बेलापुर (प्रतिनिधी  )- - लाॅकडाऊन काळात मयत व अपंग माणसांच्या नावावर खोटे चेक काढुन आपले उखळ पांढरे केले  बगलबच्यांना सांभाळले अशा नतद्रष्ट लोकाना जनता त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार  नाही असे उदगार जि प सदस्य शदर नवले यांनी काढले  सर्वसामान्य लोकांना कुठेही मदत दिली गेली नाही , खरे लाभार्थी लाभापासुन वंचित राहीले  त्यांना मदत केली नाही,  अश्या लोकांना तुम्ही निवडून देणार आहात का? सभा  पार पडल्यावर मतदारांना फोन केले जातात   तुम्ही सभेत का गेलात ? अशी दमबाजी सत्ताधाऱ्यांकडून केली जाईल, तुम्ही मिटींगला का गेले व का बोलले ?  तुम्हाला धमकावले जाईल घाबरू नका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील  आता या  गावगुंडांची दादागिरी मोडून काढण्याची वेळ तुमच्यावर आली.

          *असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना केले*.


      - *सभेत बोलताना नवले पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या जागेत बचत गट भवन बांधण्याचा मानस आहे, बचत गटांना  चालना देण्यासाठी मोठे मार्केट उभे करण्यासाठी त्यांची जबाबदारी आमच्या सारख्यावर राहणार असल्याने ती आपण पुर्ण करू, अशी ग्वाही नवले दिली.*


       *आपल्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार नवले यांनी केला आहे*. 


         *आलीबाबा चाळीस जणांची टोळी गावात आता  एकएका मतांसाठी वणवण फिरत आहे.  दहा वर्षात काय दिवे लावले हे जनता आता विचारत इहे हीच सुज्ञ जनता इतकी दुधखुळी नाही, गावाला यापुढील काळात नवीन वळण लावावा लागणार आहे. यांचीही बोगसगिरी जनता खपवून घेणार नाही* 

    -  *असेही नवले म्हणाले* 


   -  *सभेत बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की*, 

   *खार्‍या पिण्याच्या पाण्यामुळे माता -भगिनी आजारी पडत आहे. आपले जेष्ठ नागरिक आजारी पडत असल्याने आपल्या गावामध्ये व आपल्या भागात मोठ्या आरोग्याच्या समस्या उभ्या  आहेत पाणी पुरवठ्यावर कुणाचेही नियंत्रण नाही   पाणी पुरवठ्याला कुठेही टायमिंग नाहीच,बडी मंडळी दररोज आर ओचे फिल्टर पाणी पित आहे पण सर्वसामान्याचे काय त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार  असा सवाल अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे* 

*चाँदनगर येथे झालेल्या गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठकीत केला*. 


      *खंडागळे म्हणाले की, गेल्या 10 वर्षेच्या कालखंडात विकास कामांमध्ये  फार मोठा भ्रष्टाचार* *झालेला आहे.  विकास कामे*

*करत असतानाच मलई खायची हा मोठा उद्योग गेल्या 10 वर्षेच्या कालखंडात सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा आरोप खडांगळे यांनी केला*


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget