आदेशाला केराची टोपली दाखवणार्यावर कायदेशीर कारवाई व्हावि.

देशात कोरोना  ने  माजवला असून  कोरोनाचा पादुर्भाव  रोखण्यासाठी  सर्वत्र लॉक डाऊन आहे, सर्वत्र संचारबंदी असताना मात्र राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे पुरुष, महिला, लहान मुले यांना एकत्रित  येथील श्री हनुमान मंदिर सभामंडपात जमवून किराणा वाटप करण्यात येऊन लॉक डाऊन चे नियम तोडत कायद्याचे उल्लंघन केले गेले,  यामध्ये शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिसही सामील झाले होते ,त्यांनी  हा किराणा वाटताना आयोजकांना मदत केली
,मात्र गर्दी पांगवण्याऐवजी उलट पोलिसांनी आयोजकांना सहकार्य केले, याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे,
     सध्या जगात, देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सर्वत्र कोरोनामुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर 14 एप्रिल 20 20 पर्यंत लॉक डाऊन आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, तसेच एकत्रित येण्यास मनाई आहे, संचारबंदी जारी आहे, असे असताना राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे आज रविवार दि,२६ला
सकाळी येथील राहता तालुका पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे,व काही कार्यकर्त्यांनी अतिउत्साह पोटी गावातील महिला ,पुरुष ,लहान मुले ,यांना श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपात बोलावून एकत्रितरीत्या त्यांना  सभामंडपात बसून किराणा वाटप करण्यात आले, हे वाटप करताना सोशल डिस्टंन्स व अनेकांकडे मास्ककही नव्हते, सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने देशात पसरत असताना व सर्व शहरे ,गावे कडकडीत बंद असताना, येथे गर्दी करून व कोणतेही   लॉक डाऊन चे नियम, व धोरणाचा  संसर्ग होऊ नये  म्हणून  कोणतीही दक्षता न घेता हा किराणा वाटपाचा घाट घातला गेला, हा प्रकार सुरू असताना शिर्डी पोलीस स्टेशनचे काही पोलीस येथे आले, मात्र त्यांनी या गर्दीला पांगवणे ऐवजी उलट आयोजकांना मदत करत महिलांना, मुलांना, किराणा देण्यास मदत केली व हा एकत्रित जमाव पांगवणे ऐवजी नंतर पोलिसही निघून गेले, त्यानंतर तासभर हा कार्यक्रम चालला, देशात ,राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सेवा  सोडून कडकडीत बंद असताना,  सावळीविहीर येथे हा किराणा लोकांना वाटप करण्याच्या हेतूने कायद्याचे उल्लंघन करण्यात आले, लॉक डाऊन नियमाची एैशी की तशी झाली, हे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनाने मोठे धोकादायक आहे, परंतु यावेळी अचानक आलेले पोलिसही आयोजकांच्या विनंतीला मान देत त्यांनी मंदिराच्या सभामंडपात जाऊन लोकांना किराणा वाटपास मदत केली, त्यामुळे जमा झालेले लोक बिनधास्त होते,
    शासनामार्फत गोरगरीब, भिकारी व गरजूंना जवळच निमगाव निघोज येथील श्री साई पालखी निवारा येथे   भोजन निवास व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच ज्यांना कोणाला किराणा, धान्य स्वरूपी मदत करावयाची आहे त्यांनी साई पालखी निवारा येथे जाऊन द्यावयाची आहे, अशा शासनाने अगोदरच सूचना दिलेल्या आहेत, कोणीही  भोजन, किराणा अन्नधान्य वाटपासाठी आपापल्यापरीने कार्यक्रम घेऊ नये, त्यास मनाई आहे ,असे असताना सावळीविहीर ला या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले, राजकीय प्रभुत्व दाखवण्यासाठी असे कार्यक्रम आता घडत आहेत, यावर अहमदनगर जिल्हाधिकारी व नवीनच जिल्ह्यात आलेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिकारी अखीलेश कुमार सिंह ह्यांनी अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन याला पाय बंद घालावा, शिवाय असे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याना मग तो कोणीही सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील व्यक्ती ,नेता,असो त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ,अशी जिल्हावासयांची आपणाकडून अपेक्षा आहे, व तशी मागणी करण्यात येत आहे,
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget