कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेत राज्यातील सर्वात उंच शिखर असून, समुद्रसपाटीपासून त्याची उंची १६४६ मी. इतकी आहे. शिखरावर चढाई करण्यास कठीण वाट आहे.अशा खडतर मार्गाने तुरकणे या ५५ वर्षाच्या ज्येष्ठ शिक्षकाने २ तास ४२ मिनिटांत कळसुबाई शिखर सर केले.याआधीही त्यांनी ब्रह्मगिरी, शिवनेरी, देवगिरी किल्ले सर केले असून, लहान वयात ट्रेकिंगची त्यांना आवड असून, जिद्दीने शिखर चढाई करतात. त्यांना योगाची ही आवड आहे.रोज सकाळी ते नियमित २१ सूर्यनमस्कार देखील करतात. त्यांच्या या यशस्वी कळसुबाई शिखर चढाई बद्दल त्यांचे शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे,सौ नथलीन फर्नांडिस तसेच शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
वारे वा पठ्ठ्या,वयाच्या ५५ वर्षी बी के तुरकणे यांनी केले कळसुबाई शिखर सर
कोपरगांव (गौरव डेंगळे):वयाच्या ५५ व्या वर्षी सोमैय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम डियम स्कूलचे मराठी विभाग प्रमुख बी के तुरकणे कळसुबाई शिखर सर केले.
Post a Comment