Latest Post

हैदराबाद - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी पहाटे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. चौघा संशयीतांना ठार केल्यामुळे देशातील अनेकांनी आनंद व्यक्त केला असून, हैदराबादमध्ये अनेकांनी मिठाई वाटली, पोलीस अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि अनेक महिलांनी पोलिसांना राख्याही बांधल्या. मात्र, ज्या 4 आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आलाय, त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेचा मोठा धक्का बसलाय. हैदराबाद बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद आरिफ (26), जोलू शिवा (20), जोलू नवीन (20), चिंताकुन्टा चेन्नाकेसवलू (20) या चार आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर, न्यायालयाने या चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.  मात्र, पोलीस कोठडीत असतानाच हैदराबाद पोलिसांनी एनकाऊंटर करुन चारही आरोपींना ठार केले. हैदराबाद पोलिसांच्या धाडसी कारवाईनंतर बलात्कारपीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आम्हाला न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली आहे. मात्र, आरोपींच्या कुटुंबींयांनी आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय. मोहम्मद आरिफच्या आईला बोलताच येत नव्हते. मात्र, आपल्या मुलाने हा गुन्हा केला असेल, तर त्याला सर्वात कडक शिक्षा देण्यात यावी, असे त्याच्या वडिलांनी आधीच म्हटले होते.चेन्नाकेशवुलूची पत्नी तर सतत रडत होती. ती म्हणाली की मी आता एकटी राहिली आहे. तिचा चेन्नाकेशवुलूशी अलीकडेच विवाह झाला होता. त्याला मूत्रपिंडाचा आजार होता. माझ्या नवऱ्याला काही होणार नाही आणि तो लवकरच घरी परतेल, असे मला सांगण्यात आले होते, पण आता काय करावे, मला सुचत नाही, असे तिने बोलून दाखविले. सिवा नावाच्या आरोपीची आई जोल्लू रामप्पा म्हणाली की, माझ्या मुलाने तो गुन्हा केलाही असेल. पण, त्यासाठी दिलेली शिक्षा खूपच भयंकर आहे. हे चारही संशयीत अतिशय गरीब कुटुंबातील होते. पण त्यांनी नंतर कष्टाने बऱ्यापैकी पैसा मिळविला. मात्र, दारू आणि इतर व्यसनांनी त्या चौघांचा नाश केला.पशुवैद्यकीय तरुणीवर 28 नोव्हेंबर रोजी या चार आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या भयानक छळाने ती मरण पावली. पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधमांनी तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला आणि संसदेमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

अहमदनगर (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू पुढील 20 महिने शिक्षणासाठी परदेशात जाणार आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे ते शिक्षण घेणार आहेत. ईशू सिंधू यांनी स्वतः या माहितीला दुजोरा दिला. त्यांच्या पत्नी बुलढाणाच्या जिल्हाधिकारी सौ. निरुपमा सिंधू या देखील त्यांच्याबरोबर शिक्षणासाठी असणार आहेत. अशी माहिती आहे.ईशू सिंधू आणि सौ. निरुपमा ह्या दोघा पती-पत्नीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षणासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. त्याची दखल केंद्र सरकारने घेतल्याचे समजते. केंद्र सरकारने शिक्षणासाठी असलेला हा अर्ज मंजूर केला आहे. लवकरच याबाबत आदेश प्राप्त होऊन शिक्षणासाठी रवाना होईल, असे स्वतः ईशू सिंधू यांनी सांगितले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा  अभ्यासक्रम वीस महिन्यांमध्ये पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सिंधू यांनी 1 मार्च 2018 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. जिल्ह्यात 9 महिने यशस्वी कार्यकाळ संभाळून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. लोकसभा, विधानसभा निवडणूक, विविध सण-उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यांची दक्षता घेतली. अनेक सराईत गुंडावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून गुन्हेगारीला लगाम घातला. जळगाव येथील जैन प्रकारणात त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली होती.

बुलडाणा- 6 डिसेंबर
देशाला हादरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी इनकाउंटर करुण खात्मा केला आहे.सदर इनकाउंटर शंबर टक्के बनावट असून ही हत्या आहे,पोलीसला अशा प्रकारे मारण्याचा अधिकार कोणी दिला? या घटनेवर आपला मत व्यक्त करताना असा प्रश्न व से संशय बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
    मागील काही दिवसा पूर्वी हैद्राबाद येथे एका माहिला डॉक्टरवर 4 लोकांनी बलात्कार करुण तीला जीवंत जाळुन दिला होता.सदर घटना उघडकिस आल्यानंतर संपूर्ण देशात आक्रोशाची लाट पसरलेली होती.
अश्यात आज हैद्राबाद पोलीसाने 4 ही आरोपींचा इनकाउंटर कल्याचे बातम्या सगळी कडे झळकू लागले.या इनकाउंटरवर लोकांचे अनेक प्रकारचे मत समोर येऊ लागले.या विषयी बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मत जाणून घेतला असता तर ते म्हणाले की हैद्राबाद येथे जे बलात्काराची घटना घडलेली आहे त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी प्रत्येक देशवासीची होती,कोपरडी घटनेत अश्या लोकांना फाशीची शिक्षा देखील झालेली आहे,परंतु आज ज्या पद्धतीने आरोपींच्या इनकाउंटर ची बॉटम टीव्हीवर पाहिली असता मला हे सगळा संशयस्पद वाटला,आरोपींच्या हातात शस्त्र देऊन त्यांना मारून टाकला,पोलिसाला ही हत्या करण्याचा अधिकार कोणी दिला? आपल्याकडे न्यायालय आहे,आपला देश संविधानावर चालतो आणि त्यांना कोर्टाने शिक्षा भविष्यात दिली असती.एक जनभावना तैयार झाली होती की या प्रकारणातील आरोपींना गोळ्या घातल्या पाहिजे,त्यांना मारला पाहिजे परंतु आपल्या देशात अशा प्रकारचा कायदा नाही आहे,हे इनकाउंटर  शंभर टक्के बनावटी असल्याची शक्यता व्यक्त करत आ.गायकवाड पुढे म्हणाले की न्यायालय या इनकाउंटरवर निश्चित पणे लक्ष घालेल असा विश्वास ही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

अहमदनगर :- शिर्डी येथील फ्रेंडस मोबाईल शॉपी फोडून 2 लाख 53 हजार रुपयांचे मोबाईल चोरणारे दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. किरण ज्ञानदेव सदाफुले (वय 21, रा. प्रसादनगर, शिर्डी ता.राहाता जि.अहमदनगर) याला अटक करण्यात आले असून,  राजु अशोक माळी (रा. गणेशनगर, शिर्डी) हा फरार झालेला असल्याने पोलिस यश घेत आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, फे्ंरडस मोबाईल शॉपी (शिर्डी) येथे शॉपीचे छताचा पत्रा कापून आतील 18 वेगवेगळ्या कंपन्यांचे 2 लाख 53 हजार रुपयांचे मोबाईल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची फिर्याद शिर्डी पोलिस ठाण्यात मंगेश भागवत लांडगे (रा. डोर्‍हाळे ता.राहाता) यांनी दिली होती. त्या गुन्ह्यासंबंधी तपास सुरु असता, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार किरण सदाफुले याला मोठ्या शिताफिने पकडण्यात आले. सदाफुले याच्याकडून 82 हजार रुपये किंंमतीचे 8 मोबाईल जप्त केलेे. अन्य चोरीस गेलेले 10 मोबाईलबाबत चौकशी केली असता, ते मोबाईल राजु माळी यांच्याकडे असल्याचे सदाफुले याने सांगितले. त्या माहितीनुसार पोलिस माळी यांचा शोध घेत आहेत.पो.नि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ मनोज गोसावी, विजयकुमार वेठकर, रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, दत्ता गव्हाणे, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, दिपक शिंदे, विजय ठोंबरे, राहुल सांळुके, कमलेश पाथरुट, रोहित मिसाळ, चोपोहेकॉ संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

बेलापूर( प्रतिनिधी) बलात्कार तसेच छेडछाडीच्या घटना आपल्या परिसरात घडू नये म्हणून पालक सामाजिक  कार्यकर्ते  विद्यार्थी विद्यार्थीनी  यांनी जागृक राहणे आवश्यक आहे असे मत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उझे यांनी व्यक्त केले हैदराबाद व ईतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडलेले आहेत या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बेलापूर ग्रामस्थ बेलापूर पत्रकार संघ विद्यार्थी कल्याण विभाग राष्ट्रीय सेवा योजना बेलापूर महाविद्यालय आदींनी बेलापूर पोलीस स्टेशन येथे येऊन या घटनेचा निषेध केला व पोलिसांना  निवेदन दिले त्यावेळी  ग्रामस्थ समोर बोलताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय  उजे म्हणाले की वाईट घटना वेळ आणि ठिकाण विचारून होत नसते त्यामुळे इतर ठिकाणी घडलेल्या घटना आपल्या परिसरात घडणार नाही याची कुणी ग्वाही देऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालक व नागरिकांनी जागरूक राहावे व कुणाविषयी काही संशय आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन उझे यांनी केले यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच व कैलासवासी मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड पत्रकार देविदास देसाई बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे हाजी इस्माईल शेख पल्लवी पुजारी आदींनी या घटनेचा निषेध करून अशा घटना पुन्हा घडणार नाही याकरिता उपाययोजना कराव्यात तसेच पोलिसांनी हैदराबाद येथे झालेल्या घटनेतील चारही आरोपींचा एन्काउंटर केल्यामुळे समाधान व्यक्त केले यावेळी बेलापूर महाविद्यालयाचे चंद्रकांत कोतकर निजाम शेख विलास गायकवाड अशोक माने  बेलापूरच्या सरपंच राधाताई बोंबले माजी उपसरपंच नंदाताई पवार शिरीन शेख  अनिल पवार जावेद शेख अकबर भाई टिन मेकर वाले तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे  लहान भाऊ नागले शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार बेलापुर सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन कलेश सातभाई मोसिन खाजाभाई पोलीस पाटील अशोक प्रधान अशोक गवते प्रकाश जाजू नामदेव बोंबले जावेद शेख पत्रकार दिलीप दायमा अतिश देसरडा निसार शाह सोनू शेख आयुब शेख असलम शेख आदीसह बेलापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थी  विद्यार्थिनींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे  पोपट भोईटे बाळासाहेब गुंजाळ निखील तमनर राजु मेहेर आदिंनी चोख बंदोबस्त  ठेवला

हैदराबाद - देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी खात्मा केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेत चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भावना व्यक्त करताना, पोलिसांचं कौतुक करत न्याय मिळाल्याचं म्हटलं आहे. हैदराबादच्या दिशा प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर म्हणजे देशासमोर एक उदाहरण ठेवण्यात आल्याचं पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. तर, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली, असे पीडितेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील निर्भयाचे वडिल बद्रीनाथ सिंग यांनीही पोलिसांच्या धाडसी कारवाईला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, मी आणि माझ्या पत्नीप्रमाणे होणाऱ्या अग्निपरीक्षेतून दिशाच्या आई-वडिलांची सुटका झाली, असेही  सिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडिया आणि नागरिकांमधून पोलिसांची पाठराखण करत कारवाईचं कौतुक होत आहे. तेलंगणा पोलिसांकडून या 4 आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. त्यावेळी घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी गोळीबार करत या आरोपींचा एन्काऊंटर केला आहे.

बुलडाणा- 5 डिसेंबर
 संग्रामपुर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रसर असणारा नाव म्हणजे अभयसिंह मारोडे.अन्याय अत्याचार विरोधात नेहमी लडणाऱ्या या "वॉरिअर" चा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी असा साजरा केला की तो  प्रशासनाला जागवण्यासाठी आंदोलन ठरला.
    -
आज 5 डिसेंबरला अभयसिंह मारोडे व त्यांच्या लहान मुलगा कबीरचा वाढदिवस असल्याने मारोडे आपली पत्नी सोबत साकाळी शाळेत गेले व त्यांनी कबीरच्या वर्गात पेन्सिल वाटप केली. त्या नंतर हा "वॉरिअर" आपल्या काही मित्रां सोबत संग्रामपूर-वरवट रस्त्यावरील कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल समोरील मुख्य रस्त्यावर पडलेले गड्डे बुजविण्याकरिता गेले व श्रमदान करून शक्य तेवढे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला.मग त्याच ठिकाणी "वॉरिअर" च्या मित्रमंडळीने त्यांचा वाढदिवस चक्क खड्यात बसून केक कापून साजरा केला आणि हा अनोखा वाढदिवस संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.समाजिक कामात स्वताला झोकुन देणारे लोक आपल्या प्रत्येक कामाने समाजाला काही तरी नवीन शिकवण देत असतात.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget