Latest Post

बेलापूरःमहिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम होत असून महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेऊन  महिलांनी  सक्षम व आत्मनिर्भर बनावे असे मत बेलापूर बु चे उपसरपंच अभिषेक खंंडागळे यांनी केले.        बेलापूर बुll येथील स्वरांजली महिला बचत गटाच्या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर अंतर्गत, प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र, राहुरीच्या वतीने,पुणे येथील श्री सिध्दी ऍग्रोटेक लिमिटेड कडून औजार बँकेचे वाटप करण्यात आले यावेळी  ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावकरी पतसंस्थेचे संचालक रावसाहेब अमोलिक हे होते.

स्वरांजली महिला बचत गटाच्या महिलांना सात लाख किमतीची कडबा कुट्टी, फवारणी यंत्र, घरघंटी,पेरणी यंत्र आदी शेती उपयोगी विविध औजारांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री.खंडागळे म्हणाले की,ग्रामीण महिला ह्या मुख्यता प्रपंचाचा गाडा हाकतात.ग्रामीण महिला ह्या मुळातच कष्टाळू असतात.बहुतांश ग्रामीण महिला ह्या शेती व्यवसायाशी निगडीत असतात.अनेक महिला शेतीत प्रत्यक्ष राबतात.अशा महिलांना औजार बँकेव्दारे उपलब्ध झालेल्या औजारांचा निश्चितच लाभ होईल.सदरची औजारे सदर महिलांना भाडेतत्वावरही देता येतील आणि त्यातून अर्थार्जन करता येईल.सदरची औजारे बचत गटांस दिल्याबद्दल श्री.खंडागळे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळास धन्यवाद दिले.                               यावेळी म.आ.वि.महामंडळाचे व्यवस्थापक महेश अबुज व बचत गटाच्या मार्गदर्शिक कल्पना काळे यांनी सदर योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर योगेश्वर झावरे,अतुल दौले व राम झेंडे यांनी औजाराबाबत व त्याच्या वापराबाबत माहिती दिली. कार्यक्रमास स्वरांजली महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री शशिकांत तेलोरे,

निकिता तेलोरे,सविता गायकवाड ,रंजना पवार,वंदना पवार ,तरन्नुम सय्यद,नंदा पोपळघट,लता पोपळघट, निर्मला पोपळघट,नूतन पोपळघट, शशिकांत तेलोरे, पप्पू मांजरे, निशिकांत तेलोरे, रुपेश सिकची आदि उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी  )-अचानक आलेला अवकाळी पाऊस व झालेली गारपीट यामुळे या भागातील शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला असुन नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी केली आहे                         बेलापुर परिसरातील कुऱ्हे वस्ती दिघी रोड गोखलेवाडी खंडागळे वस्ती गायकवाड वस्ती परिसरास गारपीट व अवकाळी पावासाने तडाखा दिला .अचानक झालेल्या निसार्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते झाले आहे या नुकसानग्रस्त भागास बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले ऐनतपुर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक व्हा चेअरमन  पंडीतराव बोंबले राजेंद्र राशिनकर सुरेश कुऱ्हे नरेंद्र कुऱ्हे  वैभव कुऱ्हे शेषराव पवार राजेंद्र लगे भास्कर कुऱ्हे मल्हारी लगे आदिसह अनेकांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देवुन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी होती नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संप सुरु असला तरी मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात येतील हतबल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मीळणे गरजेचे आहे .त्याकरीता शासनाने शेतकरीपुत्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे

बेलापूर(प्रतिनिधी)ः  -बेलापुर बु !! परिसरातील अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूल व दुग्धविकास मंञी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांनी महसूल विभागाच्या अधिका-यांना दिले असल्याची माहिती जि.प सदस्य शरद नवले तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे, गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी दिली आहे                                   शनिवारी बेलापूर शिवारातील कुऱ्हे वस्ती,दिघी रोड,गोखलेवाडी,खंडागळे वस्ती,गायकवाड वस्ती परिसरास गारपीट व अवकाळी पावसाने तडाखा दिला.यात गहू,कांदा,हरभरा,ऊस,मका,द्राक्ष,टरबुज, डाळिंब आदि फळबाग व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची  जि. प. सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,संचालक महेश कुऱ्हे आदिंनी  शेतक-यांसह सर्वश्री नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर नागले,दत्ता साळुंके,अनिल वाबळे, श्रीहरी बारहाते,राहुल वाबळे,अर्जुन कुऱ्हे,जालिंदर कुऱ्हे,सुधाकर खंडागळे,मनोज मेहेत्रे,दादासाहेब कुऱ्हे,संतोष अमोलिक, प्रकाश मेहेत्रे, अशोक कुऱ्हे, नामदेव मेहेत्रे, कैलास कुऱ्हे,सोहम लगे,विलास कुऱ्हे,वृद्धेश्वर कुऱ्हे, किरण कुऱ्हे, अनिल कुऱ्हे, गोरक्षनाथ कुऱ्हे, सुनिल कुऱ्हे, राजधर खंडागळे, संजय भुजाडी, वाल्मिक भुजाडी, देवराम गाढे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, मका, ऊस, द्राक्ष, डाळिंब, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त भागाची पहाणी झाल्यानंतर  महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून नुकसानीची माहिती देण्यात आली तसेच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.या मागणीची दाखल घेत महसूल मंञी नामदार विखे पा.यांनी तातडीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.गावाचे लोकप्रतिनिधी तसेच महसूल मंञ्यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल आपदग्रस्त शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी बेलापुर  पोलीसांच्या मदतीने प्रवरा नदीपात्रातुन होत असलेल्या बेकायदा वाळू वहातुक करणाऱ्या वहानावर मोठी कारवाई करुन सात  लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला असुन तीन वहानावर कारवाई करण्यात आली आहे                                           उक्कलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असुन लगेच गेल्यास वाळूची वहाने मिळून येतील अशी गुप्त खबर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली त्यांनी तातडीने आपले वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ नंदु लोखंडे यांना सोबत घेवुन छापा टाकला असता तीन वहाने वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर वाळू वहातुक करताना आढळून आली पहील्या घटनेत रमेश धनवटे व अभिषेक किशोर गायकवाड रा उक्कलगाव हे प्रवरा नदीपात्रात नाव घाटाजवळ टाटा झेनाँन गाडी क्रमांक एमएच ४१ जी ९०७९ मधुन अवैधरित्यावाळु वहातुक करताना आढळून आले पोलीसांनी २ लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वाहातुक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपये किंमतीची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या बाबतची खबर पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिली  दुसऱ्या घटनेत गणेश फुलपगार उक्कलगाव व सागर साळवे राहणार बेलापुर हे उक्कलगाव शिवारात झेनाँन क्रमांक एमएच १९ एस ७३९४ मधुन अवैधरित्या वाळू वहातुक करताना आढळून आले पोलीसांनी दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वहातुक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीसऱ्या घटनेत नाना बाळू गुंजाळ हा एक पांढऱ्या रंगाचा टाटा झेनाँन क्रमांक एमएच १५ ईजी १७० किंमत रुपये दोन लाख पन्नास हजार व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा असा एकुण ७ लाख ६५  हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त  केला असुन संबधीता विरोधात भा द वि कलम ३७९ सह भारतीय पर्यावरण संरक्षक कायदा कलम ३/१५ प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे करत आहेत  [बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  व सर्व सदस्यांनी गाव व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीसांनी मोठी कारवाई केली असुन गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केली आहे ]

श्रीरामपूर : काल सायंकाळी सव्वा ५ वाजेच्या सुमारास, तपासासाठी आलेल्या जालना पोलिस अटक करतील या भीती पोटी. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील, ३५ वर्षीय जाकीर बबन पठारे नावाच्या इसमाने. ग्रामपंचायती शेजारील दुकानाच्या शेड मध्ये,स्वतःला पेटून घेतल्याची घटना घडली होती. ज्यात जखमी पठारे यास तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जाकीर पठारे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरू असतांना. १२ मार्च २०२३ च्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास, उपचार सुरू असतांना जाकीर बबन पठारे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने. दत्तनगर परिसरात शोककळा पसरली आहे. दत्तनगर येथे यापूर्वी देखील अशाच पद्धतीने एका युवकाने, स्वतः ला पेटवून आपली जीवनयात्रा संपवली होती आणि आता जाकीर पठारे याने देखील, स्वतः ला पेटून आपला जीव दिल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

बेलापूरःबेलापूर-खडाळा-अस्तगाव या कुऱ्हे वस्ती रस्त्याच्या उर्वरित कामाला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू देऊ असे आश्वसन खासदार सदाशिव लोखंडे यांनी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील कुऱ्हे वस्ती परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.

कुऱ्हे वस्ती वरील रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक तसेच कुऱ्हे वस्ती परिसरातील  नागरिकांच्या वतीने खा.सदाशिव लोखंडे यांच्याकडे करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार निधी मधून १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व नुकतेच त्या निधीतून रस्त्याचे काम करण्यात आले. याबद्दल श्री. लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात बेलापूर -खंंडाळा-अस्तगाव(प्रजिमा१२)हा रस्ता कु-हे वस्ती,जवाहरवाडी,टिळकनगर,रांजणखोल,खंडाळा,अस्तगाव असा आहे.हा रस्ता वर्दळीचा असून  वाहतुकीसाठी महत्वाचा आहे.तसेच हा रस्ता झाल्यास शिर्डी या तिर्थस्थळला जाण्यासाठी अत्यंत सोयीचा होणार आहे.या रस्त्यामुळे बेलापूर -श्रीरामपूर रस्त्यावरचा वाहतुकीचा भार कमी होणार आहे. सध्या हा रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहतुकीसाठी अडचणीचा झाला आहे.यामुळे सदर रस्त्याचे नुतणीकरण व मजबुतीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी खासदार निधीतून या रस्त्याचे कामासाठी निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे, प्रभात कुऱ्हे,अशोक कुऱ्हे,बापूसाहेब कुऱ्हे, सुनिल जाधव, दत्ता साळुंके, महेश कुऱ्हे, प्रफुल्ल कुऱ्हे, बापूसाहेब निर्मळ आदी उपस्थित होते.

बेलापुर- (प्रतिनीधी )राहुरी तालुक्यातील संक्रापुर येथील जाधव डीपी नादुरुस्त होवुन अठरा दिवस होवुनही नविन डीपी न आल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात भरुन न येणारे नुकसान होत असुन तातडीने डीपी देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंर्द मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे                                       पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की संक्रापुर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथील जाधव डी पी वर मोठ्या प्रमाणात शेतकरी अवलंबून असुन हे ट्रान्सफार्मर जळुन अठरा दिवस झाले अजुनही दुरुस्त करुन मिळालेले नाही या बाबत महावितरणकडे वारवार मागणी करुनही डीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे .राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्या जनता दरबारात देखील ही समस्या मांडलेली आहे त्या घटनेस देखील सहा दिवस उलटुन गेलेले आहे विज नसल्यामुळे सर्व पिके जळून चाललेली आहैत जनावरांच्या चारा पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असुन आपणच आमचे मायबाप आहात आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे या निवेदनावर देविदास देसाई, कल्याणराव जगताप, नबाजी जगताप, बाळासाहेब जाधव, नारायण जाधव ,बाळासाहेब गुंड, नंदकुमार लोंढे, वसंत बर्डे ,संपतराव होन, पंडीतराव थोरात ,विश्वनाथ जगताप, विकास पा थोरात, कचेश्वर जगताप, राजेंद्र जगताप, विश्वनाथ पवार ,वसंत लोखंडे, बाजीराव जगताप आदीच्या सह्या आहेत

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget