Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-ग्रंथ समजुन घ्या ग्रंथ समजले तरच संत समजतील अन संत समजले म्हणजे भगवंत समजतील. त्यामुळे ग्रंथाचा भावार्थ समजुन त्या प्रमाणे आचरण करा असे अवाहन पंढरपूर च्या पहिल्या पायी दिंडीचे मानकरी . ह. भ. प.भानुदास महाराज { हिरवे } बेलापूरकर यांनी केले.

-येथील श्री.हरिहर केशव गोविंद भगवान अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,व किर्तन महोत्सवाचे  ३ रे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते पूढे म्हणाले—देव ओळखण्यासाठी गुरु करावा लागतो,गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही.  देवाचे प्रेम आपणाला सांगता येत नाही.देव कोणालाच दिसत नाही.संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांना देव समोर आले असतांही ते त्यांना समजले नाही.

साधू, संताचे जीवन आपणाला जगता येणार नाही.आचाराने, विचाराने प्रत्येकाने आपले जीवन जगावे यासाठी संताच्या दिंड्या निघतात.परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संत दुःखावर प्रेम करतात.संताचे चरण घरात आले तिथेच आनंद मिळतो.देव,देश, आणि धर्माची सेवा करा! मी वयाच्या १९ व्या वर्षापासून किर्तन सेवा करतो.माझ्या वडींलाच्या व राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज बेलापूरकर यांच्या जन्मभूमीत किर्तन करण्याचा " योग" मला आला यांचा आनंद होतो.परमार्थ हा सुखाचा सागर आहे त्याचा अंगीकार करा जिवन आनंदी व सुखमय होईल असेही ते म्हणाले

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील स्थानाकवासी जैन संघ अध्यक्ष व विश्वस्तांनी स्थानकाच्या केलेल्या इमारतीच्या प्लॅनला नगरपालिकेकडून गेल्या 15-20 वर्षांत कायदेशीर मंजुरी न घेता बांधकाम केले आहे. नगरपालिकेने प्लॅन मंजूर करावा किंवा विश्वस्तांनी मंजुरीच्या कागदपत्रांची पूर्तता करून बांधकाम नियमित करावे अन्यथा अध्यक्ष व विश्वस्त यांचेविरुध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी समाजिक कार्यकर्ते अमित मुथ्था यांनी काल गुरुवारी सकाळी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते.मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी उपोषणार्थी व जैन समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना सायंकाळी 5 वा. नगरपालिका कार्यालयामध्ये चर्चेसाठी बोलावून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी समाजातील ज्येष्ठ सदस्य रमेश कोठारी म्हणाले, जैन स्थानकाची होत असलेली वास्तू ही कायदेशीर वास्तू असावी. भविष्यात तरुण पिढीला त्यासंदर्भात काहीही बेकायदेशीरपणासाठी प्रयत्नांची वेळ येऊ नये. आम्ही व अमित मुथ्था यांनी बांधकाम प्लॅन मंजुरीसाठी अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही कार्यवाही झाली नाही. स्थानकवासी संघाचे अध्यक्ष जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.मुख्याधिकारी गणेश शिंदे यावेळी म्हणाले, अमित मुथ्था यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची मागणी रास्त आहे.स्थानकवासी जैन संघ अध्यक्ष व विश्वस्तांना आम्ही वेळोवेळी पत्र दिले. समक्ष बोलावले परंतु अद्याप त्यांचेकडून पूर्तता झाली नाही. त्यामुळे स्थानक बांधकाम मंजुरीचे प्रकल्प प्रलंबित आहे. आम्ही त्यांना मंजुरीच्या कामासाठी व कागद पत्रासाठी 1 महिन्याची मुदत द्या. 1 महिन्यात ही पूर्तता झाली नाही तर नगरपालिका त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करील, त्यामुळे अमित मुथ्थांनी उपोषण मागे घ्यावे तसे लेखी आश्वासन दिले.आश्वासनानंतर अमित मुथ्था यांचे उपोषण मुख्याधिकारी शिंदे यांनी सरबत देऊन सोडले.यावेळी मुथ्था यांचे समवेत अभय मुथ्था, सतीश चोरडिया, किरण लुणिया, रमेश कोठारी, रमेश गुंदेचा, राजेंद भंडारी, हेमंत खाबिया, मनसुख चोरडिया, प्रकाश समदडिया, दिलीप लोढा, दीपक गांधी, दीपक संघवी, सचिन गुंदेचा, रोहित भंडारी, सुमित गांधी, सचिन समदडीया, गिरीश बाठिया, महेश सोनी,हर्ष चोरडिया, मनोज बोरा आदी उपस्थित होते.

राहुरी प्रतिनिधी-राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोडलगत असलेल्या गोदामात ड्रग्जसदृश्य अंमली पदार्थ व औषधांचा सुमारे सव्वाकोटी रुपये किंमतीचा मोठा बेकायदा साठा आढळून आला. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस पथकाने बुधवारी (दि.03) रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली आहे.दरम्यान, घटनास्थळी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाने येऊन संबंधित औषधांची तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. ही अंमली पदार्थांची तस्करी कोठे कोठे सुरू होती? या तस्करीत कोण कोण सामील आहेत? याचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे. उशिरापर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून बसले होते. तर मुद्देमालाची पॅकिंग करून ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. काल सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी जाऊन बेकायदा साठ्याची पाहणी केली.गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती.

याची खबर पोलीस पथकाला लागली. काल सकाळी राहुरी येथील चार ते पाचजणांची पोलीस पथकाने धरपकड केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती घेतली. त्यानंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अंमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, महिला पोलीस उप निरीक्षक ज्योती डोके, आदींसह डीवायएसपी पथकातील फौजफाट्याने दुपारी तीन वाजे दरम्यान राहुरी शहरहद्दीतील बारागांव नांदूर रोड परिसरात असलेल्या शिवचिदंबर मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एका पत्र्याच्या गाळ्यात धाड टाकली. त्याठिकाणी उत्तेजित करणार्‍या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणार्‍या गोळ्या तसेच ड्रग्जसारखा अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचा हा मुद्देमाल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

बेलापूर (प्रतिनिधी )-"ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे" असे ठणकावून सांगणारे, बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती येथील विजय स्तंभ चौकामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 याप्रसंगी रमेश शेलार, सुहास शेलार, तानाजी शेलार, विजय शेलार, भाऊसाहेब राक्षे, बाबासाहेब शेलार, उदय शेलार, बंटी शेलार आदि जेष्ठ समाज बांधवांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बेलापूर येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटना व ग्रामपंचायतिचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी अण्णाभाऊंच्या प्रतिमेची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळीआमदार लहूजी कानडे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण नाईक, बेलापूर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, माजी जि प सदस्य शरद नवले, जनता विकास आघाडीचे रवींद्र खटोड, सरपंच महेंद्र साळवी, माजी सरपंच भरत साळुंके, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुक्तार सय्यद, माजी उपसभापती दत्ता कुऱ्हे, विलास मेहेत्रे, पंडित बोंबले, प्रकाश कुऱ्हे, अनिल पवार, अय्याज सय्यद, पत्रकार विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, दीपक क्षत्रिय, किशोर कदम, अतिश देसरडा, भाऊसाहेब तेलोरे, अल्ताफ शेख, शशिकांत कापसे, बाळासाहेब दाणी आदी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त अभिवादीत केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहन शेलार, उपाध्यक्ष दिनेश सकट, रोहित शेलार, निखील शेलार, संकेत शेलार, तुषार शेलार, संदेश शेलार, अदित्य शेलार, सचिन खाजेकर, अतिश शेलार, निशिकांत शेलार, रामा उमाप, ऋतिक शेलार यांच्यासह बाळासाहेब शेलार, नंदू शेलार, सुभाष शेलार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 " ईस्लाम समजून घेताना " लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-"🌹🌹  इस्लामी हिजरी नये १४४४ साल (वर्ष) मुबारक हो '"🌹🌹

 ईस्लामी कालगणना नुसार " मोहररम " हा पहिला महीना, "हिजरी "  कालगणने, कॅलेंडर नुसार .अल्लाह च्या( सत्यधर्माचा)ईसलाम चा प्रचार प्रसार मकके मध्ये करीत असताना तेथील स्वधर्मियांनी आतोंनात छळ यातना प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या अनुयायींना देत होते,खुपदा  संघर्षाची थिंनगी विरोधी करत , तीन वर्ष सामुदायिक बहिष्कृत- बहिष्कार घातला गेला, छळ कपटाला आकरा वर्ष तोंड देत देत शेवटी हजरत प्रेषित मुहम्मद स्व  यांनी स्वदेश सोडून दुसऱ्या देशात राहुन सर्व जगात अल्लाह च्या सत्यधर्माचा प्रचार प्रसार करण्याचा निश्चिय करून मक्का पासून चारशे किलोमीटरहून जास्त असलेले तेव्हाचे " यसरब " व आजचे " पवित्र मदीना " शहर निवडून तेथे " स्थलांतरित " होण्याचे ठरविले . प्रेषित मुहम्मद स्व. हे १६ जुलै ६२२ रोजी पवीत्र मक्का हुन पवित्र मदीना साठी स्थलांतर करण्यात आलेल्या प्रवासाला - प्रयाणाला आरबी भाषेत " हिजरत '" म्हणतात . त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून त्यांच्या खास जवळील मित्र इस्लामिक एतिहासातील पहीले खलिफा हजरत अबु-बकर सिददीक रजि. दुसरे खलिफा हजरत उमर व असंख्य मित्रमंडळी ( सहाबा) च्या सल्लागार मंडंळीच्या एकत्र सल्ला मसलतीने  त्या वर्षी हिजरी साल म्हणुन मान्यता दिली गेली त्याला आज १४४३ वर्ष पुर्ण झालीत.यालाच " हिजरी " हिजरा Hirahसाल ही म्हणतात.

प्रत्येक वर्षी च्या संख्येच्या शेवटी ' H ' म्हणजे हिजरा Hijrah " ला संक्षिप्त स्वरूपात, भाषेत इंग्रजी   एच'   H '  लावले जाते. 

  " AH  " लॅटिन वर्णमालेमधील, भाषेत ANNO HIJRI" अन्नो हिजरा" लिहिले जाते. 

परंतु प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या प्रवासाच्या, स्थलांतर च्या अगोदर  "  BH ' '' before Hijarat ' हा शब्द, प्रयोग वापरला जातो. म्हणजेच प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या जन्म तारखेला 53 BH   असा लिहिले जाते.. अर्थात सध्याच्या घडीला ला हिजरी 1443 वर्ष पूर्ण होउन.. 1444 वर्षात पदार्पण झालेले आहेत. 

                  हिजरी इस्लामी कालगणना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील परस्परसंबंधावर आधारित आहे.चांद्रमासाचा कालावधी सुमारे २९.५३ दिवसांचा असुन त्यानुसारच आपण १२ महिन्यात गुणल्यास वर्षांचे ३५४ दिवस होतात . 

         परंतु हिंदू कालगणना ही सौर म्हणजे सुर्य पृथ्वीच्या परस्परसंबंधावर असल्याने त्यांचे ३६५ दिवस  व १ जानेवारी ही जगातील सर्व देशांनी मान्य केलेली ग्रेगोरियन कॅलेंडर लॅटिन ANNO Domino ग्रेगोरियन कॅलेंडर ,हे येशू ख्रिस्ताच्या जन्मावर्षीपासून करतात .त्यांचे ही ३६५-६६ होतात .

        तर सौर व चंद्र वर्ष यांच्यामधे १०-११ दिवसांचा फरक होत असतो ,तर हिंदू मधील सौर कालगणनेतील १०-११ दिवसांच्या फरक , तफावत भरून काढण्यासाठी भारतीय पंचांग करत्यांनी त्यामधे " आधीकमासा' ची ' क्ष' चापास ची योजना केली आहे .

    ""  गुढीपाडवा " हिंदू नववर्ष आरंभ म्हणजे " चैत्र " महीना पहिला.. हिंदू कालगणना ही सातवाहन राजा शालिवाहन राजाने त्यांच्या जन्मप्रारंभापासून " शालिवाहन शक किंवा शालिवाहन संवत्सर" सुरू केले . सध्या शालिवाहन शके १९४४ चालू आहे. 


ईस्लाम कालगणना नुसार  मोहररम हा इस्लामी पहिला महीना व प्रत्येक महीन्याच्या सुरुवात ही चांदरात  ने होत असते . त्यामुळे प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " मुहररम हा अल्लाह चा महीना आहे.."'( सहीह मुस्लिम शरीफ हा. न. ११६३) 

  प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी सांगितले की, " तुम्ही अल्लाह जवळ जे शुभ शुभ चिंतन, करुणा, दया,शांती मगफीरत,जन्नत ,माफी ,चांगले आरोग्य, हलाल रोजी,चांगले जे मागता येईल ,ज्या ईच्छा असतील,त्या सर्व गोष्टींची याचना करा.तो अल्लाह, ईश्वर, परमेश्वर आहे त्यांच्या खजिन्यात काहीही कमी नाही तो कायम देणाराच आहे "'

सर्वांना हिजरी नवीन १४४४ वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. अल्लाह यावर्षी सर्वांच्या अकाक्षा,ईच्छा पुर्ण करो... आमीन.... 


  🌷डॉ सलीम सिकंदरशेख .

  🌷बैतुशशिफा हॉस्पिटल 

  🌷श्रीरामपूर ९२७१६४००१४ 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌷🌷

राजूर वार्ताहर-कोल्हार-घोटी रोडने एक इसम चारचाकी वाहनातून दारुचे बॉक्स घेवून जात असतांना हे वाहन पोलिसांनी पकडले. यामध्ये 16 हजार रुपयांची दारु व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.पोलिसांनी कोल्हार-घोटी रोड वर केळुगंण फाटा येथे नाकाबंदी केली होती. दरम्यान एक व्यक्ती मारुती कंपनीची अल्टो गाडी क्रमांक एम. एच. 04 -सीएम. 8666 घेवून समोरुन आला. सदर गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 16,800 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 240 सिलबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली, व 1,50,000 रुपये किमतीच्या मारुती कंपनीची अल्टो गाडी असा एकुण 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दारुची वाहतूक करणारा किसन सोना बांडे (वय 45 वर्ष, रा. खडकी खुर्द, ता. अकोले) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 162/2022 मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम 65 (अ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाडेकर करत आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रकाश भैलुमे, पो. हवालदार विजय मुंढे, पो. कॉ. अशोक गाढे, पो. कॉ. अशोक काळे, पो. कॉ. आकाश पवार, राकेश मुलाने यांनी ही कारवाई केली.

श्रीरामपूर : शहरातील अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल बँकेच्या आवारात, आज दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास.अशोक सहकारी साखर कारखाना चे अधिकारी, सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते. दरम्यान सुरक्षा रक्षक, दशरथ कारभारी पुजारी हे, बँके बाहेरील एटीएम समोर बसलेले असतांना. अचानक पणे त्यांच्या जवळील रायफल मधील गोळी सुटल्याने, बॅंकेत कामासाठी आलेल्या. ४२ वर्षीय अजित विजय जोशी या इसमास सुटलेली गोळी लागल्याने दुर्दैवी मुत्यु झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल

झाले असून. सदरची दुर्घटना कशी झाली याबाबत त्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. सदरची घटना शहर मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या घटने नंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षकास विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असून. मयत अजित जोशी हे प्रगत शेतकरी असून, ते वार्ड नंबर ७ मधील सार्वमत रोड परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget