Latest Post

श्रीरामपूरःपुणतांबा येथील रहिवासी असलेले धीरज व सूरज संपतराव बोर्डे या बंधुची अनुक्रमे  जलसंपदा व नगरपालिका विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.                                                     महाराष्ट्र शासनाच्या 'जलसंपदा विभाग' तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत  धीरज बोर्डे याची सहाय्यक अभियंता (ज्यु. इंजिनियर ) पदी निवड झाली आहे . तर सूरज बोर्डे यांची सन २००० मध्ये नगरपालिका विभागात लेखाधिकारी म्हणून निवड झाली असून ते बुलढाणा नगरपालिकेत रुजू झाले आहेत. धीरज व सूरज हे दोघे अशोक सहकारी कारखान्याचे माजी कर्मचारी संपतराव बोर्डे यांचे चिरंजीव आहेत.विशेष म्हणजे सुरज व धीरज हे जुळेबंधू असून दोघांचीही शासकीय अधिकारी म्हणून निवड होणे  दुर्मिळ ठरते.धीरज व सुरज बोर्डे यांच्या या नियुक्तीबद्दल भास्कर खंडागळे ,नानासाहेब जोंधळे,अॕड.एन.जी.खंडागळे ,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

बेलापूर( प्रतिनिधी )-आंबी येथून पुण्याला जाण्याकरता पहाटे निघालेल्या मायलेकाच्या मोटरसायकलला बिबट्याची धडक बसल्यामुळे दोघेही  जखमी झाले असुन त्यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल उपचार सुरू आहेत केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघेही वाचले.                याबाबत समजलेली हकीगत अशी की आंबी येथील अलका भगवान वायदंडे वय वर्ष 45 व त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे वय 28 हे पुणे येथे जाण्याकरिता सकाळी साडेपाच वाजता आंबी येथून निघाले श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी रस्त्याच्या वळणावर गाडी असतानाच अचानक बिबट्याने गाडीला धडक दिली. या धडकी मुळे बिबट्या देखील एका बाजूला पडला तर विशाल वायदंडे व त्याच्या आई अलका वायदंडे या एका बाजूला पडल्या बिबट्या लगेच शेजारील झुडपात निघून गेला. गाडीवरून पडल्यामुळे विशाल व अलका यांना मार लागल्यामुळे ते साखर कामगार रुग्णालयात दाखल झाले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिबट्याची धडक बसून देखील दोघे सुखरूप आहेत याबद्दल दोघाही मायलेकांनी देवाचे आभार मानले.

कोपरगाव ( गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा Xpress खो-खो संमिश्र लीग २०२५ स्पर्धेला शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सुरुवात होणार आहे. कोपरगाव, संगमनेर, येवला आणि अहिल्यानगर येथून आलेल्या १३ संघांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण १८ सामने रंगणार आहेत.

शारदा स्पार्टनचे कर्णधार फरहान शेख आणि उपकर्णधार तन्वी देवकर, शारदा Xpress संघाचे जय शिंदे आणि श्रेया वाघ, शारदा महारथीचे सरस ठोळे आणि अनुष्का देवकर, शारदा शूरवीरचे अमित बोरनारे आणि श्रद्धा ठेके, शारदा बाजीराव संघाचे श्रेयस अनाड आणि श्रद्धा कालेकर अशी शारदा परिवारातील पाच संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

शहराबाहेरील सहभागी संघांमध्ये आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल संगमनेरचे तेजस रोकडे आणि किरण पथवे, राधिका इंग्लिश मीडियम स्कूल येवल्याचे ओम भंडारी आणि स्वरा पानमळे, नूतन माध्यमिक विद्यालय राजापूर संगमनेरचे राजवीर पवार आणि कावेरी मोरे, दिग्विजय क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ अहिल्यानगरचे जयदत्त गाडेकर आणि श्रावणी थोरात, आत्मा मालिक कोकणठाणचे निलेश तडवी आणि मनीषा वाळवी, सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडीचे अभिजीत पवार आणि प्रीती अहिरे, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगावचे सार्थक कुलकर्णी आणि अन्वी परजणे तसेच सोमैया विद्यामंदिर साखरवाडीचे ओम शिंदे आणि अनुष्का भाकरे यांचा सहभाग आहे.स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, युवा उद्योजक मनोज नगरकर, संकेत पारखे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर, सचिव अनुप गिरमे, पंच समिती प्रमुख अण्णासाहेब रतन गोपाल,अजित कदम, गणेश वाघ,बाळासाहेब शेळके, अनिल तेलगट,भीमाशंकर औताडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.स्पर्धेच्या तांत्रिक बाबतीत दिग्विजय भोरे,जयदीप दरंगे व जिशान इनामदार कार्यरत राहणार आहेत.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागाची संधी मिळणार असून नेतृत्व, संघभावना आणि स्पर्धेची चुणूक यांचे उत्तम दर्शन घडणार आहे.

बेलापूरात काही महिन्यांपूर्वी बेलापूरच्या कोल्हार चौकात एटीएम फोडून धुमाकूळ घालणारे आरोपी पुन्हा बेलापुरात सक्रिय झाल्याचे पाहून स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सतर्क पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, जीव मुठीत धरून या संशयितांचा थरारक पाठलाग केला.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुज्ञ नागरिक यांनी नंदकिशोर लोखंडे यांना बाजारात एक संशयित निळ्या रंगाची मारुती ८०० गाडी उभी असल्याची माहिती दिली. तात्काळ नंदकिशोर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा दरवाजा वाजवला. मात्र, पोलिसांना पाहताच संशयितांनी गाडी भरधाव वेगाने पळवून नेली. पेठेतून झेंडा चौक मार्गे पडेगावच्या दिशेने आरोपी फरार झाले.


​या घटनेची माहिती मिळताच, नंदकिशोर लोखंडे यांनी भारत तमनर यांना फोन करून संशयितांचा पाठलाग करण्यास सांगितले. तात्काळ भारत तमनर आणि पंकज सानप यांनी सरकारी गाडीतून, तर जाधव साहेब आणि कोळपे दादा यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून संशयितांचा पाठलाग सुरू केला. नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात हे देखील त्यांच्या गाडीतून पाठलागात सहभागी झाले.

​पोलिसांच्या या थरारक पाठलागादरम्यान, भरधाव वेगाने पळणाऱ्या निळ्या रंगाच्या मारुती ८०० गाडीचा लाडगाव रेल्वे चौकीजवळ ताबा सुटला आणि ती पलटी झाली. या अपघातात गाडीतील तीनही संशयित जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पलटी झालेली गाडी बेलापूर आऊटपोस्ट येथे आणण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

​पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे बेलापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)-संत सावता महाराज म्हणजे प्रेमाचे प्रतीक असून त्यांचे प्रेरणादायी चरित्र तरुण पिढीने अभ्यासणे आवश्यक आहे असे संमत हरिभक्त परायण अनिल महाराज महांकाळे यांनी व्यक्त केले .              संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काल्याच्या कीर्तनात ह.भ . प. अनिल महाराज महांकाळे बोलत होते   श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ह भ प अनिल महाराज महांकाळे म्हणाले  की प्रत्येकाने आपले कर्म करताना आपल्या कर्माशी प्रामाणिक असले पाहिजे. आज समाजात वाढत असलेली अराजकता ही चिंतेची बाब आहे समाजाला योग्य दिशा देण्याकरता संत सावता महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. संकटाला घाबरून आत्महत्या करू नका नैराश आले तरी चुकीचा मार्ग निवडू नका आपल्या कामाला भक्तिमार्गाची जोड द्या जिवन अधिक सुखकर होईल असेही ते म्हणाले . प्रारंभी गावातून संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी अनेकांनी आपल्या घरापुढे सडा रांगोळी काढली होती मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर अनेक मान्यवरांनी श्री संत सावता महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ही महाराजांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीते साठी हे भ प मयुर महाराज बाजारे, ह भ प कृष्णा महाराज शिरसाठ, संजय महाराज शिरसाठ,जालिंदर कुर्हे, विलास मेहत्रे, प्रकाश कुऱ्हे ,राजेंद्र टेकाडे ,राजेंद्र सातभाई ,अशोक महाराज शिरसाठ, बबन महाराज अनाप, साईनाथ महाराज शिरसाठ, चांगदेव मेहेत्रे, अर्जुन कुर्हे, मधुकर अनाप , तुकाराम मेहेत्रे, गोरक्षनाथ कुर्हे ,सोमनाथ शिरसाठ सचिन नगरकर संदीप कुर्हे, महेश कुऱ्हे केशव कुर्ते, रमेश लगे, चंद्रकांत रासकर, संदीप कुऱ्हे ,वैभव कुरे ,अमोल मेहेत्रे ,रवी मेहेत्रे, भैय्या शिरसाठ, कान्हा लगे ,बाळासाहेब टेकाडे ,ज्ञानेश्वर शिरसाठ, दादा कुऱ्हे, तुकाराम मेहेत्रे,शरद गायकवाड ,अशोक कुर्हे, विशाल मेहत्रे बबलू कुर्हे भाऊसाहेब लगे तुषार जेजुरकर कार्तिक मेहत्रे किरण कुर्हे सागर कुर्हे चेतन कुर्हे सौरभ लगे अशोक दुधाळ अमोल आनाप अच्युत कुर्हे प्रफुल्ल कुर्हे योगेश कुर्हे बाळासाहेब टेकाळे सागर कुर्हे प्रकाश दुधाळ अनिल कुर्हे गौरव कुर्हे आदींनी विशेष प्रयत्न केले

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): शब्दांची ताकद काय असते, हे दाखवून देणारी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा कोपरगाव येथे पार पडली. सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे पाचवे पर्व होते.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील – नाशिक, श्रीरामपूर, येवला, निफाड, संभाजीनगर, प्रवरानगर, शिर्डी आदी परिसरातील ३५ शाळांमधील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मंचावर उभा राहून विचार व्यक्त करताना प्रत्येक वक्त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची झळाळी दिसून येत होती. भाषणात त्यांनी समाज, शिक्षण, संविधान, स्त्री सक्षमीकरण, शिवरायांचे राष्ट्रनिर्माण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील माणुसकी आणि नवभारताचे स्वप्न अशा अनेक विषयांवर प्रभावी मांडणी केली.छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक वारसा, शिवरायांची आदर्श नेतृत्वशैली, स्त्री शक्तीचा जागर – या सर्व विषयांवर भाष्य करताना विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा जिंकण्याचे नाही, तर विचार प्रबळ करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांच्या वक्तृत्वशैलीत ओघवती भाषा, भावनिक आविष्कार आणि समाजप्रबोधनाचा प्रगल्भ दृष्टीकोन स्पष्टपणे दिसून येत होता.स्पर्धेचे उद्घाटन प्रा. अमोल चिने यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,पालक संघाचे उपाध्यक्ष रामदास खरात आणि काशिनाथ दामोदर लव्हावाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परीक्षक म्हणून सुमित डेंगळे (इतिहास अभ्यासक),ॲड. प्रवीण जमदाडे आणि प्राचार्या सुनीता हिंगडे यांनी अतिशय पारदर्शक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मूल्यांकन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, तसेच मराठी विभागप्रमुख बी. के. तुरकणे आणि शिक्षकांनी अतुलनीय परिश्रम घेतले.

या स्पर्धेत श्रीराम अकॅडमी, श्रीरामपूरने प्रथम क्रमांक पटकावला. श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगावने द्वितीय क्रमांक तर संत विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, अहिल्यानगरने तृतीय क्रमांक पटकावला. त्याशिवाय सेंट मोनिका स्कूल, बी. आर. खटोड कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, आत्मा मलिक स्कूल, श्री साईबाबा कन्या विद्यालय यांसह इतर शाळांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नव्हता, तर नव्या पिढीच्या मनात विचारांची मशाल पेटवणारा एक संस्कार सोहळा ठरला. वक्त्यांच्या ओघवत्या भाषणांनी उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली. विचारशक्ती, आत्मविश्वास, आणि नेतृत्वगुण यांचे अद्वितीय दर्शन घडवणाऱ्या या मंचाने विद्यार्थ्यांच्या मनात भाषेचे, विचारांचे आणि संस्कृतीचे बीज रुजवले. कोपरगावने पुन्हा एकदा राज्य पातळीवर शिक्षण आणि साहित्य यांचे तेज झळकावले,हे निश्चित.

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला पायी चालत जातात. पालखीच्या मुक्कामी वारकऱ्यांना सुविधा नसल्याने उघड्यावर शौचाला जावे लागत होते. ज्यामुळे अस्वच्छता व्हायची. यावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेने पुढाकार घेत निर्मल वारीला सुरवात केली. महाराष्ट्राची सांस्कृतीक परंपरा असलेली ही वारी सुखरूप पार पडावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि ज्या गावातून वारी जाते तिथे अनारोग्य होऊ नये. यासाठी २०१५ पासून निर्मल वारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेकडो वर्षे हिंदुत्वाची अनेक स्थित्यंतरे पाहत वारकरी पंढरीची वारी नित्यनेमाने करतो आहे. आधुनिक काळात आता वारी खऱ्या अर्थाने भौतिकदृष्ट्या निर्मल झाली आहे..!


विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसोबत राज्य शासनाने २६५ फिरते शौचालय उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या व्यवस्थापनाचे, स्वच्छतेचे, वापराचे नियोजन, तसेच वारकऱ्यांच्या प्रबोधनाचे नियोजन सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक गेली १० वर्षे अव्याहतपणे करत आहे. वारीचा प्रवास स्वच्छ व निर्मल करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येत हा उपक्रम सुरू केला. ज्याला आता राज्य शासनाची आणि समाजातील विविध संस्थांची मोठी साथ मिळत आहे. दरवर्षी वारी अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी होत चालली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पसरणारे अनारोग्य जवळपास नष्टच झाले आहे.” मागील १० वर्षात वारीमध्ये उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत घटल्याचे जाधव यांनी सांगितले. नियमित वारी करणारे वारकरी शौचालयाचा वापर करत असून, दींडी चालक आणि स्थानिक नागरिकांकडूनही शौचालयाचा आग्रह होत आहे. ज्याला वारकऱ्यांचाही सकात्मक प्रतिसाद लाभत असून विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये आदित्य एंटरप्राइजेस या कंपनीकडून तसेच या कंपनीचे संचालक विक्रम मोरे यांच्या माध्यमातून शौचालयाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये कुठल्याही वारकऱ्याला गैरसोईचा सामना करावा लागला नाही..!

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget