बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज - आ. अब्दुल सत्तार;

आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महिला बचत गटांना फिरता निधीचे वाटप ;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 29
बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. सिल्लोड शहरातील राजश्री शाहू महाराज मंगल कार्यालयात दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत शहरातील एकोणाविस महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा फिरता निधीचे वाटप करण्यात आले, यावेळी माजीमंञी आ.अब्दुल सत्तार बोलत होते. नगरपरिषद अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम ,गटनेते नंदकिशोर सहारे,मुख्याधिकारी सय्यद रफिक,डाँ. मोरे, नगरसेवक विठ्ठलराव सपकाळ, राजु गौर, सुधाकर पाटील, सत्तार हुसैन, राम कटारिया, संजय फरकाडे, चांद मिर्झा, आरेफ पठाण, माणसिंग राजपूत, संदीप पाटील, गोलू कटारिया, सुशिल गोसावी, गणेश डकले आदी मान्यवरांसह बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र सुर्यवंशी यांनी केले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget