बेलापुर (प्रतिनिधी )- येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येनंतर आज बेलापुर गावातील व्यवहार सुरळीत सुरु झाले या घटनेच्या निषेधार्थ बेलापुरगाव हे प्रथमच सलग तीन दिवस बंद होते.बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेतली त्या बैठकीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय एक मुखाने घेण्यात आला शनिवार ग्रामस्थांनी बंद पाळला रविवार आठवडे बाजार होता त्यामुळे सर्व व्यापारी किरकोळ विक्रेते भाजीपाला विक्रेते आदिंनी दुकाने सुरु करण्यास सुरूवात केली नाही तोच गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्याची वार्ता येवुन धडकली लगेच व्यापारी व सर्व व्यवसायीकांनी आपले व्यवहार बंद केले त्यांनंतर सोमवारी अंत्यविधी होईपर्यत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवारी सायंकाळी गौतम हिरण यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे शनिवार रविवार व सोमवार अशी तीन दिवस बेलापुरची बाजारपेठ बंद होती आज व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरु केली असली तरी सर्व व्यापारी प्रचंड दहशती खाली काम करताना दिसत आहे बेलापुर गावाकडे वाकड्या नजरेने पहाण्याची कुणाची हिम्मत नव्हती आशा बेलापुरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याचा खून होने ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे गुंडगीरी करणारे गुंड आपल्या गावापर्यत पोहोचलेले आहे नव्हे कांहीचा त्यांना आश्रयही आहे काही लोक त्या टोळ्यातही वावरत आहेत काहीही काम धंदा न करणारा व्यक्ती पंचवीस तीस हजाराचा मोबाईल महागडी गाडी वापरत असेल ते आले कोठून याचाही विचार ग्रामस्थांनी करण्याची गरज आहे गावातील जागृक नागरीकांनी पुढाकार घेवुन गावात येणारे नवखे अनोळखी यांना जाब विचारला पाहीजे सर्वात महत्वाचे म्हणजे गावात देखाव्यासाठी असलेली सि सि टी व्ही ची कुचकामी यंत्रणा आतातरी सुधारली पाहीजे प्रत्येक व्यापारी व्यवसायीकांनी आपल्या दुकानाच्या आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी सि सि टी व्ही बसविणे अंत्यत गरजेचे आहे अन ते ही चालु स्थितीत असणे गरजेचे आहे गुन्हेगारांना कँमेर्याचा फार मोठा धाक असतोच शिवाय पोलीस यंत्रणेलाही तपास करण्यास सोपे जाते शिवाय एक कँमेरा आपल्या दुकाना भोवतालचा परिसरही कव्हर करणारा असल्यास आपण सुरक्षित राहु हे नियम आता काटेकोर पाळण्याची गरज आहे.
तीन दिवसानंतर बेलापुर बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत व्यापारी प्रचंड दहशतीखाली.
बेलापुर (प्रतिनिधी )- येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येनंतर आज बेलापुर गावातील व्यवहार सुरळीत सुरु झाले या घटनेच्या निषेधार्थ बेलापुरगाव हे प्रथमच सलग तीन दिवस बंद होते.बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेतली त्या बैठकीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय एक मुखाने घेण्यात आला शनिवार ग्रामस्थांनी बंद पाळला रविवार आठवडे बाजार होता त्यामुळे सर्व व्यापारी किरकोळ विक्रेते भाजीपाला विक्रेते आदिंनी दुकाने सुरु करण्यास सुरूवात केली नाही तोच गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्याची वार्ता येवुन धडकली लगेच व्यापारी व सर्व व्यवसायीकांनी आपले व्यवहार बंद केले त्यांनंतर सोमवारी अंत्यविधी होईपर्यत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवारी सायंकाळी गौतम हिरण यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे शनिवार रविवार व सोमवार अशी तीन दिवस बेलापुरची बाजारपेठ बंद होती आज व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरु केली असली तरी सर्व व्यापारी प्रचंड दहशती खाली काम करताना दिसत आहे बेलापुर गावाकडे वाकड्या नजरेने पहाण्याची कुणाची हिम्मत नव्हती आशा बेलापुरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याचा खून होने ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे गुंडगीरी करणारे गुंड आपल्या गावापर्यत पोहोचलेले आहे नव्हे कांहीचा त्यांना आश्रयही आहे काही लोक त्या टोळ्यातही वावरत आहेत काहीही काम धंदा न करणारा व्यक्ती पंचवीस तीस हजाराचा मोबाईल महागडी गाडी वापरत असेल ते आले कोठून याचाही विचार ग्रामस्थांनी करण्याची गरज आहे गावातील जागृक नागरीकांनी पुढाकार घेवुन गावात येणारे नवखे अनोळखी यांना जाब विचारला पाहीजे सर्वात महत्वाचे म्हणजे गावात देखाव्यासाठी असलेली सि सि टी व्ही ची कुचकामी यंत्रणा आतातरी सुधारली पाहीजे प्रत्येक व्यापारी व्यवसायीकांनी आपल्या दुकानाच्या आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी सि सि टी व्ही बसविणे अंत्यत गरजेचे आहे अन ते ही चालु स्थितीत असणे गरजेचे आहे गुन्हेगारांना कँमेर्याचा फार मोठा धाक असतोच शिवाय पोलीस यंत्रणेलाही तपास करण्यास सोपे जाते शिवाय एक कँमेरा आपल्या दुकाना भोवतालचा परिसरही कव्हर करणारा असल्यास आपण सुरक्षित राहु हे नियम आता काटेकोर पाळण्याची गरज आहे.
Post a Comment