गेली वीस-बावीस वर्षांपासून उक्कलगाव गणातील कार्यक्षेत्रात उक्कलगाव गळनिंब एकलहरे कुरणपूर फत्याबाद मांडवे कडीत खंडाळा चांडेवाडी तांबेवाडी यादी भागात सामाजिक कामात कार्यरत असून व नात्यागोत्याचा मोठा जाळं मित्रपरिवार मोठा असून या परिसरातील सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे केले असून उक्कलगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी असे सर्व सामान्यांचे आग्रही भूमिका व लागेल ती मदत करणार असल्याचे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असल्याचे संदीप शेरमाळे यांनी सांगितले.
कडीत बुद्रुक, कडीत खुर्द, मांडवे, तांबेवाडी,फत्याबाद, चांडेवाडी, कुरणपूर, गळनिंब, उक्कलगाव, एकलहरे, आठवाडी, जवाहरवाडी, यादी परिसरात अनेक प्रश्न त्यामध्ये
वीज, पिण्याचे पाणी,बिबट्या कडून हल्ल्या, हॉस्पिटलचे प्रश्न, बांधकाम कामगार, रस्ते, रेशनचे, त्याचबरोबर संजय गांधी निराधार, अपंग, एकल महिला, बालसंगोपन प्रकरणही मोठ्या प्रमाणावर या परिसरात राबवले आहे.कोरोना काळातही मोठं काम असून महिला बचत गटांच्या समस्या सोडवण्याचे काम यापूर्वी केलेले असून मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. आतापर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी हे गावात कोणालाच माहीत नव्हते. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दुकानात त्यांचा शिक्का व सही उपलब्ध होती त्याचा हे उल्लेखनीय काम विद्यार्थ्यांसाठी असून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप साठी देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेले आहे. या सामाजिक कामाबद्दल गळनिंब येथील व प्रभाग क्रमांक तीन मधील कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणुकीत उभं करून बिगर खर्च निवडून आणले ते गळनिंब ग्रामपंचायतचे दहा वर्षे सदस्य असून श्रीरामपूर न्यायालयाच्या विधी सेवा समिती चे तीन वर्षे काम केले. याव्यतिरिक्त त्यांचं सामाजिक काम फार मोठे असून स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले असून या पाच गावे वाड्या वरती ४२ मावस भाऊ,सासरवाडी घरातील सर्वांची, भावाची सासरवाडी याच पाच गावात असल्याने मोठे नातेगोते व मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यात या भागातून जाणारा कोल्हार बेलपिंपळगाव रस्ता याचे काम देखील त्यांच्या रेट्यामुळे झाले. फत्याबाद मधील असणारे कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गटार त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी काँग्रेटीकरण करून रस्ता उंचावण्यासाठीचा प्रस्ताव करण्यात आला. या ठिकाणी बोलले जाते. उक्कलगाव प्रवरापट्ट्यातील पाच गावांच्या विकास कामासाठी त्यांचं मोठे प्रयत्न राहिले असल्याने परिसरातील नागरिकांची मनोमन इच्छा आहे त्यांनी उकलगाव गनातून पंचायत समिती निवडणूक लढवावी.