Latest Post

बेलापूरःराज्याचे जलसंपदा मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी  नाम.राधाकृष्ण विखे पा.च्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बेलापूर बुll ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली 'प्रारंभ कचरा संकलन प्रकल्पा'च्या सहकार्याने  गावातील ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञपणे संकलन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.नजिकच्या काळात कच-यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांनी दिली.                                                 बेलापूर ग्रामपंचायतीने कच-याचे वर्गिकरण करुन संकलन करण्याचा उपक्रम श्री.शरद नवले व श्री.अभिषेक खंडागळे यांचे संकल्पनेतून हाती घेण्याचे जाहिर केले होते.याबाबत स्वच्छता कर्माचा-यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे जमा करावा याबाबत ग्रामस्थांनाही आवाहन करण्यात आले होते.प्रारंभ प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग व अनिता पाचपिंड या घरोघरी जाऊन कचरा संकलना बाबत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांना बेलापूर ग्रामपंचायत यांच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.                ग्रामपंचायतीच्या आवाहनास ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.ग्रामस्थ ओला कचरा(फळे.भाजीपालाभाज्यांच्या,साली व देठे,पालापाचोळा,खरकटे,खराब अन्न इत्यादी )तर सुका कचरा(प्लॕस्टिक बाॕटल्स,खाद्यपदार्थ पाकिटे,कागद व पुठ्ठे,प्लास्टिक वस्तु,कापडाच्या चिंध्या,औषधांची पाकीटे,प्लास्टिकचे अवशेष इत्यादी)स्वतंञपणे संकलित करुन कचरागाडीतील ओल्या व सुक्या कच-यासाठीच्या स्वतंञ कप्यांत टाकून गोळा करण्यात येत आहे.                                         नजिकच्या काळात हा कचरा नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोफत उपलब्ध करुन दिलेल्या जमिनीवर डंम्पिंग यार्ड करुन तेथे टाकण्यात येणार आहे.तसेच या डम्पिंग यार्डवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारुन सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ.साळवी व उपसरपंच श्री.नवले यांनी  दिली.

बेलापूर: श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बेलापूर पोलीस दूरक्षेत्रात कर्तव्यास असलेले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत १५ वर्षांचा टप्पा पार केला, त्यानिमित्त बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.


पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत अकरा वर्षे मुंबईमध्ये सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफास केरुन गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली, येथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. वरिष्ठांच्या हस्ते अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे. श्री.बडे यांना उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या खडतर आणि यशस्वी सेवेबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी कॉन्स्टेबल बडे यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार स्वीकारताना, बडे यांनी आपल्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणांचे अनेक धाडसी आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यांच्या या अनुभवांबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.


या छोट्याशा सत्कार सोहळ्याला पत्रकार देवदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, सामाजिक  कार्यकर्ते दादासाहेब कुताळ, तिळवण तेली महासंघाचे एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांसह मान्यवर उपस्थित होते.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) – सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, शाळेच्या इतिहासात प्रेरणादायी अशी कामगिरी नोंदवली आहे. यामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीतील आदर्श आढळ, अवधूत अंभोरे, आयुष निर्मल, शर्वरी बोरसे, श्रीरंग मालपुरे आणि श्रेया वर्गुडे तर इयत्ता आठवीतील सृष्टी वावधणे आणि नचिकेत काठमोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही कामगिरी म्हणजे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे प्रामाणिक मार्गदर्शन यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.या यशामध्ये शिक्षिका शिल्पा खांडेकर, सोनल निकम, माधुरी भस्मे,सुनंदा कदम, स्वरूपा वडांगळे, सीमा शिंदे, गणेश मलिक आणि अर्चना बाजारे यांनी विद्यार्थ्यांसोबत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी )- जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीने  सातत्याने विविध उपक्रम राबविले असुन या उपक्रमामुळे गावातील विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                बेलापूर बुll ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास संबोधित करताना नवले बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मिनाताई साळवी या होत्या.तर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे,उपसरपंच चंद्रकांत नवले,ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,रंजना बोरुडे,प्रतिभा नवले, मानवी खंडागळे,पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकारी  शोभा शिंदे,बँक आॕफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक राजेश परदेशी, डॉ. अश्विनी लिपटे, शशिकांत दुशिंग आदि उपस्थित होते.                         आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की गावात महिलांची संख्या पन्नास टक्के असुन या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाम.राधाकृष्ण विखे पा, माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले  आहेत. गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता आल्यापासून गावात विविध विकास कामे वेगाने होत असून बेलापूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक,मिनाताई  साळवी,माजी उपसरपंच तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,सदस्य उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,शिलाताई पोळ,छायाताई निंबाळकर आदिंचा यात  मोठा सहभाग आहे.गावकरी मंडळाने  समाजांतील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबिले असुन लवकरच १००० घरकुलांचे बांधकाम सुरू होणार आहे.महिलांकरीता शासनाच्या अनेक  योजनां असुन योजनांची माहिती न झाल्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहतात.महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहू शकते.त्यामुळे महीलांनी आरोग्याबाबात सजग व्हावे यासाठी आरोग्य प्रबोधन व तपासणी स्वच्छता महिलांना मिळणारे लाभ गावाच्या विकासात महीलांचे योगदान या सर्व बाबींची माहिती व्हावी या हेतुने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे नवले यांनी सांगीतले .                                          प्रास्तविक भाषणात बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणाले की,आजवर बेलापूर ग्रामपंचातीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांचे  भक्कम सहाय्य व पाठबळ मिळाले आहे.नाम.विखे यांच्या सहकार्याने १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच या योजनेच्या साठवण तलावासाठी आठ एकर जमिन ग्रामपंचायतीला मोफत मिळाली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या सहा महिन्यात योजना पूर्ण होणार असुन तिनं म्हशीने पुरेल इतका पाणीसाठा त त्यात असणार आहे.गावातील गरजूंसाठी तब्बल ११०० घरकुले मंजूर झाली आहेत.  या घरकुलासह,सेंद्रिय खत प्रकल्प,क्रिडा संकुल तसेच सर्वधर्मियांच्या स्मशानभुमिसाठी ३४ एकर जागा नाम.विखे पा. यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे.ग्रामपंचायतीने भुयारी गटारीचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे संकलित करण्याचे कामही सुरु केले आहे.भविष्यात कच-यावर प्रक्रिया करुन खतप्रकल्प उभारणी केली जाणार आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई झाल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत.माञ पावसाळ्यानंतर लगेचच रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी निधी उपलब्धतेसाठी नाम.विखे पा.यांचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पाणीपुरवठा योजना कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खंडागळे यांनी दिली.                                                यावेळी सरपंच मिनाताई साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला तर सौ.आशाताई गायकवाड ,ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प.समितीच्या प्रकल्प आधिकारी शोभा शिंदे यांनी बचतगटा संदर्भातील योजना,त्या माध्यमातून करता येणारे व्यवसाय याची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेचे बेलापूर शाखेचे व्यवस्थापक  राजेश परदेशी यांनी महिलांसाठी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून त्याबाबात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभ प्रकल्पचे शशिकांत दुशिंग यांनी घनकचरा व ओलाकचरा संकलन व प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली.प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत प्रबोधन केले.पञकार देविदास देसाई यांनी अंधश्रध्देबाबत प्रबोधन केले.मेळाव्याचे दरम्यान महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अध्यक्षीय सूचना सौ. मनिषा दळे यांनी मांडली त्यास सौ. संध्या तेलोरे यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूञसंचलन सौ.योगिताताई अमोलिक यांनी केले तर सौ. वैशालीताई शेळके यांनी आभार मानले.मेळाव्यास उपसरपंच चंद्रकांत नवले सदस्य मुस्ताक शेख तबसूम बागवान प्रियंका खुरे उज्वला कुताळ जया भराटे आशा गायकवाड ज्योती जगताप मंगल जावरे सरिता मोकाशी वैशाली शेळके मनीषा दळे संगीता देसाई प्रतिभा देसाई संगीता शिंदे तेलोरे नीलिमा कुमावत सुजाता गुंजाळ वैशाली शिरसाठ सुवर्णा खंडागळे आदिसह मोठ्या संख्येने परिसरातील बचत गटाच्या महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

कोपरगाव (गौरव डेंगळे): श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित ‘शारदा एक्सप्रेस खो खो संमिश्र लीग २०२५’ ही राज्यस्तरीय स्पर्धा शनिवार, २६ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि पावसाच्या सरींसह संपन्न झाली. कोपरगाव, संगमनेर, येवला, अहिल्यानगर येथून आलेल्या एकूण १३ संघांनी सहभाग घेतलेला असून १८ सामन्यांमध्ये दमदार खेळाचा थरार अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,युवराज नगरकर,संकेत पारखे, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर,रामदास खरात, अजित पवार,रवी नेद्रे, भरत थोरात आणि दिगंबर गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

चार गटांमध्ये विभागलेली ही स्पर्धा गटसाखळी,उपांत्य आणि अंतिम फेरी अशा तीन टप्प्यांमध्ये झाली. अ गटातून नूतन विद्यालय संगमनेर, ब गटातून आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर, क गटातून दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगर आणि ड गटातून आत्मा मालिक कोकणठाण यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य सामन्यात दिग्विजय क्रीडा मंडळने नूतन विद्यालयाचा पराभव केला, तर दुसऱ्या लढतीत आत्मा मालिक संघाने आदर्श स्कूलवर मात केली.

अंतिम सामन्यात आत्मा मालिक कोकणठाण संघाने जबरदस्त खेळ करत दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगरचा पराभव केला आणि शर्यतीचे विजेतेपद पटकावले. यावेळी खेळाडूंनी पावसाचे आव्हान अंगिकारत मैदानावर चिवट झुंज दिली आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून राधिका भोसले आणि जयदत्त गाडेकर यांना गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचा मानकरी तनिष मानकर ठरला. स्पर्धेत विविध सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित हसे, साईराज पाटील, साहिल नेहे, तेजल रोकडे, साई सरोदे, साई भराडे, अनामिका आहेर, कार्तिक कराळे, रिंकू वळवी, मनीषा वळवी, अर्णव थोरात, अमित वासवे आणि तनवी देवकर यांचा समावेश होता.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये पंच म्हणून अण्णासाहेब गोपाल, बाळासाहेब शेळके, गणेश वाघ, गणेश मोरे, रितेश माळवदे, ओम जगताप, यश जाधव, साई जाधव, प्रसाद मावळ यांचे मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांच्यात नेतृत्वगुण, संघभावना, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास यांचे उत्तम संकलन घडल्याचे दृश्य मैदानात दिसून आले.पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विजेता आत्मा मालिक कोकणठाण संघाला ₹२१०० रोख रक्कम व चषक देण्यात आला, तर उपविजेता दिग्विजय मंडळ अहिल्यानगर संघाला कोपरगाव क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय देवकर यांच्या हस्ते ₹१००० रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच सर्वोत्तम खेळाडू, अंतिम सामन्याचा मानकरी व इतर उल्लेखनीय खेळाडूंनाही स्मृतिचिन्हे देण्यात आली.

‘शारदा एक्सप्रेस खो खो लीग’ ही स्पर्धा केवळ एक खेळ नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी मंच ठरली आहे.



*कोट*


"कालपर्यंत संपूर्ण जिल्ह्याला पावसाने वेढलं होतं... प्रश्न होता, 'स्पर्धा होणार तरी कशा?' पण मनामध्ये एक आशा होती, की देव जिथं खेळाचं मंदिर असतं, तिथं पावसालाही थांबावं लागतं. आज सकाळी मैदानावर आलो, ओलसर माती, पाण्याच्या साऱ्या, पण मनात एकच विनंती – ‘देवा, चार तास विश्रांती दे… खेळू दे आमचं स्वप्न.’ आणि खरंच... पावसाने थोडं बाजूला सरून मैदान खुलं केलं आणि शारदा खो खो लीगचा थरार साऱ्या सीमारेषा तोडून मैदानावर अवतरला!"


गौरव अरविंद डेंगळे (क्रीडा मार्गदर्शक)

बेलापूर (प्रतिनिधी)-एका दिव्यांगाला प्रवाहात आणण्याची टाकलेली जबाबदारी एका कर्मचाऱ्याला चांगलीच महागात पडली .50 हजार रुपये रोख भूर्दंड भरुन इज्जतीचा पंचनामा करण्याची वेळ त्या कर्मचाऱ्यांवर आली पण दिवसांचा गोंधळ रात्री च मिटला अन् त्याने सुटकेचा निश्वास टाकला.                      त्याचे झाले असे की परिसरातील एका परिवारात एक मुलगा दिव्यांग होता. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मिळाली. त्यांनी एका कर्मचाऱ्याला आदेश दिला की त्या दिव्यांग मुलाच्या घरी जाऊन त्याला प्रवाहात आणा. वरिष्ठाच्या आदेशानुसार तो कर्मचारी त्या दिव्यांग मुलाच्या घरी गेला त्याने दिव्यांग व्यक्तीला मिळणारे लाभ, शासकीय योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तीच्या आईला दिली . त्याचबरोबर त्या मुलाचे अहिल्यानगर येथे जाऊन दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून आणा ते कसे करायचे याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले. काही अडचण आल्यास माझ्या फोन नंबर वर संपर्क साधा असे सांगून त्या कर्मचार्‍याने आपला फोन नंबर त्या महिलेला दिला .त्यानंतर दिवसभर त्या महिलेने वेगवेगळ्या कारणाने संबंधित कर्मचाऱ्याला फोन केले. तो कर्मचारी प्रामाणिकपणे दिव्यांगाची माहिती व येणाऱ्या अडचणी विषयी सांगत होता. हे सर्व झाल्यानंतर सायंकाळी ती महिला विचारपूस करत राहुरी येथील कर्मचाऱ्यांच्या घरी गेली व तेथे आरडा ओरडा करून हा मला दिवसभर घेऊन फिरला याने नको ते केले असे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. झालेला प्रकार पाहून तो कर्मचारीही गडबडून गेला. आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागले .तसे ती महिला आणखीनच जोर जोरात ओरडू लागले त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने आपल्या मित्रांचा सल्ला घेऊन त्या महिलेसह बेलापूर गाठले. बेलापूरला आल्यानंतर ते सरळ पोलीस स्टेशनला गेले तेथे आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या कर्मचाऱ्याला होती.परंतु तिथेही संबंधित महिलेने एकच रट लावून धरली. त्यामुळे कर्मचारी आणखीनच गडबडून गेला त्याने गावातील काही व्यक्तींना बोलावले. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती महिला एका विषयावर ठाम राहिले. रात्री अकरा वाजता सुरू झालेले नाट्य दीड दोन वाजेपर्यंत सुरू होते. अखेर शेवटी त्या महिलेने आपला प्रस्ताव ठेवला. मनात नसतानाही सर्वांच्या आग्रहा खातर त्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार रुपयांचा भूर्दंड बसला.वास्तविक तो कर्मचारी दिवसभर पंचायत समितीत आपल्या सहकाऱ्यां बरोबर काम करत होता.पण एका महीलेपुढे त्याला हतबल व्हावे लागले. यापूर्वीही अशाच घटना घडलेल्या असून हनी ट्रॅप सारखे प्रकार आता ग्रामीण भागातही सुरू झाले आहेत.या याबाबत काही कर्मचारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे समजले

श्रीरामपूरःपुणतांबा येथील रहिवासी असलेले धीरज व सूरज संपतराव बोर्डे या बंधुची अनुक्रमे  जलसंपदा व नगरपालिका विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.                                                     महाराष्ट्र शासनाच्या 'जलसंपदा विभाग' तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत  धीरज बोर्डे याची सहाय्यक अभियंता (ज्यु. इंजिनियर ) पदी निवड झाली आहे . तर सूरज बोर्डे यांची सन २००० मध्ये नगरपालिका विभागात लेखाधिकारी म्हणून निवड झाली असून ते बुलढाणा नगरपालिकेत रुजू झाले आहेत. धीरज व सूरज हे दोघे अशोक सहकारी कारखान्याचे माजी कर्मचारी संपतराव बोर्डे यांचे चिरंजीव आहेत.विशेष म्हणजे सुरज व धीरज हे जुळेबंधू असून दोघांचीही शासकीय अधिकारी म्हणून निवड होणे  दुर्मिळ ठरते.धीरज व सुरज बोर्डे यांच्या या नियुक्तीबद्दल भास्कर खंडागळे ,नानासाहेब जोंधळे,अॕड.एन.जी.खंडागळे ,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget