Latest Post

मुंबई | वृत्तसंस्था हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर एनकाऊंटरची चौकशी तेलंगणा सरकारने सुरु केली आहे. यासाठी आठ सदस्यीय अधिकाऱ्यांची टीम हि चौकशी करणार आहे. याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून मानव हक्क आयोगदेखील याबाबत चौकशी करणार आहे.या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत राज्य तेलंगणा सरकारने एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मराठी आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्यासह एक टीम ही चौकशी पूर्ण करणार आहे.भागवत तेलंगणा येथील रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. हैद्राबादमधील संपूर्ण घटनेची चौकशी करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे काम या संपूर्ण टीमकडे असणार आहे.याप्रकरणी तेलंगणा येथील न्यायालयाने एनकाऊंटर झालेल्या चारही मुलांचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश  होते. दरम्यान,   न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.

नाशिक( प्रतिनिधी)जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आघाडी सरकारच्या काळात बोट क्लबसह अत्यंत महत्वपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण होऊनही गेल्या पाच वर्षात सुरू न होऊ शकलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यास प्राधान्य असेल अशी माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना दिली.कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ हे पहिल्यांदाच दोनदिवसीय नाशिक दौऱयावर आहेत. त्यानिमित्ताने आज नाशिक येथील कार्यालयात जिल्हाभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.यावेळी भुजबळ भुजबळ पुढे म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू असल्याने महिन्यापेक्षा जास्त काळ नाशिक आणि येवल्याला येऊ शकलो नाही. मुंबईत होत असलेल्या घडामोडींमुळे मुंबईत थांबणे अत्यंत आवश्यक होते. त्यानंतर  दि. २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाल्यानंतर मंत्रालयीन कामकाज देखील सुरू झाले आहे. त्यामुळे नाशिकला येण्यासाठी उशीर झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सन १९९१ साली पहिल्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर २५ वर्षात मंत्रीपदावर काम।केले. मात्र गेल्या पाच वर्षांचा कालावधी भुजबळ कुटुंबीयांसाठी अत्यंत खडतर होता. अशा वेळी भुजबळ संपले अशा वार्ता पसरविल्या जात होत्या. मात्र मतदारसंघातील जनता आणि पवार साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकीय पुनर्जन्म झाला. आणि  मंत्रीपदावर काम करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नाशिक जिल्हयातील बोट क्लब, कलाग्राम, मनोरंजन पार्क, ग्रेप पार्क रिसॉर्ट यासारखे अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले. मात्र गेल्या पाच वर्षात का सुरू होऊ शकले नाही हाही एक प्रश्नच आहे. मात्र आता हे सर्व रखडलेले प्रकल्प तसेच नव्याने काही प्रकल्प मार्गी लावले जातील असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी तसेच अधिक नवीन वाढण्यासाठी प्रयन्त केला जाईल असे त्यांनी सांगितले.अत्याचारांच्या घटनेवर बोलतांना ते म्हणाले की, समाजात विकृत गुन्ह्यांची वाढ झाली आहे. अत्याचाराच्या घटना या अत्यंत वेदनादायी असून नागरिकांनी आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. या घटना रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच यावर जो त्वरीत कारवाई करत नाही तो पोलीस अधिकारी जबाबदार धरला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.खातेवाटपाबाबत ते म्हणाले की, खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. येत्या काही दिवसात हा प्रश्न मिटेल. ते म्हणाले की, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं याला माझा विरोध नाही. उलट त्यांना परत आणण्यासाठी मी स्वतः प्रयन्त केले आहे. त्यांना पद देण्याचा अधिकार हा पवार साहेबांचा असल्याचे त्यांनी सांगितले. या सरकारमध्ये सर्व पक्षातील अनुभवी नेते आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ द्या,मग टीका करा असे सांगत रात्रीतून शपथ घेणं हा धोका असल्याची टीका त्यांना केली.जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, खडसे मला भेटले आहेत आणि कामानिमित्त नेहमीच भेटत असतात. भाजपात ओबीसी नेते नाराज या खडसेंच्या आरोपात तथ्य आहे. मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. खडसे कोणाला भेटले म्हणजे त्या पक्षात गेले असा अर्थ होत नाही असे सांगत खडसे अनुभवी नेते असून ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.

पाथर्डी(प्रतिनिधी विकास दिनकर)शेवगाव तालुका व परिसरामध्ये सुमारे पंधरा वर्षान पासून या ठिकाणी सर्पमित्र आतार बंधू हे सर्व प्रकारचे सर्प उदारणार्थ नाग,नागीण,धामण,आजगर,घोणस,मणियार,अशा सर्व प्रकारचे सर्प धरून जंगलामध्ये सोडण्याचे काम करतात.
      गेल्या दोन दिवसांमध्ये आतार बंधूनी विशेषतः गफार आतार व मुड्याभाई आतार या दोन बंधूनी गेल्या दोन दिवसामध्ये पाच नाग,एक नागीण,एक अतिशय विषारी घोणस,एक धमन,बिन विषारी दोन सर्प गेल्या दहा दिवसानामध्ये पाथर्डी व शेवगाव तालुक्यामध्ये विविध भागानामध्ये पकडून त्यांना निसर्गामध्ये मुक्त केले. विशेष म्हणजे सर्पाचे प्राण वाचवतात त्या सोबत नागरिकांचे प्राण वाचून निसर्ग संवर्धनासाठी निच्छित त्यांचा हातभार लागतो.या  मुळे पाथर्डी शेवगाव परिसरात कुठही सर्प अथवा नाग घ्यारांमध्ये,दुकानांमध्ये,मळ्यामध्ये,कंपनी मध्ये,आठवा सार्वजनिक ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये शाळा कॉलेज येथे आढळल्यास मुद्याभाई व गफार भाई याना संबधित ठिकाणाहून फोन येतो.व ते तत्काळपने व निस्वार्थीपणे जाउन त्या ठिकाणात संबधित निघालेला सर्प धरून ते सोडून देतात.
      या मुळे त्यांनी हजारो सर्पाचे जीव गेल्या पंधरा वर्षान मध्ये वाचविले आहेत. तसेच सुमारे पंधरा ते वीस सर्प मित्र तयार केले आहेत.आणखी ज्यांची इच्छा आहे सर्प वाचविण्याची,त्यानाही ट्रेनिग देण्याची त्यांची तयारी आहे.
मात्र एकाच त्यांचे म्हणणे आहे,स्वतःच्या जीवाची परवा न  करतात स्वतः चा जीव धोक्यात घालून इतर नागरिकाचे व सर्पाचे प्राण वाचवून निसर्गसंवर्धन करतात.यावेळी त्यांचे कुटुंब अतिशय काळजी मध्ये असते. मात्र सर्प विषयी निसर्गाविषयी प्रेम आणि ज्या कुटुंबांमध्ये सर्प निघाला त्यांचा विषयीचे प्रेम हे सर्व सामाजिक बांधिलकी म्हणून ते मोठ्या धाडसाने स्वतः चा जीव धोक्यात घालून हे सामाजीक कार्य करतात .
          मात्र शासनाचे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्याने त्यांच्या मनामध्ये खंत आहे.त्यांच्या म्हणण्या नुसार फक्त पाथर्डी_शेवगाव नाही तर नगर जिल्हा व महाराष्ट्र मध्ये जेवडे खरे सर्प मित्र आहेत.त्या सर्व मित्रांना विविध प्रकारच्या सुविधा शासनाने द्याव्यात आशी आतार यांची मागणी आहे.विशेषतः यामध्ये सर्प धरताना काही अपघात झालयास आथवा सर्पदंश झाल्यास दवाखान्याचा खर्च सर्प मित्राचा मृत्यू झाल्यास २० लाख रुपयांचा विमा त्यांच्या घरच्यांना भरपाई तसेच सर्प धरण्याचे अत्याधुनिक साहित्य त्याना वेळोवेळी सरकार कडून त्यांना मिळावे.त्यांना वेळोवेळी बदलत्या काळानुसार किमान वर्षातून एकदा जिल्ह्या ठिकाणी ट्रेनिंग द्यावी.आशा काही मागण्या त्यांच्याकडे आहेत.या कडे शासनाने सहानभूती पूर्वक लक्ष ध्यावे.आतार यांची विनंती आहे.


बुलडाणा- 8 डिसेंबर
पुण्यातील चंदन नगर भागात एका फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये धाडसी दरोडा टाकून 4 कोटी 20 लाख रुपयांचे सोने लुटुन मुख्य आरोपी बुलडाणा येथील आपल्या साऱ्याच्या घरी येऊन राहत असतांना पुणे पोलिसांनी या मोठ्या गुनह्यातील दोन आरोपींना बुलडाणा एलसीबीच्या मदतीने कृषि विभागात अधिकारी पदावर कार्यरत सासऱ्याच्या घरातून अटक करत दरोड्यातील जवळपास 8 किलो सोनेही जप्त केल्याची चर्चा शहरात आहे.सदर कार्रवाई पोलीसाने अत्यंत गुप्तपणे 7 डिसेंबरला राबवली आहे.
        या प्रकरणी प्राप्त माहिती नुसार पुणे येथील अहमदनगर मार्गावरील चंदननगर पोलीस ठाणे हद्दीतील बीआरटीएस बस स्टॉपच्या विरूद्ध दिशेला ‘नानेकर प्रेस्टीज’ बिल्डींगच्या तळमजल्यावर इंडीया इन्फोलीन फायनान्स लिमिटेड (आयआयएफएल) चा कार्यालय आहे. गुरुवार, 5 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी कार्यालय उघडले असता रिसेप्शन काऊंटरवर एक तरूण आला आणि कर्जाविषयीची माहिती विचारू लागला. काही वेळानंतर दोन शस्त्रधारी तरूण देखील आले. त्यातील एकाने रिसेप्शनीस्ट महिलेच्या कानशिलावर बंदूक रोखून इतर कर्मचार्‍यांना धमकावले. जीवे मारण्याची धमकी देत लॉकर उघडण्याचे सांगितले. या दोनमध्ये तिसराही मिळाला आणि तिघांनी मिळून सोबत आणलेल्या बॅगेत कंपनीच्या लॉकरमधील सोने तारणाचे 394 पॅकेट भरले. बॅग भरल्याबरोबर काही क्षणातच तिघेही बाहेर पडले आणि बाहेर पडतांना त्यांनी बाहेरून कंपनीचे शटर लावून घेतले तर त्यांचा एक साथीदार बाहेर स्विफ्ट डिझायर कार घेऊन तैयार होता जसेच तिघे दारोडा टाकून परतले व स्विफ्ट कार मध्ये बसून फरार झाले.
पोलिसांनी जेव्हा कंपनीकडून लुटलेल्या सोन्याची किंमत विचारली असता सर्व मिळून 12 किलो सोने ज्याची किंमत 4 कोटी 20 लाख रुपयांपर्यंत होती. तपासादरम्यान परिसरातील सिसिटीव्ही फूटेज पोलिसांनी जमा केले. त्यात दोन आरोपींचे चेहरे अगदी स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांचे अर्धे काम सोपे झाले होते.आरोपींचे धागेदोरे जोळत व घटनेत वापरण्यात आलेली कार क्र. MH28-AN-5050 चे सीसीटीव्ही फुटेजच्या साहयाने पुणे पोलीस बुलडाण्यात दाखल झाली व एलसीबीच्या मदतीने बुलडाणा येथील आरास ले आउट मधील कृषि अधीक्षक राठोड यांच्या घरी पोहोचली व तेथून या दरोडयातील मुख्य आरोपी 32 वर्षीय दिपक विलास जाधव (बुलडाण्याचा जावई) रा.प्लॉट नं. 609, ज्यूब्लेशन बिल्डींग, वाघोली, पुणे व त्याचा साळ्याला ताब्यात घेऊन घरातून सोनेही जप्त करण्यात आले,अशी माहिती मिळाली.बुलडाणा आलेल्या पुणे पोलीसाच्या चमु प्रमुख एपीआई गजानन जाधव यांच्याशी जेंव्हा बुलडाणा एलसीबी कार्याल्यात या प्रकरणी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळले व नम्बर प्लेट काढलेली इनोव्हा कारने 7 डिसेंबरच्या रात्री मुख्य आरोपी जाधव(जावई) व राठोड (साळा) यांना घेऊन पुण्याकडे रवाना झाले.


नाशिक : हैदराबाद, उन्नाव येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच नाशिक मधील अंबड भागामध्ये आठ वर्षीय बलिकेवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.८) दुपारी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी संशियत नराधमाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देशातील हैदराबाद, व उन्नाव येथील बलात्काराच्या घटना घडल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली असतानाच रविवारी दुपारी नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर भागात एका आठ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.महालक्ष्मीनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह, भाडेतत्वावर घर घेऊन राहायला आले होते. याठिकाणी पुर्वीपासून राहत असलेल्या कैलास रामू कोकणी (२३) याने कुटुंबातील एका आठ वर्षाच्या बालिकेला ‘कार्टुन’ दाखविण्याच्या बहाण्याने शेजारील घरमालकाच्या घरावरील छतावर नेले. तेथून नराधम कोकणी हा बालिकेला स्वत:च्या राहत्या खोलीत घेऊन गेला. घरात अन्य कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत बालिकेवर बळजबरीने अत्याचार केला. काही वेळातच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्याचवेळी जवळच राहणाऱ्या कोकणीला याबाबत विचारणा करण्यासाठी पिडित बालिकेच्या आईने हाक मारली असता संशयित कोकणी याने घाबरून बराचवेळ दरवाजा उघडला नाही. यावेळी शेजाऱ्यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले असता बलिकेच्या अंगावर कपडे नसल्याचे आढळून आले. भेदरलेल्या मुलीने तत्काळ आईला मिठी मारत घडलेला प्रकार रडत रडत कथन केला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील रहिवाशांनी संशयित कोकणी यास चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संशयित कोकणी यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत कोकणीविरूध्द बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

राहुरी (तालुका प्रतिनिधी) राहुरी शहरातील बसस्थानकासमोरील भरपेठेतठ असलेले एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात पाच चोरट्यांनी तेथून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून एकाजणाच्या मल्हारवाडी शिवारात मुसक्या आवळल्या. तर उर्वरित पसार झाले.ही घटना रविवारी (दि.08) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. हे एटीएम अगदी भरपेठेत आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ अंधारात काहीतरी वाजत असल्याची चाहूल गस्तीवर असलेल्या पोलिसांना लागली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्यांना पाहताच चोरटे पळून गेले. तर पोलिसांनी त्यांचा मल्हारवाडी शिवारात एक किमी पाठलाग करून त्यातील एकाजणाच्या मुसक्या आवळल्या. पकडण्यात आलेला आरोपी राहुरी तालुक्यातील असून दत्तात्रय बोर्‍हाडे असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.

कोल्हार( साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
श्री दत्त जयंतीनिमित्त सुर्योदय आश्रम इंदोर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हजारो भाविक, गुरू बंधू  या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

सुर्योदय आश्रम इंदोर येथे श्री दत्त जयंती निमित्त आध्यात्मिक कार्यक्रम 5 ते 11 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. श्री दत्त जयंतीच्या दिवशी श्रीदत्त जन्मोत्सव ,श्री गुरुदेव पाद्य पूजन ,महाआरती ,ध्यान साधना,भजन असे आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर गरजूंना ब्लॅंकेट वाटप ,साडी वाटप  मोबाईल टॅबलेट वाटप तसेच आरोग्य ,नेत्र स्वास्थ्य शिबिर असे सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. या श्री दत्त जयंती उत्सवात सर्व भाविकांनी व गुरु बंधूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन सद्गुरू प .पु .भय्यूजी महाराज यांच्या पत्नी ,सुर्योदय परिवाराच्या संचालिका,डॉ.आयुषी देशमुख यांनी केले आहे.
 इंदोर येथील सूर्योदय आश्रमात श्री दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget