Latest Post

श्रीरामपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकली. त्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला. फरार झालेल्या आरोपीचे नाव राहुल गणेश शिंदे (वय २०) असे आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान तो बेड्यांसह पसार झाला. यावेळी तिघा पोलीस कर्मचा-यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला. यावेळी पोलिसांसमवेत रुग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले. शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची कुमक दाखल झाली.  शहरातील खिलारी वस्ती भागात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील तो आरोपी आहे. त्याच्यावर प्रारंभी मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे आहे.याबाबत विचारणा केली  असता पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट साहेबांनी आरोपी हा शहर पोलीस कर्मचारी व आधिकारी यांच्या पथकाने अवघ्या पाच तासात आरोपी च्या मुसक्या आवळल्या व पुन्हा काराग्रहात रवाना केल्याची माहिती दिली.

श्रीरामपूर/प्रतिनिधी-
 येथील साखर कामगार हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ.रवींद्र जगधने यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ डॉक्टर सेलच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
10 डिसेंबर मानव अधिकार दिनानिमित्त श्रीरामपूर शहरात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साखर कामगार हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर .रवींद्र जगधने यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ डॉक्टर सेलच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येऊन नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. प्रसंगी रवींद्र तुपे यांची श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी तर डॉ.सुनील कोळसे यांची अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली. दरम्यान साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना मानवाधिकार दिनानिमित्त फळे वाटप करण्यात आले.यावेळी आंतराष्ट्रीय मानवअधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास निर्मळ, राष्ट्रीय संपर्कप्रमुख  गणेश भांड, दक्षता चेअरमन(पत्रकार) करण नवले ,डॉ सेलचे भारताचे अध्यक्ष- डॉ.प्रशांत चव्हाण,लीगल ॲडव्हायझर भारताचे -अँड.प्रसन्ना बिंगी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष- विठ्ठल गोराणे, संपर्क प्रमुख-सचिन सारंगधर,रवींद्र तुपे,युथ चेअरमन-अजिंक्य काळे , उप अध्यक्ष-लकी गोयल,पत्रकार-श्रीकांत जाधव ,विलास भालेराव , डॉ.कोळसे आदी उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी )--बेलापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची तातडीची बैठक घेऊन त्यात उपोषणार्थी किरण खरोटे यास कामावर घेण्याबाबत  सकारात्मक निर्णय घेण्याचे विस्तार अधिकारी विजय चराटे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी किरण खरोटे यांनी कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेतले                              बेलापूर येथील ग्रामपंचायत कर्मचारी किरण खरोटे यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ त्यांनी कुटुंबियासह बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते काल सकाळपासून उपोषणार्थीना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी गावातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच राधाताई बोंबले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यादव काळे  अशोक गवते अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे महेंद्र त्रिभुवन  पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा आदींनी उपोषण सोडण्यासाठी परावृत्त केले दरम्यान जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी देखील उपोषणार्थी खरोटे यांची  भेट घेऊन ग्रामविकास अधिकारी चांडे यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगितले सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ही तडजोडीची चर्चा सुरू होती दोनदा तीनदा याबाबत चर्चा होऊन एकमत न झाल्यामुळे ही चर्चा फिसकटली अखेर  विस्ताराधिकारी विजय चराटे  यांनी सरपंचांना व  ग्राम विकास अधिकारी चांडे यांना तातडीची बैठक बोलावून त्यात सदर कामगारास कामावर घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच उपोषण कर्त्यास हा निर्णय मान्य नसल्यास त्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे दाद मागावी असे लेखी आश्वासन दिले या आश्वासनानुसार खरोटे याने विस्ताराधिकारी विजय कराटे ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडेल व सरपंच राधाताई बोंबले यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले यावेळी अशोक कारखाना संचालक विजय खंडागळे अशोक गवते प्रकाश जाजू माजी सरपंच भरत साळुंके पत्रकार दिलीप दायमा युसुफ शेख नामदेव बोंबले बंटी शेलार महेश कुर्हे  यादव काळे मुस्ताक शेख प्रसाद खरात महेंद्र साळवी आदी उपस्थित होते

औरंगाबाद : पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत चक्क सहायक फौजदारच जुगार खेळताना आढळून आल्याच्या प्रकार समोर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याच्या बाजूलाच बऱ्याच दिवसांपासून खुलेआम जुगार अड्डा सुरु होता. मात्र स्थानिक पोलिसांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचे आरोप नेहमीच होत होते. त्यामुळे अखेर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पथकाने या ठिकाणी रविवारी रात्री अचानक छापा टाकला. या छाप्यात वीरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह पाच जुगाऱ्यांना पकडले.औरंगाबाद ग्रामीण विशेष पथकाला वीरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेल्या शाहरूख टी स्टॉलमध्ये काही जुगारी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता वीरगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह पाच व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले.पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य व मोबाईल असा एकूण नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकणी पाचही जुगाऱ्यांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या कारवाईनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे जुगार अड्डा सुरु होता का ? त्यामुळे ठाणेप्रमुखावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाशिक ( प्रतिनिधी )लाचखोरीप्रकरणी अटक करण्यात आलेले सातपूरचे पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर तालुक्याच्या दोघा निरीक्षकांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब रामकिसन नागदरे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे यांच्या कोठडीत कोर्टाने एका दिवसाची वाढ केली. या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्यासाठी 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 50 हजार रुपये स्वीकारताना सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना शुक्रवारी सातपूर पोलीस ठाण्याच्या आवारातील शासकीय निवासस्थान येथे सापळा रचून पकडले होते.न्यायालयाने त्यांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. एसीबीने लागलीच जाधव यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली. त्यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे.तालुका पोलीस ठाण्याचे नागदरे आणि देवरे यांना गुरुवारी लाचेची रक्कम घेताना तालुका पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी एका इव्हेंट मॅनेजमेंटचे काम पाहणार्‍या व्यक्तीने तक्रार दिली आहे. कार्यक्रमा दरम्यान साऊंड सिस्टिमचा वापर करण्याची मंजुरी देण्यासाठी नागदरे आणि जाधव यांनी पैशांची मागणी केली होती. त्यातील 25 हजारांची रक्कम घेताना दोघांना एसीबीने पकडले. यानंतर कोर्टाने दोघांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. एसीबीने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने दोघांच्या कोठडीत एका दिवसाची वाढ केली.पोलीस ठाण्यांना निरीक्षकांची प्रतीक्षा सातपूर तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना लाच प्रकरणी अटक केल्यानंतर दोन्ही पोलीस ठाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा पदभार सध्या सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील रजेवर असून ते हजर झाल्यानंतर सातपूरचा निर्णय होणार आहे. तर तालुका पोलीस ठाण्याचा निर्णय येत्या दोन-चार दिवसात होईल, अशी माहिती ग्रामीण पोलीस दलाच्या सूत्रांनी दिली. 

यवतमाळ-दिग्रस तालुक्यातील इसापूर जि.प.शाळेचा भोंगळ कारभार झाल्याचे शाळेच्या मुख्य भागाचा दरवाजा रात्रीला सुद्धा उघडा राहत असल्याने मोठी चिंतेची बाब बनली आहे.या कडे नवीन रुजू झालेल्या मुख्याध्यापिका खडतकर यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते.

         जि.प.इसापूर शाळेत अनेकदा चोरी झाल्या आहे.तसेच एक वेळा तर रेकॉर्डरूम ला अज्ञात आरोपीने आग लावली त्या आगीत पूर्ण रेकॉर्ड खाक झाला होता या सर्व घडलेल्या प्रकरणाबाबत पोलिसात तक्रारी सुद्धा झालेल्या आहे.जि. प.इसापूर शाळेत मुख्याध्यापिका यांचे सध्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने एखादी घटना घडण्याची शक्यता बळावू शकते कारण रात्रीच्या वेळी शाळेचे मुख्यद्वार बंद अवस्थेत दिसत नसल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता असू शकते. हा मुख्य दरवाजा नेहमी उघडा राहत असल्याने प्रेम युगल या शाळेचा उपयोग घेऊ शकतो कारण या शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळी अनेक मोबाईल वर बोलणारे या आवाराचा उपयोग घेत आहे.तेव्हा पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळा सुटल्यावर मुख्य दरवाजा बंद करावा जेणेकरून रात्रीच्या वेळी कोणीही शाळेत प्रवेश करणार नाही यासाठी योग्य ती चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी इसापूर वासीयांनी केली आहे.

           

      

पाथर्डी_तालुका प्रतिनिधी  विकास दिनकर*
पाथर्डी_तालुक्यातील तिसगाव येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या  चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत पोलिसांनी गाडी  व बॅटरी ताब्यात घेतल्या.अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेली
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील मोबाईल टॉवरच्या कंट्रोल रूममधून सेंटर लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 48 हजार रुपयाचे किमतीच्या 24 बॅटरी चोरून नेल्या याबाबत माहिती गारा कडून माहिती मिळताच व पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीने पाथर्डी च्या दिशेने पिकप गाडी क्रमांक एम एच 17 ए जी 47 73 मधून मुद्देमाल नेत्यांना आढळणारा गाडी थांबून पोलिसांनी तपास सुरू केली असता अंधाराचा फायदा घेऊन तिघेतिघे चोरटे पळाले .पोलीस नाईक सचिन नवगिरे राहुल तिकोने व संदीप नागरगोजे यांच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती गोविंद मचाले निसा सिक्युरीटी सुपरवायझर (अहमदनगर) यांनी दिली tu

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget