Latest Post

कोपरगांव (गौरव डेंगळे):वयाच्या ५५ व्या वर्षी सोमैय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम डियम स्कूलचे मराठी विभाग प्रमुख बी के तुरकणे कळसुबाई शिखर सर केले.

कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेत राज्यातील सर्वात उंच शिखर असून, समुद्रसपाटीपासून त्याची उंची १६४६ मी. इतकी आहे. शिखरावर चढाई करण्यास कठीण वाट आहे.अशा खडतर मार्गाने तुरकणे या ५५ वर्षाच्या ज्येष्ठ शिक्षकाने २ तास ४२ मिनिटांत कळसुबाई शिखर सर केले.याआधीही त्यांनी ब्रह्मगिरी, शिवनेरी, देवगिरी किल्ले सर केले असून, लहान वयात ट्रेकिंगची त्यांना आवड असून, जिद्दीने शिखर चढाई करतात. त्यांना योगाची ही आवड आहे.रोज सकाळी ते नियमित २१ सूर्यनमस्कार देखील करतात. त्यांच्या या यशस्वी कळसुबाई शिखर चढाई बद्दल त्यांचे शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे,सौ नथलीन फर्नांडिस तसेच शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

गौरव डेंगळे (२९/७) :भारतीय नेमबाज मनू भाकरनं इतिहास रचला आहे. मनूनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं.भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज आहे. मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. तिनं शेवटच्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदार्पण केलं होतं, परंतु १० मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत तिचं पिस्तूल खराब झालं. यामुळे तिला मागच्या वेळी पदक जिंकता आलं नव्हतं.मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २२१.७ गुणांसह कांस्यपदक जिंकलं. अंतिम फेरीत मनूनं सुरुवातीपासून तिसरं स्थान कायम राखलं. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदकं दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी जिंकली. ओ ये जिननं २४३.२ गुणांसह सुवर्णपदक जिंकलं तर किम येजीनं २४१.३ गुणांसह रौप्य पदक जिंकलं.मनू भाकरनं पात्रता फेरीतही तिसरं स्थान पटकावले होतं. नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. यासह तिनं नेमबाजीत भारताचा १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपवला. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदकं जिंकली होती.

२२ वर्षीय मनू भाकरनं पॅरिस २०२४ ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला आहे.२१ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव ॲथलीट आहे जी इतक्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे.२०२३ आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात पाचव्या स्थानावर राहून मनूनं भारतासाठी पॅरिस २०२४ ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मनू भाकर ही सर्वात तरुण भारतीय आहे. गोल्ड कोस्ट २०१८ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ती कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन देखील आहे.

हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरनं शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय तिनं ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेतला, ज्यातं तीनं राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. बॉक्सिंगदरम्यान मनूच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला. पण मनूला खेळाची वेगळी आवड होती, त्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली.रिओ ऑलिम्पिक २०१६ नुकतंच संपलं असताना मनूनं वयाच्या १४ व्या वर्षी नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आठवडाभरात तिनं वडिलांना शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं. यानंतर वडील राम किशन भाकर यांनी तिला बंदूक विकत घेऊन दिली. याच निर्णयानं मनू भाकरला ऑलिम्पियन बनवलं.

सर्व्हअर तातडीने दुरूस्ती करा अन्यथा काम बंद अंदोलन छेडणार - देसाई

मागण्या वरीष्ठांना कळविल्या, सर्व्हअर तातडीने सुरळीत होईल - मिलींदकुमार वाघ भोकर(वार्ताहर) - सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानच्या ई पॉझ मशीनचे सर्व्हअर तातडीने दुरूस्ती करा, धान्य वितरणास मुदत वाढ द्या, गेल्या चार महिण्यांपासूनचे थकीत कमीशन द्या अन्यथा कुठलीही पुर्व सुचना न देता काम बंद अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांना संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या महिण्यापासून मोफत धान्य लाभार्थी रेशनकार्ड धारकांच्या प्रत्येक सदस्याचे याच ई पॉझ मशीनवर ई के वाय सी करण्याचे आदेश आले त्याप्रमाणे कामकाजास सुरूवात झाली अन् ई पॉझ मशीन बाबतच्या तक्रारी सुरू झाल्या. ई के वाय सी करताना अनेकदा मशीन रिस्टार्ट होत आहे. अनेकदा सवर्हअर डावून होत आहे. लाभार्थीचा थम्स आला नाही तर प्रत्येक थम्सच्या वेळी आधार क्रमांक टाकावा लागत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपुर्वी आलेल्या नवीन व्हर्जन मध्ये प्रत्येक वेळी पासवर्ड टाकावा लागत आहे, प्रत्यक्षात जेथे दुकानदारांचा व लाभार्थींचा थम्स असतो तेथे पासवर्ड ची गरज नसताना केवळ मानसिक त्रास देण्यासाठी हा पासवर्ड टाकल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

गेल्या महिण्यातील सर्व्हअरच्या तक्रारीरींच्या तुलनेत या महिण्यात सर्व्हअरच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने धान्य वितरणास हि मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात गेल्या चार दिवसांपासून सर्व्हअर डावून मुळे हि यंत्रणाच कोलमडली आहे. दररोज दुकानदार दुकान उघडून बसत आहेत पण या सर्व्हअरच्या अडचणीमुळे लाभार्थी धान्यासाठी व ई के वाय सी करीता दुकानात चकरा मारत आहेत. पर्यायाने दुकानदार अन् लाभार्थीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहेत. या ई के वाय सी व धान्यासाठी अनेक लाभार्थींना आपल्या रोजंदारीला मुकावे लागत आहेत. पर्यायाने दुकानदार व लाभार्थीमध्ये हा वादाचा मुद्दा ठरत आहे.

या सर्व अडचणी सोडविण्यासाठी श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दि. 3 जुलै रोजी यात दुरूस्ती करण्याची मागणीचे निवेदन दिलेले असताना या सर्व्हअरच्या अडचणी वाढल्याने संतप्त दुकानदारांनी आता या सर्व्हअरमध्ये तातडीने दुरूस्ती न झाल्यास कुठलीही पुर्व सुचना न देता काम बंद अंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. त्याच बरोबर सर्व्हअर अडचणीमुळे अनेक दुकानदारांचे धान्य वितरण शिल्लक असल्याने हे धान्य वितरणास ऑगष्ट पर्यंत मुदतवाढ द्यावी व गेल्या चार महिण्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांना कमीशन मिळालेले नाही ते त्वरीत दुकानदारांना अदा करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, शहराधयक्ष प्रकाश गदीया, मंगेश छतवाणी, आजीज शेख, जाकीर शेख, प्रेम छतवाणी, बाळासाहेब राठोड, चंद्रकांत गायकवाड, धनु झिरंगे, राजेंद्र वाघ आदिंसह तालुक्यातील दुकानदारांच्या सह्या आहेत.

ई पॉझ चे सर्व्हअर लवकरच सुरळीत होईल - तहसिलदार वाघ

सर्व्हअरच्या अडचणींसह दुकानदारांच्या सर्व अडचणी वरीष्ठांना कळविण्यात आल्या असून तातडीने सर्व्हअर दुरूस्तीच्या सुचना संबधीतांना देण्यात आल्या असून उर्वरीत अडचणी ही तातडीने सोडविण्यात येईल असे आश्वासन यावेळी तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांनी दिले.

सर्व्हअर तातडीने दुरूस्ती न झाल्यास ई पॉझ मशीन शासनाकडे जमा करणार - देसाई, पठाण

प्रत्यक्षात अनेकदा रेशनकार्डधारक कुटूंबातील सर्व सदस्यांसह रेशन दुकानात ई के वाय सी करण्यासाठी व धान्य घेण्यासाठी येतात त्यावेळी सर्व्हअर डावून असल्याने दुकानदार व कार्डधारकांत चांगलेच वाद होतात अशा वेळी कार्डधारक दुकानदारांना विनाकारण शिव्याशाप देत असल्याने दुकानदार ही या प्रकारे त्रस्त झालेला असल्याने आमच्या अडचणी तातडीने न सुटल्यास व तातडीने सर्व्हअर दुरूस्ती होवून वितरण सुरळीत न झाल्यास लवकरच जिल्ह्यातील सर्व दुकानदार हे ई पॉझ मशीन शसनाकडे जमा करणार असल्याचे इशारा जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई व जिल्हा सचीव रज्जाक पठाण यांनी दिला आहे.

सर्व्हअर अडचणी सोबत इतर अडचणींचे निवेदन तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांना देताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई समवेत चंद्रकांत झुरंगे, मंगेश छतवाणी, आजीज शेख, जाकीर शेख, प्रेम छतवाणी, बाळासाहेब राठोड आदिंसह दुकानदार दिसत आहेत.

👉 राज्यभरातून ७० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग!

कोपरगाव(गौरव डेंगळे)२३/७:सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दिनांक २३ जुलै २०२४ रोजी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपूण वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील ३५ शाळेतील ७० उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ उज्वला भोर प्राचार्या एस.एस.जी.एम.कॉलेज कोपरगाव होत्या.तर बक्षीस वितरण समारंभासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गोदावरी बायोरिफाइनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी शाळेचे प्राचार्य के.एल.वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नथलीन फर्नांडिस यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक योगेश शिंदे,विमल राठी,वृषाली कुलकर्णी हे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल शालेय व्यवस्थापन,माननीय प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

संत विवेकानंद इंग्लिश स्कूल, अहिल्यानगर ₹ ३,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, अकोले 

₹ २,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

प्रवरा कन्या विद्या मंदिर, लोणी  ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 सेंट जॉन् इंग्लिश मिडियम स्कूल,राहता

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण(स्पेशल सेमी)

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सहावे पारितोषिक*

आत्मा मालिक मिलेट्री स्कूल गुरुकुल, कोकमठाण.

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक*

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल कोऱ्हाळे 

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - राज्यभरातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभरात सुरू असून त्यासाठीचे फॉर्म भरून घेण्याचे काम सर्वत्र सुरू आहे.

श्रीरामपूर शहरात देखील नगरपालिकेने यासाठी जोरदार तयारी केली असून मेन रोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयातील आगाशे सभागृह येथे तसेच शहरातील सर्व नगरपालिका शाळा, संजय नगर भागातील मुळे शाळा व मिनी स्टेडियम मधील नगरपालिकेच्या उपकेंद्रात देखील या योजनेचे फॉर्म विनामूल्य भरून घेतले जात आहेत.

आगाशे सभागृहामध्ये नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील व पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी, वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रीमती स्वाती पुरे यांच्या देखरेखीखाली त्यांची संपूर्ण टीम सदर योजनेचे फॉर्म भरणे कामी अग्रेसर आहे.यामध्ये स्वतः स्वाती पुरे,सिद्धार्थ गवारे,स्वप्निल माळवे,विजय झिंगारे, राजेश जेधे,दिशा बोरकर,साक्षी अहिरे,पूजा क्षत्रिय, राजेंद्र बोरकर हे सर्व काम करीत आहेत. महिला वर्गाचे फॉर्म भरून घेऊन जागेवरच अपलोड केले जात आहेत. त्यासाठी आगाशे सभागृहामध्ये वायफाय व राऊटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आत्तापर्यंत या केंद्रावर 750 पेक्षा जास्त फॉर्म भरून झाले आहेत.शहरातील इतर केंद्रातील सर्व फॉर्म येथे जमा केले जात आहेत तसेच नगरपालिकेचे बालवाडी विभागातील कर्मचारी देखील घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत.खाजगी किंवा इतर ठिकाणी संगणकावर भरले जाणारे फॉर्म ची हार्ड कॉपी येथे जमा केली जात आहे. येणाऱ्या महिला भगिनींना अत्यंत चांगली सेवा येथे मिळत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

शहरामध्ये काही ठिकाणी पैसे घेऊन फॉर्म भरले जात आहेत त्यातही ओटीपी येत नसल्याने अनेकांना दोन दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. त्यापेक्षा नगरपालिकेच्या आगाशे सभागृहातील केंद्रावर मोठी टीम कार्यरत असून येथे मोफत फॉर्म भरले जात आहेत तसेच वायफाय सुविधा उपलब्ध असल्याने ओटीपी वगैरे सुद्धा पटकन येत आहेत.तरी शहरातील मुख्यमंत्र्यांच्या लाडके बहिणींनी या ठिकाणी येऊन आपले फॉर्म भरावेत तसेच समवेत अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आणावीत. जागेवर ती अपलोड केली जातात.या केंद्रावरील कर्मचारी स्वतः फॉर्म भरून घेत आहेत.तरी अद्याप भगिनींनी फॉर्म भरले नसतील त्यांनी ते त्वरित भरावेत. फॉर्म भरण्यासाठी येताना स्वतःचा मोबाईल सोबत आणावा असे आवाहन ग्रंथपाल स्वाती पुरे यांनी केले आहे.

बेलापूर :(प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील ग्रामस्थांनी गावठी दारु विक्रीस बंदी घातल्यानंतर दारुचे व्यसन लागलेले दारु पिण्यासाठी शेजारच्या गावात जात असुन दारु पिऊन येत असताना दोन दुचाकीची धडक होवुन एक जण गंभीर जखमी झाला आहे.       ही घटना काल रात्री घडली दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले कोल्हार-बेलापूर 

ररत्यावरील शिंदे वस्तीजवळ ही घटना घडली. 

    या अपघातातील पाच जणांना पुढील उपचारासाठी 108 मधून लोणी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी एकास शिर्डी येथे अतिदक्षता विभागात तसेच एकाला नगर येथे हलविण्यात आले.एकाच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर असल्याने संगमनेर येथे हलविण्यात आले.त्यांनतर पुढील उपचार घेतल्यांनतर त्यास घरी सोडून देण्यात आले.विशेष म्हणजे शुक्रवारी रात्री नऊ 

वाजेच्या सुमारास गावातील तीन जण एकाच 

दुचाकीवर गळनिब येथून दारु पिऊन घरी चालले 

होते.त्याबरोबर गावातीलच दोन जण गळनिबकडे दारु पिण्यासाठी चालले असता यांच्या दोन दुचाकीच्या समोरासमोर धडक झाली या अपघातात पाच गंभीर जखमी झाले.या अपघातातील दोन जण लोणी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते.दोन दुचाकीची धडक झाल्यानंतर  मोठा आवाज झाला त्या आवाजाने वस्तीवरील नागरीकांनी रस्त्याकडे धाव घेतली.रात्रीची वेळ असल्यामुळे 108 रुग्णवाहिकेला भ्रमणध्वनीवरुन माहिती देण्यात आली.काही वेळातच रुग्णवाहिका आल्यानंतर जखमीना त्वरित लोणी येथे पाठविण्यात आले.अपघातग्रस्त दुचाकी शिंदेवस्ती येथे लावण्यात आल्या असून पाच जणांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे.मात्र काही तरुण दुसऱ्या गावात दारू पिण्यासाठी जातात अन असे अपघात घडतात.यामुळे उक्कलगावाप्रमाणेच आसपासच्या गावातही दारुबंदी  व्हावी,अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश गवले (उपाध्यक्षपदी लांडगे व बनकर; सचिव लोखंडे, सहसचिव देसाई)श्रीरामपूर (प्रतिनिधी) राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश गवले , उपाध्यक्षपदी चंद्रकांत लांडगे व साईनाथ बनकर,सचिवपदी दिलीप लोखंडे, सहसचिवपदी देविदास देसाई आणि खजिनदारपदी अमोल कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, अशी माहिती परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.


परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेच्या श्रीरामपूर तालुका कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.


नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणुन सर्वश्री भाऊसाहेब काळे, बी. आर. चेडे, बापु नवले, भरत थोरात, दिपक क्षत्रिय, मयुर गव्हाणे आणि सचिन उघडे यांचा समावेश आहे. सल्लागारपदी सर्वश्री अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे,रविंद्र भागवत, महेश माळवे, विकास अंत्रे, शिवाजी पवार, बाळासाहेब आगे,

करण नवले, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 या निवडीप्रसंगी तालुक्यातील सर्वश्री अशोक अभंग,लालमहंमद जहागीरदार, महेश रक्ताटे,अमोल बोर्डे, दिलीप तांबे, विकास बोर्डे, प्रविण दरंदले,व्ही.डी.देवळालकर, दिलीप दायमा, अतिश देसर्डा, र्विश्वनाथ जाधव,आदी उपस्थित होते.


नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार  हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे, सह निमंत्रक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget