श्रीरामपूर (प्रतिनिधी) रमजान महिन्यांमध्ये पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी नगरपालिकेने नळांना पाणी न सोडल्यामुळे जनतेचे खूपच हाल झाले . त्यामुळे नागरिकांना शनिवारी कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले .
याबाबतअधिक माहिती घेतली असता नगरपालिकेतर्फे दर शनिवारी कोरडा शनिवार पाळला जातो . परंतु सध्या मुबलक पाणी असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून तो पाळला गेलेला नाही . सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे 25 मे पर्यंत शहरात दर शनिवारी पाणी पुरवठा केला जाईल असे नगरपालिकेने जाहीर केले होते .
त्यामुळे नागरिकांनी सुद्धा नगरपालिकेला धन्यवाद दिले . मात्र शुक्रवारी सायंकाळी शहराच्या काही भागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला . चार-पाच तास वीज गायब असल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यामध्ये अडथळा निर्माण झाला . त्यातच रात्री अकरा वाजता नगरपालिके मार्फत सोशल मीडिया वर मेसेज टाकून शनिवारी सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले . वास्तविक पाहता थोडा उशिरा पाणीपुरवठा केला असता तरी लोकांना पाणी मिळाले असते . कारण रात्री अकरा पासून वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरायला भरपूर वेळ होता . सध्या रमजान महिना चालू असल्यामुळे मुस्लिम बांधवांना दररोज पाच वेळा वजू साठी पाण्याचा वापर करावा लागतो . शनिवारी पाणी येणार नाही याची कोणतीही पूर्व कल्पना नसल्यामुळे लोकांनी भरपूर पाणी वापरले . परंतु रात्री अकरा वाजता जेव्हा नगरपालिकेने सकाळी पाणीपुरवठा होणार नाही असे जाहीर केले तेव्हा मात्र लोकांनी संताप व्यक्त केला . शहरातील पाण्याचे दोन्ही तलाव भरलेले आहेत . भंडारदारा धरणातही मुबलक पाणी आहे . म्हणजे सध्या उन्हाळा असूनही पाण्याची कुठेच टंचाई नाही . प्रवरा कालवा सुद्धा पाण्याने तुडुंब वाहत आहे .असे असताना रमजान महिन्याच्या पवित्र काळामध्ये पाण्याअभावी लोकांचे हाल केल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . वार्ड नंबर 2 मध्ये सात-आठ नगरसेवक राहतात . परंतु त्यांनी सुद्धा याबाबत कोणतीही नोंद न घेतल्याने जनतेने या नगरसेवकांबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे .नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली . नगरपालिकेने आधी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी नियमित पाणीपुरवठा करावा किंवा शनिवारचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी बंद ठेवावा . जनतेच्या भावनेशी खेळू नये . अशी संतप्त प्रतिक्रिया वार्ड नंबर 2 मधील महिला भगिनींनी व्यक्त केली .
त्यामुळे नागरिकांनी सुद्धा नगरपालिकेला धन्यवाद दिले . मात्र शुक्रवारी सायंकाळी शहराच्या काही भागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला . चार-पाच तास वीज गायब असल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यामध्ये अडथळा निर्माण झाला . त्यातच रात्री अकरा वाजता नगरपालिके मार्फत सोशल मीडिया वर मेसेज टाकून शनिवारी सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले . वास्तविक पाहता थोडा उशिरा पाणीपुरवठा केला असता तरी लोकांना पाणी मिळाले असते . कारण रात्री अकरा पासून वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरायला भरपूर वेळ होता . सध्या रमजान महिना चालू असल्यामुळे मुस्लिम बांधवांना दररोज पाच वेळा वजू साठी पाण्याचा वापर करावा लागतो . शनिवारी पाणी येणार नाही याची कोणतीही पूर्व कल्पना नसल्यामुळे लोकांनी भरपूर पाणी वापरले . परंतु रात्री अकरा वाजता जेव्हा नगरपालिकेने सकाळी पाणीपुरवठा होणार नाही असे जाहीर केले तेव्हा मात्र लोकांनी संताप व्यक्त केला . शहरातील पाण्याचे दोन्ही तलाव भरलेले आहेत . भंडारदारा धरणातही मुबलक पाणी आहे . म्हणजे सध्या उन्हाळा असूनही पाण्याची कुठेच टंचाई नाही . प्रवरा कालवा सुद्धा पाण्याने तुडुंब वाहत आहे .असे असताना रमजान महिन्याच्या पवित्र काळामध्ये पाण्याअभावी लोकांचे हाल केल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . वार्ड नंबर 2 मध्ये सात-आठ नगरसेवक राहतात . परंतु त्यांनी सुद्धा याबाबत कोणतीही नोंद न घेतल्याने जनतेने या नगरसेवकांबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे .नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली . नगरपालिकेने आधी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी नियमित पाणीपुरवठा करावा किंवा शनिवारचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी बंद ठेवावा . जनतेच्या भावनेशी खेळू नये . अशी संतप्त प्रतिक्रिया वार्ड नंबर 2 मधील महिला भगिनींनी व्यक्त केली .
नगरसेवक ताराचंद रणदिवे यांची तत्परता
सकाळी 11:00 वाजता देखील नळांना पाणी न आल्यामुळे गुलशन चौक परिसरातील नागरिकांनी या भागाचे कर्तव्यदक्ष व जागरूक नगरसेवक ताराचंद रणदिवे यांना पाणी न आल्याबाबत विचारणा करून घरात पाणी नसल्याचे सांगितले . त्यांनी तातडीने नगरपालिकेचा टॅंकर पाठवून या परिसरातील लोकांना पाणी उपलब्ध करून दिले.याबद्दल या भागातील जनतेने त्यांना धन्यवाद दिले.
Post a Comment