जोर जबरदस्तीने नगरपालिकेच्या वतीने होत असलेलि घरपट्टी व पाणीपट्टी वसुली शीथील करण्यात यावी पत्रकार संघाची मागणी

श्रीरामपूर (शहर प्रतिनिधी शेख फकीर महंमद) श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या वतीने होत असलेली घरपट्टी नळपट्टी व बाजारपेठेतील दुकानांची जोर जबरदस्तीने होत असलेलि पट्टी वसुली शीथील करणे बाबत आज दिनांक 17/ 3/ 2022 रोजी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरील निवेदन स्वीकारताना पालिकेतील अधिकारी श्री कविटकर यांनी यासंदर्भात वरिष्ठांना कळवितो असे सांगितले सदरील निवेदन देताना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली महासचिव शेख फकीर महंमद उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष मोहम्मद हनीफ तांबोळी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख बेलापुर शाखा प्रमुख मुसा भाई सय्यद बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद महिला जिल्हाध्यक्ष सौ समिना रफिक शेख पत्रकार संघ सदस्य सलीम जान मोहम्मद शेख अमीर बेग मिर्झा शेख नजीर गफूरभाई शकील इस्माईल कोथमिरे आदी पत्रकार या वेळी उपस्थित होते

पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आले की महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणूका ओबीसी चा मुद्दा सोडविण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका लांबणीवर टाकल्या असून या सर्व नगरपालिकांवर  प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे सबब सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांकडून जनतेच्या अडीअडचणीं चा विचार न करता कठोरपणे शक्तीची घरपट्टी पाणीपट्टी व दुकानांची पट्टी वसुली करण्यात येत आहे यामुळे सर्व नागरिक हवालदिल झाले आहे विशेष म्हणजे श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार जोरदार पट्टी वसुली करण्यात येत आहे पट्टी वसुली करिता नगरपालिकेचे वसुली पथक प्रत्येक वॉर्डातील घरी घरी जाऊन थकलेल्या पट्टीची मागणी करून दमबाजी करीत आहेत पट्टी थकलेल्या लोकांन पट्टीच्या ऐवज मध्ये त्यांच्या घरातील सामान घरावरील पत्रे जप्त करून नळ  कनेक्शन तोडण्याची धमकी देत आहेत सबब नागरिकांनी नगरपालिकेत चौकशी केल्यास उलट कर्मचारी वर्गाचे गाऱ्हाणे ऐकावे लागतात वसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते की या पट्टी वसुली नंतरच या पैशावर आमचे पगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन होणार असल्याने तुम्हीच आमच्यावर उपकार करा व पट्टी भरा असे सांगितले जाते अर्थातच वसुली कर्मचाऱ्यांनी जनतेचे गाऱ्हाणे ऐकण्यास कानावर हात ठेवले आहे यामुळे शहरातील जनता त्रस्त झाली असून पालिका प्रशासनाच्या या जोर जबरदस्ती पणाच्या वागणुकीचा निषेध नोंदवित आहे वास्तविक पाहता सन 2019 -20- 21 व 22 मध्ये कोरोना च्या प्रादुर्भावामुळे लोकांना उद्योग धंद्या पासून मुकावे लागले सद्य स्थितीतही बाजारपेठेतील दुकानदार व सर्वसामान्य नागरिकांची अत्यंत दुरवस्था झाली असून अद्याप शहरातील जनता कोरोना च्या संकटातून सावरली नसताना त्यांच्यावर वसुली चा बडगा थोपणे योग्य नसून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चालविलेल्या या अत्याचाराचा आम्ही निषेध नोंदवित असून जनते कडून सूट देऊन टप्पे वारीने झेपेल अशा स्वरूपात व भरता येईल अशा स्वरूपात पट्टीची वसुली करावी पट्टी वसुली मध्ये शिथीलता वर्तवावी जेणेकरून नागरिकांना पट्टी भरण्यास सवलत मिळेल व ते आपल्या कुवतीप्रमाणे पट्टी भरण्यास समर्थ होतील सदरील या बाबींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून सक्तीची पट्टी वसुली शिथील करावी असे नमूद करण्यात आले असून त्वरित पट्टी वसुली शीथील न केल्यास पत्रकार संघ व नागरिकांच्या वतीने पालिकेसमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात येईल असा इशाराही पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget