Latest Post

बेलापूर( प्रतिनिधी  )--प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला असला तरी तालुक्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचे आधार जुळत नसल्यामुळे त्यांनी तातडीने सेतू केंद्रात जाऊन आपले आधार जुळवून घ्यावे व शेतकरी सन्मान योजनेस पात्र व्हावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केली आहे शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची माहिती देण्याकरिता तहसीलदार प्रशांत पाटील हे बेलापूर येथे आले होते  या वेळी जमलेल्या शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहिती देताना तहसीलदार पाटील म्हणाले की आधार कार्ड वरील माहिती व पोर्टल वरील माहिती चुकीची
असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी अर्ज दुरुस्त करून घेतल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे शेतकऱ्याने केवळ आधार कार्ड घेऊन सेतू केंद्रात जावयाचे आहे त्या ठिकाणी केवळ दहा रुपये फी घेऊन आपले आधार अपडेट केले जाईल कर्जमाफी बाबत बोलताना तहसीलदार पाटील म्हणाले की कर्जमाफी च्या याद्या बँकाकडून मागण्यात आलेल्या आहेत परंतु अजूनही शेतकऱ्यांनी आपले आधार आपल्या बँक खात्यास लिंक केलेले नाही आठ दिवसात शेतकऱ्यांनी आपले खाते आपल्या आधार कार्डास लिंक करून घ्यावे आपल्या अज्ञानामुळे आपण कर्जमाफी  पासून वंचित राहू नये दुष्काळ निधी ची सर्व कागदपत्रे व अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे परंतु अद्याप अनुदान आलेले नाही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचीही पंचनामे करण्यात आले असून निधी येताच त्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाईल यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक उपसरपंच रवींद्र खटोड चंद्रकांत नाईक कामगार तलाठी कैलास खाडे मिलिंद दुधाळ दत्ता कुर्हे  रमेश वाबळे ज्ञानदेव वाबळे बाळासाहेब लगे बेलापूर सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक मनोज श्रीगोड कलेश सातभाई सेतू चालक  प्रसाद लड्डा इंगळे आदी सह अनेक शेतकरी उपस्थित होते प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर उपसरपंच रवींद्र खटोड यांनी आभार मानले

🔹आरोपी
 5 दिन पुलिस कस्टडी में

बुलढाणा- 10 जनवरी

देशभर में चर्चित "हीरा गोल्ड" फ्रॉड मामले में बुलढाणा आर्थिक गुनाह सेल ने मुख्य आरोपी नव्हेरा शेख को कल 9 जनवरी को मुंबई से कोर्ट के आदेश पर गिरफ्तार किया है.बता दे कि इस कंपनी में देशभर के लाखों लोगों ने करोडो-अरबों में अपनी रकम इन्वेस्ट की हुई है.
      नव्हेरा शेख ने "हीरा गोल्ड" नामक कंपनी के माध्यम से लोगो को व्यापा में अपनी रकम इन्वेस्ट कर मुनाफा देने का झांसा दिया इस मामले में देश के कई राज्यों में नव्हेरा शेख के खिलाफ अपराध दर्ज हुए और पिछले करीब 2 साल से नव्हेरा शेख को विभिन्न इलाकों की पुलिस अपनी हिरासत में ले रही है.वर्ष 2018 में बुलढाणा शहर थाने में भी नव्हेरा शेख के खिलाफ अपराध दर्ज हुआ था जिसकी सुनवाई बुलढाणा की सेशन कोर्ट में जारी थी किंतु नव्हेरा शेख कोर्ट में निरंतर अनुपस्थित  रही जिसका संज्ञान लेते हुए बुलढाणा सेशन कोर्ट ने प्रॉडक्शन वारंट जारी करते हुए आरोपी नव्हेरा शेख को गिरफ्तार करने का आदेश दिया पश्चात बुलढाणा आर्थिक गुनाह इकाई की टीम ने 9 जनवरी को  मुंबई की भायखला महिला जेल से आरोपी को गिरफ्तार कर आज 10 जनवरी को बुलढाणा सेशन कोर्ट के सामने पेश किया जिसे आगामी 5 दिन तक पीसीआर में रवाना कर दिया गया है.मामले की अधिक जांच आर्थिक गुनाह सेल के उपविभागीय पुलिस अधिकारी डी. बी.तडवी कर रहे है.

शिर्डी : साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे.साईसमाधी शताब्दी सोहळ्यात राष्ट्रपतींनी साईबाबांच्या जन्मस्थानाचा उल्लेख केला होता. यावर साईभक्त व शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिर्डीकरांनी दिल्लीत जाऊन थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थानाचा खुलासा केला होता. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी जन्मस्थानाचा उल्लेख केल्याने पुन्हा भाविक व शिर्डीकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.साईबाबांबद्दल अधिकृत डॉक्युमेंट म्हणून साईसतचरित्र हेच आहे. साईसतचरित्रात कुठेही साईबाबांच्या जन्म व जन्मस्थळाचा उल्लेख नाही. ज्या बाबी ज्ञात नाहीत त्या अज्ञात आहेत. त्याबद्दल अधिकृत बोलणे कठीण वाटते, असे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावर यांनी सांगितले.पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे. साईबाबांनी आपला जन्म, गाव, जात, धर्म याबद्दल कधीच कोणाला सांगितले नाही. यामुळेच बाबांची प्रतिमा सर्वधर्म समभावाची आहे. अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक साईबाबांच्याच विचाराला नख लावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे देश विदेशातील करोडो साईभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे साईबाबांचे निस्सीम भक्त असल्याने त्यांनी ग्रामस्थ व साईभक्तांच्या भावना समजावून घ्याव्यात, असे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले.

मुंबई - पुणे येथील एमटी विभागात डीआयजी पदावर होते असलेले डीआयजी निशिकांत मोरे यांचे अखेर गुहा विभागाने निलंबन केले आहे. विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आजच फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा आरोप केल्याने तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडली नाही. याप्रकरणी देखील मुलगी हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आज मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही तात्काळ निलंबनाची कारवाई केली.निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधीन आहे. तसेच मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृह विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करुन मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे गृह मंत्री देशमुख यांनी सांगितले. नेमके काय आहे प्रकरण?खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट (एमटी) विभागात कार्यरत असलेले पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी)  निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. तळोजा येथील घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री 11-12च्या दरम्यान ती निघून गेली. जाताना तिने घरात सुसाईड नोट लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली.पॉक्सोप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलापरिचित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप करण्यात आला आहे. मोरे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार दाखल करून घेतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अलीकडेच खारघरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे यावेळी मुलींना वडिलांनी सांगितले होते. तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले, विकासक असलेले पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघरमध्ये ओळख झाली होती. मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घेतले होते. काही पैसे रोख देऊन गाळ्याचा ताबा घेऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे लेखी स्वरूपात केला होता. दरम्यान, जून महिन्यात १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले होते. मात्र, दरम्यान अटक टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता.

अहमदनगर (प्रतिनिधी) बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा साठा करून बाजारात चढ्या भावाने विक्री करणार्‍यावर शहर पोलीसांनी छापा टाकून एक लाख 71 हजार 850 रूपये किंमतीच्या 18 गॅस टाक्या जप्त केल्या आहे.  शहर पोलीसांनी ही कारवाई गुरूवारी (दि. 9) दुपारी अडीचच्या सुमारास मुकुंदनगर परिसरात केली. सय्यद जिशान आरीफ (वय- 32 रा. फकीरवाडा), जावेद आमीश सय्यद (वय- 41 रा. ख्रिस्त गल्ली) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मुकुंदनगर परिसरातील लक्ष्मी आटा ट्रेडिंग कंपनीचे आवारात बेकायदेशीररित्या गॅस टाक्यांचा साठा केला असून काही इसम त्याची विक्री बाजारात चढ्यादरांनी करत असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपाधीक्षक मिटके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी लक्ष्मी आटा कंपनीच्या आवारात छापा टाकला.या छाप्यात पोलीसांनी 18 गॅस टाक्या जप्त केल्या. सय्यद आरीफ, जावेद सय्यद यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा अधिकारी, सहायक फौजदार गायकवाड, पोलीस नाईक सुद्रिक, कुलांगे, द्वारके यांच्या पथकाने केली.

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
 काही दिवसांपासून कोल्हार भगवतीपुर परिसरातील रान शेंडा येथे धुमाकूळ घालीत असलेला बिबट्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास अखेर पिंजऱ्यात अडकला याबाबत सविस्तर असे की रानशेंडा येथील रामराव चांगदेव खर्डे पाटील व उल्हास खर्डे पाटील यांच्या वस्तीवर व परिसरात गेले दोन ते तीन महिन्यापासून बिबट्याचे वास्तव्य होते या बिबट्याने या परिसरातील कुत्रे व बकऱ्यांवर  हल्ला चढवित फस्त करीत त्यामुळे या परिसरातील रहिवासी चांगलेच भयभीत झाले होते शेतात काम करणाऱ्या मजुरांना दहशतीमुळे शेतीत काम करणे अवघड झाले होते परिसरातील नागरिकांच्या मागणीनंतर वनखात्याने या ठिकाणी पिंजरा लावला पण बिबट्या या पिंजऱ्यात अडकत नसल्याने दोन ते तीन ठिकाणी जागा बदलून हा पिंजरा लावण्यात आला शेवटी उल्हास खर्डे व प्रशांत खर्डे यांच्या शेताजवळील रोडलगत पिंजरा ठेवण्यात आला या पिंजऱ्यात अखेर मंगळवारी पहाटे च्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला.
जेरबंद झालेला बिबट्या एक ते दीड वर्षाचा असून अजूनही एक -दोन बिबट्याचा संचार  परिसरात असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे व पुन्हा या भागात पिंजरा लावण्याची मागणी.

दिल्ली :अखेर निर्भयाला न्याय मिळाला असून सात वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २२ जानेवारीला चारही आरोपीना तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे.दरम्यान दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज शिक्षेची सुनावणी केली. सुनावणीनंतर १४ दिवसांचा अवधी दिला असून २२ तारखेला सकाळी सात वाजता तिहार तुरूंगात चारही दोषींना फाशी देण्यात येईल.गेल्या सुनावणीत कोर्टाने तिहार जेल प्रशासनाला दोषींना नोटीस बजावण्यास सांगितले होते. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget