Latest Post

 रमजानुल मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर:-  ३० 

बुधवार दिनांक १०-०४-२०२४ 



!!  रोजा ३० : आत्मचिंतन - अवलोकनातुन ;-   सकारात्मक भविष्यासाठी स्वयंप्रेरणा ..!!


आज लैलतुल जायजा .. अर्थात" जायजा " म्हणजे अवलोकन " आज महीनाभर ठेवलेल्या रोजे( उपवास) चं आपण केलेल्या खडतर प्रवासाचं (अवलोकन) जायजा करणं . खरोखरच इमानेइतबारे केले असेल तर अल्लाह जवळ त्याचं बक्षीसाची मागणी करणं .अपण केलेल्या महिन्याभराच्या कष्टाचं परिक्षण करुन फळ देणं हे त्यांच्या हातात.

       कुठल्याही गोष्टीचे प्रशिक्षण घेणे यासाठी आवश्यक आहे की, त्यात पारंगत व्हावे आणि त्याअनुषंगाने कामे सोपे व्हावीत. आपण मुख्यत्वेकरून पाहतो, शिक्षण, आरोग्य, पोलिस प्रशासन, मिलिट्री, खाजगी संस्थांमध्ये आपल्या कर्मचार्‍यांच्या व्यक्तीमत्वात, कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून सदरच्या उमेदवाराची कार्यक्षमता तपासली जाते, त्याच्यात प्रशिक्षणातून होणार्‍या बदलाचे मूल्यमापन केले जाते आणि त्याची कार्यक्षमता वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जाता आणि त्यावरून त्याच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. 

असेच सर्वांगीण प्रशिक्षण वर्षाकाठी एक महिना ईश्‍वराने श्रद्धावंतांंसाठी रमजानुल मुबारक मध्ये ठेवले आहे. मित्रानों! रमजानमध्ये महिनाभर आम्ही रोजे ठेवले, कुरआन पठण केले, सर्व वाईट गोष्टीं- सवयी- व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले.  शक्य तितक्या उच्चकोटीच्या नैतिकतेला प्राधान्य दिले.  मित्रानों,हे काम अजून संपलेले नाही व नसतात देखील व हेच कार्य आम्हाला पुढील 11 अकरा महिने अमंलात आणायचे आहे.  इमान, नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामच्या मुलभूत पाच तत्वांपैकी आम्ही चार तत्वांना रमजामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याचा कसोशीने प्रयत्न केला . आपल्याला सत्यावर चालणारे आणि वाईटांपासून इतरांनाही दूर करणारे शिलेदार बनायचे आहे.   कुरआनमध्ये ईमानधारकांबद्दल असे सांगितले आहे की, “आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.”  (सुरह नंबर ३ आ.नं. ११०)

मित्रानों, या आयातीवरून समजते की, श्रद्धावंतांना संपूर्ण मानवकल्यासाठी अस्तित्वात आणले गेले आहेत , 

 रमजानच्या काळातील प्रखर प्रशिक्षणानंतर समजून येते की, आम्हाला ज्या अर्थी उन्हाचे चटके सहन करीत, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची कडक तंबी दिली गेली. काही काळापुरते वैध गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले गेले. उच्चकोटीचा संयम, धैर्य अंगी बाळगण्याचे मनोबल रमजानमध्ये मिळाले. मित्रानों, हे कठीण प्रशिक्षण ठराविक कालावधीत अर्थात संपूर्ण रमजान महिनाभर संपूर्ण जगात दिले गेले. यानंतर या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्याला सर्व मानवकल्याणाच्या हिताचे कार्य करायचे आहे. 

                दिव्य कुरआनच्या पुढे काय सांगते  ”हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे  आमंत्रित करा  मुत्सद्देगिरीने व  उत्तम उपदेशासहित ,  आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.”  ( सुरह नं १६ अल - नहल आ.न. १२५ ).

तुम्ही जर तुमच्या अल्लाहाने सांगितले प्रमाणे या पृथ्वीतलावर मनापासून फक्त अल्लाहच्या इच्छेसाठीच काम करीत राहिले तर नक्कीच त्यांचे चांगले बळ मिळते..पुढे दिव्य कुर आन म्हणते की , ” आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.  (सुरह नंबर ४१ अल - सजजदाह आ.नं.३४ ). 

तुम्ही केलेल्या महीनाभरातील खडतर प्रशिक्षणाचा उपयोग तुम्हाला सर्व समाजातील लोकांना फायदा करण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे आहे.. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी, त्यांना वाईट सवयी पासून दुर करण्यासाठी  ,  त्यांना आपल्या प्रपंच चागले चालावा व आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी तत्पर राहावेत यासाठी, तुम्हाला तुमच्या सभोवताली असलेल्या सामाजिक समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या हक्कासाठी, प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून भांडणे होतात ते होणार नाही म्हणून प्रयत्न करण्यासाठी , समता बंधुता अखंडता सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे.

     "बदलते वातावरण आणि आपली भूमिका "

मित्रानों! देशाचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ केले जात आहे. धर्माच्या नावावर आपआपसांत लोकांना भडकाविले जात आहे. भारतीय संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा आहे. धर्माबाबात कोणावरही जबरदस्ती करता येत नाही. 

    दिव्य कुरआन ही हेच फरमावितो, ”तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.” ( पारा नं ३० सुरह नं. १०९ ,अल- काफीरून आ.नं.१०९)  

   पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, ”धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे.”  ( सुरह नं. २ अल - बकराहा आ.नं. २२३ )

 सदरील कुरआनच्या आयातीवरून आम्हाला बोध मिळतो की, धर्मासंबंधी कुठलाही अतिरेक करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये, संवादाने एकमेकांची भूमिका समजून घ्यावी. शक्य तेवढे एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते,  वाद विकोपाला जाणार नाहीत याची सतत काळजी घ्यावी. आप आपसात विसंवाद निर्माण होता कामा नयेत , आपल्या बुद्धीच्या क्षमतेने विचार करून मार्गस्थ व्हावे. समेट घडवून आणला पाहिजे.

                        राजकारण करायचेच असेल तर खरोखरच समाज कारण व लोककल्याणासाठी केेले पाहिजे. परंतु, त्या ऐवजी समाजात विषाची बिजे पेरली जात आहेत. अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आजचे समाजकारण राजकारण गेलेले आहेत,तर त्याला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे  व जे चुकीचे चालले आहे ते रोखायची जबाबदारी सर्व समाजातील श्रद्धावंत आणि समाजधुरीणांकडे आहे.  त्यांनी खरोखरच यासाठी कसोशीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे.. अल्लाहा म्हणतात प्रयत्न करणं तुमचे काम नंतर त्याचं फळ देणं हे माझं काम मी सर्वांचं मन परिवर्तन करणारा जरूर आहे.. प्रयत्न तर करून तर बघा, आजचं राजकीय पक्ष फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी समाजात विष पसरविण्याचे काम करीत असतात,

विष हे कोणासाठीच अमृत ठरत नाही. मग ते स्लो पॉईजन असो की कडक. आज नाही तर उद्या ते आपला गुण दाखविण्यास सुरूवात करते. 

                   दिव्य कुरआनमध्ये सांगितले आहे की,  

”आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील.  (पारा नं. १३ ,सुरह नं. १४ अल - इब्राहीम  आ.नं. ४२ ). 

             पृथ्वीतलावर सुधारणा करण्यासाठी कुर आन म्हणते‌ की,   ”जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ”आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!” ( सुरह नं. २ अल- बकराह आ.नं.११. ) व हो  ”सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना ते कळत नाही. ( सुरह नं.२ अल- बकराह आ. नं. १२ )."

मित्रानों, या कुरआनच्या आयाती ज्या उपद्रव माजविणार्‍यांविरूद्ध आहेत. कोणीही कुठल्याही समाजघटकाचे का असेनात दंगे, उपद्रव माजवू नका आणि जे माजवित आहेत त्यांना रोखा,  आशा उपद्रवी संघटनेत सामील होवू नका.  ईश्‍वराने प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिली आहे, त्याचा उत्तम फायदा जनकल्याणासाठी करावा.

पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, “  ज्याने कोणा एकाला ही जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.”  (सुरह नं. ५ अल- माईदा आ.नं.32).

या आयातीवरून बोध मिळतो की आपल्या हातून कधीच नाहक व्यक्तीचा खूनच काय, त्याचा हक्क ही मारला जावू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. 

            कुरआनमध्ये फरमाविले, “काळाची शपथ आहे, मानव वस्तुतः तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.  ( सुरह १०३ सुरह अल - हश्र आ.नं.१ते ३ ) " .

सर्व श्रध्दावान बंधुंना  विनंती आहे की, त्यांनी दैनंदिन जीवनात दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचं मार्गदर्शन आत्मसात करून समाजात नैतिक बदलासाठी पुढाकार घेऊन सत्कर्माचे काम हाती घ्यावे. लोकांना वाईटापासून रोखावे, जे समाजात उपद्रव माजवत आहेत,  विनाकारण सामान्य माणसांना त्रास देत आहेत, मानवकल्याणाच्या विरूद्ध जाऊन वागत आहेत अशांचा शोध घेऊन संवैधानिक मार्गाने त्याविरूद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न करावा आणि लोकांमध्ये ईश्‍वरीय मार्गदर्शन पोहोचवावे. हाच रमजाननंतरच्या प्रशिक्षणाचा संदेश.

मित्रानों, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाने जीवन कसे जगावे, जगण्याची नियमावली कशी असावी,  त्याची आचार-विचार करण्याची पद्धती कशी असावी? कोणाशी कसा संवाद साधावा, त्याचे अध्यात्मिक जीवन कसे असावे, त्याने पारलौकिक जीवनाची तयारी कशी करावी, ऐहिक जीवनात प्रगती करताना कोणती नैतिक मुल्य अंगी बाळगावीत अशा एक ना अनेक मनुष्याच्या जीवनासंबंधी  मार्गदर्शन आपल्या परीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे...

तरच या संपूर्ण रमजानुल मुबारक खडतर प्रवासाचा व प्रशिक्षणाचं फलीत राहीलं...

अल्लाह सर्वांना सद्बुद्धी देवो हिच अल्लाहच्या जवळ दुआ याचना करतो 

  "  उद्या ईद उल फिजत्र चा दिवस सर्वांना सुखरूप जावो हिच अल्लाह जवळ दुआ याचना करतो "

    ईद मुबारक २०२४ ..



( .मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर कळवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. प्रतिक्षेत )

 रमजान मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर २९ वा .

मंगळवार दिनांक ०९-०४-२०२४ 



लेखन,:-  डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,मिल्लतनगर ,

     श्रीरामपूर 

९२७१६४००१४ 


इस्लाम:-!!  बुरखा - पडदा - हिजाब - समजून घेत -  काळा प्रमाणे वापरणं गरजेचं....!!


                 #  दिव्य कुर आन सांगितले की, " पैगंबर ! आपल्या पत्नींनां , व मुलींना आणि श्रध्दावंत स्त्रियांनाही सांगां , ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) की, त्यांनी बाह्य वस्राचा ( Outer Garments,चादर ) भाग आपल्या अंगाभोवती ( अगांवर ) स्वतः वर ( म्हणजे डोक्यावर , अंगावर) टाकून घ्यावा . आशा पेहरावामुळे त्या ( शालीन स्त्रियां म्हणून )ओळखल्या  जातील ,  आणि ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) त्यांना काही त्रास होणार नाही.. आणि अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे . ( पारा नंबर २२ वा सुरह  नं . ३३ अल-अहजाब आ.नं. ५९ वी ).


 # तसा महिलांबाबत, निकाह ( विवाह) , तलाक ( घटस्फोट), विधवा, खुला , बुरखा- पडदा - हिजाब  व लग्नानंतर वारसा हक्क व सार्वजनिक ठिकाणी वापर असे बरेच विषय कायमस्वरूपी चर्चेत असतात परंतु इस्लामी मुस्लिम समाजातील काही विषय हे शोशल मेडीयावर  जास्तच चर्चेचे असतात. सर्व विषयांवर खूप काही लिखाण करण्याची गरज असताना परंतु  एका लेखात पुर्ण होवू शकत नाहीत... सविस्तर लिखाण करणे गरजेचे आहे..असो.

       कोणत्या महीलेने काय वस्र परिधान करायचं हे प्रत्येक बघिनींना स्वातंत्र्य दिले आहे व तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.. परंतु इस्लाम मधे प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या काळापासून महीलांनी आपल्या कपड्यांच्या वर एक वस्त्र परिधान करावयास सांगितले आहे त्याला बुरखा - हिजाब - चादर- पडदा -  म्हणतात, असे चादर ओढण्याची सांगितले आहे..त्यात डोक्यावर दुपट्टा ओढनी व संपूर्ण अंगाला चादर ओढणी किंवा शिवन घेतलेल्या बुरखा हिजाब पांघरूण घेणे ...हे दिव्य कुर आन मधील पारा नं. २२ मधील अल - अजहाब सुराह मधे स्पष्ट शब्दांत आलेलं आहे.

महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना वावरताना घालण्याचं सांगितले आहे..१५०० वर्षापुर्वी चा काळ अज्ञानाचा काळ होता त्यावेळी स्त्रिया फक्त भोग विलासी साठी व च अश्लिल कृत्यं व नाच गाणं मनोरंजनाचं साधनं येवढ्या पुरत्याच  मर्यादित जीवन स्त्रियांचं होते.. स्त्रियांकडे वाईट नजरेतुनच बघितले जायचं, आजची परिस्थिती ही शोशल मेडीया व नेटवर्किंग च्या जमाण्यातील आहे .. परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे..शोशल मेडीयामुळे लहान लहान मुलांना ही अश्लिल चाळे करताना दिसत आहेत.. बाकीचे सांगणं कठीण आहे.

हे सर्व टाळण्यासाठी  त्या काळातच प्रेषितांच्या मार्फतच अल्लाहा( ईश्वर) नेच बघिंनी महीलांसाठी संरक्षण कवच म्हणून चादर -ओढनी- बुरखा- हिजाब चं संकल्पना सक्तीची सांगितली ..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या विविध पत्नी होत्या .. विशेष म्हणजे प्रेषितांनी  बेसहारा -विधवा -पिडीत असलेल्या महीलांबरोबरच लग्न केलीत , ( हा  स्वतंत्र लेखाचा विषय आहे) त्यांना हजरत जैनब , हजरत रूककयया ,हजरत उम्मे कुलसूम , हजरत फातिमा रजी या चार मुली ही होत्यां .तर त्यांनी आपल्या परीवारांसह सर्व सहकारी मित्रांना ही सक्तीचं केले .

            ##   विशेष गोष्ट म्हणजे पुरुषां साठी ही आचारसंहिता लागू  केली होती , अल्लाह दिव्य कुर'आन मधे सांगतात व सक्तीची मनाई केलेली आहे , ते बघू या, प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या द्वारे सांगतात की, " हे  पैगंबर (स्व.) श्रद्धावान ( बंधुंना) पुरुषांना सांगा ,की त्यांनी आपली दृष्टीं ( नजरां) ची जपनूक करावी   ( नजरा खाली ठेवाव्यात ), आणि आपल्या लज्जा स्थांनांचे रक्षण करावेत . असे करणे त्यांच्या साठी शुध्द चारीत्र्याचे  द्योतक ठरेल  , ते ( पुरुष)जे  काही करतात अल्लाहाला त्यांचीं  पुर्ण जाणीव(खबर)आहे." 

 खरं तर या आदेशाचा अर्थ सदैव खाली पाहणं न होता पुरुषांनी स्त्रियां कडे चुकीच्या दृष्टीकोनातून न पाहणे . स्त्रियांच्या गुप्त अंगावर दृष्टी न टाकणं..

म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. सांगतात की # चालता फिरताना आपली दृष्टी खाली ठेवून व आपल्या शरिराचे अंग प्रदर्शन पर स्त्रियांना ही होणार नाही याची काळजी पुरुषांना ही घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.  फक्त स्त्रियांसाठी सक्ती केली नव्हती तर तोच कायदा रुल हा पुरुषांना ही सक्ती चा केला होता.

                  #  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. " महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटात वावरावे , नटून थटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करून फिरू नयेत , घराबाहेर जाताना डोक्याव चादर घेउन , जो दागिने घातलेली आहे त्या दागिन्यांचां मधुर नाद( खुळ खुळ) आवाज होत असेल तर तो काढुन ठेवावेत .".

         # "घरातील पती, वडील ,भाउ, मुलगा, भाचा , पुतण्या ( यांच्या शी विवाह होत नाही)सोडून ;   ईतर सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगावी . साज शृंगार नटने सजने फक्त पतींसाठीच ..घरातील अपत्यजनांसमोर समोर जाताना वावरताना सुध्दा आपल्या वक्षस्थांवर ओढनी-  दुपट्टा पांघरूण अपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्र धारण करावेत " 

# पुरुषांना खास आदेश देण्यात आले आहेत की , " त्यांनी आपल्या आया बहीणींच्यां खोलींत जाताना परवानगी घ्यावी जेणेकरून अचानक तुमच्या घरात प्रवेशाने बेसावध बसलेल्या महीला,बहीणींवर खजिल होण्याची पाळी येणार नाहीत."

 # या सर्वाला परदा बुरखा पध्दत म्हणतात यावर अधिक खुलासा करताना प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनीं सांगितले की, " स्त्रियांनों ,( महिलांनों ) आपल्या सख्ख्या भावा व वडीलांसमोर जाताना सुध्दा चेहरा हाताचा पंजा ,व घोट्याच्या पर्यंत पाया व्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्राने अच्छादित करूनच जावे , पारदर्शक, शरिर प्रदर्शन घडेल  असे कपडे टाळावेत .., तसेच आपल्या घरातील आप्त जनां ( मेहरम) सोडून इतर कोणत्याही नात्याच्या पुरुषासमोर एकांतात बसू नये ' .#

# पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध अत्तर वगैरे लावून घराबाहेर जाण्याबाबत मनाई केली आहेत , मस्जिदीत महीलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. एकाच रांगेत स्त्रियांना व पुरुषांना नमाज अदा करण्यास नाकारण्यात आले होते  . त्याकाळात सुध्दा महिलांची संपुर्ण नमाज अदा झाल्यानंतर सर्व महीला मस्जिदी मधून निघून जाई पर्यंत स्वतः प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे पुरुष मित्र आपल्या बसल्या जागेवरून हालत नव्हते.

इस्लाम ने महीलांना संपूर्ण सवलत व सुट देण्यात आल्या आहेत... प्रत्येक गोष्ट ही महीलांसाठी सोयीची व कामाचीच करून ठेवली आहे... महीलांना प्रत्येक क्षेत्रात वाव देण्यासाठी प्रयत्न केले आहे परंतु त्यांच्या चौकटीत राहून.. याला बंदिस्त नाही म्हणू शकत.. (हा मोठा विषय आहे) मतमत्तांततरे कैक पटीने असू शकतात . अगोदर इस्लाम समजून घेत ,त्याचा अभ्यास केला पाहिजे.. असो.

सध्या शोशल मेडीयाच्या जमाण्यात यू ट्यूब व असंख्य बेब सिनेमा व असंख्य सिरीयलस चालू आहेत त्या प्रत्यक्षात त्यामध्ये अजनाते पणे किंवा जाणते पणे अपण नक्कीच काही सांगू शकत नाहीत परंतु एख तरी दृश्य हे अश्लिल असतेच आशा फार थोड्या सिरीयल असू शकतात की त्यामधे अश्लील दृश्य नाहीत.. परंतु बहुतेक सिनेमा मधे , सिरीयलस मधे जाहीराती मधे महिलांचां वापर करून कमी कपड्यात  अंग  प्रदर्शन  केले जात  आहे.. कमी व फिट्ट व पारदर्शक कपड्यात स्त्रियांना दाखवले जातात त्यामुळे लहान लहान मुलां वर परीणाम होउन लहान मुले ही अश्लील दृश्यांची बळी पडून नको ते कृत्य करुन राहीलेत . त्यांच्या बालमनावर  मानसिक परिणाम होउन चुकीचे कृत्य करू राहिले त त्यामुळे  नकळत पणे नराधमांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. यासाठी ओढणी पडदा- बुरखा -हिजाब ही काळाची गरज बनत चालली आहेत.

       .हा प्रश्न फक्त एका  समाजापुरताच मर्यादित  राहिला नाही, तर हा प्रश्न सर्वसामान्य समाजातील लोकांना भेडसावत आहेत..मुली  सर्वांना असतात , सर्वांच्या मुली  लाडक्याच असतात..आपल्या मुलीं या सुरक्षित राहावेत असे प्रत्येक पालकांची मनोमन इच्छा असते ,   यासाठी सुरक्षित पध्दत  हिजाब -बुरखा - पडदा  किंवा दुसऱ्या भाषेत त्याला काही ही नावे द्यावीत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे...शोशल मेडीयाच्या जमाण्यात मुलींच्या शिक्षण व संरक्षण होणं गरजेचं आहे..ती स्वतःच्या पायावर उभी राहणं गरजेचं आहे.

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचे कथन आहे की ,' अगर घरातील एक महीला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षीत होतं "  


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)

लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल मिल्लतनगर 

श्रीरामपूर 🎉 🎉 

🎉  9271640014🎉

बेलापुर (प्रतिनिधी  )-  देशात होणाऱ्या निवडणूका या पारदर्शीपणे व्हाव्यात या उदात्त हेतूने बारा ओळखपत्रांची यादी जाहीर केली.मात्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदाराकडे असल्यास तो मतदान करू शकेल.असे असले तरी बारा पैकी अकरा ओळखपत्र हे बनावट असु शकते असा दावा येथील भाजपाचे जेष्ठ नेते व  सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथा यांनी केला आहे.

या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सुनिल मुथा यांनी म्हटले आहे की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरख धंदा जोरात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पारदर्शी मतदानाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे..

या प्रकाराची खातर जमा करण्यासाठी बेलापूर येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे बोगस आधार कार्ड बनवून घेऊन या कृत्याचा पर्दाफाश केला आहे.त्यांनी समाजातील काही जबाबदार व्यक्तींचे बनावट ओळखपत्र कसे तयार होते याचा अनुभव स्वतः घेतला.काही लोक कागदपत्राची पडताळणी न करता बनावट आय डी प्रुप तयार करुन देत असल्याचा आरोप मुथा यांनी केला आहे .

यामुळे मतदान केंद्राच्या ठिकाणी ओळखपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी मजबुत  यंत्रणा असणे अत्यावश्यक बनले आहे. याखेरीज बोगस मतदान टाळणे केवळ अशक्य असल्याची चिंता सुनील मुथा यांनी व्यक्त केली आहे.

या बोगस ओळखपत्रांचा वापर करून एसटी महामंडळालाही दरवर्षी लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचेही बऱ्याच प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे बोगस ओळखपत्र वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मार्फत हे ओळखपत्र बनवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.

तरी निवडणूक आयोगाने सदर बाब गांभीर्याने घेऊन त्याकरीता आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात अशी मागणी सुनील मुथा यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात केली आहे.

लोकांनों ! आम्ही तुम्हाला ( सर्वांना) एकच पुरुष व एकाच स्त्री पासून निर्माण केले आहे  ;  मग तुमची राष्ट्रे व वंश ( कबीले,व वंश ) बनविले ,.  जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे ( ओळखावे) ;    परंतु अल्लाह जवळ तुमच्या पैकी सर्वात जास्त श्रेष्ठ ( प्रतिष्ठित) तोच असणारं आहे, जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा..". ( पवित्र कुरआन पारा नं. २६ , सुराह अल - हुजूरात नं. ४९ ,आ .न. १३ वी. )   

            जागतिक पातळीवरील   "फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२  " चे आयोजन ,  रविवार  दिनांक २०  नोव्हेंबर २०२२  रोजी  " दोहा- कतार "  येथील  अल- खोर च्या  अल - बायन स्टेडियमवर   उद्घाटन समारंभ संपन्न झाला . यामध्ये अमेरिकेचा  प्रसिद्ध  हॉलिवूड  अभिनेता  मॉर्गन फ्रिमॅन  व फिफा फुटबॉल  विश्वकप चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर केलेल्या(Ghanim Al miftahi ) घानिम - अल - मुफ्ताह हा कॉउडल - रिग्रेशन सिंद्रोम (Caudal Regression Syndrome)  ज्यांचे स्पायनल कॉर्ड ( मेंदुरजजा)  चा दुर्धर दुर्मिळ आजार झालेला,   अपंगत्वावर मात करून  कुरआन हाफीज व कारी  झालेला  , उद्घाटनप्रसंगी मंचावर येऊन  पवित्र कुरआन मधील वरील आयात (श्लोकाचा ध्वनी)  म्हणून सुरुवात केली गेलीत .

 ते सुद्धा असंख्य देशातील फुटबॉल  खेळणाऱ्या सदस्यांचा  विरोध डावलून,   जगातील सर्वात बडे  ५०० पेक्षा ही जास्त  टी. व्हि. चॅनेलनी २०० देशात लयीव्हि Live telecast) प्रक्षेपण केले. कित्येक कोटी लोकांनी याच देह याचं डोळ्यांनी लाईव्ह शो बघितले.

    

 एवढ्या मोठ्या आतंरराष्ट्रीय प्रक्षेपणात  विरोध डावलून मंचावर पवित्र कुरआण सुराह अल - हुजूरात ची १३ वीच आयात   का ??? म्हणून  सुरुवात केली असेल.??? .

  म्हणुनच या श्लोकाचा अर्थ  समजून घेताना:- 

या आयातीत अखिल मानवजातीला उद्देशून सर्वोच्च अल्लाहने तीन महत्त्वाचे तात्विक विवेचन केले आहेत.  ते सांगतात की, " तुम्हा सर्वांचे मुळ एकच आहेत. एकाच पुरुष व एकाच स्त्री पासून तुमचा वंश  अस्तित्वात आला( निर्माण केले) आहे .  आज जगाच्या पाठीवर जे जे वंश आढळतात ते वास्तविकपणे एकाच आई व वडीलांपासून  त्यांचा प्रारंभ झाला आहेत .त्याच्याच वंशाच्या अनेक शाखा आहेत.(२) परंतु आपल्या मुळ स्वरुपाच्या एकच असताना देखील त्यामधे तुमचे विविध राष्ट्र ( देश ) , विविध जाती , विविध कुळात , विविध कबील्यांत, विविध भावक्यात,  तुम्हाला विभागले जाणे स्वाभाविकच होते . परंतु या स्वाभाविकच विभागात विभागलेल्या कुळं या आधारावर बिलकुलच नव्हते केली की ती  उच्च- निचच, श्रेष्ठ- कनिष्ठ, स्पृश्य- अस्पृश्य , असले भेदभाव मतभेद व्हावेत असे , बिलकुल नव्हतेच केले होते .किंवा एका वंशाने दुसऱ्या वंशावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे अथवा सत्ता -हुकूमत गाजवावे,  किंवा एका वर्णाच्या लोकांनी दुसऱ्या वर्णाच्या लोकांना तुच्छ,क्षुद्र मानावे  किंवा एका मोठ्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर जम, हुकूमत प्रस्थापित करावी ,..

हो , निर्माण करत्याने या एकाच कारणास्तव मानवी समुहानां  राष्ट्र व वंशांच्या स्वरूपात उभारले होते ते फक्त त्याच्या दरम्यान परस्परांत सहकार्य सहकार व ओळखण्याची एक स्वाभाविक रित - खून ( सिंबोल, चिन्ह  )  होती ..(३)  त्यात , माणसं माणसांच्या दरम्यान श्रेष्ठत्व व उच्चतम तेचा आधार जर कोणता असेल तर तो फक्त केवळ उच्च नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा.  ;  जर अल्लाहला जर सर्वात श्रेष्ठ तो असेल ,ज्यांची नैतिक नितीमत्ता उच्च दर्जाची असेल ..तेच अल्लाह ( ईश्वर) ला आवडते...!.

त्या दोहा कतार येथील आंतरराष्ट्रीय फिफा फुटबॉल  विश्वकप २०२२. च्या उद्घाटनप्रसंगी मंचावरून सांगितलेल्या पवित्र कुरआन मधील सुराह अल - हुजूरात च्या १३ व्या आयाती(श्लोका) चा अर्थ सर्व धर्मांच्या लोकांना सर्व जगाला हेच संबोधित करायचे होते की आपण सर्व एकच आहोत ..एकच आहोत ...

परंतु त्यांनी त्या अपंगत्व आलेल्या घानिम अल - मुफ्ताहीचीच निवड केली की अल्लाह ( ईश्वरा) ला  अपंग - धडधाकट - काळे- गोरे सर्व सारखेच  आहेत...

     अर्थात:-" वसुधैव कुटुंबकम "

" The world 🌎🌍 is one family "

हे संस्कृत शब्द आहे ज्यांचां अर्थ संपूर्ण जग एकच कुटुंब आहे.. हिंदी मधे " धरती ही परीवार है '

 " उद्देश हेच होता  -- विश्व व्यापक बंधुत्वाचा  संदेश."

त्या कतार मधील जागतिक फुटबॉल संघटनेचा जगातील सर्वांना एकतेचा अखंड तेचा च संदेश अभिप्रेत असावा...या साठी जगातील सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले तर खरोखरच हा विचार मानव कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक ठरेल ... अल्लाहाला मानवता धर्म कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे काम करणाऱ्या लोकांना जरूर पसंत करतात...जो अल्लाह ( परमेश्वर) ला आवडतो तो सर्वांना आवडतो ...

सर्वांनी आपल्या नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा आदर्श निर्माण करून अल्लाह ( ईश्वरा) चे आवडते  , श्रेष्ठ ..व्हावे...


( मित्रांनो लेख काळजीपुर्वक वाचुन आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा , आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा..)



लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख,

बैतुशशिफा हॉस्पिटल -मिल्लतनगर ,

श्रीरामपूर 

 ९२७१६४००१४

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या बेलापुर खुर्द येथील प्रा. बाबासाहेब शेलार यानी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल शासनाने घेवुन त्यांना डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार  दिला ही बेलापुरकराच्या नव्हे श्रीरामपुर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे गौरोद़्गार अरुण पा नाईक यांनी काढले                    सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रा. बाबासाहेब शेलार  यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्याबद्दल प्रा. शेलार  यांचा ग्रामपंचायत बेलापूर विविध सामाजिक संघटना बेलापुर ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला होता .त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन नाईक बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच  अँड दीपक बारहाते ,  करण दादा ससाने द्वारकनाथ बडधे बापुसाहेब पुजारी प्राचार्य काळूराम बोर्डे विजय शेलार सुभाष त्रीभुवन उपस्थित होते,या वेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. बाबासाहेब शेलार म्हणाले की मला आतिशय गरीब परिस्थीतून शिक्षण घ्यावे लागले गरीबीचे चटके सहन करतानाच गावातील काही समाज कार्य करणाऱ्या समाजसेवकाशी संपर्क आला अन समाजसेवेचे खुळ डोक्यात शिरले समाजसेवेतुन मिळणाऱ्या  आनंदाचे मोलच होवु शकत नाही .मी कधीच अपेक्षा ठेवुन कुठलेही सामाजिक काम केले नाही आपल्या सर्वाच्या आशिर्वादामुळे मला महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला हा माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल दागीना असुन या पुढेही माझे कार्य असेच सुरु ठेवणार असल्याचे शेलार म्हणाले या वेळी श्री हरिहर केशव गोविंद बन येथील विश्वस्त बापुसाहेब पुजारी पत्रकार देविदास देसाई आलम शेख कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले बाबासाहेब दिघे काँग्रेसचे हेमंत ओगले  द्वारकनाथ बडधे दिपक बारहाते प्राचार्य काळूराम बोर्डे प्रा.सोळसे मुख्याध्यापक ना म साठे संजय शिंदे विजय शेलार सुभाष त्रिभुवन आदिनी मनोगत व्यक्त केले  या वेळी प्रशांत होन  गोरख भगत प्रा. तुकाराम सोळसे  प्राचार्य काळूराम बोरुडे, विश्वनाथ आल्हाट  उत्तमराव शेलार रवि शेलार, विजय शेलार  माजी उपसरपंच शरद पुजारी संदेश विसपुते विलास  भालेराव , मधुकर पुजारी  ना. म. साठे, कार्याध्यक्ष,  बहुजन रयत परिषद  प्रभाकर क्षीरसागर भगवानराव जगताप दादू नेटके  संजय शेलार,दिलीप दायमा आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरुण बोरुडे व संजयकुमार शिंदे यांनी केले.प्रास्ताविक जागृती प्रतिष्ठाणचे सचिव रविंद्र शेलार यांनी केले तर आभार .प्रभाकर क्षिरसागर यांनी मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )- :बेलापुर व परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील विज मोटारीच्या केबल चोरुन त्यातील तांब्याची तार विकणारे दोन व तार विकत घेणारा असे  तीन आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे . श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे शिवारातील एकलहरे- टिळकनगर रस्त्यांच्या कडेला शेती महामंडळाच्या शेतात भल्या सकाळी केबल चोरट्यांना येथील शेतकऱ्यानी केबल जाळतांना रंगेहाथ पकडले मात्र चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी देत घटनास्थळावरून पोबारा केला या बाबतची माहीती बेलापुर पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीली पोलीसांनी गणेश संतोष आल्हाट यास ताब्यात घेतले पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आदित्य नामदेव आहेर रा वडजळी भोकर याचे नाव सांगितले पोलीसांनी तातडीने आरोपी आहेर याची माहीती घेवुन त्यास शिताफीने अटक केली.तसेच आणखी काही जण पोलीसांच्या रडारवर असुन एक इसम संशयीत म्हणून ताब्यात घेतला आसल्याची माहीती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.तसेच चोरीची तांब्याची तार विकत घेणारा मुस्ताक याकुब शेख यास देखील ताब्यात घेतले असुन न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे   याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी भल्या सकाळी टिळकनगर-एकलहरे रस्त्याच्या महामंडळाच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात काळकुट धुर निघत होता, एकलहरे येथील शेतकरी सदर रस्त्याने आपल्या शेतांत मोटार चालू करण्यासाठी जात असतांना सदर बाब शेतकऱ्याच्या निदर्शनास आली शेतकऱ्याने घटनास्थळी जाऊन बघितले असता,सदर चोरटे लंपास केलेल्या केबली जाळून नष्ट करत त्यामधून कॉपर तार काढून विक्री करण्यासाठी तयार करत होते. सदर शेतकऱ्यानी चोरट्यांना याबाबत हटकले असता, चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी करत घटनास्थळावरून धूम ठोकली सदर शेतकऱ्यानी लगेचच बेलापूर पोलिसांना याबाबद माहिती देताच बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे पोलीस काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून आरोपी बाबत माहीती घेतली  पोलीसांनी संशयावरुनआगोदर अल्हाट यास ताब्यात घेतले नंतर आहेर यास ताब्यात घेतले असुन पोलिसांना सदर जागेवरून वीस ते तीस किलो कॉपर तारेचा साठा जाळलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. एकलहरे ,उक्कलगाव, बेलापूर शिवारातील सातत्याने शेतकऱ्यांचे वीजपंप व केबल चोरीचे प्रकार समोर आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे., सदर आरोपीकडून सखोल तपास केल्यास या ताब्याच्या तारा स्वस्तात विकत घेणारा मोठा मासा गळाला लागु शकतो काल सदर घटनेने एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत आपापल्या चोरीला गेलेल्या मोटारी, केबल सह अन्य वस्तु बाबत तक्रार दिल्या आहेत. 


[ एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव क्षेत्राच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी रात्र वैऱ्याची ठरत आहे.येथील शेतकऱ्यांचे विद्युत पंप, केबल, स्टार्टरवर चोरटे डल्ला मारीत आहेत. यामुळे रात्री सुरू असलेला पंप सकाळी शाबूत असण्याची खात्री नाही. आमचा हजारोंचा वीजपंप व केबल चोरट्यांनी चोरून नेला आहे. उन्हाची वाढती तीव्रता, पिकांची पाण्याची गरज भागविताना होणारी दमछाक व चोरीची घटना यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोर चोरी करीत आहेत.पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबर चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे. - सचिन थोरात, शेतकरी, उक्कलगाव ]

आज २० विसावा रोजा  चालला आहे अर्थात पहिला अशहरा ( विभाग) " रहमत,( 'दये)चे संपलेंत ,  आज  २० रोजा पुर्ण  " मगफीरत '( माफी दैवून कृपादृष्टी )चे (१०- ते २० ) संपूं  राहिलेत , आज संध्याकाळी तिसऱ्या विभाग ( अशहारा ) हा " नरकाग्नितल्या ( जहान्नुम) च्या आगीच्या होणाऱ्या इंधनापसून संरक्षण " वाचण्यासाठी  पुढील दहा दिवस आहे , वेळ दिवस खुप लवकर संपत चाललेली ..आज संध्याकाळीच "लैलतुल -कद्र "  च्या पवित्र रात्रीं ( ज्यांचे पुण्य हे एका रात्रीचं एक हाजार महीन्यांच्यां रात्रीं पेक्षाही अधिक असतं) बरोबरच" एहतेकाफ "संध्याकाळ पासूनच सुरू होणार ,   आज ही अल्लाहच्या कृपेपासून विमुक्त आहोत . याचं महत्त्व आपल्या लक्षात घेतलं पाहिजे .   दुआ याचना करण्याच्या पर्वाचा प्रवास सुरू झाला आहे. 

                 एक ते वीस दिवसांत तुम्हाला तुमच्या व्यस्तते  ,हालगर्जीपणामुळे ,  त्याचं महत्त्व न समजल्यामुळे  अल्लाहा ( ईश्वरा) च्या एवढ्या मोठ्या पर्वाच्या संधीचा फायदा उचलला नाहीत  ,तर तुम्ही दरीद्रीच समजा. " मगफिरत "या पर्वात वर्षांनु वर्षे क्षणा क्षणाला ,कळत नकळत केलेल्या पापांची , चुकांची दुरुस्ती  , चुकांची माफी मागणं व अल्लाह ला पुन्हा पुन्हा या चुकीचं होणार नाहीत यासाठी कृपादृष्टी व्हावीत . याला म्हणतात "मगफिरत ' होणं. संपूर्ण आयुष्यभर श्रद्धांवान बांधव याच आशेवर जगत असतात की परमेश्वर( अल्लाह) ने आमची मगफीरत करावी..हे फक्त परमेश्वराच्याच हातात आहे.

आपण कळत नकळत चुका होतच असतात . एखाद्या शुल्लक चुका ; त्याला साधी लहान चुक समजतो , परंतु ती कोणां दुसऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानिची ठरु शकते  हे कधीच आपल्या लक्षात येत नसते , आशा चुक ही आपल्यासाठी नरकातील इंधनासाठी  पुरेशी ठरु शकते.  

पवित्र कुरआन  सांगितले की, " त्या ( कयामत)  दिवशी तुम्हाला वाचवणारा कोणी नसेल , त्या दिवशी स्वतः चे आई-बाबा मुलांना ओळख देणार नाही , बहीण- भावाला , पती -पत्नी ला ,मुलं- आई-बाबांना  ओळख देणार नाहीत . ज्याला त्याला स्वतःचं पडेल. " 

आयुष्यभर केलेल्या  चांगल्या -वाईट कर्मांचां हिशोब द्यावाच लागणार आहे . मग  त्यासाठी आजच तय्यारीला लागा .

तिसऱ्या टप्प्या ( अशराह )ला  २१ ते ३० ला सुरूवाती बरोबरच रमजानुल मुबारक मधील   पवित्र लैलतुल -कद्र च्यां   रात्रीं रोजा२१ , रोजा २३ ,रोजा २५ , रोजा २७- रोजा २९- रोजा ३० वी, या विषम संख्यात्मक " लैलतुल-कद्र " च्या  रात्रीं  असतात ,   या एक रात्र ही एक हजार महीण्यांच्या रात्रींच्यां  पेक्षा ही जास्त पुण्यंचीं फक्त एक  लैलतुल कद्रची  रात्रींचं पुण्यं - सबाब भेटतं.

दिव्य कुरआन मधे सांगितले ,  " आम्ही या( कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरले आहे .(१), आणि , तुम्हाला काय माहित ,की, " कद्र " ची रात्र काय आहेत ? म्हणून, (२), कद्र ची रात्र ही हजार महीण्यांपेक्षा ही अधिक  उत्तम आहेत (३),ईशदूत ( फरिशते) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यारात्री आपल्या पालनकर्तांच्या आज्ञेनुसार प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४),  ती रात्र म्हणजे पुर्णतः " शांती" आहेत व  उष: काळा पर्यंत...(५) ..( दिव्य कुराण ,सुरहा नं. ९७ .अल- कद्र आ.नं. १ ते ५).


त्याच बरोबरच आज २० व्या रोजा च्यां दिवसांपासून ते थेट ३० व्या रोजा पर्यंत १० दिवस सलग अल्लाहच्या याचने नतमस्तक होउन याचना करण्यासाठी बांधंव २४ तास १० दिवस बसतात त्यालाच " एहतेकाफ " ला बसणं.

जगात प्रत्येक मस्जिद मधे या शेवटच्या दहा दिवसांत एक तरी रोजेदार बांधंव बसणं गरजेचे आहे.दहा दिवस अल्लाह च्या भक्तीत बाहेरील जगाशी संपर्क तोडून - जग विसरून,  स्वतःच्या प्रंपाचाला बाजूला ठेवून , फक्त अल्लाहाला संपूर्णतः समर्पण करून- देह भान विसरून अल्लाहचच नामस्मरणात तल्लीन होऊन जाणं ..बस..

     या रात्रीच्या आलेल्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा उचलून अल्लाहा जवळ सर्वस्वी अर्पण- लिन - तल्लीन होऊन छाती बदडून , रडून -डोळ्यात पाणी आणून , आयुष्य भर केलेल्या चुकांची जाणीव करून उदा. जाणते व  अजाणतेपणी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता व खात्री देउन गरीबांचे ,मजुरांचे , भिकारी, बहीण,भाउ , आई-बाबा , आजी-आजोबा, मित्र मंडळ , गिऱ्हाईक या सर्वांबरोबर कधीतरी  उच्च निच झाले असतील , एखाद्याला  वेडेवाकडे  अपशब्द वापरले गेले असतील , अपमानास्पद भाषेचा वापर झाला असेल, संशयास्पद वागणूक दिली गेली असेल,  कधी घमेंडी आली असेल , " मी " ही जागा झाला असेल, कधी" अहंकार" आला असेल , 

"अहंकार""रावर :- प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम . म्हणतात की, " ज्या व्यक्तींच्या मनात तिळमात्र देखील अहंकार असेल ,तो स्वर्गात जाणार नाहीत, " 

त्यावर त्यांच्या एका मित्र( सहाबी) ने विचारले की चांगले कपडे परिधान करणे, नव्या पादत्राणांचां वापर करणं, हे देखील अहंकारासारखंच आहे का? 

त्यावर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी उत्तर दिले," अल्लाह सुंदर आहे आणि त्याला सौंदर्य आवडते, अहंकार हा आहे की तो सत्याला नाकारतो आणि दुसऱ्या लोकांना तुच्छ समजणे " ( हादिस ईब्न मस- उद , मुस्लिम.). कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नयेत. आपल्यातल्या " मी "पणा , अहंकार माणसाच्या आयुष्यात खूप गडबड करत असतो तर त्या मी व अहंकाराला बाजूला काढून टाकण्यासाठी अल्लाहच्या दरबारात येउन बाजूला काढण्याचं प्रयत्न करा .

         " , आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ , जितकं वेळ मिळाला तेवढं का होईना वेळ काढून , एकांतात ,एका शांत जागी , निवांत बसून, अल्लाहा जवळ पुर्ण पणे लीन -शरण - समर्पित होउन - अगदी तल्लीन होऊन , निर्विकार पणे , अंतर्मनात दडलेल्या प्रत्येक  प्रत्यक्ष गुन्हेची , दुष्कृत्ये ची , काही घटना  फक्त आपल्यालाच माहीत असतात , आशा केलेल्या  गुन्हे ची माफी मागणं ,   आगदी मनापासून- मनमोकळेपणाने अल्लाहा (परमेश्वरा) बरोबर संवाद साधणं ..जसं  एका  खास मित्राला  मनमोकळेपणाने गप्पा मारतो तशा पध्दतीने अल्लाहा (परमेश्वरा) समोर मनापासून मनमोकळे करणं .याला रिते होणं , फक्त रिते होणे ‌, आत्मक्लेश करणे , आत्मचिंतन करणं ,  पुन्हा पुन्हा अल्लाहा( परमेश्वर )ला सांगणं पुढे कधीच  कोणत्याही परिस्थितीत अशा चुकीचं होणार नाही याची ग्वाही - खात्री देणं . म्हणजेचं मोकळे ,रिते होउन  अल्लाहा ( ईश्वराला) ला   राजी करणं .

आशा गोष्टींमुळे   जेव्हा आपण केलेल्या पापांची - गुन्ह्याची कबुली कुठे  तरी देत असतो  ;  निश्चितपणे माणुष्यात  सकारात्मक बदल घडत असतात . निगेटिव्ह विचार -आचार हळूहळू जावून सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येतात . प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक च होत जाते .  हे फक्त  स्वतः  ठरवलं  तर अशक्य काहीच नसतं .   " मी "फार धोकादायक ठरतो ,तो मी च आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो . तो " मी' मनापासून गायब झाला तर अहंकार ही नष्ट होऊन मनाची अंतर्मुख होऊन आत्मशुद्धी होते व आत्मविश्वास वाढला जातो .मणुष्य  स्वतः च स्वतः ला कित्येक वर्षे ओळखत नसलेला  या दहा दिवसात ओळखू लागतो याच साठी अंतरात्माला आत्मक्लेश आत्मसमर्पण आत्मसमर्पित करणं गरजेचे असते.

नंतर  निर्विकार -शांत - नितळ  अंतरमन होउन आत्मिक शुध्दी होउन व्यक्तीचा उत्सव वाढतो , चेहऱ्यावर  तेज , आनंद  ,झळकतो .  आपल्या जीवनात एक अल्हाददायक , आनंदी पहाटचं ..

 अल्लाह राजी हुआ समझो...


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)


लेखक डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,

श्रीरामपूर ९२७१६४००१४.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget