Latest Post

श्रीरामपूर-लेखक:-डॉ सलीम सिकंदर शेख - ईस्लाम या शब्दाचा अर्थ,"अल्लाहा (ईश्वरा) समोर संपूर्ण समर्पण करणं " असा होत असून ' आरबी " भाषेत त्याचा अर्थ " शांतता " असा होतो. श्रद्धेसाठी तांत्रिक दृष्टीने वापरण्यात आलेला शब्द " ईमान " असून मुळ शब्द " अमन " अमन पसंद " त्याचा अर्थ ही " शांती " च होतो. कोणत्याही कार्याची सुरुवात ही ," बिस्मिल्लाह- हिर- रहमान निर- रहीम " अर्थात :- अल्लाहा च्या नावाने सुरूवात करतो ,जो कृपाळू -दयाळू आहेत.

पवित्र कुराण ची सुरुवातच आशा आयातीने होउन पहील्या पारा १  व पहील्या सुराहा नं.१ यामध्ये , (१)सर्व स्तुती ही फक्त अल्लाहा साठीच आहेत ,जो संबंध सृष्टीचा रब आहे. " रब " या शब्दाचा अर्थ मालक , पालनपोषण करणारे, समस्त सृष्टीची काळजी घेणारी, देखरेख करणारे,शासक व्यवस्थापक , (२) तोच एकमात्र कृपावंत,दयावंत आहे , (३)प्रलय(कयामतच्या) दिवसाचा स्वामी फक्त तोच आहे,(४) आम्ही, सर्व जण तुझीच बंदगी ( ईबादत , भक्ती ) करतो ,(५) फक्त व फक्त तुमच्या जवळच (पाशी)मदत मांगतो ,(६) आम्हाला सरळ मार्ग दाखवं ,(७)जे कोपग्रस्त झाले नाहीत, व जे मार्ग भ्रष्ट नाहीत ( अर्थात, ज्या मार्गाने तुम्ही खुश आहेत ) असा सरळ मार्ग आम्हाला दाखवां..( अल-,फातिहा १ ते ७).

पहिल्या प्रथमच पवित्र कुराण मधे ईस्लामचा स्वभाव, वैशिष्ट्ये दर्शवली आहे.  त्यामधे शांतता, स्नेहभाव, प्रेम, परोपकार आहे, वविशेष महत्त्व प्राप्त झालेत ते प्रेम, करुणा, सहानुभूती ही बांधवाप्रती व संपूर्ण सृष्टीप्रती .

या संबंध सृष्टीला मार्ग , दिशा दाखवण्यासाठी वेळोवेळी  सव्वा लाख प्रेषीत पाठवले.त्यात अंतिम प्रेषित मुहम्मद स्व यांना सृष्टीच्या मार्गदर्शनासाठी त्या बरोबरच पवित्र कुराण हे समस्त सृष्टीला "जीवन कसे जगावे " यासाठी पाठवले.

  प्रेषित मुहम्मद स्व . सांगताना की, " सर्व निर्मित  प्राणीमात्र अल्लाहा (ईश्वरा) ची लेकरे आहोत म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या मानवी शी जो प्रेम करतो, त्यांच्या शी अल्लाहा (ईश्वर) प्रेम करतात ."

पवित्र कुराण म्हणते ," जो अणु-रेणू ईतके ही सत्कर्म , त्याचे ही फळ त्याला जरूर मिळेल, व जो अणु- रेणू ईतके ही दृष्ट - कर्म (वाईट कृत्ये )करील त्याला त्याचे वाईट फळ  ( त्याला चाखायला मिळेल) मिळेल."  (सुराह नं.८ अल- जिल -जलाल आ.नं.८).

  सृष्टीच्या निर्मितीनंतर चे पहिले प्रेषित हजरत अदम ( अॅडम) अलै. यांच्या पुत्र  कैन याने त्याच्याच भाउ ' अबेल ' ची हत्या केली .या जगात  घडलेल्या पहिल्या पहिल्या खुना बदल पवित्र कुराण मधे अल्लाहा  सांगतात , "  कोणाचीही हत्या न घडता पृथ्वीवर उपद्रव मागविण्या करिता ,. जो  एखाद्या ही माणसाचा खुन , हत्या करील ..तर ..समजा त्याने  संपूर्ण मानवजातीची हत्या  केली व करणारा ठरैल ..., व....जो कोणी एका मानवाचे रक्षण करील ...त्या व्यक्तीला अखिल, सर्व , मानवी जातीचे रक्षण केल्या सारखं होईल .ते श्रेय मिळेल..''"( सुराह नं.५ अल- माईदा ,आ.नं.३२ वी).

        ईस्लाम धर्माने देशात, समाजात कोणत्याही प्रकारची हिंसक कारवाया करण्यासाठी मुळीच परवानगी दिलेली नाही व देत ही नाहीत. पृथ्वीवर मानवी कल्याणासाठी व सुखरूप राहावं म्हणून या जगात अल्लाहा सुधारणा घडवून आणण्यासाठी पवित्र कुराण मधे स्पष्ट शब्दात आदेश देतात की, "  पृथ्वीवर  तिच्यामधे सुधारणा घडवून आणा व सुधारणा घडवून आणल्या नंतर पृथ्वीवर उपद्रव ,कलह माजवू नका , आणि भयमुक्त आशेने अल्लाहा (ईश्वर) ची प्रार्थना करीत राहा . अल्लाहा चे वरदान ,कृपा ,कायम सत्कर्मे करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत."  ( सुराह अल -आराफ आ.नं.५६ ).

वरील सर्व पवित्र कुराण व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या सांगण्यावरून हे लक्षात येते की जे जे लोकं आपल्या दृष्ट प्रवृत्ती ने , दृष्ट विचाराने ,वागण्याने , पृथ्वीवर जाणूनबुजून कलह , उपद्रव ,विष पसरविण्याचे काम , प्रयत्न करतात त्यांच्या साठी एक प्रकारची तंबीच आहे.व जे जे खरोखरच पुण्यं च , समाजातील सर्वच थरातील लोकांच्या कल्याणासाठी झटतात त्यांच्यासाठी एक वरदान च आहे.

   ईस्लाम ने कोणत्याही जाती धर्माचा कधीच केव्हाही तिरस्कार केला नाही .ईतर कोणत्याही बाबतीत बळजबरी करण्याची कधीच परवानगी दिली नाहीत.याबाबत ..

पवित्र कुराण म्हणते की, " धर्माच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती नाही.."(सुराह नं. २ अल- बकराह आ.नं.२५६).

                         हे सत्य आहे की ईस्लाम अत्याचाराविरोधात, असत्या विरोधी , अन्यायाविरुद्ध , जे जे लोकं नाहक त्रास देतात त्याविरोधात,  स्रीयां वर जेथे जेथे अत्याचार  किंवा त्यांच्या चारित्र्यावर हनन होत असेल तर , स्त्रियांच्या रक्षणा साठी आवाज उठवतो .. जेथे जेथे काही चुकीचे होत असेल आशा ठिकाणी आवाज उठवण्यासाठी परवानगी देतो .

             परंतु , सर्व आक्रमकांना , विरोधकांना , शक्य तो  संयमाने ,नेमेस्त पणे ,शांतीने उत्तर द्यायचे आव्हान करतो .

याबाबत पवित्र कुराण म्हणतात की," तुम्हाला जर बदला घेण्याचा असेल तर ,जितक्या प्रमाणात तुमच्या वर  करण्यात आला ,आगदी  तेवढ्याच प्रमाणात ...पण , परंतु ...जर संयम राखाल तर तुमच्यासाठी ते अधिक चांगले होईल ...जर शांतते कडे त्यांचा कल असेल तर तुम्ही ही शांततेकडेच झुका .." , सुराह नं. २ अल - बकराह आ.नं.८१).

यासर्व पवित्र कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या  आदर्शवत शिकवणीनुसार व जीवन चरित्रानुसार  हे निर्विवाद सत्य व सिध्द  होते की ईस्लाम कधीच केव्हाही जातीयवाद विद्वेष व दहशतवादी कारवाया करण्यासाठी कधीच उत्तेजन देत नाहीत . ईस्लाम चा कायम शांततेकडे कल ,झुकाव राहीलेला आहेत....

डॉ सलीम सिकंदर शेख  बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर ९२७१६४००१४

संगमनेर प्रतिनिधी-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेरात गुरुवारी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीला काही तरुणांकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला.मिरवणूक मेनरोडवर येताच एका समाजाचे काही तरुण हिरवे व लाल झेंडे घेवून मिरवणुकीत घुसले. या तरुणांनी घोषणाबाजी करत दुसर्‍या समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या. तसेच काहींना धक्काबुक्की करत महिलांना अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 100 ते 120 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मेनरोड येथे आली असता एका समाजाच्या काही तरुणांनी हातात हिरवे व लाल झेंडे घेवून मिरवणुकीत प्रवेश करत घोषणाबाजी केली. यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण झाला. घोषणाबाजी करत असतांना मिरवणुकीतील काही महिलांना या तरुणांनी अपमानास्पद वागणूक दिली. तसेच धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने मिरवणुकीतील रथासमोर विक्षीप्त हावभाव करत रथ अडविण्याचा प्रयत्न केला. व पुतळ्याची हेळसांड करुन धार्मिक भावना दुखावल्या. फिर्यादी व साक्षीदार यांच्या जातीय विषयी दुसर्‍या समाजात द्वेष निर्माण करुन दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने या तरुणांनी गैरवर्तन केले. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे 3 वाजता किशोर सुदामराव चव्हाण (रा. दिल्लीनाका, संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी फिरोज गुलाब बागवान (रा. मोमीनपुरा), अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इकबाल बागवान, सोहेल इकबाल शेख, अल्ला अजीज शेख, हमजा शेख, साबीर शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, फैजान गफ्फार याचा मुलगा (नाव माहित नाही), मारुफ अस्लम बागवान व इतर 100 ते 120 (सर्व रा. संगमनेर) जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 270/2022 भारतीय दंड संहिता 295 (अ), 296 (अ), 153 (अ), 453 (अ), 143, 147, 120 (ब), 323 व अनुसुचित जाती जमाती अधिनियम सुधारित कायदा 2015 ते कलम 3(1), (यू)(व्ही)(डब्ल्यू), 3 (2) (5, ए) प्रमाणे दाखल केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी मारुफ अस्लम बागवान (वय 20, रा. बागवानपुरा, संगमनेर), अब्दुल समद जावेद कुरेशी (वय 21, रा. भारतनगर, संगमनेर) यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे.


लेखक -  डॉ. सलीम सिकंदर शेख-पवित्र दिव्य कुरआन  नुसार ,"" ज्याने मला जन्म दिला आहे ,तो ही मला सरळ मार्ग दाखवतो  # तोच मला अन्न-पाणी देतो #,आणि आजारी पडलो तर तोच मला बरा करतो# तोच मला मृत्यू देईल आणि मग पुन्हा तोच मला कयामतच्या दिवशी जिवंत करील # आणि ज्यांच्यापासून मी आशा बाळगतो की,तोच (कयामतच्या) मोबदल्याच्या दिवशी माझी चुक माफ करील  ," (पवित्र कुराण ,पारा नं.१९ ,सुरहा नं.२६ ,अल-अशुराह आ.नं.७८,७९,८०,८१,८२).

     #" तोच सृष्टीचा निर्माता ,रब (पालनकर्ता) आहे  , तोच एक मात्र कृपावंत ,आणि दयावंत आहे ." (  पारा नं.१ सुरह नं.१  अल -फातिहा आ.नं.१,२)

     #" तोच चिरंतरजीवी असून ,तमाम सृष्टीचा भार त्यानेच सांभाळलेला आहे , पृथ्वी व आकाशाचा स्वामी (रब) तोच आहे " ( सु..नं.२ आ.नं.२५९).

     # "  समस्त सृष्टीचा स्वामी ( रब) तोच आहे , प्रतिष्ठा प्राप्त करणारा ही तोच (रब) आहे व अपमानित करणारा ही तोच आहे  " ( सु.नं.३ आ.नं.२६-२७)

     # "  आकाशातील चंद्र सुर्य तारे सर्व काही त्याचेच आहे ,तोच जी्न व मृत्यू देणारा आहे "( सु. नं.१०, आ.नं.५५-५६).

       #"  पृथ्वी व आकाशातील गुप्त सत्यांचे ज्ञान फक्त त्यालाच आहे ,तो सर्व ज्ञानी आहे ,तो सर्व काही करु शकतो "( सु. नं. १६,आ.नं. ७७)

     #" सृष्टीच्या प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा तोच आहे ". (सु.नं.२०,आ.नं.५०).

      #" मागिल व पुढील सर्व समई तोच आहे , चिरंजीवी व चिरस्थानी तोच आहे ." ( सु. नं. २० आ.नं.११०-१११).

         -- " तोच सर्वोत्तम उपजिविका देणारा आहै , सर्वत्र आहे ." ( सु. नं. २२ आ.नं.५८ व ६६).

     #" तोच असण्याला नष्ट करतो , सत्याला खरे करून दाखवतो , लोकांची निराशा झाल्यानंतर ही पाउस पाडतो " ( सु.नं..४२ आ.नं.२४ व ३१).

   #" तोच जबरदस्त व बुद्धीमान आहे , तोच आद्य ही आहेत व  अंतिम ही तोच राहाणार आहे  , तोच प्रकट ही आहे व तोच अप्रकटही , व. तोच मनातील रहस्ये ही जाणणारा ,"( सु.नं.५७ आ.नं.१ ते ६).

    #"तोच वाली व दाता आहे , तोच मृतांना जिवंत करणारा (कयामतच्या दिवशी) आहेत ." (सु. नं.४२ आ.नं.९).

      #" कोणीही त्याचा पुत्र नाही व त्याच्या बादशहीत कोणीही त्याचा भागिदार नाही ." ( सु. नं.१७ आ.नं.१११).

       # " तोच क्षमा करणारा ही आहे व कठोरातील कठोर शिक्षा देणारा ही तोच आहे ." ( सु. नं.१३ आ.नं.६)

       # " तरी ही तो - निरपेक्ष आहे , कोणीही त्याची संतती नाही व तो ही कुणाची संतती नाही ." पारा नं ३० सु.नं ११२ सुरह -ईखलास आ.नं.१ ते ४).

   

आपण  सृष्टी वर तारकीक लक्ष दिले तर , निश्चितच आपण आश्चर्यचकित होत असतो , सृष्टीतील प्रत्येक कण न कण , चंद्र सुर्य ,तारे ,प्रत्येक घटना आपल्याला आश्चर्य चकीत , चमत्कारिक, अदभुत करुन सोडतात . सृष्टीच्या निर्मितीचा व सृष्टी चा सुनियोजित आराखडा ,रचना ,  पद्धती, त्यांची प्रत्येक वेळेस ची अचुकता , आप-आपल्या वेळी , त्यामधे मिली सेकंदाचा ही फरक नाही ,एवढी अचुकता , चंद्र सुर्य तारे पृथ्वी यांच्या मधे एक मिली सेंकदाचाही फरक न होता आपल्या वेळेनुसार रूतूचक्र  फिरत आहेत .येवढं अदभुत चमत्कार आज विज्ञानाच्या युगात सुद्धा आपण आश्चर्यचकीत होऊन पहात असतो. एवढ्या जगात , एवढ्या मोठ्या जनसंख्येला वेळेवर तीन वेळा पोटात अन्न , व समुद्रात जवळपास १८००० आठरा हाजार जिवजंतु आहेत ( कुरआन च्या नुसार) फक्त समुद्रात ..त्यामधे एकटा व्हेल मासा फक्त कितीतरी टन ,टन एका वेळेस खातो .. फक्त एक व्हेल मासा .असे  कोटींनी जिवजंतु जिवंत पृथ्वीवर आहेत . त्यामध्ये प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळे ,  नखरे वेगवेगळे हे सर्व सिस्टिम बघून माणूस हैरान होत असतो ..पण सृष्टीच्या प्रत्येक जिवजंतु , प्राणी मात्रा , प्रत्येक आणु व रेणू ,ची साचेबद्ध रचना बनवली आहे , प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध , साचेबद्ध , काम करीत आहे, प्रत्येकाला आप -अपलं अस्तित्व -ओळख देऊन जन्माला घातलं  आहे., सृष्टीत चराचरात चैतन्य भरलेले पाहायला मिळते , प्रत्येक जिवाला एक आपलं वैयक्तिक पातळीवर वैशिष्ट्य बाहल केलेलं आहे . 

सृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू जन्मापासून मृत्यूपर्यंत एक साचेबद्ध नियमितपणे नियमबद्ध जीवन जगत आहे , हे कोणीतरी चाललंय हे लक्षात घेतलं तर .

आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला तो जन्माला येण्याआधी त्याला उपाशी पोटी राहु नाही म्हणून येण्याआधीच दुधाची सोय पुर्ण करुन ठेवतो .किती अद्भूत आहे हे सर्व विचार केला तर.त्या बाळाला थोडं थोडं  मोठं करतो आई बाबा , समाजाच्या प्रत्येक घटकांकडून काही तरी शिकायला देतो.

जमीनीतुन एक दाणा पेरणी केल्यानंतर त्या दाण्याचे रूपांतर असंख्य संख्येने करून ते धान्य , प्रत्येक दाण्यांची विल्हेवाट लाउन , प्रत्येकाला त्याच्या भुकेच्या वेळेनुसार पोटात घालतो .किती अद्भुत आहे ना ? विचार केला तर आश्चर्य करण्याशिवाय पर्याय नाहीच नाही. 

ज्याच्या त्याच्या कर्तृत्वानुसार , कर्मानुसार तो मोठा होत जातो , ५०,६०,७०,८०-१०० जगून जग सोडून जातात , सृष्टीच्या प्रत्येक कणा - कणाला मग काही ही आसो त्याला मरण हे निश्चित  ,सत्य आहे ( कुल्यु नफसून जायकतुल मौत ), मृत्युनंतर तो कयामतच्या दिवशी जीवंत सुद्धा करणार आहे , तुम्ही या जगात केलेल्या चांगल्या- वाईट कामांचं हिशोब घेण्यासाठी..हे जीवन चक्र आहे.

           हे सर्व फक्त  अदृश्य अल्लाहा च चालवत असतो. .!!.

अल्लाहा बद्दल काही ही व्याख्या करताच येणार नाहीत , .

                       पवित्र कुरआन पारा न. १५ मधे  ,"हे पैगंबर (स्व.) सांगा की,जर सात ही समुद्र हे  माझ्या पालनकर्तयाच्या गोष्टी लिहिण्यासाठी शाई (लिहीण्याची) बनला तर ,तो समुद्राची शाई संपेल , परंतु ,पालणकरत्याच्या गोष्टी संपणार नाही, इतकेच नव्हे तर पुन्हा तितकीच शाई आम्ही आणली तरी देखिल पुरेशी ठरणार नाही ," (सुराहा अल - कहफ आ..नं.१०९) ..!!!.

लेखक -  डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा जनरल हॉस्पिटल

श्रीरामपूर ९२७१६४००१४

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात विनापरवाना शस्त्रे घेवून फिरत असलेल्या एक़ास गुन्हे अन्वेषण नगरच्या पोलीस पथकाने सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्याचेकडून एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू.कि.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे जप्त केले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रविंद्र घुंगासे. रोहित येमुल, मेघराज कोल्हे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे या अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बीफ मार्केट, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला.त्यानंतर काही वेळातच एक संशयीत इसम बीफ मार्केट परिसरात फिरतांना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू.कि.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली असून ते जप्त करण्यात आले आहे. त्याचे नाव अंजर इलीयाज शहा वय 22, रा. बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं. 2, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र तुकाराम धुगांसे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 268/2022, नुसार अंजर इलीयाज शहा याचेविरुध्द भादंवि कलम आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

कर्जत प्रतिनिधी -स्वस्तात सोने देतो म्हणून एका दरोडेखोराने सात पुरुष व दोन महिलांच्या मदतीने खेडनजीकच्या आखोणी परिसरात बोलावून जेजुरीच्या तिघांना जबर मारहाण करत केली. सोन्याची चैन, एक मोबाईल व एक लाखाची रक्कम असा एकूण १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल बळजबरीने लुटल्याचा प्रकार नुकताच घडला होता. कर्जत पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न करत तिघांना जेरबंद केले आहे.शेखर वसंत माने (रा. जेजुरी, रेल्वे स्टेशन ता.पुरंदर जि. पुणे) असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे तीन वर्षांपुर्वी खुनाच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असताना तिथे भाऊ बेल्या काळे याच्याशी ओळख झाली होती. तुरुंगात दोघेही वर्षभर एकत्र राहिले होते. त्यानंतर फिर्यादी हे तुरुंगातुन सुटून घरी आले होते. तीन आठवड्यापुर्वी भाऊ काळे याने फिर्यादीला फोन करून तुरुंगातील ओळख सांगून 'माझ्याकडे सोने आहे, तुला स्वस्तात सोने देतो' असे सांगितले.त्यावर वेळ भेटल्यावर येतो असे फिर्यादीने सांगुनही तो पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादीस वारंवार फोन करत होता. त्यावर ५ पाच ते सहा दिवसांपुर्वी फिर्यादी (टाकळी ता. करमाळा) येथे आले असता भाऊ बेल्या काळे व त्यासोबत अन्य दोन महिलांनी दोन चैनमधील गंठन दाखवले. ते सोने असल्याची फिर्यादीने खात्री केली. त्यावर 'दोन लाख घेऊन या, तुम्हाला सोने देतो' असे संभाषण झाल्यावर फिर्यादी तेथून गावी निघून आले. दि.२५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता भाऊ बेल्या काळे याने फोन करून 'तुम्ही येणार आहे का? असे विचारले. त्यावर फिर्यादीने सांगतो असे म्हणत एक लाख रुपयांची जमवाजमव केली.त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे मित्र ओंकार जाधव, रामभाऊ झगडे असे तिघे फिर्यादीच्या मारुती अल्टो गाडीतून (एमएच ०५ एएस ७७३४) सकाळी ११ वाजता निघाले. त्यावेळी फिर्यादीने आपल्या मित्रांना स्वस्तातील सोने घेण्यासाठी चाललो असल्याची माहिती दिली होती. दरम्यान भाऊ काळे याने कोठे आले?आणखी किती वेळ लागेल?अशी वेळोवेळी विचारणा केली. त्यानंतर फिर्यादी बारामती- भिगवण- खेड नजीकचा भीमा नदी पुल ओलांडून खेड व आखोणी शिवारात खराब डांबरी रस्त्याच्या ठिकाणी दुपारी २ च्या सुमारास आले. त्या ठिकाणी भाऊ बेल्या काळे उभा होता व त्याच्याबरोबर पायजमा-शर्ट घातलेला आणखी एकजण होता.त्यानंतर त्यांनी गाडीपासून बाजूला येण्यास सांगितले असता सर्वजण बाजुला गेले त्यावेळी भाऊ बेल्या काळे याचे सहा जोडीदार व दोन महिला तीन मोटारसायकलवरून आले. त्यांनी फिर्यादी व मित्रांवर दगड मारायला सुरुवात करून लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. त्यातील एकाने बळजबरीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन काढली. फिर्यादीचा मित्र रामभाऊ झगडे याच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढला. काहींनी गाडीची उचकापाचक केली व त्यातील एक लाखाची रक्कम काढून घेऊन मोटारसायकलवर निघून गेले.याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जत पोलिसांनी आरोपी अभिमान दागिन्या काळे, रा. इंदिरानगर, राशीन, ता. कर्जत, अविनाश उर्फ लल्या बेळया काळे, रा. जवळा, ता. जामखेड आणि आणखी एक असे तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींची ही नावे निष्पन्न केली आहेत. या गुन्ह्यातील आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि पुणे जिल्ह्यातील लोणीकाळभोर, लोणीकंद, रांजणगाव या पोलीस ठाण्यात चोरी, दरोडा, घरफोडी, दरोड्याची तयारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, अनंत सालगुडे, पोलीस जवान भाऊसाहेब काळे, अंकुश ढवळे, शाम जाधव, अर्जुन पोकळे, संपत शिंदे, गोवर्धन कदम, सुनील खैरे, मारुती काळे आदींनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने बेलापुर बु।। ग्रामपंचायतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातील सुमारे १५००० पुस्तकांचे प्रदर्शन अनोखी पर्वणी ठरल्याने या पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन ग्रंथालयाचे नियमित वाचक रंगनाथ देवकर, मच्छिंद्र पुंड तसेच सेवानिवृत्त ग्रंथपाल रमेश खरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की,महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीनिमित्त पुस्तक प्रदर्शन आयोजित केले असून डॉ.आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा,संघर्ष करा या मंत्रा प्रमाणे नवीन पिढी घडावी हा या पुस्तक प्रदर्शना मागील हेतु आहे.उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की,

ग्रामपंचायतीच्या वाचनालयात २०००० पुस्तके असून यात बाल साहित्य,नाटक,कविता संग्रह,प्रवास वर्णने,धार्मिक, स्पर्धा परीक्षा अश्या एकूण १० विभागांची पुस्तके उपलब्ध आहेत. यातील १५००० पुस्तकांचे आज प्रदर्शन आयोजित केले आहे यातून वाचन संस्कृतीचे जतन होऊन नवीन वाचक वर्ग निर्माण होण्यास मदत होईल. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,पत्रकार देविदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.पत्रकार विष्णुपंत डावरे यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली.यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे,मारुती राशिनकर,प्रकाश नवले,किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,किशोर खरोटे,नानासाहेब जोंधळे,जनार्धन ओहोळ,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख, रमेश अमोलिक,पत्रकार देविदास देसाई,विष्णुपंत डावरे,दिलीप दायमा,ज्ञानेश गवले,किशोर कदम,कासम शेख,रुपेश सिकची,प्रकाश कु-हे,रफिक शेख,अकबर सय्यद, रत्नेश गुलदगड,नितीन नवले,सुधीर तेलोरे,तान्हाजी शेलार,जिना शेख,सुधिर तेलोरे,विशाल आंबेकर, गोपी दाणी,अजीज शेख,रोनाल्ड अमोलिक,सुभाष कु-हे,रमेश शेलार,जलील जनाब,जलील शेख,सचिन कडेकर,बाळासाहेब शेलार,महेश ओहोळ आदी उपस्थित होते.प्रदर्शन यशस्वीतेसाठी ग्रंथपाल उज्वला मिटकर-साळुंके,सोपान हिरवे,सुभाष राशिनकर,मधुकर गायकवाड, बाबासाहेब प्रधान,शिला पुंड,निर्मला गाढे,सचिन नगरकर,सचिन साळुंके,रविंद्र मेहेत्रे,विजय खरोटे,अमोल साळवे,अविनाश शेलार,गौरव वाडिया,राजेश गोहेल आदींनी परिश्रम घेतले.पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थी, महिला,जेष्ठ नागरिक,तरुण आदींसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्रीरामपूर मनसेच्या वतीने श्री साई विठ्ठल  अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व अन्नधान्य वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

दोन वर्षानंतर प्रथमच डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सहात साजरी करण्याचा योग आला मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  या वर्षी आगळ्या वेगळ्या पध्दतीने जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला महामानवाची जयंतीही त्याच पध्दतीने गोरगरीब अनाथ मुलात जावुन साजरी करण्याचा निर्णय घेतला मनसेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवुन त्यांनी सुभाषवाडी येथील कृष्णानंद महाराज चालवत असलेला श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम गाठला तेथील मुलांना अन्नधान्य व शालेय साहीत्य वाटप करण्यात आले  त्याप्रसंगी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की अठरा ते वीस वर्षापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीचे शिका संघटित व्हा मग आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करा हा कानमंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येक जयंतीला विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे काम आम्ही करत असतो परंतु यावर्षी बेलापुर  येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम येथे कृष्णानंद महाराजांनी अनाथ आश्रम चालू करून 25 ते 30 विद्यार्थ्यांचे पालन पोषण करत असल्याचे समजल्याने  अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी व खाण्यापिण्याची साठी  अन्नधान्याची गरज असल्याने आम्ही यावर्षी या आश्रमातील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके कंपास व इतर  शालेय साहित्य व तसेच दात स्वच्छ घासण्यासाठी टूप पेस्ट ब्रश व गहू तांदूळ ज्वारी  इत्यादी अन्नधान्य खाद्य पदार्थ देण्यात आले यापुढे या आश्रमासाठी वेळोवेळी मदत करत राहू जेणेकरून अनाथाश्रमातील मुले शिकून पुढे काहीतरी मोठे अधिकारी व्हावेत जेणेकरून इतर अनाथ मुलांना यांची प्रेरणा मिळेल की रस्त्यावर भीक न मागता कुठल्यातरी अनाथ आश्रम मध्ये शिकून भविष्यात कुठल्यातरी शासकीय अधिकारी किंवा मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करावे किंवा स्वतःचे व्यवसाय चालू करावे येणारी तरुण पिढी वाया जाऊ नये यासाठी आश्रमासाठी यापुढे जी काही मदत लागेल ती सर्व मदत करत राहू 

असे आश्वासन याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे दिले याप्रसंगी संतोष डाहाळे  उपाध्यक्ष, बाबा रोकडे तालुकाध्यक्ष, निलेश लांबोळे, शहराध्यक्ष, आश्रमाचे अध्यक्ष कृष्णा महाराज, उपाध्यक्ष प्रकाश  मेहेत्रे,विशाल शिरसाट विद्यार्थी सेना जिल्हा सचिव, विकी राऊत विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, संतोष भालेराव प्रवीण कारले, दीपक सोनवणे, दीपक लांडे, समर्थ सोनार, अतुल खरात, विकी शिंदे, विशाल लोंढे, विशाल त्रिभुवन,राजू शिंदे, अमोल साबणे, संदीप विशंभर, किशोर वाडीले, रोहित जवंजाळ, महेश कोलते, चेतन दिवटे, मंगेश जाधव, किशोर बनसोडे सुमित गोसावी विकी परदेशी,लखन शिंदे ज्ञानेश्वर काळे सोमनाथ गुंजाळ  ऋषिकेश सानप किशोर अमोलिक भास्कर मंदार भाऊसाहेब फटांगरे रतन वर्मा अभिमन्यू धर्म जिज्ञासू किरण राऊत सुधाकर पाटील आकाश आदिक दीपक जगताप

आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget