Latest Post


भारतीय  लहुजी सेना  अहमद नगर जील्हा प्रमुख  रज्जाक  भाई  शेख यांच्या घरी पोळा हा सन साजरा करन्यात आला त्या प्रसंगी लहुजी सेने चे बाळासाहेब बागुल हानीफभाई  पठान  प्रशांत भाऊ सलून वाले अशपाक फीटर शींपी शेठ सुफीयान भाई दीलीप राव प्रकाश गायकवाड़  शेरू भाई आदी मान्यवर उपस्थित होते

श्रीरामपूर : ३ ते ४ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यां पासून, प्रशासन देखील तैयारीला लागले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा या करिता पोलीस, महसूल,महावितरण,नगरपरिषद यासह तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील वाहतुक व्यवस्था, अखंडित विद्युप्रवाह,विसर्जन व्यवस्था, मोकाट जनावरे,सुरक्षा दृष्टीने पोलीस बंदोबस्त. यासह अनेक विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले. यावेळी मांडलेल्या विविध विषय व प्रश्ना संदर्भात, सकारत्मक निर्णय घेण्यात येईल असावं असे आश्वासन, प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. प्रशासकीय इमारत याठिकाणी झालेल्या बैठकीस, प्रांताधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, मुख्याधिकारी गणेश शिंदे ,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, आदी अधिका-यांसह, अहमदभाई जहागीरदार, कामगारनेते नागेशभाई सावंत,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नाऊरचे सरपंच संदीप शेलार,बेलापूरचे उपसरपंच अभिषेक, खंडागळे,समाजवादी पार्टीचे जोयफ जमादार ,आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, माजी नगरसेवक मुक्तार शाह, कुणाल करंडे,कैलास बोर्डे, सतीश सौदागर, रियाज पठाण, पत्रकार अस्लम बिनसाद, पत्रकार देविदास देसाई, आदींसह तालुक्यातुन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी-Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर ते औरंगाबाद जाणारे रोड वर वडाळा  बहिरोबा शिवारातील हॉटेल साई सबुरीचे पाठीमागे काही इसम हे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहेत त्यानुसार त्यांनी लगेच आपले पथकातील अधिकारी, अंमलदार आणि नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या समवेत पुरवठा विभागातील कर्मचारी यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा व किमतीचा अवैध मुद्देमाल मिळून आला. -1) 5,00,000 रू कि चा .   एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक MH 16 CC 2488 जु.वा कि.अं.2) 2,08,000 रू.कि च्या भारत गँसच्या  अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल मोकळ्या 87 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या जु.वा .कि.अं3) 12,000रू कि.च्या नोझलला लावलेल्या इंडियन गँसच्या  कमर्शिअल मोकळ्या 5 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या जु.वा .कि.अं. 4) 2500 रू कि.चा एक HP कंपनीची घरघुती गँस सिलेन्डर 14.5किलो क्षमतेचा अंदाजे 5किलो गँस असलेला जु वा कि.अं.5) 1,32,000रू किमतीचे टेम्पोमध्ये  भरलेल्या भारत गँसच्या  अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल भरलेले 30 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे  जु.वा .कि.अं 6)22,000 रू.कि चे टेम्पोमध्ये  भरलेले इंडियन गँसचे अर्धवट निळ्या रंगाचे कमर्शिअल 05गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे  जु.वा .कि.अं 7)1200रू कि.चे निळ्या रंगाचा अंदाजे 5 फुट लांबीचा प्लास्टीक पाईप त्याला पांढ-या रंगाचे 06 नळ्या जोडलेल्या असुन प्रत्येक नळीला समोरील तोंडास नोझल जोडलेले जु.वा कि.अं. 8)1000 रू कि.चे एक 2इंच व्यासाचा लोखंडी पाईप त्याला काळ्या रंगाचे अंदाजे अर्धा इंचाचे व 5फुट लांबीचे काळ्या रंगाचे प्लास्टीकचे पाईप जोडलेले असुन त्यांना प्रत्येक पाईपला एक असे  05 नोझल जु.वा कि.अं. 9)2500रू कि.चे काळ्या रंगाचा अंदाजे दिड इंच व्यासाचा अंदाजे 25ते 30 फुट लांबीचा  रबरी पाईप जोडलेला असुन त्याच्या पुढील बाजुस लोखंडी साँकेट जोडलेले असा एकूण सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानुसार आरोपी विरुद्ध पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांचे फिर्यादीनुसार शनिशिंगणापूर गु.र.नं -97/2022भादवी कलम 379,285,34 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3,7 सह LPG पुरवठा वितरन आणि नियमन आदेश 2000 चे कलम 3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली Dysp  संदीप मिटके , नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पुरवठा अधिकारी रुपाली मोडसे, Api  रामचंद्र करपे,Asi  राजेंद्र आरोळे,Hc ज्ञानेश्वर माळवे, रमेश लबडे, संतोष वाघ,Pc नितीन शिरसाठ आदींनी केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अधिवेशन संपल्यावर लवकरच जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या व रेशन कार्डधारकांच्या अडचणी समजुन घेवुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेला दिले अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवुन दुकानदारांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या .या वेळी  दुकानदारांच्या विविध अडचणी मांडताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले की जिल्ह्यात वेळेवर धान्य वहातुक न झाल्यामुळे अनेक दुकानदारांना महीना संपल्यावर धान्य उपलब्ध  होते. महीना बदलल्यामुळे ते धान्य मशिनवर दिसु शकत नाही. त्यामुळे धान्य असुनही कार्डधारकांना त्याचे वाटप करता येत नाही. पर्यायाने कार्डधारकांचे धान्य बुडते. त्यामुळे धान्य वहातुक सुरळीत करण्यात यावे गेल्या काही महीन्यापासून धान्य वाटप करण्याच्या पाँज मशिनला अनेक अडथळे येत असल्यामुळे दुकानदारांना धान्य वाटप करणे मुश्कील झाले आहे धान्य असुनही वाटप करता न आल्यामुळे दुकानदारांना कार्डधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे .माल आल्यानंतर तो वेळेवर मशिनवर टाकला जात नाही दुकानदारांनी मोफत धान्य वाटप केले परंतु त्याचे मार्जिन अद्यापही दुकानदारांना मिळालेले नाही राज्य शासनाने मे 2021मध्ये मोफत धान्य देण्याचे जाहीर केले त्याचे पैसे दुकानदारांनी भरलेले होते ते कमिशनसह परत मिळावे दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी अशा मागण्या दुकानदारांच्या शिष्टमंडळाने  नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्याकडे केल्या. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरगे ,श्रीरामपुर धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वहाडणे, गणेश येलम ,श्रीकांत म्हस्के, कृष्णा गागरे, बाळासाहेब धनवटे ,अजीज शेख, किशोर चेचरे आदिंचा समावेश होता

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेवून धर्मांतर करुन निकाह करत अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी मुल्ला कटर व त्याच्या टोळीला पुढे कोणतेही गुन्हे उघडकीस येवू नये म्हणून मदत केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी  निलंबीत केले आहे.श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मधील अहिल्यादेवीनगर भागात राहणार्‍या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिचे धर्मांतर करत तिच्याबरोबर निकाह करुन सलग तीन वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्याकडे होता.या प्रकरणाचा तपास करत असताना असेच आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पाहून मुल्ला कटर व त्यांच्या टोळीस पोलीस निरीक्षक संजय सानप हे मदत करत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. मात्र त्याची दखल श्रीरामपूरात घेण्यात आली नसल्याने फिर्यादी महिलेने याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणाची शहनिशा केली असता संजय सानप हे दोषी आढळून आले. त्यात त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. याप्रकरणातच दोन दिवसापूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी या पोलिसास निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्दची तक्रार पाहून त्यांना निलंबित केल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

श्रीरामपूर: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील रस्त्यांवर कमालीचे खड्डे पडले आहेत या खड्डेरहित रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते, शिवाय सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग या रस्त्यावर वाहन चालविणे तर सोडाच पादचाऱ्यांना पायी चालणे देखील मोठे मुश्किल झाले होते.अशात या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे छोटे - मोठे अपघात होणे हे नित्याचेच होऊन बसले होते.याबाबत समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनास संबंधित बाबी अनेकवेळा कळवूनही नगर पालिका प्रशासन कुठलीच दखल घेत नव्हते,नगर पालिकेकडे जर सदरील कामांसाठी निधी उपलब्ध नसेल तर समाजवादी पार्टी भिक मांगो आंदोलनाद्वारे श्रीरामपूर न.पा.ला निधी उपलब्ध करुन देईल या अनुषंगाने जोएफ जमादार यांच्या

मार्गदर्शनाखाली समाजवादी पक्षाने भिक मांगो आंदोलन करत जनसामान्यांसोबत आपली नाराजगी दर्शविली होती,या आंदोलनात आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण,इमरान शेख, रिजवान बागवान, ज़केरिया सैय्यद,अरबाज़ क़ुरैशी,रवी बोरसे, कलीम वेल्डर,अब्दुल सैय्यद, मतीन शेख, राजू शेख, साद पठाण, मुबस्शिर पठाण, गुड्डु जमादार आदींनी आपला सहभाग नोंदवला होता,या आंदोलनाची येथील उप विभागीय (प्रांत) अधिकारी तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष प्रशासक मा.श्री. अनिल पवार साहेब आणि मुख्याधिकारी मा.श्री.गणेश शिंदे साहेब यांनी दखल घेत सदरील सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग रस्त्याची कामे चालु केल्याने शहरातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी उशीरा का होईना मात्र नगर पालिका प्रशासनाने समाजवादी पार्टीच्या आंदोलनाची दखल घेत सदरील कामे चालु केले असल्याने समाजवादी पार्टी तर्फे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाचे अभार व्यक्त करण्यात येत आहे.मात्र सदरील विकास कामांनिमित्त काही दिवस सदरील मार्ग हा रहदारीकरीता बंद राहणार आहे म्हणून तृर्त पर्यायी मार्ग म्हणून वॉर्ड क्र.१ मधील सिद्धार्थनगर (मुस्लिम कब्रस्तान जवळील) ते भारत गॅस कंपनी दरम्यानच्या रेल्वे भुयारी मार्गचा वापर करुन नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे असेही श्री.जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

श्रीरामपूर वार्ताहर-श्रीरामपूर येथील रेल्वे भुयारी पुलाजवळ टँकरचा अ‍ॅक्सल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. सदरचे वाहन क्र एम एच 43 यु 2296 असुन यावेळी वाहन चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावरील ताबा सुव्यवस्थीत ठेवला.यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु दुर्घटना अगदी बोगद्याच्या तोंडाजवळ असल्याने वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी निर्माण झाली होती. यावेळी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी तहसील कार्यालय तसेच विविध प्रकारची शासकीय कार्यालय न्यायालय आदी ठिकाणच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.घटनेची माहिती नागरिकांमधून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आली. यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शफिक शेख यांनी घटना स्थळी भेट देत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक सचिन गायकवाड, सादिक शेख, दत्तात्रेय सातकर, तसेच गृहरक्षक दलाचे महेश थोरात, राहुल जाधव, रेवननाथ पेठे, नारायण चोरमले, हारी कदम, राजेन्द्र देसाई यांनी चोख बंदोबस्त बजावले.यावेळी नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. मळीचे टँकर वाहतुकीसाठी बाहेरच्या मार्गाने घेऊन जाणे आवश्यक आहे. परंतु शहरांमधूनच मळीची वाहतूक होत असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत संबधित विभागाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. साधारण 2 ते 3 तास वाहतुकीची कोंडी झाली असुन पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget