सार्वजनिक क्षेञात कार्यरत कार्यकर्त्यांना खोट्या केसमध्ये अडकवाण्याचा समाजकंटकांचा डाव सर्वपक्षियांनी हाणून पाडला.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-सार्वजनिक व सामाजिक क्षेञात कार्य करणाऱ्या  व्यक्तींना काही अन्यायकारक घडले तर पोलिस स्टेशनला जावेच लागते.अशाच एका प्रकरणी भाजपचे सुनिल मुथ्था व आप पक्षाचे तिलक डुंगरवाल काही कार्यकर्त्यांसह शहर पोलिस स्टेशनला गेले असता काही समाजकंटकांनी त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्यचा प्रयत्न केला.माञ सर्वपक्षिय नेते व सामाजिक संघटनांनी संघटीतपणे विरोध करुन समाजकंटकांचा डाव उधळून लावला. याची सर्वदूर चर्चा होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,एका प्रकरणी महिलेने खोटी फिर्याद दाखल करुन प्राॕपर्टी बळकाविण्याचा प्रयत्न केला.हे समजताच सुनिल मुथ्था व तिलक डुंगरवाल हे  शहर पोलिस स्टेशनला गेले.तेथे पोलिसांना वस्तुस्थिती विशद केली.माञ काही समाजकंटकांनी सदर महिलेला चुकीचा सल्ला देवून संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांवर विनयभंगाची खोटी केस दाखल करायला सांगीतले.तथापि, पोलिस तपासात सदर केस खोटी व हेतूप्रेरीत असल्याचे निष्पन्न झाले.  खोटी केस दाखल केल्याची कुणकुण लागताच माजी आ.भाऊसाहेब कांबळे, सिध्दार्थ मुरकुटे ,काँग्रेसचे करण ससाणे,आशिष धनवटे,राजेंद्र सोनवणे,रितेश एडके,रियाज पठाण,अनितीन दिनकर,दिपक पटारे,प्रकाश चित्ते,संजय पांडे,रुपेश हरकल,शंतनु फोपसे,अतुल वढणे,दत्ता जाधव ,अमजद पठाण,शाकिर शेख,शिवसेनेचे  सचिन बडधे, लाखान भगत,निखिल पवार,संजय छल्लारे,अशोक थोरे,रमेश घुले,सुनिल फुलारे,रोहित भोसले,तेजस बोरावके,आम आदमी पक्षाचे विकास डेंगळे,राहुल रणपिसे,प्रवीण जमदाडे,अक्षय कुमावत,भरत डेंगळे,श्रीराम दळवी,श्रीधर कारले,डाॕ.सचिन थोरात,डाॕ.प्रविण राठोड,भैरव मोरे,प्रविण काळे,प्रशांत बागुल,राजमोहंमद शेख,बी.एम.पवार,आर.पी.आय.चे सुरेन्द्र थोरात,सुभाष ञिभूवन,संदीप मगर,राष्ट्रवादीचे अजयभाऊ डाकले,शिवप्रहारचे चंद्रकांत आगे,वंचितचे चरण ञिभूवन,मनसेचे बाबा शिंदे,व्यापारी असोसिएशनचे राहुल मुथ्था,मुन्ना झंवर,गौतम उपाध्ये,बाळासाहेब खाबिया,कल्याण कुंकुलोळ,स्वप्नील चोरडीया,भाग्येश चोरडीया,अनुप लोढा, सामाजिक कार्यकर्ते संजय गांगड,चंद्रकांत सगम,नाना गांगड,संकेत संचेती,युवराज घोरपडे,मुबारक शेख,प्रसाद कटके,चेतन बोगे,संदेश मेहेर,आकाश निकाळजे,निलेश गिते,तेजस उंडे  आदी सर्व पक्षीय नेते,विविध संघटनांचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनला जमले.त्यांनी समाजकंटकांना पोलिसांनी थारा देवू नये अशी मागणी केली.सामाजिक व सार्वजनिक क्षेञातील कार्यकर्त्यांवर असे खोटे गुन्हे दाखल करुन दबाव आणणे उचित नाही.त्यामुळे शहनीशा व खातरजमा केल्याशिवाय पोलिसांनीही अशा खोट्या केसची दखल घेवू नये.दरम्यान जिल्हा पोलिस आधिक्षक राकेश ओलांशी संपर्क केला गेला.त्यांना या प्रकरणाची सविस्तर  माहिती देण्यात आली.त्यावर श्री.ओला यांनी खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कारवाई करु नये अशा सूचना दिल्या.यावार पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी या वेळी ताक्रारीची  शहानिशा केल्याशिवाय नोंद घेतली  जाणार नाही तसेच फिर्याद खोटी निघाल्यास संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल  असे आश्वासन दिले.त्यामुळे खोट्या गुन्ह्याता .मुथ्था व .डुंगरवाल यांना अडकविण्याचा समाज कंटकाचा डाव उधळला गेला.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget