्याच्याबरोबरील अन्य तीन अनोळखी चोरटे यांनी त्यांना रस्त्यात थांबण्यास सांगितले व पत्ता विचारण्याचा बहाणा केला.त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून फिर्यादीच्या पाठिवरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची बॅग ओढून जबरीने चोरुन घेवून गेले. त्यानंतर बाळासाहेब आंबिलवादे यांनी जखमी अवस्थेत मांजरी येथील ओम मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात उपचार घेतले व बुधवार दि. 22 रोजी रात्री पावणेआठ वाजता सोनई पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दाखल केली.सोनई पोलिसांनी फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर फर्स्ट 23/2020 भारतीय दंड विधान कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे करत आहेत.चोरट्यांनी लुटलेले दागिने,ने (200 ग्रॅम- 7 लाख 60 हजार रुपये)- पावत्याप्रमाणे एकूण 200 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांमध्ये सोन्याचे 3 नेकलेस, कानातील (इअरींग) जोड, कुडके पुडी, टॉपजोड, रिपेरिंगचे गंठण, लहान गंठण, डिस्को बाळ्यांची पुडी, फॅन्सी गोल रिंगांची पुडी, सटुबाई व बाळ्यांची पुडी, लहान बाळांच्या अंगठ्या, ठुशी, गोल व खरबुजे आकाराचे मिक्स मणी, डोरले, रेग्युलर जेन्टस्, लेडीज अंगठ्या, लेडीस पेन्डल्स इत्यादी. या सर्व दागिन्यांवर इंग्रजीत डीबीए असे शिक्के आहेत. सन 2019 मधील खरेदी पावत्याप्रमाणे प्रति ग्रॅम प्रमाणे सोन्याची किंमत असलेले.चांदी ( 760 ग्रॅम- 30 हजार 778 रुपये) पायातील जोडवी, कडे, वाळे, चांदीच्या सरी, बाहुटी, तोरडी (पैंजण), चांदीचे गणपती, लक्ष्मी, सरस्वतीच्या लहान मुर्त्या, चांदीच्या जोडव्याचे मध्यभागी आतील बाजूस इंग्रजीतून डीबीए असा छाप व पैंजणावर इंग्रजीतून डीजी-1 असा छाप असलेले दागिने.

औरंगाबाद /प्रतिनिधी ÷ फिरोज शेख ÷  आज दि रोज धावत्या स्कूल बस मध्ये मतिमंद मुली चा विनयभंग करून विडीऔकिल्प वायरल झाल्याची घटना औरंगाबाद येथे काही दिवस आगोदर घडली या घटनेनंतर पुर्ण महाराष्ट्र भर संताप व्यक्त करण्यात आला आहे पुर्ण औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात पुर्ण शाळा , कॉळेज मध्ये जाऊन स्कूल बस चालक व मालक बस ची पहाणी करण्यात येत आहे व पुर्ण चालकांनी चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे या पुढे पुन्हा विद्यार्थीचा छळ होईल आशा घटना टाळण्यासाठी विविध उपयोजना करण्यास सूचना दिल्या व पुर्ण गाडी चे कागदपत्रे हे ही पुर्ण कमप्लेट ठेवावीत  तसेच आज बेगमपुरा पोलिस हद्दीत येणार्या ऑक्स्फर्ड व किड्स आय टी वल्ड होणाजी नगर येथे पोलिस उप निरीक्षक एस. सानप व आदी पोलिस कर्मचारी व  अक्षदा मॅडम खुडे   
तबरेज खान सर योगेश जाधव सर आदी मान्यवर व स्कूल बस चालक व मालक व पालक मोठ्या संख्येने  उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget