Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायतीच्या स्थापनेस शंभर वर्ष पुर्ण होत असुन सर्वांच्या सहकार्याने शतक महोत्सवी वर्ष साजरे करताना गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला मानस असल्याचे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले .  बेलापुर कुऱ्हे वस्ती रोडवरील पाटील मळा कुऱ्हे वस्ती कापसे वस्ती या रस्त्याच्या १२ लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुऱ्हे सुरेश कुऱ्हे मा.उपसभापती दत्ता कुऱ्हे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख रमेश अमोलीक सौ  प्रियंका कुऱ्हे आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की एक कोटी रुपयांचा घनकचरा प्रकल्प मंजुर करण्यात आला असुन गाव व वाड्यावस्त्यावरील पिण्याच्या पाण्याकरीता १२ कोटी निधी मंजुर करण्यात आला असुन जागेअभावी ही योजना दुसऱ्या टप्प्यात गेली आहे .स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. कुऱ्हे वस्तीवरील या रस्त्याच्या कामास १२ लाख रुपये गायकवाड वस्ती ते सुभाषवाडी या रस्त्याच्या कमास १५ लाख रुपये तर सुभाषवाडी ते ऐनतपुर या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे जाँगींग ट्रँकसाठी ५० लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे मागासवर्गीयासाठी  पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ ची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही ते म्हणाले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनीही मनोगत व्यक्त केले . या वेळी विलास कुऱ्हे, संजय गोरे, पत्रकार देविदास देसाई ,दिलीप दायमा, भाऊसाहेब कुताळ ,भास्कर बंगाळ, शरद देशपांडे, गोरक्षनाथ कुऱ्हे,  मधुकर अनाप, गोविंद शिरसाठ ,अजिज शेख, सुभाष कुऱ्हे, शशिकांत कापसे, सोमनाथ शिरसाठ ,महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, आमोल गाढे ,अमोल पाडांगळे, सौ कांता साळूंके, सौ मिरा नीर्मळ, सौस्वाती कुऱ्हे, वैशाली कुऱ्हे, कोमल कुऱ्हे, पुष्पा कुऱ्हे, अश्विनी कुऱ्हे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यातील उंबरी बाळापूर येथील सौ सुनीता संपत शिंदे यांनी बनविलेला "जिंदगानी "हा मराठी चित्रपट दिनांक ११ फेब्रुवारी पासुन सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचित                                  उडत्या पाखरांना परतीची सिमा नसावी,  नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्यांच काय केव्हाही बाांधता येईल,क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी..असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या सौ.सुनिता संपत शिंदे एम.ए,बी.एड,पीएच.डी रा.उांबरी बाळापूर,ता.संगमनेर,जिल्हा अहमदनगर यांनी कठोर परिश्रम घेवुन जिंदगानी या चित्रपटाची निर्मिती केली आहे त्यांचे पती पोलीस दलात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्या म्हणतात की   मानवाने एकदा  ध्येय ठरवल की तो ते साध्य करतोच.कारण ध्येयाकडे गुरूत्वाकर्षणाची शक्ती आहे.ध्येय वेडी व्यक्ती त्या शक्तीकडे नकळत पणे ओढली जाते... असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे .मी त्यांच्या विचाराने प्रभावीत झाले एकदा आपण ध्येय ठरविले की त्याला प्रयत्नाची जोड दिल्यास यशापासून आपल्याला कुणीही दुर ठेवू शकत नाही जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्या करीता हवी फक्त जिद्द आणी चिकाटी .म्हणजे तुम्ही हव्या त्या सर्व गोष्टी मिळवू शकता. म्हणतात ना एका यशस्वी पुरूषा मागे एक स्री असते,पण माझ्या बाबतीत  याच्या उलटेच घडले,जसे महात्मा ज्योतीबा फुलेंनी आपली पत्नी सावीत्रीला घडविले तसेच माझ्या बाबतीतही मला माझ्या पतीने जे पोलीस दलात सेवा करत आहेत त्यांनी  भक्कम साथ दिली.माझ्या कामाचे सर्व श्रेय मी त्यांनाच देते.त्यांनी साथ दिली नसती तर मी आहे तीच राहीले असते.मला लहानपणापासून चित्रपट  संगीत याची आवड होती . पी एच.डी पुर्ण केल्यानंतर नातेवाईक  म्हणायचे तु नोकरी का करत नाही.परांतू माझ्यावरील असलेली कुटुंबाची जबाबदारी माझ्या पती असलेली नोकरी त्यामुळे असे वाटायचे की मी जर नोकरी केली तर कुटुंबाला न्याय देवु शकणार नाही म्हणून मी नोकरी ऐवजी काहीतरी व्यवसाय करावा यादृष्टीने विचार सुरु केला यामधे बरेच दिवस ब्युटीपार्लर केले.त्यानांतर एस.टी.महामंडळात पार्सल सुविधेचे काम केले  .शेतीमधे अनेक नवनवीन प्रयोग करीत असतानी फळबागा लावल्या.त्यातुन चांगले उत्पनही मिळाले .पण तरीही मन सतत नवीन करण्याकडे असायचे काहीतरी मोठा व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यात कोणता व्यवसाय करावा. लहानपणा पासून सिनेमाची आवड होतीच आणी त्यातच  आमचे कौटुंबिक मित्र  विनायकजी साळवे हे कधी कधी आमच्या घरी येत असत .आल्यानांतर गप्पा करत असताने  ते सतत त्यांनी लिहीलेल्या कथा सांगायचे  

या कथांवर सिनेमा करायचा आहे पण कुणी प्रोड्यूसर मिळत नाही.असेही ते म्हणायचे ते कथा सांगायचे त्यावेळी त्यांची एक कथा फार आवडायची त्या कथेमधील निसर्ग  आणी मानव यांच असलेल नात मनाला स्पर्शून जात असे.   मग मी माझ्या  पतीला सांगीतले मला की मला सिनेमा काढावयाचा आहे त्यावर ते म्हणाले की  हे आपले काम नाही ही चित्रपट नगरी फार वेगळी आहे  तुला जमेल का पण तो पर्यंत माझ्या मनाने पक्का निश्चय  केलेला होता ,मी हे करू शकते आपण हा प्रोजेक्ट करू या. त्यांनी हो सांगीतल्यावर खर्‍या कामाला सुरूवात झाली.सुरूवातीला कथेसाठी लागणारी कलाकार मांडळी   शोधण्यासाठी जाहीरात दिली  नंतर सर्व कलाकारांची निवड केली  कथेच्या मागणी नुसार आम्हाला प्रमुख भुमिकेसाठी लागणारा चेहरा मिळत नव्हता शेवटी माझ्या मुलीची स्क्रिन टेस्ट घेण्यात आली.त्यात ती योग्य वाटली.तीला लहानपणा पासून  अँस्क्टांग व डान्सची आवड आहे. एम.एस्सीचा अभ्यास तसेच यू.पी.एस.सी ची चालू असलेली  तयारी यामुळे काय कराव काय नाही अशा दिधा मनस्धथतीत शेवटी मुलीने होकार दिला मग शुटींगसाठी योग्य ठिकाणांचा शोध सुरु झाला  नाशिक मधील त्रिंबकेश्वर येथील निसर्गरम्य वातावरणात शुटींगला सुरुवात झाली ,शुटींग दरम्यान अनेक अडचणी आल्या त्या सोडवत गेलो काही कठीण प्रसंगाचाही सामना केला .अन जिंदगांनी हा चित्रपट तयार झाला आज तो आपल्या भेटीला येत आहे पर्यावरण व मानव यातील  नाते काय असते ते या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आपल्या परिवारासमवेत पहावा असा हा चित्रपट असुन आपल्या लाडक्या नगरच्या कन्येचा हा पहीलाच चित्रपट आहे.   आपल्या भेटीला हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.आपणा सवाांना नम्र दवनांती आहे की आपण कुटुंबासह हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊनचां बघावा.असे आवाहनही सौ सुनिता शिंदे यांनी केले आहे.

श्रीरामपूर : शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,शेळके हॉस्पिटल, साईबाबा मंदिर वार्ड नंबर ६ परिसरात, एक युवक विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने. यासंदर्भातील माहितीची खतीरजमा करून, कारवाईचे आदेश दिल्याने ,शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गोतम लगड,रमिजराजा आत्तार,गौरव दुर्गुळे आदींच्या पथकाने,८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी साडे १२ वाजेच्या सुमारास, मिळालेल्या माहितीतील वर्णनाशी मिळत असलेला, एक इसम संशयास्पद रित्या फिरत असतांना. कारवाईस गेलेल्या पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेतले असता. त्याने आपले नाव दिपक बबन जाधव राहणार, शेळके हॉस्पिटल मागे असे सांगितले असून. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता. सदरच्या २१ वर्षीय युवकाच्या कमरेला लावलेला ,एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकूण २० हजार ५०० रुपये किमतीचे मुद्देमाल पोलिसांनी आरोपीसह  ताब्यात घेतला असून. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, सपोनि जिवन बोरसे, पोना पंकज गोसावी,पोना बिरप्पा करमल, पोको राहुल नरवडे, पोकॉ गीतम लगड, पोकॉ रमिज़ आत्तार, पोकॉ/ल गौरव दुर्गुळे, पोकों महेश पवार आदींनी केली.


श्रीरामपूर प्रतिनिधी - नुकत्याच झालेल्या कर्नाटक या ठिकाणी हिजाब बंदी व त्या ठिकाणी झालेली काही समाजकंटकांकडून निंदनीय घटना याचा श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले यावेळी अहमद भाई जागीरदार, हाजी मुजफ्फर शेख, हाजी अंजुम मुसा शेख, मुनीर इमाम पठाण, मुक्तार शाह, शकूर भाई, असलम बिनसाद , साजिद मिर्झा, रियाज खान पठाण, गफार शाह, जफर शाह हे उपस्थित होते निवेदनात म्हणण्यात आले होते हिजाब हा कायद्याने दिलेला प्रत्येक नागरिकास मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकाराचा वापर करून त्या पद्धतीने राहणे कपडे परिधान करणे म्हणजे काही गुन्हा होत नाही म्हणून सर्व मुस्लिम समाज सदर घटनेचा निषेध करून मुस्लिम समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन देण्यात आले. 


श्रीरामपूर शहरातील कर्मवीर चौक येथील जय हिंद करिअर अकॅडमी चे संचालक सुयोग सस्कर यांचे पुतणे चिरंजीव शौर्य अण्णासाहेब सस्कर या सहा वर्षाच्या मुलाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2022 साठी नोंद झालेली आहे. शौर्य दोन वर्षाचा असल्यापासूनच जनरल नॉलेज ची संपूर्ण गोष्टी व्यवस्थित पणे  लक्षात ठेवतो व जसेकी प्रश्न  भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या, भारता शेजारील देश, तसेच विज्ञानातील पिरॉडिक टेबल व विज्ञानातील शोध याची संपूर्णपणे अचूक माहिती सांगतो. सुरवातीला या गोष्टी शिकवण्यासाठी त्याची आई अमृता सस्कर तसेच आजोबा विठ्ठल सस्कर व घरातील इतर सदस्यांबरोबर आत्या,मामा यांचे योगदान मोलाचे ठरते.आज अमृत जवान सन्मान या तहसील कार्यालयातील आजी-माजी सैनिकांच्या अभियानाच्या निमित्ताने शौर्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी त्याने काही क्षणात सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे मान्यवरांना अचंबित करणारी ठरली. जमलेल्या सर्वच मान्यवरांनी शौर्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत शेवटी शौर्य ने ही आय ए एस होण्याचे  सांगितले. शौर्य सध्या महाले पोतदार शाळेमध्ये सिनियर के जी मध्ये शिकत आहे. त्याच बरोबर जय हिंद मध्ये प्रशिक्षण घेतलेले माजी सैनिक मेजर सचिन सत्रे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. प्रसंगी आमदार लहू कानडे साहेब ,सचिन गुजर ,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे माननीय न्यायाधीश नांदगावकर साहेब ,दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर माननीय न्यायाधीश कासट साहेब ,श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम ,प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, नगरपालिकेचे सी ओ गणेश शिंदे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय  सानप ,तालुका पोलिस स्टेशनचे पीआय खाडे ,श्रीरामपूर पंचायत समितीचे बी डी ओ तलाठी राजेश घोरपडे सैनिक संघाचे मेजर सरदार, मेजर शन्खेश पांडव,विट्ठलराव सस्कर, मेजर उंडे , सुनिल गवळी,तांबे,भालेराव, तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक जय हिंद चे संचालक सुयोग सस्कर ,अजय बत्तीसे, बाळासाहेब वाणी, कृष्णा वाघ त्याचबरोबर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

नाशिक प्रतिनिधी- जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग  क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंत्याने विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ  यांच्या अडवलेल्या फाइली जिल्हा परिषदेसह कार्यकारी अभियंत्यांच्या अंगलट आलेल्या असतानाच, आता जिल्ह्यातील चार आमदारांनीही कार्यकारी अभियंत्याविरोधात लेखी तक्रारी दिल्या आहेत  . त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान, कार्यकारी अभियंत्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांनी मंत्रालयात बुधवारी (दि.9) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला कार्यकारी अभियंत्यांनाही बोलविण्यात आले आहे.मागील दोन-तीन आठवड्यांपासून बांधकाम विभाग एकच्या कार्यकारी अभियंत्यांच्या व्हीआयपी संस्कृती विरोधात सदस्य, पदाधिकार्‍यांसह ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. कार्यकारी अभियंता भेटत नाही, कार्यालयात येत नाही, फाइली काढत नाही, पंचायत समितीत बसून कामकाज करतात, सदस्यांसह लोकप्रतिनिधींचे मोबाइल घेत नाहीत, अशा तक्रारी अभियंत्याविरोधात सुरू होत्या. यातच एक ठेकेदार अन् विभाग एकचे कार्यकारी अभियंता यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद थेट विभागीय आयुक्तांपर्यंत पोहचला होता.यातच विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील फाइलीही कार्यकारी अभियंता यांनी अडवल्या. या फाइली काढण्यासाठी स्वतः झिरवाळ यांनी कार्यकारी अभियंता यांना सूचना केल्या. मात्र, त्यांच्या आदेशालाही त्यांनी केराची टोपली दाखवल्याने विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांनी थेट मंत्रालयात या कार्यकारी अभियंत्यांविरोधात तक्रार केली होती.अशा तक्रारी असतानाच जिल्ह्यातील चार आमदारांनीही कार्यकारी अभियंत्यांविरोधात लेखी तक्रारी केल्याचे असल्याचे समजते. कार्यकारी अभियंत्यांच्या कामकाजाविरोधात या तक्रारी असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रालयात बोलविलेल्या बैठकीवरून अडचणीत सापडलेले कार्यकारी अभियंता अजुनच अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


कर्जत प्रतिनिधी-शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची  चोरी करून ते भंगारात विकणाऱ्यांविरुद्ध कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगार व्यावसायिकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी, कर्जत तालुक्यातील राशीन येथील साईराज मोटार रिवायडिंग या दुकानाच्या मागील उघड्या असलेल्या गोडाऊनमधून वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या पाणबुड्या व इलेक्ट्रिक मोटारी दोन विधीसंघर्षित बालक आणि अजय आप्पा पानसरे, वय- १९ (सर्व रा. राशीन ) व आदींनी चोरल्या. नंतर त्या इबारत मुस्तकीम शेख, वय -३० ( रा.भिगवण ता. इंदापुर) या भंगार व्यावसायिकास विक्री केल्या.याबाबत राहुल आबासाहेब जांभळकर वय-३० वर्षे (रा. जांभळकरवस्ती, राशिन) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात कलम ३७९, ४११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अजय आप्पा पानसरे व इबारत मुस्तकीम शेख या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजार किमतीचे कृषी पंप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भगवान शिरसाठ, सहाय्यक फौजदार तुळशीदास सातपुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल मारुती काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, भाऊसाहेब काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे आदींच्या पथकाने केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget