Latest Post

बेलापूरःजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे समवेत उपमुख्यकारी अधिकारी  दादाभाऊ गुंजाळ यांनी बेलापूर गावाला भेट देवून मानाच्या निवृत्तीनाथ महाराज यांचे  दिंडीचे नियोजना संदर्भात जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली.                                                       निवृत्तीनाथ महाराज यांची ञंबकेश्वर येथून पंढरपूरला जाणारी दिंडी बेलापूरच्या भानुदास महाराज हिरवे यांनी ३५० वर्षांपूर्वी  सुरु केली.त्यामुळे सदरची दिंडी हि बेलापूर येथे मुक्कामी असते. ज्यांनी दिंडी परंपरा सुरु केली त्या भानुदास महाराज हिरवे  यांच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामाला राहून दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ होते.                                                                                             निवृत्तीनाथांची दिंंडी आणि बेलापूरचे दृढ संबंध लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ,गटविकास अधिकारी प्रविण सिनारे,सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के,विस्तार अधिकारी विजय चराटे,दिनकर ठाकरे यांनी जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांचेशी दिंडीचे नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी विष्णुपंत डावरे,दिलिप काळे,राजेंद्र लखोटिया,राजेंद्र कर्पे,किरण गंगवाल,संदीप देसर्डा ,जितेन्द्र संचेती,राज गुडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

बेलापूरःराज्याचे जलसंपदामंञी तथा  जिल्ह्याचे पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर ग्रामपंचायतीचा  वृक्ष  वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे.प्रत्येकाने आपला वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा करावा असे आवाहन सौ.धनश्री सुजय विखे पा.यांनी केले.                                                                                           अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाम.श्री.विखे पा.यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण वा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे आवाहन केले होते.त्यास प्रतिसाद देत बेलापूर ग्रामपंचायत,सत्यमेव जयते ग्रुप तसेच बेलापूर-ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सौ.धनश्री विखे पा.बोलत होत्या.सदर कार्यक्रमात वड,पिंपळ,आंबा,टिकोमा,सप्तपर्णी,लिंब,स्पॕथोडीया,बकुळ अशा २००० हजार वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.                                       प्रास्ताविकात श्री.अभिषेक खंडागळे म्हणाले की,बेलापूर-ऐनतपूर  गावांच्या विकासात नाम.श्री.विखे पा.यांचे सततचे व  मोलाचे योगदान आहे. १२६ कोटीची पाणीपुरवठा योजना,साठवण तलाव,घरकुले,विविध समाज घटकांची स्मशानभुमी,क्रिडांगण,सेंद्रिय खत प्रकल्प इत्यादी कामांसाठी नाम.श्री.विखे यांनी ४३ एकर जमिन ग्रामपंचायतीस मोफत दिली आहे.याशिवाय नुकतेच १००१ घरकुलांनाही मंजुरी मिळवून दिली आहे. यात डाॕ.सुजय विखे पा.यांचेही सतत सहकार्य लाभले.                               कार्यक्रमास भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे,बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने,भाऊसाहेब बांद्रे,डाॕ.शंकर मुठे,रामराव शेटे,सरपंच मिना साळवी,उपसरपंच प्रियंका कु-हे,सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,जालिंदर कुऱ्हे, रणजित श्रीगोड, अँड.अरविंद साळवी,देविदास देसाई,प्रफुल्ल डावरे,भास्करराव खंडागळे,विष्णुपंत डावरे,भाऊसाहेब कुताळ, साहेबराव मोकाशी,  अरविंद साळवी,शफिक बागवान, सुभाष अमोलिक,बाळासाहेब दाणी, गोरक्षनाथ कुऱ्हे,जनार्दन ओहोळ भाऊसाहेब कुडाळ ,प्रभात कुऱ्हे,विशाल आंबेकर,रमेश काळे,सचिन वाघ, भाऊसाहेब तेलोरे,मोहसीन सय्यद, मोकाशी दादा बंटी शेलार, श्रीहरी बारहाते महेश कुऱ्हे,  सुधीर तेलोरे, गोपी दाणी,आदित्य शेटे, दीपक क्षत्रिय, शफीक आतार, आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


बेलापूरःनागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी तातडीने मिळणे आवश्यक आहे.यादृष्टिने शासकीय योजनांचा लाभ निर्धारित वेळेत मिळावा तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण व्हावा या हेतूने छञपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.आशाप्रकारच्या शिबिरांचे प्रत्येक महसूल मंडलात आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डाॕ.पंकज आशिया यांनी केले.                                               महसूल व वन विभाग तसेच बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथे आयोजित छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना जिल्हाधिकारी बोलत होते.याप्रसंगी  उपविभागीय महसूल अधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,नायब तहसीलदार बी.बी.गोसावी,श्री.शेकटकर, श्रीमती निर्मला नाईक,जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच मिना साळवी,उपसरपंच प्रियंका कु-हे,रामराव शेटे,मंडलाधिकारी सर्वश्री विठ्ठल गवारी,सुशीम ओहोळ,तलाठी सर्वश्री राजेश घोरपडे,अक्षय जोशी,श्रीमती सुवर्णा शिंदे,शिल्पा राणे,वर्षा कातोरे, हिमालय डमाळे,अशोक थोरात,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे कोतवाल सुनिल बारहाते नंदू बोंबले अरुण अमोलीक ज्ञानेश्वर भांड संतोष पारखे दिपक बेल्हेकर  उपस्थित होते.                                  सदर शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॕ.आशिया यांचे हस्ते नागरिकांना सेतू कार्यालयाकडील  जातीचे दाखले,संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपञ,पुरवठा विभागाकडील आॕन लाईन पध्दतीचे रेशन कार्ड,ग्रामपंचायत वतीने मृत्यु दाखला, कृषी विभागाकडून खत गोणी,गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरी पञ,ग्राममहसूल अधिकारी कार्यालयाकडील हयातीचा दाखाला आदिं प्रदान करण्यात आले.देविदास देसाई,विष्णुपंत डावरे यांनी सूञसंचलन केले.                                               दिवसभर चाललेल्या महाराजस्व शिबिरात उपस्थितांना विविध शासकीय योजनांचे दाखले, ऑनलाइन रेशन कार्ड,शासकिय प्रमाणपञे,ग्रामपंचायत दाखले अपघात विमा मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले.शिबिरास बेलापूर महसूल मंडलातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.शिबिरस्थानी विविध महिला बचत गटांनी खाद्यपदार्थ,मसाले आदि उत्पादनांचे स्टाॕल लावले होते.शिबिरास भास्कर खंडागळे,  मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,हाजी इस्माईल शेख,मारुतराव राशिनकर, अॕड.अरविंद साळवी,भैय्या शेख,जाकीर शेख,बाबालाल पठाण,महेश कु-हे,प्रभात कु-हे,बाबुराव पवार,चंद्रकांत नाईक, मिलिंद दुधाळ,प्रकाश कु-हे,गणेश बंगाळ,रावसाहेब गाढे,विशाल आंबेकर ,भाऊसाहेब तेलोरे,इस्माइल आतार आदिंसह बचत गटाच्या महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी दिल्ली(गौरव डेंगळे): भारतीय शालेय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल अशी ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. School Games Federation of India (SGFI) च्या या ऐतिहासिक सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील सुपुत्र पार्थ दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ही सभा यशस्वी झाली. आपल्या कार्यकुशलतेने व दूरदृष्टीने पार्थ दोशी यांनी महाराष्ट्राचा व देशाचा गौरव उंचावला आहे.


महाराष्ट्राचा सुपुत्र राष्ट्रीय पातळीवर चमकला!!!



सुमारे आठ महिन्यांपूर्वी पार्थ दोशी यांची SGFI च्या कार्यकारी अधिकारी (Executive Officer) पदावर निवड झाली. केवळ अल्पावधीतच त्यांनी महासंघाच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवत महासंघाला नव्या यशशिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वात SGFI ने शालेय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि खेळाडू केंद्रित धोरणे राबवली आहेत.


ऐतिहासिक सामंजस्य करार — निधी संकलनास नवे वळण!!!


SGFI च्या अध्यक्ष श्री. दीपक कुमार (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पार्थ दोशी यांच्या सक्रिय सहभागातून महासंघाने निधी संकलनासाठी शशक्त डेव्हलपमेंट अँड एम्पावरमेंट फाउंडेशन बरोबर ऐतिहासिक MoU केला आहे. या करारामुळे देशातील नामांकित कंपन्यांच्या CSR प्रकल्पांमधून आणि विविध प्रायोजकांकडून महासंघाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या करारानंतर प्रतिकात्मक स्वरूपात ₹१० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, जो महासंघाच्या शाश्वत विकासाचा नवा अध्याय ठरला आहे.


डिजिटायझेशनद्वारे कार्यपद्धतीत क्रांती!!!


पार्थ दोशी यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नोंदणी व पात्रता तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता आणली आहे. आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ओळख प्रणालीमुळे खेळाडूंची खरी पात्रता सहज निश्चित होणार असून अपात्रतेला पूर्णविराम मिळणार आहे. यामुळे महासंघाच्या कामकाजात विश्वासार्हता, गती आणि सुरक्षितता यामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.


राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना अधिक सुविधा!!!


राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळाडूंना दर्जेदार सुविधा व उत्तम वातावरण मिळावे यासाठी महासंघाने आयोजकांना वित्तीय सहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चांगली निवास व्यवस्था, दर्जेदार आहार, उत्तम मैदान व अन्य सुविधा या सहाय्यामुळे उपलब्ध होतील. यामुळे स्पर्धकांच्या कामगिरीत निश्चितच सकारात्मक बदल दिसून येतील.


पार्थ दोशी यांची दूरदृष्टी आणि कार्यतत्परता कौतुकास्पद!!!


पार्थ दोशी यांनी केवळ महासंघाच्या यशासाठीच नव्हे तर देशातील लाखो शालेय खेळाडूंना दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न सुरू ठेवले आहेत. देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.


"शालेय पातळीवरूनच खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा व प्रोत्साहन मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. शाळा हीच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारी पहिली प्रयोगशाळा आहे," असे पार्थ दोशी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.


महाराष्ट्राचा अभिमान — श्रीरामपूरचे भूषण!!!


पार्थ दोशी यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः श्रीरामपूरमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांच्या यशाची दखल विविध क्रीडा संघटना, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व नागरिकांकडून घेतली जात आहे. युवकांनी पार्थ दोशी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन अनेकांनी केले आहे.


🌟 "पार्थ दोशी यांच्यासारख्या तळमळीच्या नेतृत्वामुळेच भारत शालेय क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडवू शकतो."

गौरव डेंगळे/ पुणे/ ८ जून: सेंट्रल एशियन व्हॉलिबॉल चॅम्पियनशिप २०२५ (उजबेगिस्तान) या स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील भारतीय पुरुष व्हॉलिबॉल संघात पुण्याचा अलोक मनोज तोडकर याची निवड झाली आहे. केवळ १६ वर्षांचा असलेला अलोक पुरुष गटात लिब्रो म्हणून निवड होणारा महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला आहे, ही बाब महाराष्ट्रासाठी आणि पुण्यासाठी अत्यंत गौरवाची आहे.

अलोकने यापूर्वी दोन वेळा भारतीय संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले होते,मात्र अंतिम संघात निवड होणे हुकले होते.परंतु त्या अपयशाला न जुमानता त्याने सातत्यपूर्ण मेहनत,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात प्रभावी कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

अलोक वयाच्या चौथ्या वर्षापासून पैलवान अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन येथे नियमित सराव करत आहे.लहानपणापासून त्याने या क्लबच्या वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघाच्या सराव शिबिरात स्थान मिळवताना पाहिले आणि त्याच प्रेरणेतून तोही भारतीय संघात स्थान मिळवण्याचा निर्धार करत सरावात गुंतला.

या यशामागे फाउंडेशनचे प्रशिक्षक डॉ. संतोष पवार, रोहित मालेगावकर,संदीप भोसले,तसेच संस्थेचे आधारस्तंभ मा.अप्पासाहेब रेणुसे व अमोल बुचडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.अलोकच्या घडणीत प्रीतम जाधव,योगेश कुत्रेह, सुयश पवार,गौरव ब्रम्हे, आदित्य कुडपणे,केशव गायकवाड या वरिष्ठ खेळाडूंचाही मोलाचा वाटा आहे.

अलोकच्या या अभूतपूर्व निवडीबद्दल त्याला शुभेच्छा देण्यासाठी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ मा. पार्थ दोशी,MVA सचिव विरल शाह,

प्राचार्य डॉ. स्वप्नील विधाते, श्री. शिवाजी कोळी, उपाध्यक्ष भास्कर बुचडे,रेल्वे संघाचे प्रशिक्षक अमेय कुलकर्णी,राष्ट्रीय प्रशिक्षक कुलदीप कोंडे,शिवाजी जाधव आदी मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

श्रीरामपूर  : महाराष्ट्र शासन व प्रशासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार  स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग  करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. राज्यातील 13 जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मोठा गाजावाजा करून 1 मे 2025 रोजी सुरू करण्यात आले.परंतु कुठल्याही स्वरूपाचे अधिकार प्रायोगिक तत्वावर  सुरू करण्यात आलेल्या 13 जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नव्हते.त्यामुळे तातडीने मंत्रालय व आयुक्त कार्यालाकडे पाठपुरावा करून डी.डि.ओ कोड प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अशी माहिती संजय साळवे अध्यक्ष जिल्हा दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी दिली.

          दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, जीपीएफ,मेडिकल बीले,सेवानिवृत्त कर्मचारी व त्या अनुषंगाने सर्व कामे प्रलंबित होते  ती सर्व मार्गी लागेल.त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या योजना देखील कार्यान्वित होतील.  

         संघटनेने व नासिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री मा.अतुल सावे यांनी तातडीने दखल घेतली. त्यानुसार 4 जून 2025 रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव भा.रा.गायकवाड यांनी तातडीने आदेश निर्गमित केले. दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव मा.भा. रा.गायकवाड यांनी 4 जून 2025 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे.दि. 6 जून 2025 रोजी दिव्यांग  कल्याण विभागाचे आयुक्त यांनी 13 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्वरित अहवाल  पाठविण्याचे आदेश दिले आहे.

         सदर आदेशामुळे 13 जिल्ह्यातील कर्मचारी व दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेआहे.दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहिल्यानगर यांचे सर्वांनी विशेष आभार मानले. आहे.याकरिता संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे,उपाध्यक्ष चांगदेव खेमनर,खजिनदार प्रदीप भोसले,श्रीरामपूर मूकबधिर  विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी,नागनाथ शेटकर,रमेश टिक्कल,ज्ञानदेव जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

अहिल्यानगर,(४ जून/गौरव डेंगळे):

अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांवरील वयोगटासाठी भव्य जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धा दिनांक ६ व ७ जून २०२५ रोजी दोन प्रमुख ठिकाणी पार पडणार आहेत — कराळे हेल्थ क्लब, सावेडी आणि वाडिया पार्क क्रीडा संकुल, अहिल्यानगर.


स्पर्धेतील खेळ प्रकार:


या उत्सवामध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि पोहणे (स्विमिंग) या प्रमुख खेळांचा समावेश असून, खेळाडूंमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.


स्पर्धेतील सहभागी संघ:


ही स्पर्धा चार संघांमध्ये खेळवली जाणार आहे. त्या संघांची नावे आणि प्रमुख खेळाडू पुढीलप्रमाणे:



🟢 रायगड किंग्स


प्रमुख खेळाडू:

सतीश गायकवाड, घनश्याम सानप, प्रमोद आठवाल, शैलेश गवळी, कृष्णा लांडे, प्रशांत गंधे, बंटी गुंजाळ, सतीश झेंडे, विजुभाऊ मिस्कीन, पुरोहित सर, अजय पवार, संतोष घोरपडे, सचिन तिवारी, वैभव पवार



🔵 राजगड कॅपिटल


प्रमुख खेळाडू:

संदेश भागवत, संतोष ठाणगे, विल्सन फिलिप्स, अनिल भापकर, सचिन पठारे, डेविड माकासरे, किशोर गांधी, गणेश तलवारे, सोमानी सर, संतोष वाबळे, शब्बीर सर, प्रशांत कोळपकर, जयंत जाधव, संतोष गाडे



🔴 प्रतापगड वॉरियर्स


प्रमुख खेळाडू:

डॉ. विजय म्हस्के, विशाल गर्जे, मोहित भगत, रामेश्वर सर, रोनक फर्नांडिस, दिनेश भालेराव, निलेश मदने, संजय साठे, विजय पवार, कुलकर्णी सर, शंतनू पांडव, महेश पटेकर, सचिन जावळे, प्रशांत निमसे, विनायक भूतकर



🟡 सिंहगड लायन्स


प्रमुख खेळाडू:

सुनील गोडळकर, विकास परदेशी, संजय पाटील, मुकुंद काशीद, योगेश चव्हाण, ज्ञानेश्वर खुरांगे, अविनाश काळे, प्रदीप पाटोळे, कल्पेश भागवत, अजय बारगळ, सचिन सप्रे, प्रवीण कोंडावळे, दिनेश मोरे, हेमंत कुलकर्णी, सचिन गायकवाड



पंचमंडळी (रेफरीज):


या स्पर्धेसाठी पंच म्हणून मनीष राठोड, अमित चव्हाण, शदाब मोमीन आणि हर्षल काशीद हे जबाबदारी पार पाडणार आहेत.



ही स्पर्धा का खास?


४० वर्षांवरील वयोगटातील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानी स्पर्धेचा अनुभव मिळणार आहे.


फिटनेस, खेळातील शिस्त, सामाजिक स्नेह यांचा संगम असलेली ही स्पर्धा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.


निवृत्तीनंतरही सक्रिय राहण्यासाठी प्रेरणा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम!


उद्घाटन व समारोप:


या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन व समारोप सोहळे प्रमुख क्रीडा अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्हे व संघांना सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा एक प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण निर्माण करणार असून, वयोमानानुसारही 'खेळ भावना' अमर आहे हे दाखवून देणारी ठरेल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget